मानवता धर्म पेरण्याचे काम संतानी केले — डॉ.रंगनाथ पठारे
पुणे – संत जनाबाई या स्त्री साहित्याच्या प्रवर्तक होत्या एवढेच नाही तर जागतिक स्त्रीवादाचा पाया संत जनाबाई यांनी घातला असे मत जेष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले .
पुढे ते म्हणाले की ,संत नामदेव आणि संत जनाबाई यांनी कीर्तन परंपरेला शिखरावर नेले . संत जनाबाई या मातंग समाजाच्या होत्या त्यांचे तत्वज्ञान हे चैतन्यवादी होते तसेच त्यांना स्त्री जन्माचा सार्थक अभिमान होता असे परखड मत सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले .धनंजय होनमाने लिखित संत जनाबाई शोध आणि तत्त्वचिंतन या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला त्यावेळी ते बोलत होते
मानवता धर्म पेरण्याचे काम संतांनी केले .महाराष्ट्राची भूमी समतेने ठेवण्याचे कार्य संताचे आहे .तसेच लोकप्रबोधनाचे अत्यंत व्यापक कार्य संतानी केले त्यामध्ये संत जनाबाई यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा.डॉ.रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले .
धनंजय होनमाने यांनी संत जनाबाई यांच्या चरित्राचा योग्य शोध घेतला आहे संत जनाबाई या मातंग समाजाच्या होत्या त्यांच्या या संशोधनाने जनाबाई यांच्या अभंगाचा आणि कार्याचा बोध घेणे अधिक महत्पूर्ण ठरणार आहे .जनाबाई यांनी त्यावेळी समाजव्यवस्थेचा त्रास सहन केला तरीही त्यांनी धाडसाने उभे राहून समाज प्रबोधनाचे काम केले हाच खरा विद्रोह जनाबाई यांनी अभंगातून व्यक्त केला .असे मत जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी व्यक्त केले .
ह.भ.प.प्रा.डॉ.सुहास फडतरे आपल्या मनोगतात म्हणाले की ,भारतीय समाजव्यवस्थेने स्त्रियांवर अन्याय झाला .बुद्ध आणि महावीर यांनी स्त्रियांना पहिल्यांदा न्याय दिला .आम्हा सापडले वर्म कडू भागवत धर्म तसेच भागवत धर्म एकच धर्म मानतो तो म्हणे मानवता धर्म होय असे ते म्हणाले .
संत जनाबाई यांच्या ओव्या सर्वसामान्य महिलांनी जात्यावर गाइल्या तसेच त्या गावागावात पोहोचल्या तशा अर्थाने त्या ग्रामीण भागात अधिक लोकप्रिय होत्या असे मत जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.आशालता कांबळे यांनी व्यक्त केले .
या प्रकाशन समारंभास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रंगनाथ पठारे , संत जनाबाई शोध आणि तत्त्वचिंतन या ग्रंथाचे लेखक प्रा. धनंजय व्हनमाने, जेष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. विश्वनाथ शिंदे,ह.भ.प दिनकरशास्त्री भुकेले ,ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे,डॉ. आशालता कांबळे ,माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे ,माजी मंत्री रमेश बागवे ,माजी सभागृह नेते सुभाष जगताप ,समस्त वारकरी फडकरी दिंडी समाजचे उपाध्यक्ष विष्णु कबीर,शब्दालय प्रकाशन च्या सुमती लांडे ,माजी नगरसेवक अविनाश बागवे,अॅड. एकनाथ जावीर तसेच या प्रकाशन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शरदभाऊ लाड (चेअरमन, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सह. साखर लि., कुंडल) होते.तर या कार्यक्रमाचे आयोजन शब्दावली प्रकाशन व संत जनाबाई संस्थान गंगाखेड यांनी केले होते .या कार्यक्रमास वारकरी संप्रदाय तसेच विविध सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

