पुराचा धोका टाळण्यासाठी औंधमध्ये नाला, ओढ्यालगत सीमा भिंत
पुणे : पावसाळ्यात पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी औंध मधील कचरा, रॅम्प परिसरातील नाला आणि ओढ्यालगत सीमा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी दिली.
येत्या पावसाळ्यात पुणे शहर पूरमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पुण्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी छत्रपती शिवाजीनगर मतदार संघासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून हे काम हाती घेतले आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या महत्त्वाच्या कामामुळे पावसाळ्यात होणारी पाण्याची समस्या, पूरस्थिती आणि यातून नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. प्रशासनाच्या समन्वयातून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा निर्धार आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी औंधमधील नाला आणि ओढा यांची पहाणी केली. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना ताई छाजेड, नगरसेविका भक्तीताई गायकवाड, मंडल अध्यक्ष आनंद छाजेड, लताताई धायगुडे, गणेश कलापुरे, अभिजीत गायकवाड, वसंता जुनवणे, चोंदे, सागर मदने, सागर परदेशी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

