रिपाइं शिष्टमंडळाने दिला जिल्हाधिकारी यांना निवेदन
पुणे : प्रतिनिधी
संविधान बनविण्यास डॉ. बाबासाहेबांच्या पेक्षा पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे योगदान जास्त आहे. डॉ. बाबासाहेबांनी केवळ संविधानाचे लेखन करण्याचे काम केले आहे. असे वादग्रस्त वक्तव्य सुधिंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. असे वक्तव्य डॉ. बाबासाहेबांचा अवमान करणारे व संविधानाचे महत्व कमी करण्याचा हेतु आहे. डॉ. बाबासाहेबांचा अवमान असुन ,जातीयवादी कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहरांच्या वतीने रिपाइं पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय गेट समोर घोषणाबाजी करीत जाहिर निषेध करण्यात आला. सुधिंद्र कुलकर्णी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी करत पुणे जिल्हाधिकारी यांना रिपाइं शिष्टमंडळाने निवेदन दिले.
महिलां व कार्यकर्त्यांनी सुधिंद्र कुलकर्णी यांच्या पोस्टरला चपलानी मारत प्रतिमेस आग लावून निषेध केला.
बंडगार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांची ही शिष्टमंडाळाने भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले,
मोर्चात रिपाइं महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी शहर अध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे, रिपाइं प्रदेश सचिव यशवंत नडगम, मंदार जोशी,विरेन साठे,माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशीकला वाघमारे, पश्चिम युवक कार्याध्यक्ष निलेश आल्हाट,बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, आप्पासाहेब वाडेकर,संतोष खरात, हडपसर अध्यक्ष महादेव दंदी, विनोद टोपे, अविनाश कदम, चिंतामण जगताप, मिना गालटे, उज्वला सर्वगोड, सुनिता वाघमारे, छाया लोंढे, मिनाज मेमन, चांदणी गायकवाड, प्रमोद कदम, अविनाश गायकवाड, तानाजी तापकीरे, खंडू शिंदे, गणेश जगताप, शशिकांत मोरे, राजेश गाढे, तिरुपती मेडिबोयांना, सुशील सर्वगोड, उमेश कांबळे, आकाश बाहुले, बाळासाहेब जगताप, सुनीता वाघमारे, उद्धव चिलवंत, निलेश रोकडे, मलखेसिंग दुधाणी,सुरज जाधव सह रिपाइं कार्यकर्ते , महिला उपस्थित होते.