…तर अजित पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा-रामदास तडस यांची मागणी

Date:

मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विरोधात आंदोलन

राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, भ्रष्टाचाराची चौकशी यासाठी संदीप भोंडवे यांचे उपोषण

पुणे: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराबाबत अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अजित पवार यांना संघटनेच्या कामात लक्ष देण्यासाठी वेळ नसेल, तर त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी केली. संघटनेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर राज्यभरातील २५ ते ३० क्रीडा संघटना व खेळाडू आक्रमक झाले असून, मंगळवारी रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली बंडगार्डन पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. कुस्ती, कबड्डी, तायक्वांदो, बॉक्सिंग, हँडबॉल, स्विमिंग, कुराश अशा विविध २५ ते ३० संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारप्राप्त खेळाडू या निषेध आंदोलनात सहभागी झाले. नामदेव शिरगावकर यांनी तीन नॅशनल गेम्समध्ये केलेला भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत सर्व संलग्न ५० राज्य क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी हिंदकेसरी पै. योगेश दोडके, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, सल्लाउद्दीन अन्सारी, संदीप गाडे, तात्या भिंताडे आदी उपस्थित होते. 

रामदास तडस म्हणाले, “संघटनेला ५० खेळांच्या संघटनांना मान्यता असतानाही केवळ २२ संघटना मतदानासाठी पात्र ठरवणे, हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. नामदेव शिरगावकर यांची ही मुजोरी आणि भ्रष्ट कारभार खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ आहे. खेळाडूंच्या कल्याणासाठी आमचे हे आंदोलन आहे. ‘नामदेव हटाव’ ही एकच सर्वांची मागणी आहे. त्यासाठी संदीप भोंडवे उपोषणाला बसले आहेत. यासह आम्ही या दोन्ही गोष्टींवर हरकती नोंदवल्या असून, २५ तारखेपर्यंत याचा निकाल लागला नाही, तर २७ तारखेपासून माझ्यासह अन्य खेळाडू व पदाधिकारी महाराष्ट्रभर आमरण उपोषणाला बसतील.”

“गुजरात, गोवा, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्य शासनाने १२ कोटी रुपये दिले. मात्र, त्याचा हिशोब अद्यापही दिलेला नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंना मागे खेचण्याचे काम संघटनेकडून सुरु आहे. अजित पवार केवळ नावापुरते पदावर आहेत की काय, अशी शंका आम्हाला येत आहे. माझ्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. पवार यांना संघटनेच्या कार्यात लक्ष घालायला वेळ नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आहे.”

उपोषणाला बसल्यानंतर संदीप भोंडवे म्हणाले, “खेळासाठी वेळ देऊ शकणारे, खेळाडूंचा विचार करणारे लोक संघटनेत येण्यासाठी सर्व संघटनांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. नामदेव शिरगावकर यांच्यासारखे भ्रष्ट लोक संघटनेतून बाहेर काढण्यासाठी हा आमचा लढा आहे. भ्रष्टाचाराची चौकशी, सर्वाना मतदानाचा अधिकार आणि नामदेव शिरगावकर यांना हटवत नाही, तोवर माझे उपोषण सुरु राहणार आहे. खेळाडूंच्या नावावर स्वतःच्या व कुटुंबियांच्या नावाने कंपन्या काढून शिरगावकर यांनी मोठ्या प्रमाणात पैसे लाटले आहेत.”

यावेळी आंदोलनात सहभागी खेळाडूंचे रौद्र रूप पाहायला मिळाले. संघटनेच्या भोंगळ कारभारामुळे खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही आम्हाला योग्य संधी मिळत नसल्याची खदखद खेळाडूंनी व्यक्त केली. कुस्ती, तायक्वांदो खेळांची प्रात्यक्षिके करून हलगीच्या निनादात झालेल्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...