Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चांगल्या समाज निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची-कृष्णकुमार गोयल

Date:

पुणे : “आपल्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या समाजाप्रती कृतज्ञतेची भावना ठेवत चांगले काम करत राहायला हवे. त्या कामाची समाज दखल घेतो. चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी बंधुतेची शिकवण मोलाची आहे. बंधुतेच्या याच विचाराला जीवन समर्पित करत समाजाला एकसंध ठेवण्याचे कार्य बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात बंधुतेचा विचार समाजाला योग्य दिशा देऊ शकेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्य महोत्सवी (२५ वे) राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी गोयल बोलत होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गुरुनानक सेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा, संमेलनाध्यक्ष कवयित्री मधुश्री ओव्हाळ, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, डॉ. विजय ताम्हाणे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. शंकर आथरे आदी उपस्थित होते.
गेल्या चार दशकांपासून समर्पित भावनेने बंधुतेचा विचार पेरणाऱ्या बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना गोयल व मोखा यांच्या हस्ते सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्काराने, तर रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींना बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “बंधुताचार्य प्रकाश रोकडे सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक असे काम करत आहेत. सम्यक सत्यार्थी जीवनगौरव पुरस्कार हा त्याचे संचित आहे. एखादा सकारात्मक विचार मनात आला, की तेवढ्याच तीव्रतेने तो साध्य करण्यासाठी प्रयत्न केले की यश नक्कीच मिळते. सामाजिक स्थिरतेसाठी बंधुतेची चळवळ कायम राहावी.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेच्या वाटेवर अनेकांना सोबत घेऊन प्रमाणिकपणे केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. या प्रवासात अनेकांची साथ मिळाली. आईने बंधुतेचा संस्कार दिला. त्यामुळे तो अधिक व्यापकतेने मनात भिनला. पैशामागे धावण्यापेक्षा विचारांच्या मागे धावत राहिलो आणि जीवन समृद्ध करत गेलो. जीवनातील प्रत्येक संघर्षावर बंधुता हाच उपाय आहे.”
संतसिंग मोखा, डॉ. विजय ताम्हाणे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी विचार मांडले. प्रा. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता झिंजुर्के यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंदी सक्तीच्या मुद्यावर अखेर सरकारची माघार:हिंदी अनिवार्य भाषा नाही, राज्य सरकारने दिली स्थगिती

'अनिवार्य' या शब्दाला स्थगिती मुंबई- महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून वातावरण...

येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत मलेरियाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी झाली हि  कंपनी सज्ज…

केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत कार्यप्रणाली स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या भागांतून मलेरिया, डेंग्यू हद्दपार करण्यासाठी कंपनीचे धोरण मुंबई, २२ एप्रिल २०२५ – दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन काही दिवसांवर येऊन ठेपला असताना युपीएल एसएएस कंपनीने मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरि प्रयत्न करित असल्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने केंद्र सरकारच्या आरोग्याविषयक धोरणांतून तसेच उपाययोजनांतून डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर आळा घालण्यासाठी तत्परता दर्शवली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखडा आणि राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन धोरणात्मक योजना यांसारख्या सर्वसमावेशक धोरणांना पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत देशातून मलेरियाची एकही केस सापडता कामा नये, हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. युपीएल एसएएस कंपनी देशभरातील महानगरपालिकांच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. मलेरियाच्या केसेसवर नियंत्रण यावे म्हणून कंपनीने शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्रकल्प राबवण्यावर भर दिला आहे. गुजरात येथील उदवाडा गावात डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी क्लीन एण्ड ग्रीन चॅरिटेबल ट्रस्टसोबत कंपनीने डासांच्या उत्पत्तीची उगमस्थाने नष्ट करण्याचा प्रकल्प हाती घेतला. तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसह विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीरित्या अंमलात आणले गेले. गुजरात आणि तेलंगणा राज्यातील डासांमुळे होणारया आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने अथक परिश्रम घेतले. दोन्ही प्रकल्पांमध्ये डासांची उत्त्पत्ती आणि संबंधित आजार कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या दोन यशस्वी प्रकल्पानंतर युपीएल एसएएस कंपनीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुजरात, तेलंगणा या राज्यांसह कंपनी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसबोत मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही राज्यांसोबत नव्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यास कंपनीला शहरी आणि ग्रामीण भागांत राहणा-या लोकांचे जीवनमान सुधारण्यास अधिक प्रखरतेने योगदान देता येईल. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचे कंपनीचे मूळ उद्दिष्ट सफल होईल. कंपनीच्या वाढत्या कार्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष डोभाल यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘ आम्ही सुरु केलेली सार्वजनिक आरोग्य मोहिम ही व्यापक क्षेत्रात सुरु आहे. ही मोहिम केवळ शेतीपुरतीच मर्यादित नसून, आम्ही विविध समूहांचा उद्धार आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासही कटिबद्ध आहोत. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोऱणांना पाठिंबा देणे, सर्व भारतीयांसाठी निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली निर्माण करणे हे आमचे उद्देश आहे. म्हणूनच आम्ही डास नियंत्रणासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणली आहे. या उपाययोजनांमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान सुधारेल. या बदलांसाठी स्थानिक प्रशासन आणि समुदायांचे सहकार्य गरजेचे आहे. तरच आपल्याला ख-या अर्थाने मलेरिया आणि डेंग्यूमुक्त भारताच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करता येईल.’’ या नवनव्या उपक्रमांबद्दल तसेच कंपनीच्या विस्तारीत कार्याबद्दल कंपनीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचे प्रमुख श्री. सुब्रतो पल यांनी माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ डासांची उगमस्थाने आणि अळ्या नष्ट करणे आणि डासांच्या उत्त्पत्तीवर नियंत्रण ठेवणे हेच कंपनीचे मुख्य धोरण आहे. या धोरणाशी आमच्या भागदारकांनीही सहमती दर्शवली आहे. म्हणूनच आम्ही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच डासांच्या उत्त्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देतो. युपीएल एसएएस डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाटी हरित रसायनाचा वापर करणार आहे. हे रसायन देशात पहिल्यांदाच वापरले जाईल. डासांच्या उत्त्पत्तीला नष्ट करणारे हे अनोखे हरित रसायन जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असून, या रसायनाच्या वापराने मानवी आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही. या रसायनाच्या वापराने पिण्याचे पाणीही सुरक्षित राहते. तलाव, विहिरी, वाहत्या पाण्याचा जलस्त्रोत, टाक्या, घर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात हे रसायन वापरता येईल. डासांची संख्या नियंत्रणात आल्यास डेंग्यू आणि मलेरियामुळे पसरणा-या आजारांची संख्याही आपोआप आटोक्यात येईल. या आजारांचा प्रसार रोखणे हेच कंपनीचे उद्दिष्ट आहे.’’ युपीएल एसएएसद्वारे डासांची उगमस्थाने असलेल्या जागांवर थंड धुरी देणारी यंत्रे वापरली जातात. धुरी देणारी यंत्रे वापरताना वायू प्रदूषण होणार नाही अशा रितीने डिझाईन केली आहेत. ही यंत्रे हाताळायला सोप्पी आहेत, शिवाय या यंत्रांसाठी ऊर्जाही कमी लागते. हे उपाय जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोगवाहक नियंत्रण कार्यक्रम या दोन्हींद्वारे मंजूर केलेल्या सूत्रीकरणावर आधारलेले आहेत. या उपाययोजनांमुळे जलपरिसंस्था, मनुष्य आणि प्राणीही सुरक्षित राहतात. या सर्व उपाययोजना युपीएल एसएएसच्या पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या व्यापक धोरणाला अधोरेखित करतात. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे आता मनुष्याला निरोगी आणि सुरक्षित परिसंस्थेत आरामदायी जीवन जगता येणे शक्य आहे.