मुंबई-वय झाल्यानंतर थांबायचे असते,पण काही जण ऐकत नाही, 84 वय झाले तरी काहीजण निवृत्त होत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. बापाला रिटायर करायच नसते..बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बापाला रिटायर करायचे नसते. बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो. बाप कुटुंबातील ऊर्जा स्रोत आहे.
प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोष ओढावून घेतला. त्यातच आता आव्हाड यांनी We Are Back असे सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू केले आहे. मात्र, संघर्ष प्रेजेन्ट्स माध्यमातून ठाणे फेस्टिव्हल 2024 असे ही म्हटले आहे. संघर्ष ही Jitendra Awhad यांची ओळख असून ती एक त्यांची सामाजिक संस्थाही आहे. त्यातच आव्हाडांनी We Are Back म्हटल्याने नेमके हा कार्यक्रम कधी असणार आहे. त्यामध्ये ते श्रीराम हे मांसाहारी असल्याचे पुरावे तर घेऊन येणार नाही ना?. तर ठाणे फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी असल्याने यामध्ये यावेळी ‘गीतरामायण’ हा संगीतमय कार्यक्रम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांचे वक्तव्य काय?
सरकारी नोकरीत 58व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत 60व्या वर्षी निवृत्ती होते. राजकारणातही निवृत्तीला काही ठरावितक वय आहे. मात्र, काही जण 84 वर्ष वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणाजेच ठाण्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर वयावरून पुन्हा एकदा शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. वय 84 झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. वय झाले की थांबायचे असते पण काही जण अती करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

