शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेबाबत फसव्या घोषणा करत आहेत. गॅंरंटी-गॅरंटी म्हणजे मोदींची आहे तरी काय? 400 जागांवर भाजपचा विजय होईल, असे सांगितले जाते. पण देशातील परिस्थिती वेगळी आहे. विशेषतः महाराष्ट्रातील राज्यकर्ते मराठा समाजाला खोटी आश्वासन देत आहेत, त्यांची फसवणूक करत आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला.
ते शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अर्थव्यवस्थेबाबत खोटी आश्वासनं
शरद पवार म्हणाले की, मोदींनी आश्वासन दिले, या देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींच्या पुढे नेऊ. पण परिस्थिती वेगळी आहे. या देशाचा शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले. शेतींवर माणसांची संख्या वाढली. 70 ते 80 टक्के लोक शेतीवर होते. पण आता लोकसंख्या वाढली आहे. दुसरीकडे विकासासाठी शेतीची जमीन काढून घेणे. त्यावेळी जमीनेचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त झाली आहे. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या पाहिजे, अशी मागणी केली जाते. पण त्यासाठी केंद्रसरकार पुढाकार घेत नाही. त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
निर्यातीवर निर्बंध लादली जाताहेत
महाराष्ट्र साखर निर्मितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर निर्यात झाली पाहिजे, पण निर्यात करायला सरकार निर्बंध वाढला आहे. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संख्या दुपटीने वाढली आहे. ही बाब चिंताग्रस्त बनली आहे. दिवसेंदिवस देशात बेरोजगारीचा प्रश्न वाढतोय. महागाईचा प्रश्न मोठा झालेला आहे. गॅंस देशातली तरुण पिढी अस्वस्थ झाली आहे, असे शरद पवार म्हणाले.
मराठा समाजाची फसवणूक होतेय
मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करताना अन्य ओबीसीच्या घटकातील लोकांवर अन्याय नको, अशी मागणी आहे. दरम्यान, ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिलं. माझी जरांगेंशी भेट झाली. राज्यसरकारने लिखीत स्वरुपामध्ये मंजूर केली. पण ती सरकार आता पूर्ण करत नाही. त्यामुळे तरुण मुलांना आपली फसवणूक झाली असे वाटायला लागली आहे.
त्याचे कारण म्हणजे, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, मराठा आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहो असे म्हणतात. तर दुसरीकडे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात एक वर्ष अजून मराठा समाजाला वाट पाहावी लागेल, असे म्हणतात. म्हणजेच सरळसरळ फसवणूक केली. तसेच 8 ते 9 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आश्वासन दिले होते. ते आरक्षणाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेली नाही.
पाच कलमी कार्यक्रम, देशाची
आरएसएसची विचारधारा अंगीकारली जात आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रम हातात घेतले आहे. सर्व क्षेत्रात खाजगीकरण, नफेखोरी, न्यायव्यवस्था, निवडणूक आय़ोग, ईडी, सीबीआय स्वायत्त संस्था ताब्यात ठेवणे. मनूवादी विचार, आक्रमक राष्ट्रवाद पाच कलमी कार्यक्रम आखला जातोय.
राष्ट्रपतींना सन्मान किती?
मणिपूरची घटना शर्मेने मान खालावी लागते. देशाचे राष्ट्रपती बघिणी आहे. त्या महिला भगीनींचा सन्मान किती वेळा करतात. त्याचे उदाहरण म्हणजे नवीन व जुन्या पार्लमेंट उद्घाटन सोहळ्यातील घटना, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातील.
आंबेडकरांचा विषय मांडणार
सत्तेचा गैरवापर केला जातोय. मोदींना सत्तेपासून हटवणे, ही भूमिका प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांना इंडियात घेण्यासाठी येणा्ऱ्या बैठकीत मुद्दा मांडणार आहे. मोदींना हटविण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी देखील एकत्र काम करणे गरजेचे आहे, असे आव्हान शरद पवार यांनी केले.
भाजप 400 जागी कशी जिंकणार?
भाजपच्या हातात सत्ता आहे. शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीने सुरू आहे. सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही, अथवा बळकट नाही. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. तरी देखील 450 जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर सांगत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

