रोहित पवार म्हणाले,’ विरोधकांच्या सापळ्यात अडकू नका , देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ..
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी केलेल्या आपल्या एका वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केला आहे. मी श्रीरामांविषयी ओघात बोललो. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात, पण आमचा राम आमच्या मनातच आहे, असे ते म्हणालेत.
मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात पण आमचा राम आमच्या हृदयात आहे, असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणे माझे काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. त्यातील अयोध्ये कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नंतर एक 1891 चं डॉक्युमेंट प बंगालमध्ये पब्लिश झाले आहे. आताचे नाही. मी ते वाचून दाखवणार नाही, ज्यांना वाचायचे आहे त्यांना मी कॉपी देतो. मला भारतातील अनेक आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी पेपर्स पाठवले. त्या त्या काळात कसे ट्रान्सलेशन केले गेले. वाल्मिकी रामायणात जे लिहिले असेल त्यामध्ये कोणाचा आक्षेप आहे का, त्यावर बोलावे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अन्नपूर्णी नावाचा पिक्चर आला आहे. 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी पाठांतर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलेही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो, आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे. त्यावर मी म्हणेन, माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.
आमदार रोहित पवार यांनीही जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिला आहे. देव आणि धर्माचे कुणीही राजकारण करू नये. अशा राज्यकर्त्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले,’आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!