दिनांक ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस आहे. १८३१ साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांनतर मुलींचे पहिली शाळा पुण्यामध्ये १८४८ सालाच्या सुमाराला सुरू झाली. यावेळी सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत काम करण्याबरोबरच अनेक सामाजिक कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी समाजामध्ये मुलींच्यावरती अन्याय करणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. यामध्ये बालविवाह, लग्नानंतर मुलींना टाकून देणे,मुलगीचा जन्म झाला तर मुलीच्या आई वर व मुली ना विविध मार्गाने त्रास दिला जायचा. अशा अनेक गोष्टींच्या विरोधामध्ये फुले दांपत्याने लक्ष घातले. त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच्या मार्फत अनेक समाजातील रूढी व परंपरा यांना विरोध केला. यासाठी समाज प्रबोधन स्वतःच्या कृतीतून सुरू केले. मुलींसाठी शाळा सुरू केल्यामुळे मुलींना शिक्षणासाठी अनेक दारे उघडी झाली. मुलींच्या शिक्षणाला जो विरोध होता तो दूर करण्याचे काम सुद्धा त्यांनी स्व:तच्या कृतीने केले. अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्त्री आधार केंद्र संस्थेची स्थापना दिनांक ३ जानेवारी १९८४ रोजी पुण्यामध्ये केली. तेव्हापासून आतापर्यंत ४० वर्ष आम्ही सातत्याने महिलांचे प्रश्नावर काम करतोय. यामध्ये मुलींचे शिक्षण प्रमाण वाढविणे, अत्याचारित मुलींना धीर देऊन त्यांचे पुनर्वसन करणे,त्यांच्या केसेस साठी कोर्टामध्ये मदत करणे हे काम स्त्री आधार केंद्र सातत्याने ४० वर्षे करत आहे. त्याचबरोबर विविध कायदे, शासकीय धोरण बदलने व नवीन महिला सबलीकरणासाठी आवश्यक कायदे करणे,समाजातील विविध संघटना मार्फत जनजागृती व शासकीय यंत्रणेला महिलांचे प्रश्नावरती अजून संवेदनशील करणे यावरती सुद्धा आम्ही काम करत आहोत.
स्त्री आधार केंद्राचे हे काम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांत पोहोचलेले आहे. विशेषतः पुणे, लातूर, धाराशिव, मुंबई, नाशिक, जळगाव, नागपूर,सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यां काम करत आहेत. आज स्त्री आधार केंद्राचा स्थापना दिवस पण आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने मी सावित्रीबाईना सगळ्यात प्रथम विनम्रपणें अभिवादन करते.
स्त्री आधार केंद्राचं जे सगळं काम चाललेले त्या कामाला अधिक चालना मिळण्यासाठी आपलं सहकार्य आम्हाला मिळत राहावे अशा प्रकारचे मी आवाहन करते. ०२०२४३९४१०३/०४ ह्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ११ ते सायं.०६ वाजेपर्यंत आमचे कार्यालय चालू असते. सोमवार ते शनिवार जरूर संपर्क करा आणि कार्यकर्त्या होऊन समाजाच्या विकासाचे काम करा असे मी आपल्याला शुभेच्छा देते. अनेकजणी या कामात सहकार्य करत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करते. आणि नवीन वर्षाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा ही देते…
डॉ.नीलम गोऱ्हे,
उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य, मुंबई.
मानद अध्यक्ष स्त्री आधार केंद्र, पुणे.