पुणे- आशिष भारत जाधव नावाचा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवड्याच्या कारागृहातून पळून गेला आहे, दहा वर्षे शिक्षा भोगल्याने आता त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते . कारागृहाचे तुरुंग अधिकारी हेमंत पाटील (वय ४३ ) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. आशिष जाधव याच्या विरुद्ध २००८ साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता त्याला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा २०१३ साली झाली होती . १० वर्षे शिक्षा भोगल्यावर आणि ताब्बेतीचे कारणाने त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते . बरॅक नंबर ४ मधून तो पळून गेला . पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे 8805179775 याप्रकरणी तपास करत आहेत .
खून ,खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील जन्मठेपेचा कैदी येरवडा कारागृहातून पळाला
Date:

