देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेसाठी कंबर कसली:फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेत करणार महाराष्ट्राचा दौरा
मुंबई- कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनुरावृत्ती होऊ नये अशा पद्धतीने उमेदवार द्यावा अशी मागणी आमच्या पर्यंत पोहोचली असून जरी पुणे लोकसभेसाठी महापलिकेत सत्ता असताना पदाधिकारी राहिलेल्या कोणी लोकसभेसाठी इच्छुक म्हणून फिल्डिंग लावलेली असली तरीही पक्ष रिपोर्ट कार्ड पाहूनच पुणे लोकसभेचा उमेदवार देताना निर्णय घेईल रिपोर्ट कार्ड पाहताना त्यांच्याबाबतच्या आक्षेपांचा देखील विचार करण्यात येईल.कसबा निवडणुकीत पराभव का पत्करावा लागला याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले असून त्याचा देखीलविचार करण्यात येईल असे येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रांकडे दिलेली माहिती समजते आहे.पुण्याचे माजी महापौर मोहोळ आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांचे भाऊ माजी आमदार मुळीक यांच्या उमेदवारी बाबत वरिष्ठ नेत्यांकडे शंका उपस्थित करण्यात आल्याचे वृत्त आहे यावर स्पष्टीकरण देताना नेत्यांनी हि माहिती दिल्याचे समजते आहे.दरम्यान आता मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही असं स्पष्ट सांगितल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्याच प्रचाराचा धडाका लावण्याचं निश्चित केलं आहे. याच निवडणुकीवर महाराष्ट्रातील विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार असून रोज 3 सभा घेत भाजपला चांगल्या जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असले तरी अजून त्यांचे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. मात्र, ते फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार आहेत, अशी माहिती समजत असून लवकरच या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर होणार अशी माहिती आहे. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्याचाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश नंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
राजकीय विश्नेषक यांच्या मते 2024 लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय होऊ शकतो. पण गेली काही दिवस सोशल मिडीयावर भाजपने 3 राज्यांत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू असून असे झाले तर भाजप नेते विनोद तावडेंसारख्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची लॉटरी लागण्याची चिन्हे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून हे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.