पुणे- पूर्वी पाणी व्यवस्थित येत होते ,पण मग आता दीड वर्षातच काय झाले.. पाउस तर कोसळतोय चांगला .. धरणे ओव्हरफुल्ल होताहेत मग पाणी मुरतंय कुठे ? सत्ताधारी असून भाजप ची होणारी मुस्कटदाबी आज ओसंडून बाहेर पडली . माजी आमदार योगेशटिळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांच्या समवेत होते . मनीषा कदम, राजाभाऊ कदम ,राणी भोसले, रायबा भोसले ,स्वतः टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका रंजना टिळेकर आणि शंभरावर कार्यकर्ते …आणि मग काय सुरु झाले ‘आंदोलन ‘
संशय: पाण्याचे राजकारण ,अधिकाऱ्यांना हाती धरून .. मरण मात्र जनतेचे …
खरे तर या पूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी दक्षिण पुण्याला रोज सकाळी ४ तासाचा पाणी पुरवठा नियमित होत होता . आणि टिळेकर यांच्या भागात म्हणजे पूर्वेकडील पुण्याला पाणी पुरेसे मिळत होते . दक्षिण पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात कशी झाली ? हे या सर्व आंदोलनातून स्पष्ट झाले. कोणाच्या भागाला सातत्याने पाणी , कोणाच्या नशिबी कधी येईल भरोसा नाही … हे सारे राजकारण ,महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही राजकीय लोकप्रतिनिधी स्वतःची राजकीय पोळी भाजायला तर करीत नाही ना ? असा संशय यावा अशी स्थिती . सर्वत्र समान पाणी पुरवठ्याचे न्यायालयात आश्वासन देणाऱ्या महापालिकेने वर्षानुवर्षे चालविलेला हा कारभार .. आज जनतेचा नाही बनला तरी राजकीय उद्रेक मात्र बनू पाहतो आहे .. या सर्व कार्यकर्त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहेच …पण प्रश्न आहे ..तो कायमचा सुटणार आहे काय ? हा महत्वाचा मुद्दा आहे.. पहा या राजकीय उद्रेकाची ..आंदोलनाची हि व्हिडीओ झलक