पुणे- वरुणराजाने मोठ्या संयमाने पुण्याच्या चारही धरणांना चौफेर वर्षाविहार करून जलमय करून टाकले असून पानशेत आणि खडकवासला हि दोन्ही धरणे १०० /१०० टक्के भरली आहेत तर वरसगाव ९०.१२ आणि टेमघर ७३.५८ टक्के भरले आहे .एकूण धरणातील पाणी साठा हा ९२.२९ टक्के झाला असून आता या सर्व पाण्याचे पुढील २०२१ च्या सप्टेंबर पर्यंतचे नियोजन करण्याचे काम जलसंपदा आणि पुणे महापालिकेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे . गेल्या वर्षी हि धो धो पाउस झाला होता आणि यावेळी सर्व धरणे १०० टक्के भरून ओसंडून वाहत होती ,पुराने पुण्याला हैराण केले होते . यंदा मोठ्या संयमाने वरुणराजाने पुण्यावर कृपादृष्टी दाखविली आहे आता प्रशासनाकडेच नियोजनाची जबाबदारी आहे .
पानशेत धरण खोऱ्यात पावसाच्या सरी पडत असल्याने पाटबंधारे विभागाने येथील विसर्ग दोन हजार क्यूसेकहून पाच हजार 248 क्यूसेकपर्यंत वाढविला. हे पाणी खडकवासला धरणात जमा होत असले तरी येथे पाऊस नसल्याने येथील विसर्ग नऊ हजार 416 क्यूसेकवर नियंत्रित आहे.
पानशेत धरणात 29 जुलै 2020 रोजी सर्वात कमी म्हणजे 4.31 टीएमसी म्हणजे 40.51 टक्के पाणी शिल्लक होते. हे धरण 17 ऑगस्ट रोजी 10. 65 टीएमसी पाणी जमा झाल्याने 100 टक्के भरले
. त्यादिवशी दोन हजार क्यूसेक ने विसर्ग आंबी नदीत सोडला. हा विसर्ग आज बुधवारी संध्याकाळी पाच वाजता चार हजार 648 क्यूसेक आणि वीजनिर्मिती साठी 600 क्यूसेक सोडले जात आहे. असे मिळून पानशेतमधून पाच हजार 248 क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे.
बुधवारी सायंकाळची स्थिती
धरणाचे नाव- धरणाचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये)/ आज अखेर जमा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये)/ टक्केवारी
खडकवासला- 1.97/ 1.97/ 100
पानशेत-10.65/10.65 /100
वरसगाव- 12.83 /11.55 /90.12
टेमघर- 3.71/2.71/ 73.58
चार धरणातील एकूण पाणीसाठा 26. 90 टीएमसी, 92. 29टक्के