पुणे- भारत बंद च्या आजच्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांनी आणलेला कामगाराचा पुतळा , शेतकऱ्यांच्या नांगराचे फाळ अशा प्रतीकृती आणल्या होत्या पण यातील कामगाराचापुताला पीएम नरेंद्र मोदी यांचाच आहे असे वाटल्याने पुण्याच्या पोलिसांनी तो जप्त करून गाडीत घालून ताब्यात घेतला यावरून आंदोलनासमयी पोलीस आणि आंदोलकांत थोडा तणाव निर्माण झाला होता. कामगारहितासाठी कामगार आणि शेतकऱ्याच्या प्रतिक म्हणून हे आंदोलनात शोभा वाढविण्यासाठी आणले गेले आहे असा दावा आंदोलकांचा होता, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी यावेळी मोबाईल वरून संपर्क साधला मात्र पोलिसांना तो पीएम मोदी यांचाच पुतळा भासल्याने त्यांनी जप्त केलेला पुतळा सोडला नाही . पोलीस यावर तणाव असल्याने काही बोलायला तयार नव्हते . कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी यावेळी शेतकरी बड्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधण्याचा डाव असल्याचा आरोप केला तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी थेट फत्तेचंद रांका यांचे नाव घेत … त्यांना आणि पुण्यातील ठराविक व्यापाऱ्यांना शेतकरी राजाचे महत्व सांगत सणसणीत इशारा देऊनच आपल्या भाषणाचा समारोप केला .. पहा व्हिडीओ झलक