पुणे-काल कॉंग्रेसची बैठक महापालिकेत झाली अन आज भाजपच्या खासदार गिरीश बापटांनी देखील महापालिकेत अधिकारी पदाधिकारी ,नगरसेवक यांची बैठक घेतली अन याची माहिती देताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महत्वपूर्ण विधान केले . ते म्हणाले ,’ भाजपमध्ये कोणी सुपेरीअर, एकटा दुकटा सुपर पॉवर नेता नाही . चंद्रकांत दादा शहराच्या प्रश्नांत लक्ष घालतात मी आता महापालिकेत २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना असेल अन्य योजना असतील त्यात लक्ष घालून दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, भाजपचे सरचिटणीस नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह आमदार व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट यांनी माहिती दिली.
एकट्या दुकट्याने कामे होत नाहीत, सर्वांना सोबत घेऊन कामे पुढे न्यावी लागतात. यापुढे मी महापालिकेच्या कामात लक्ष देणार असून भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणार आहोत. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण केले जाईल, या कामात अडथळे आणणाऱ्या कोणाची गय केली जाणार नाही, असा इशारा देत खासदार गिरीष बापट यांनी सूचक इशारा दिला आहे.
बापट म्हणाले, की महापालिका विविध विकास कामे करत आहे. काही सुरू काहींची गती कमी. कोरोना मुळे परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे, त्यामुळे कामांना गती मिळेल. यासाठी आज बैठक घेतली.यापुढील काळात शहरातील 4 – 5 प्रकल्पात मी अधिक लक्ष घालायचे ठरवले आहे. कचरा प्रश्न, स्मार्ट सिटी, नदिसुधार योजना या योजनांत प्रामुख्याने लक्ष देणार आहे. आज 24 तास पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. पुढील वर्षभरात सर्व आश्वासन किंबहुना जाहीरनामा पूर्ण करू. यासाठी केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू.
चोवीस तास पाणी पुरवठा योजनेवरील चर्चे दरम्यान टाक्या, केबल डकट, पाईप लाईनची कामे अशी चर्चा झाली. 82 ते 84 टाक्या पूर्ण करायच्या आहेत. वनखाते, खासगी जागा, व कायदेशीर अडचणीमुळे कामे रखडली आहेत. आतापर्यंत टाक्यांचे 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाईप लाईनचे 750 किमीचे काम होणे अपेक्षित होते. पण 300 की. मी. चेच काम झाले आहे. अरुंद रस्ते, व तांत्रिक अडचणीमुळे केवळ 17 टक्के काम होऊ शकले आहे. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. मीटर साठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. दिरंगाई झाली तर अपव्यय वाचवू शकणार नाही. 8 टक्के काम झाले आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
तर कोणाची गय केली जाणार नाही
‘पुणेकरांना दिलेली आश्वासने पुढील काही वर्षात पूर्ण करू. कोरोनामुळे ठप्प झालेल्या समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात येणार आहे. या योजनेतून 82 साठवण टाक्या बांधणार आहेत. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी 700 किलोमीटरचे काम अपेक्षित होते. परंतु 300 किलोमीटरचे कामच आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे.
पाण्याचे मीटरही बसविण्यात येत असून, सध्या फक्त 8 टक्के मीटरचे काम झाले आहे. परंतु या कामांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून संबंधित कंपन्याच्या ठेकेदारांना धमकाविणे, पैसे मागून अडथळे आणले जात असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. परंतु यामध्ये कोणीचीही गय केली जाणार नाही, मग तो लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो,’ असा सज्जड दम खा. बापट यावेळी भरला.