पुणे -फोन न घेणारे आयुक्त आणि पाणीपुरवठा प्रमुख यांच्याबद्दल वारज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून यामागे गेली ३ दिवस काही भागांना पाणीपुरवठा झालेला नसल्याचे कारण पुढे आले आहे .गेल्या १ डिसेंबर गुरुवार रोजी महापालिकेने पाणीपुरवठा बंद ठेवला होता तो २ डिसेंबर रोजी पूर्ववत होणे गरजेचे होते . मात्र आज ४ डिसेम्बर पर्यंत काही भागांना पाणीपुरवठा झालाच नाही त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे . धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आमची या प्रसासाकाने करून ठेवली आहे असा आरोप करत नागरिक पाणी दूर दूरवरून आणीत आहेत .
माजी विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी देखील या महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे, त्या म्हणाल्या , गेल्या १० नोव्हेंबरला देखील पाणीपुरवठा बंद ठेवला गेला होता त्यावेळी देखील ३ दिवस लोकांना पाण्यावाचून वंचित ठेवण्यात आले होते . महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कारभार संशायासाप्द असून त्यांच्याकडून पाण्यासाठी होणारा हा छळवाद च म्हणावा लागेल .सारखी सारखी पाणीपुरवठा खाते दुरुस्ती तरी कसली करते ज्याच्या नावाकाहाली पाणी पुरवठा बंद ठेवला जातोय ?असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
या भागातील कार्यकर्ते म्हणाले, अधिकाऱ्यांना निव्वळ टेंडर मध्ये रस आहे , टेंडरच्या उलाढाल्या कितीही करू द्यात आमचे काही म्हणणे नाही पण त्यासाठी लोकांचे पाणी वारंवार बंद करत असाल तर मात्र लोक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने धडा शिकवतील , लोक संतापलेत अधिकाऱ्यांनी अजूनही शहाणे व्हावे आणि पाण्यासाठी होत असलेला नागरी छळवाद थांबवून काय करायचे ते करावे अन्यथा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि त्याची जबाबदारी या महापालिकेच्या आयुक्त आणि पाणीपुरवठा प्रमुख यांच्यावरच असेल.