पुणे- सहा महिने होत आलेत कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असताना ,लुटारू वैद्यकीय व्यावसायिकांनी लुटमार सुरु ठेवली असताना , गोर गरिबांचे जीव जात असताना , शेकडो कुटुंबे उध्वस्त होत असताना ,शेकडो कोटी रुपयांच्या योजनांच्या गप्पा मारणाऱ्या मंत्री ,सत्ताधारी पदाधिकारी ,आणि रुबाबाने फिरणाऱ्या आय ए एस अधिकाऱ्यांनी अजूनही आपण ऍम्ब्युलन्स वेळेवर देऊ शकत नाही याची जबाबदारी गुमान स्वीकारून राजीनामे देऊन खरे तर घरी निघायला हवे अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केली आहे .
ते म्हणाले ,’ पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जी पणा आहे. कारण परवा सुद्धा जम्बो कोवीड सेंटरच्या बाहेर एक माणूस तडफडून उपचाराविना मृत्यू पावला होता… त्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका व राज्य सरकारची आहे. पुण्यात लोकांना बेड उपलब्ध होत नाहीत, ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला खाजगी हॉस्पिटल सामान्य लोकांना लाखो रुपयांना लुटत आहे हा ठरवून केलेला सांघिक भ्रष्टाचार आहे.महापालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे. महानगरपालिकेचे गोळ्या-औषधं साठी किती ‘टेंडर’ निघाले आणि त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णाला मिळाल्या का याचा तपास झाला पाहिजे.परवा जंबो कोविड सेंटरच्या बाहेर एक माणूस तडफडून मृत्यूमुखी पावला. आज तरुण पत्रकार करणाचा मुळे मृत्यू झाला याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुण्याच्या पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्यावा… व पुण्यातील मनपाचे निष्क्रिय आरोग्य प्रमुख यांची तत्काळ बदली करावीपत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार धरून पालकमंत्री, पुण्याचे खासदार, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.