पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील विविध विषयांवर झालेल्या वेळोवेळी च्या घुमजाव ची माहिती राजकीय क्षेत्रात सर्वांना आहेच ,पण कधी काळी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करणारी एनसीपी ची सांस्कृतिक आघाडी देखील आता वरीष्टांचे बोट धरून चालु लागली आहे, अगोदर विरोध असणाऱ्या आघाडीने होकार कसा दिला यावर सांस्कृतिक विभागाने दिलेले हे स्पष्टीकरण पहा …
वाचा त्यांच्याच शब्दात
पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असतानाच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या संदर्भात सगळ्यात पहिला विरोध व कलाकारांना घेऊन पहिलं आंदोलन हे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर केल होत,
पण त्या ठिकाणी पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याशी सर्व कलाकारांना घेऊन भेटून त्यावेळी चर्चा केल्याच्या नंतर त्यातले बारकावे त्यातील भव्यता तसेच पुनर्विकास विकास केल्यानंतर होणारा तिथल्या डेव्हलपमेंट एक भव्य अशी वास्तु उभी राहणार हे पाहिल्यानंतर आम्हीसुद्धा पुनर्विकासाला होकार दिला,
तसेच त्याच बरोबर बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या संदर्भात आमचा जसा काही गोष्टींमध्ये गैरसमज प्रशासनाच्या बाबतीत झाला होता, तसाच गैरसमज हा आता काही नवीन संघटनांना झाला असावा याबाबतीत आम्ही लवकरच सर्व पक्षाच्या आणि विविध संघटनेच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्ष यांना घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या बरोबर एक संयुक्तरित्या बैठक लवकरच आम्ही लावण्याचे ठरवीत आहोत, त्या बैठकीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या संदर्भात या सर्व संघटनांना एक चांगलं प्रेझेंटेशन दाखवण्यात येईल हे प्रेसेंटेशन पाहिल्यानंतर या सर्व राजकीय पक्षांच्या व विविध संघटनांच्या मनातील गैरसमज आम्ही दूर होईल
बाबासाहेब पाटील: प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग