पुणे : माजी मंत्री उदय सामंत यांच्यावरील हल्ला प्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे व नगरसेवक विशाल धनवडे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.न्यायालयाने काही अटी व शर्तीवर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद आहे. दोन दिवसांपूर्वी कात्रज चौकात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणात गुन्हा दाखल करत पोलीसांनी रात्रीत हिगोंली जिल्हा संपर्क प्रमुखासह सहा जणांना अटक केली होती. त्यांना ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, फरार आरोपींचा शोध घेतला जात होता.
यादरम्यान, माजी नगरसेवक विशाल धनवडे व जिल्हा प्रमुख गजानन थरकुडे यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. युक्तीवाद करताना ठोंबरे यांनी याप्रकरणात कोणतीही शहानिशा न करता चुकीची कलमे लावली व त्याचे गांभीर्य वाढवत राजकीय आकसापोटी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर खोटी व चुकीची कारवाईकरून गुन्ह्यात गुंतविले जात आहे. घटनास्थळी दोघेही नव्हते, असे सांगितले. न्यायालयाने दोघांचा ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद आहे. दोन दिवसांपूर्वी कात्रज चौकात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणात गुन्हा दाखल करत पोलीसांनी रात्रीत हिगोंली जिल्हा संपर्क प्रमुखासह सहा जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, फरार आरोपींचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, पुण्यातील हल्ल्यात शिवसैनिकांचा सहभाग नव्हता. शिवसनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. राज्यातदेखील विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची आज भेट घेऊन निवेदन दिले आहे.