पुणे-रुपी बँकेच्या विलीनीकरनाबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री अनुराग जी ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेऊन रिझर्व बँकेला तत्काळ विकिनिकरणाची शिफारस करण्याची विनंती केली. रुपी बँक ही 108 वर्षाची जुनी असून मागील चार वर्षे बँकेने समाधानकारक कामगिरी केलेली आहे. तसेच खर्चातही मोठ्या प्रमाणात काटकसर केली. बँकेच्या प्रगतीचा आलेख हा मागील चार वर्षात उंचावत आहे. बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न गेले सात वर्षे रिझर्व्ह बँकेकडे प्रलंबित असून बँकेचे गुंतवणूक आणि ठेवीदार यांचा आता सहनशक्तीचा कळस झाला आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान न होता तत्काळ निर्णय होणे अपेक्षित आहे. अशी या निवेदनाद्वारे रिझर्व्ह बँकेला शिफारस करण्याची विनंती केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना केली आहे.