पुणे- ख्यातनाम साहित्यिक यांच्या “अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हिंदी लेखक जितेंद्र भाटिया आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीपाल सबनीस ,मिलिंद जोशी ,अर्जुन डांगळे शिरीष सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत . कॉ. सुबोध मोरे , डॉ.संतोष खेडलेकर व सोपान खुडे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.अक्षरधारा बुक गैलरी, राजहंस प्रकाशन आणि विश्वास पाटील मित्र परिवार या कार्यक्रमाचे निमंत्रक असून कोरोना विषयक सर्व नियम अनुसरून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य व खुला आहे.
अण्णांचा काळ जागवणाऱ्या अनेकांची दुर्मिळ छायाचित्रे प्राप्त करण्याच्या कामी वाचकांच्या आशीर्वादाने मला बर्यापैकी यश आले आहे.असे सांगत मायमराठीच्या अस्तित्वासाठी रस्त्यावरची लढाई लढलेले जनामनाचे साहित्यिक अण्णाभाऊ. त्यांचे लेखन व जीवन, त्यांच्या एकूणच महान कर्तबगारीचा पुनर्विचार करायची वेळ आली आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने त्याची सुरुवात करु या असे या निमित्ताने कादंबरीकार विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.