अजित पवार शिवसेनेचे नेते शोभतात
पुणे-एकनाथ शिंदे जे बोलतात ते करतात. निवडणूक आयोगाचा काय आणि एमपीएससी चा काय शेवटी रिझल्टला महत्व आहे. मी आणि देवेंद्र फडणवीसही रिझल्ट देण्याचे काम करीत आहोत. आम्ही असे काही बोलत नाही, चुकीचे बोलत नाही की, चुकीच्या ठिकाणी जात नाही त्यामुळे कृष्णेच्या काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर आली नाही, ना कधी येणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर डोके ठेवायला कोण गेले होते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांना लगावला.
कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीच्या अनुशंगाने आयोजित प्रचारसभेत ते आज बोलत होते.एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार शिवसेनेचे नेते शोभत आहेत. ते आम्हाला सहा महिन्याचा हिशोब विचारता, तुम्ही सत्ता उपभोगली साठ वर्षे पु्ण्यात काय केले ते सांगा. आता आम्ही सरकारमध्ये आहोत. चिंता करू नका. काहींनी ऑनलाईन सभा घेतली आम्हाला वाटले सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील पण कुणीतरी कळवले असेल इकडे येऊन उपयोग नाही. आपला आमदार काही निवडून येणार नाही. हेमंत रासणे निवडून येणार असल्याने प्रवासाचा त्रास आणि कष्ट त्यांनी टाळले आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, शार्जिल उस्मानी पुणे येथे आला व आग ओकून गेला. काल पवारांच्या समोर काॅंग्रेसच्या उस्मानी हिरोदी यांनी मोदी, आरएसएस, भाजपला हरवण्यासाठी सौदीतून माणसे आणा आणि मतदान करून हरवा. मी म्हणतो मोदींना हरवणारे अजून कुणी नाहीत.
एकनाथ शिंदे म्हणाले, पीएम मोदींनी या देशाचे नाव, डंका जगभर वाजवला. पुणे ही पावनभूमी ते आपल्याला हरवण्याची भाषा करतात. भाजपने बेईमानी केली असे ते म्हणतात. ज्यांनी अडीच वर्षे भाजपला दगा दिला. राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार म्हणून तुम्हाला हेच सांगतो की, आमचे धनुष्यबाण आणि नाव चोरले मी त्यांना सांगतो की, तुम्ही काॅंग्रेस, राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण गहाण ठेवला होता. तो आम्ही सोडवला.