पुणे – फास्ट टॅग नाही चालणार , डेबिट, क्रेडीट कार्ड नाही चालणार ..डिजिटल इंडिया असू देत रे .. इथे नाही चालत ते .. ऑनलाईन .फॉनलाईन अशा निर्बंधांनी पर्यटकांना त्रस्त करत आणि प्रसंगी दादागिरी करत महाबळेश्वर मध्ये तीन, तीन वेळा टोळधाड पडत असल्याने पर्यटकांच्या वाहनांच्या रांगाच रांगा तास तास भर हलत नसल्याने मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणाहून येणारे पर्यटक वैतागले आहेत साहजिकच आता यामुळे महाबळेश्वरच्या हॉटेल व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे .एकीकडे पर्यटकांची गर्दी असूनही येथील व्यावसायिकांना मात्र सिझन मध्ये देखील ग्राहकांची प्रतीक्षाच यामुळे करावी लागण्याची चिन्हे आहेत .
याबाबत अधिक माहिती घेतली असता , महाबळेश्वर मध्ये वन विभाग ,नगर पालिका आणि ग्रामपंचायती हे तिघेही आपापल्या स्तरावर तोल ची आकारणी करत आहेत . टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणे असे नियम लागू करून ग्राहकांची गळचेपी सरकारनेच करून ठेवल्याने सर्व टोल वसुली साठी नेमलेले कर्मचारी बेफाम सुटले आहेत . आणि रोखीने टोल वसुलीसाठी आता जोर देऊ लागले आहेत . टोल ची संगणकीय नोंद सुद्धा अनेक ठिकाणी होताच नसल्याने पावत्या जपून ठेवणे क्रमप्राप्त होत आले आहे, अन्यथा पुढे अचानक होणार्या चौकशीच्या भरारीत पर्यटकांना डबल डबल टोलचा भुर्दंड पडतो आहे. टोल च्या वारंवार च्या आणि ठिकठीकाणी होणारी अडवणूक पर्यटकांच्या आनंदावर विरजण पाडत आहे . आणि आता पुढच्या वेळी महाबळेश्वर नकोच .. दुसरीकडे जाऊ असे म्हणून येथून निघात्ना दिसत आहेत .