पुणे-पुण्यात रंग रंगोटी चा उत्सव एकीकडे सुरु असताना एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याचा समाज माध्यामांवरून आरोप होत असताना , पंचतारांकित हॉटेलांतून होणारी हि परिषद म्हणजे अमीरोंकी शाम गरीबोंके नाम’ असा ही सूर उमटत असताना, सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते ,माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी हि परिषद नेमकी कुणासाठी आहे? टाय आणि सुट घालून येणारे लोक शहराचा विकास करणार असतील पण शहरात ७० टक्के जे गरीब लोक आहेत त्यांचे प्रतिनिधित्व येथे कुठे आहे ? असा जळजळीत सवाल केला आहे तर आज राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जी-२० परिषदेसाठी शहरातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले आहे असे सांगत त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जी -२० परिषद पुण्यात होत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, या परिषदेसाठी आजी- माजी खासदार, आमदार, माजी महापौरांना परिषदेतील चर्चा ऐकण्यासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते. शहराच्या विद्यमान खासदार गिरीश बापट यांनाही परिषदेचे निमंत्रण नाही, हे खेदजनक आहे, असे वंदना चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
वंदना चव्हाण म्हणाल्या की, जी-२० परिषदेसाठी शहर सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा अपव्यय महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
जी- २० परिषदेसाठी पुण्याला संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. परिषदेच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा होणार आहे. जी-२० परिषदेसाठीचे विषयही महत्त्वाचे आहेत. संसदेत यापूर्वी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्यात आली होती. मात्र पुण्यात होत असलेल्या परिषदेसाठी आजी-माजी खासदार, आमदार, माजी महापौर यांना डालवणे योग्य नाही. परिषदेसाठी व्यासपीठावर निमंत्रित करावे, अशी मागणी नाही. मात्र चर्चा ऐकण्याची संधी मिळण्यास काेणती अडचण होती, अशी विचारणा वंदना चव्हाण यांनी केली. पुण्याचे महापौर असताना महापालिकेच्या कार्यक्रमासाठी तेव्हा शहरातील सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करून सातत्याने बैठका घेतल्या होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मनपा आयुक्त हे भाजपाचे अपयश झाकत आहेत – जगताप
जगताप म्हणाले, जी -20 च्या निमित्ताने पुणे शहरात विविध देशाचे प्रतिनीधी येत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जी विकास कामे सुरू त्याबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु मागील सहा वर्षापूर्वी पासून भाजपला शहरात मतदारानी बहुमत दिले. मात्र , शहराच्या रंगरांगोटी करीता 50 कोटी रुपये दिले आहे. मात्र पुणे मनपाचे बजेट हे पाच वर्षाचे 40 हजार कोटी रुपये आहे. उद्यापासून आम्ही शहरात महिनाभर प्रतक्ष्य विविध ठिकाणी जाऊन चुकीच्या कामाची पोलखोल करणार आहे.
नादुरस्त ठिकाणी पडदे टाकून अपयश झाकण्यात आले आहे. मनपा आयुक्त हे भाजपाचे अपयश झाकत असून मागील महिन्याभरात युद्ध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुणे शहर हे आशिया मधील वेगाने विकसित होणारे शहर असून भाजपने 150 ते 200 कोटी रुपये वेगवेगळे टेंडर काढून शहर यानिमित्ताने सुशोभिकरण करण्यात आले आहे. पुणे विमानतळ परिसरात ही पाहुण्यांचे स्वागत करताना बेकार कामावर पांढरे पडदे टाकण्याची नामुष्की आलेली आहे. शहर विकसित करण्यात अपयश आल्याची ही कबुली आहे. शासनचा पैसा परिषदसाठी वापरला जात असून भाजपने त्यांची पक्षाची स्वतःची समिती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे.