पुणे- भाजपचे महाराष्ट्रामध्ये कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कोणत्याही हालचाली नाहीत.आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अतिशय उत्तम काम करत आहेत, आम्ही सगळेच त्यांच्या पाठीशी आहोत, हायकमांड ही त्यांच्या पाठीशी आहे, केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत, त्यांच्या भेटीगाठी घ्यायला दादा व अन्य पदाधिकारी दिल्लीला गेलेत.
कृपया कंड्या पिकवू नका, पतंगबाजी करू नका….
माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांची पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टॊक्ती