पुणे- नफेखोरीसाठी कोरोना महामारीच्या काळातही काही कंटक सरसावले असून रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करूनही पैसे कमविण्याचे कारस्थान होत आहे त्यामुळे तातडीने महाराष्ट्रातून या इंजेक्शनची निर्यात होणार नाही अशा पद्धतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी करणारे निवेदन महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
या पत्रात आबा बागुल यांनी असे म्हटले आहे कि ,’कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा बऱ्यापैकी उपयोग होत आहे. हे आता सिद्ध झाले आहे. मात्र त्याची उपलब्धता अतिशय दुर्मिळ झाली असून अनेक ठिकाणी हे उपलब्ध नाही असे सांगितले जाते. वास्तविक अधिक पैसे घेऊन त्याचा काळ बाजार करून हे केमिस्ट व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले जाते. याला पायबंद तर घातलाच पाहिजे. याच बरोबर आता महाराष्ट्र शासनाने याच्या किमतीवर नियंत्रण घातले. कमाल मर्यादा घातली त्यामुळे या कोरोना विषाणूच्या काळात वैयक्तिक स्वार्थापोटी फायदा घेण्यासाठी अनेक डीलर हे आता निर्यातीकडे वळाले आहेत. वास्तविक आपल्या महाराष्ट्रात याची फार मोठी गरज असताना हे परदेशी पाठवणे अत्यंत चुकीचे असून याला देखील पायबंद घातलाच पाहिजे आणि ते देखील परदेशी निर्यातीला महाराष्ट्रातून निर्यात होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच केंद्र सरकारने देखील देश व्यापी पातळीवर निर्यात होणार नाही. व ते देशातच उपलध होईल यासाठी तातडीने कार्यवाही केली पाहिजे. आपणांस विनंती की , आपण महाराष्ट्र पातळीवरती याच्या निर्यातीवर बंदी घालावी तसेच केंद सरकारने देखील बंदी घालावी यासाठी केंद सरकारला पत्र व्यवहार करून आवाहन करावे व विनंती करावी, अशी विनंती मी आपणांस करतो.