पुणे- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान कार्यालय टीकेचे लक्ष होत असताना आता भाजपा महाराष्ट्र च्या ट्वीट ने या प्रकरणात नवे वळण दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाषण करू दिले मात्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित असताना त्यांना मात्र भाषणास परवानगी पंतप्रधान कार्यालयाने नाकारली असा मतप्रवाह स्पष्ट झालेला असताना आता हा कार्यक्रमच सरकारी नव्हता तर खाजगी होता ,प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो खाजगी कार्यक्रमाला नसतो शिवाय पंतप्रधान यांनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली होती पण त्यांनीच नकार दिला असे ट्वीट भाजपा महाराष्ट्र च्या ट्वीटर अकाउंट वरून करण्यात आल्याने सर्व गोंधलाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे देहू देवस्थान कडे बोट दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जाऊ शकणार आहे.
केवळ एवढेच स्पष्टीकरण इथे केलेले नाही तर केवळ मोदी द्वेष म्हणून हि गरळ ओकली जाते आहे असाही आरोप करणारे ट्वीट भाजपाने केलेले आहे.
यावेळी व्यासपीठावरून देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी भाषण केले त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. त्यांच्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करण्यास उठले. त्यामुळे अजित पवार यांना भाषण करण्यास दिले नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते .आणि पुण्याचे राष्ट्रवादी चे नेते दीपक मानकर यांनीही नितीन महाराज मोरे यांच्याकडे याबाबत थेट विचारणा करून प्रोटोकॉल दाखवा अशी मागणी केली होती.
देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी तर भाषणाबाबत मलाही कोणतीच कल्पना नव्हती. भाषण कोण करणार कोण नाही हे सर्व दिल्लीतून आलेल्या प्रोटोकॉलनुसार ठरले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलनुसारच आपल्याला भाषण करायला मिळाले असे म्हटले होते पुन्हा एकदा ऐका .. दीपक मानकर आणि नितीन महाराज मोरे यांच्यात फोनवर झालेला संवाद
अमरावतीत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकारावर आक्षेप घेत दादांना बोलू न दिल्याने महाराष्ट्राचा अवमान झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली होती एवढेच नव्हे तर त्यांनी अमरावतीत याप्रकरणी निदर्शने करत पीएम कार्यालयाच्या या कृतीचा निषेध देखील केला होता .
यानंतर सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका देखील मिळवून ती ट्वीटर वरून शेअर करून त्यात अजित पवार यांच्या भाषणास संधी दिली नसल्याचे स्पष्ट करून दाखविले होते.
आता त्यानंतर भाजपाने हा कार्यक्रमच सरकारी नव्हता असे स्पष्ट करून देहू संस्थान ला वादाच्या भोवऱ्यात अडकविले आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.