पुणे- लॉकडाऊन विरोधात किंवा काही प्रतिबंधा विरोधात ओरडा करणाऱ्या भाजपा नेत्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली कारभार करणाऱ्या पुणे महापालिकेने कोरोना वाढू नये म्हणून कधी कधी काय काय केले याची माहिती घेऊन प्रथम आपण तर कुठे दोषी नाहीत ना ? याची माहिती घ्यावी असे आवाहन महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
तेम्हणाले,’कोरोनामुळे घरी मृत्यू झालेल्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार नातेवाइकांनी करायचे त्यासाठी महानगरपालिकेकडून नातेवाईकांना पीपीई किट व मृतदेह पॅक करण्यासाठी बॅग देणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नातेवाइकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून यामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होणार नाही का?असा संतप्त सवाल पुणेकर विचारात आहे. याबाबत प्रशासनास विचारले असता त्यांचा कोणाचा कोणालाही ताळमेळ नाही असे करून महागरपालिका आपली जबाबदारी टाळत असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.
कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत नाही. मृतदेह संपूर्ण पॅक करून स्मशानभूमीत नातेवाईकांना अंत्यदर्शन देऊन अंत्यसंस्कार करण्यात येतात. परंतू कोरोनामुळे घरी मृत्यू झाला असल्यास महानगपालिकेकडून मृतदेह पॅक करण्यासाठी नातेवाईकांना पीपीई किट व बॅग दिली जाते. मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नातेवाईकांवर सारून महानगरपालिका प्रशासनानं आपली जबाबदारी टाळत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे नातेवाईक भयभीत होत आहे. असे प्रकार होर असल्यामुळे नागरिक तक्रार करत असून या संदर्भांत प्रशासकीय अधिकाऱ्याशी चर्चा केली असता असा प्रकार गैर असून यामुळे कोरोना आणखी वाढण्याची शक्यता आहे. हि जबाबदारी महानगरपालिकेची आहे असे सांगितले जाते. तर मग महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अश्या प्रकारे नागरिकांना वेठीस का धरण्यात येते हि अतिशय गंभीर बाबआहे. सत्ताधारी भाजप लॉक डाउन करण्यास विरोध करत आहेत.मात्र शहरात प्रशासनाने केलेला गलथानपणा पाहण्याकडे त्यांचे लक्ष नाही.पुणेकर अश्या मुजोर सत्ताधारी भाजपला कदापि माफ करणार नाही. महापालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रकार थांबण्याचे आवाहन आबा बागुल यांनी केले.