पुणे- येत्या सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर होण्याचा उशीर तो लगेचच पुण्यातील विविध दुकानांमधील विविध वस्तू जादा दराने विकण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र दिसले. वाईन शॉप्स सह किराणा दुकानात गर्दी होत गेली . आणि वाईन शॉप मधूनही बाटलीमागे २० ते २५ रुपये जादा दर आकारणी सुरु झाली किराणा मालाच्या विविध वस्तूंच्या किमतीत हि भरमसाठ वाढ झाली . आधीच नौकरी गमावलेल्या अर्धवट पगार मिळालेल्या चाकरमान्यांचे व्यापाऱ्यांच्या या नाफेखोरीने आणखीच कंबरडे मोडले . मार्च अखेरीस सुरु झालेल्या या व्याधीने व्यापारी ,कंपन्या विविध संस्था , माध्यमे यामधील सुमारे १ लाख जणांचा रोजगार गेल्याचे कामगार नेत्यांचे म्हणणे आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या हाल अपेष्टांना पारावर उरणार नाही असे स्पष्ट चित्र दिसते आहे. सरकारचा महामारीचा फायदा घेऊन दरवाढ करून लुट करणाऱ्या व्यापारी दुकानदार आणि बेरोजगारी वाढविणाऱ्या कंपन्या यांच्यावर कोणताही अंकुश उरला नसल्याचे स्पष्ट चित्र आहे . त्यामुळे पुण्यातील हि महामारी आता पोलिसांना गुन्हेगारीच्या स्वरूपातही दिसू शकण्याची शक्यता नाकारता येणार नाही .