सुखमय जीवन जगण्यासाठी वर्तमानकाळात जगा-डॉ. दिलिप पटवर्धन

Date:

२६वीं तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या दुसर्‍या सत्रात

पुणे,दि.२६ नोव्हेंबर:“आजकालच्या वाढत जाणार्‍या घटस्फोटाला थांबविण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यामध्ये संवाद, स्पर्श, सहवास, स्वातंत्र्य आणि सन्मान या पाच गोष्टी असणे अत्यंत महत्वाचे आहे. ताण तणावातून मुक्त होऊन सुखमय जीवन जगण्यासाठी वर्तमानकाळात जगायला शिका.” असा सल्ला  सांगली येथील नंदादीप आय हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. दिलिप पटवर्धन यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २६व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी डीडी सह्याद्रीचे माजी संचालक मुकेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड होते.
तसेच, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. गोविंद पालकर, डॉ. बी.एस.कुचेकर, डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
डॉ. दिलिप पटवर्धन म्हणाले,“जीवनात ताण असेल तर मानवाची कार्यक्षमता वाढते हे सत्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सदैव सकारात्मक विचार केल्यास मानव कधीही दुखी होऊ शकणार नाही. वर्तमानकाळात जगणे, चेहर्‍यावर सदैव हास्य ठेवणे आणि कौतुक करणे हे जीवन जगण्याची सर्वात मोठी कला आहे. तणाव घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत आनंद निर्माण करावा, सुख हे बाहेर नाही तर ते अंर्तमनात शोधावे. भूतकाळात घडलेल्या चुका सुधारून वर्तमानकाळात बदल करा व आयुष्य सुकर करा.”
“सुंदर जीवनासाठी आपण कोणाकडूनही अती अपेक्षा करू नये. येणार्‍या वस्तूस्थितीचा स्विकार करा आणि त्याला योग्य आकार दया. अहंकारापासून मुक्त झाल्यावर जीवनाचा खरा आनंद काय असतो हे कळते. जीवनात ४ ‘वा’ या गोष्टींचा उपयोग करा, त्यात वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. म्हणजेच आपल्या जवळील ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते सर्वांना दया.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार कमी करण्यासाठी अध्यात्म गरजेचे आहे. सामाजिक शांतीसाठी अध्यात्माची गरज आहे. स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म जागृत करण्याचे कार्य या व्याख्यानमालेतून करण्याचा प्रयत्न आहे.”
मुकेश शर्मा म्हणाले,“ईश्‍वराला कोणीही शोधू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेऊ शकतात. धर्म हे जीवनाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असते. धर्मातून सदैव सकारात्मक ऊर्जा मिळते. धर्मातून जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळल्याने आम्हाला सृष्टी ही चांगली दिसायला लागते. विज्ञानाने मानवाचे जीवन सुखमय केले आहे. परंतू ते अंर्तमनापर्यंत पोहोचलेले नाही. पण अध्यात्म मानवाच्या अंर्तमनात पोहोचले आहे. त्यामुळेच अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढे गेले आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ भारतीय संतांचा विचार संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी एमआयटी शिक्षण संस्था शिक्षणाबरोबरच हे कार्य करीत आहेे. धर्माच्या माध्यमातून मानवी जीवनाला वेगळे वळण दिले जाते. त्यामुळेच प्रत्येक वेळी जीवनात संतुलन आवश्यक आहे. मी पणा, अहंकार आणि इच्छा या गोष्टी आल्या की आपल्या अपेक्षा भंग होतात. मानवाच्या मनात विलिनता आली तरच तो आनंदी होईल.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....