मुंबई, दि. ६ डिसेंबर – भारतासारखा एवढा मोठा देश, विविधतेने नटलेला देश त्याला एका चौकटीत ठेवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने केले आहे आणि लाखो जीवनांचा विकास बाबासाहेबांनी केला. म्हणून जगात ते एकमेव महामानव असतील की ज्यांच्या महापरिनिर्वाणदिनी एवढा मोठा जनसमुदाय त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले, घटना दिली, केवळ त्यामुळेच आपण आज उभे आहोत, मानसन्मान मिळवतोय. म्हणून त्या महापुरुषाच्या आठणवणीने आज सदगदित व्हायला होतेय.
आज आपण पाहतोय की देशामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रश्न निर्माण होतायत. परंतु त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच येते की, संविधान, घटना आणि कायदा असेही त्यांनी सांगितले.
चैत्यभूमी आणि परिसरात ज्या पद्धतीने व्यवस्था उभ्या करायला पाहिजेत त्या दिसत नाहीत. कुठल्याही प्रकारचे नियोजन दिसले नाही. कोरोना संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी गर्दी उसळणार हे महापालिका आणि राज्य सरकारने गृहीत धरून तशी व्यवस्था करायला हवी होती. परंतु यापैकी काहीच दिसले नाही. स्वच्छतागृहव, पाणी, नाश्ता, भोजनाची व्यवस्था किंवा ट्राफिकचे नियोजन यामध्ये विस्कळीतपणा दिसला. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका प्रविण दरेकर केली