Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहास बदलण्याचा प्रकार:बाजीप्रभूंच्या वंशजांनी केले खबरदार

Date:

सुबोध भावेंना विनंती केली होती ; चित्रपट प्रदर्शनापूर्वी दाखवा पण … दाखविला नाही

अफजल खानाच्या समयी बाजी प्रभूंची उपस्थिती:शिरवळ येथील स्त्रियांचा बाजार -अशा प्रसंगांना आधार नाही

बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू यांनी बांदल देशमुखांच्या सैन्याचे नेतृत्व केले. दोन्ही भावांनी प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. मात्र, चित्रपटात दोन्ही भावांच्या लहानपणीच्या कटू प्रसंग दाखवून फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलीन करण्यात आली.

पुणे-सिनेमॅटिक लिबर्टी ही काल्पनिक गोष्टीमधे घेता येते, पण ऐतिहासिक घटनांमधे नाही. सिनेमॅटिक लिबर्टी याचा अर्थ इतिहास बदलणे असा होत नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणेही अनुचित आहे. ऐतिहासिक चित्रपट काढताना निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तसेच इतिहास सल्लागार यांना खूप जबाबदारीने हे कार्य करावे लागते. दुर्दैवाने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या बाबतीत अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखविलेल्या आहेत, असे मत बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पत्रकार परिषदेला रूपाली देशपांडे, महेश देशपांडे, सुभाष दिघे, सागर दिघे, राहुल दिघे, मोहनेश दिघे, मंदार कुलकर्णी, राजेंद्र देशपांडे उपस्थित होते.

अमर देशपांडे म्हणाले, हरहर ‘महादेव चित्रपटाच्या संदर्भात काही त्रुटीवर इतिहास अभ्यासकांनी देखील यातील काही प्रसंगांवर आक्षेप घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुळातच हिरेपारखी होते. गुणग्राहकतेमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वरच्या घाटामध्ये जासलोलगड किंवा कासलोलगड हा किल्ला वसवण्याची जबाबदारी दिली होती व तसे पत्र उपलब्ध आहे. परंतु चित्रपटांमध्ये अनेक जागी देवळे बांधण्यात आली असा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

पन्हाळा लढाई म्हणले की आपल्याला आठवते ते म्हणजे बांदल देशमुख, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचे नाव. बाजीप्रभू यांनी बांदल देशमुख यांचे सैन्याचे नेतृत्व यांनी केले होते. बांदल सैन्याने या युद्धात मोठा पराक्रम गाजवला आणि राजांचे प्राण वाचवले. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यामधील लहानपणीचा कटू प्रसंगांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी प्राणांची एकत्रित आहुती दिलेली आहे, अशा प्रसंगामुळे फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटांमध्ये शिरवळ येथील स्त्रियांचा जो बाजार दाखवलेला आहे. त्यासाठी सुद्धा,कोणता ऐतिहासिक संबंध घेतला होता, याचे दिग्दर्शक/निर्मात्यांनी यांनी स्पष्टीकरण द्यावे. बाजीप्रभूच्या मृत्यूनंतर बाबाजी प्रभू यांना बाजीप्रभू यांच्या पक्षात सरदारी दिली व इतर सात मुलांना पालखीचा मान व तैनाती करून दिल्या.बाजीप्रभू देशपांडे हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते, परंतु चित्रपटांमध्ये अनेक वेळा ते भावनिक होताना दाखवलेले आहेत.

अफजलखानाच्या प्रसंगी बाजीप्रभू तेथे उपस्थित होते. याला काही ऐतिहासिक संदर्भ आहे का? सदर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही कलाकार सुबोध भावे यांना विनंती केली होती. याबाबत निर्माते संपर्क साधतील असे सांगण्यातही आले होते. परंतु तसे झाले नाही प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट निदान इतिहास सल्लागारांना दाखवला होता का, हेसुद्धा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...