करोनाच्या प्रार्दुभाव आज मुंबई ,पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासारख्या शहरात वाढल्यामुळे येथील नागरिक ग्रामीण भागातील लोकांना सध्या अपराध्याप्रमाणे वाटू लागली आहेत.जवळ -जवळ त्यांच्यासाठी आता गाव बंदीच झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये या शहरातील काही सुजान नागरिकांनी स्वतःहाला धीर देत या संसर्गजन्य रोगा विरोधात लढा दयायला सुरुवात केली आहे. त्यांच्या कडून शक्य तेवढे लॉकडाऊनच्या प्रार्श्वभूमीवर सरकारला सहकार्य केले जात आहे .त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतले असून केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्या पुरताच त्यांचा जगाशी तो काय संबंध सध्या येत असावा.कोरोनाच्या नावाखालीं आज या देश कार्यात लोकांना सेवा देण्याऐवजी खाजगी क्लिनिक आणि हॉस्पिटल बंद झाली आहेत.पूर्ण सरकारी यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी कामाला लागली आहे. अशा परिस्थितीत छोट्या मोठया आजारासाठी कोणाला संपर्क करावा.अनेकांना हे कळेना असे झाले आहे. मुंबईसारख्या शहरात अनेक ठिकाणी वयोवृध्दमध्ये मोठी घबराट पसरली आहे.माध्यमातून जे काय समजते,तोच या नागरिकांना माहितीचा स्रोत असावा..म्हणून या स्थितीत यांना कुठेही एकटे दुकटे वाटू नये म्हणून सरकारला काही गांभीर्याने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेषतः शहरातील गृहनिर्माण सोसायट्याना या करीता विश्वासात घेणे महत्वाचे आहे.त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणी संशीयत करोना बांधीत रुग्ण आहे का? हे शोधायला आरोग्य यंत्रणेला सोयीस्कर जाईल.
करोनाशी दोन हात लढा देण्यासाठी आपल्याला तीन आठवडे घरात थांबून देशाला वाचवायचे आहे.ही खूणगाठ लोकांनी मनाशी बांधली आहे.डॉक्टर, पोलीस,हा प्रशासनातील महत्वाचे घटक रात्र दिवस या कामासाठी झटत आहे.काही टवाळखोर मंडळी सोडली तर अनेक सुजान नागरीकांनी आपल्याला कोंडून घेतले आहे. ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. परंतु या शहरातील लोकांना आता अनेक तऱ्हेच्या समस्यांना आता सामोऱ्य जावे लागत आहे. दर आठवड्याला नियमित चेकप करण्यासाठी रांगेत बसणारे आज अनेक रुग्ण घरात चिडीचूप बसले आहेत. वातावरणानुसार साधा खोकला सर्दी ताप आला तरी आज सोसायटीमध्ये इतर रहिवांशी त्यांना संशयाने बघत राहतात. सर्वांनी दारे खिडक्या बंद केल्याने कोण कोणाशी बोलायला तयार नाही.सरकारी दवाखाने आजच्या घडीला संपूर्ण करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाली असताना, आता प्रकारामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपली मुलं विदेशात राहणाऱ्या अनेक वयोवृद्ध मंडळी घरातुनखाली उतरू शकत नाही.त्यांचा आजूबाजूचा आधार ही यामुळे हिरावून घेतला आहे.कोरोनाच्या भीतीच्या पोटी एकमेकांच्या भेटी दुर्लभ झाल्या आहेत. आज अशा लोकांसाठी सरकारी यंत्रणेकडून आधाराची मोठी गरज भासत आहे.म्हणूनच सरकारने आता जर महानगरपालिकाच्या अंतर्गत। येणाऱ्या आरोग्य खात्याची दोन-तीन आरोग्य फिरते पथकं वार्ड निहाय फिरविले तर मोठा दिलासा शहरी भागातील घरात बसलेल्या रहिवाशांना मिळेल.
या फिरत्या आरोग्य पथकामध्ये एक डॉक्टर, वार्ड बॉय,परिचारिका आणि एक पोलिस याचा समावेश असलेली व्हॅन(वाहन) जरी करोना बाबत असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी सोसायटीच्या परिसरात जनजागृती करीत फिरत राहिली, तरी अनेक समस्यांनी ग्रासलेले लोकं आपलं मनं तरी यामुळे हलकी करतील.
सध्या अनेक ग्रामीण रुग्णालयामार्फत डॉक्टरांनी अशीच आरोग्य पथकांची टीम गावागावात फिरवून पत्रकाव्दारे करोना संसर्ग रोखण्यासाठी व्हॅन(वाहन)फिरवित आहे.गावात कोण नवीन नागरिक बाहेरून आले आहे का? त्याची पूर्ण माहिती गावाच्या पोलिस पाटील यांच्या मार्फत घेतली जाते.कोणाला जर काही छोटे मोठे आजारांची लक्षण आढळली तर सध्या ग्रामीण भागातील डॉक्टर अशा रुग्णांना तिथल्या तिथं औषध देवून रुग्णालयात येण्यास भाग पाडत नाही.
असेच नियोजन मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकाच्या आरोग्य प्रशासनाने केले, तर मोठा दिला सोसायटीच्या रहिवाशांना मिळेल.मुंबई सारख्या शहरात अजून काही बाहेर गाववरून आलेले संशियत लोकं फिरत आहेत.अनेक सोसायटीच्या प्रमुखांना आपल्या सोसायटीत घर भडोत्री कुठून आला,केव्हा पासून राहतो.याचा थांगपत्ता नाही.पण यावर काही रहिवाशी आपलं तोंड उघडायला घाबरत आहे.उगाच कशाला कोणाशी वाद घालायचा या भावनेतून अनेक जण मूक गिळून गप्प बसतात. त्यामुळें सरकारने पुढाकार घेवून करोनाचा उद्रेक असलेल्या शहरांमध्ये तातडीने फिरते आरोग्य पथकासारख्या उपाय योजना केल्या तर खूप मोठा करोनो रोखण्यास उपयुक्त ठरेल.तसेच सोसायटी मधील संशय रुग्णांची नोंद घेण्यात सोपं जाईल यामुळे निश्चितइतर समस्या सुटतील.
सध्या बहुतेक ठिकाणी गर्दी कमी झालेली आहे.या संधीचा फायदा घेत आपल्या वार्डमध्ये सर्व नगरसेवकांनी व्हेईकल माऊटिंग धूर फवारणी तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर उद्रेकांच्या ठिकाणी जलद ताप रुग्ण।सर्व्हेक्षण झाले तरच करोना सारखा प्रादुर्भावावर नियंत्रण येवू शकते.
आज घडीला झोपडपट्टी भागात सार्वजनिक शौचालयासमोर रांगा असतात. तेथे कसलेही सॅनिटायझर अन कसले माक्स मिळणार. याचा विचार करता येथेही सरकारने दिवसातून दोनदा तरी धूर फवारणी करणे गरजेचे आहे.केवळ राज्यात संचार बंदी आणि जमावबंदी लादून लोकांना थांबविणे ह्याच उपाययोजना असून शकत नाही.तर आरोग्य प्रशासनाने आता फिरते आरोग्य पथके निर्माण करून सोसायट्यामध्ये जावून तेथील लोकांना विश्वास दिला पाहिजे.त्यामुळे नक्कीच अजून कुठे लपलेले संशियत करोना बांधीत रुग्ण सापडू शकतात. अन लोकही या करोनो बाबत जागृत होतील.