नागपूर- महाराष्ट्राची ‘ क्राईम कॅपिटल ‘ अशी ओळख होवू पाहणाऱ्या दस्तुर खुद्द मुखमंत्र्याचे गाव असलेल्या नागपूर शहरात आज एक भीषण दुर्घटना घडलीय. येथील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मातोश्री उषा कांबळे आणि त्यांची केवळ दीड वर्षांची मुलगी राशी यांचे अपहरण करून त्यांचा भीषण खून करण्यात आला.या दोघी शुक्रवार पासून बेपत्ता होत्या. त्यांचे मृतदेह एक पोत्यात भरून नाल्यात टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
रविकांत कांबळे हे ‘ नागपूर टुडे ‘ या न्युज पोर्टलचे पत्रकार आहेत. अनेक गैरप्रकार त्यांनी उघडकीस आणले असून त्यातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गावातच ही घटना घडली असून गेल्या दोन तीन वर्षांपासून नागपूर गुन्हेगारीची राजधानी बनली आहे.पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणाऱ्या घटना गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने वाढत आहे.