‘शिवजयंती’ देशभर साजरी झाली पाहिजे…
पुणे-स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान करत रयतेला आधार देणारे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू न देणारे खरे संरक्षक म्हणजे कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होय. आजची ३८८ वी ‘शिवजयंती’ हि जातीयवाद व धर्मवादाला मुठमाती देणारी धर्मनिरपेक्ष राज्य व्हावे… यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिवरायांचे शेतकरी धोरण आज अवलंबले पाहिजे. कारण सध्याच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांसोबत कुटूंबातील सदस्य ही आज आत्महत्या करत आहेत. धर्मा पाटील यांची राज्याच्या सर्वोच्च सभागृहासमोरील आत्महत्या हि राज्यकर्त्यांचे अपयश आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. म्हणून ३८८ वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आदर्शाची गरज वाटते… हाच त्यांच्या समतावादी धर्मनिरपेक्ष विचारांचा विजय आहे. म्हणून देशाला शिवराय कळण्यासाठी… शिवजयंती देशभर साजरी केली पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड च्या वतिने SSPMS येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिलांचा पाळणा घेण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, Vbvp च्या प. म. उपाध्यक्ष कु. पुजा झोळे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अॕड. मिलींद पवार, छावा क्रांतिवीर सेनेच्या अध्यक्ष छायाताई खैरणार, विठ्ठल सुर्यवंशी, सुवर्णा बनबरे, प्रा. प्रतिमा परदेशी, अॕड. किरण कदम, अजय पवार, सचिन जोशी, प्रदिप तांबे, आदी शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.