Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव; राणा दाम्पत्य केवळ प्यादे -दिलीप वळसे पाटील

Date:

मुंबई-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी, आज राज्यात कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगली आहे, काही जणांकडून ती बिघडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, अशी प्रतिक्रिया देत राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव असून राणा दाम्पत्य केवळ प्यादे असल्याचा घणघणाती आरोप केला आहे. राणांनी हनुमान चालिसा आपल्या घरी वाचावी मुंबईत येऊन वाचण्याचे कारण काय ? असा सवाल देखील त्यांनी केला ते पुढे म्हणाले की, राणा दाम्पत्य हे पुढे केलेलं प्यादं आहे. त्यांची नौटंकी सुरू आहे. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. शिवसेनेचे हिंदुत्व महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मवाळ झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे, या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले की, हा त्या दोन पक्षाचा प्रश्न आहे. मी त्यावर बोलणार नाही.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, काही लोकांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र रंगवून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. परंतु तसं काहीही नाही. हनुमान चालिसा लोकांनी आपापल्या घरी वाचावी. मुख्यमंत्री आणि मी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. पोलिस परिस्थितीनुसार कारवाई करत आहेत. कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांच्या नोटिशीनंतरही राणा दाम्पत्य ठाम असेल तर कारवाई होणारच. राणा दाम्पत्यावर कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांशी याबाबत फोनवरून चर्चा झाल्याची माहितीही वळसे पाटलांनी यावेळी दिली. पोलिस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मुंबई शांतत राखण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत. वातावरण बिघडू नये यासाठी मी हेच आवाहन करेन की, सर्वांनी शांतता राखावी.

विरोधकांकडून राष्ट्रपती राजवटीसाठी प्रयत्न सुरू- वळसे पाटील

एखाद्या घटनेमुळे लगेच अख्ख्या मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडली अशा निष्कर्षाला येणं योग्य नाही. त्यांनीही तिथे अशा प्रकारे उतरून भूमिका घेणं चुकीचं आहे. या घटनांवर मी किंवा मुख्यमंत्री कोणतीही सूचना देत नाहीत, दिलेली नाही, यावर मुंबईचे पोलिस आयुक्त निर्णय घेत असतात, त्यानुसार कारवाई सुरू आहे. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, त्रिपुरातील घटनेवरून हिंसाचार, आता भोंग्याचा मुद्दा, हनुमान चालिसाचा मुद्दा असे अनेक मुद्दे करून विरोधी पक्षाच्या वतीने राज्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हा मुद्दा करून विरोधक राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यासाठी वातावरण तयार करत आहेत, असा आरोपही वळसे पाटलांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...