50 दिवसानंतर प्रामाणिक माणसांच्या अडचणी कमी व्हायला सुरुवात होईल … आणि भ्रष्टाचारींच्या अडचणीत वाढ होईल – मोदींच्या वक्तव्याने संभ्रम

Date:

मुंबई -नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर सामान्य जनतेच्या अडचणी कमी कमी होत जातील  आणि भ्रष्ट लोकांच्या अडचणीत वाढ होईल, असे सांगत काळ्या पैशाविरोधातील लढाई सुरुच राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर झालेल्या सभेमध्ये दिली . ज्या लोकांनी बॅंकांच्या मदतीने काळे पैसे पांढरे करण्याचा प्रयत्न केला ते शिक्षेस पात्र ठरतील असे ते पुढे म्हणाले.

आज त्यांच्या हस्ते येथे एकूण १ लाख कोटी रुपयांच्या मेट्रो आणि नागरी रेल्वेच्या विविध योजनांचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले परंतु नोटाबंदीचा हा निर्णय सर्वात मोठा होता. त्या निर्णयाचे समर्थन सर्व जनतेने केले. ही जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे   पंतप्रधानांनी म्हटले.

शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करुन  भाषणाला सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले कि , २०१४ च्या निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वी मी रायगडला आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. ज्याप्रमाणे त्यांनी सुशासन आणि प्रशासन या दोन्ही बाजू अनेक संघर्षमय स्थितीमध्ये समर्थपणे पेलल्या त्याप्रमाणे मला करता यावे अशी मी प्रार्थना केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांचे व्यक्तिमत्व केवळ फक्त त्यांच्या पराक्रमानेच मोजता येणार नाही. त्यांनी त्यापेक्षा खूप काही केले आहे असे मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक मावळ्यांना त्यांनी प्रेरित केले. त्यांचा पराक्रम अलौकिक होताच परंतु ते एक उत्तम प्रशासकही होते असे पंतप्रधानांनी म्हटले.

शिवाजी महाराजांनी त्यांचे आरमार समृद्ध केले. त्यांनी पायदळाबरोबरच नौदलाकडे तितकेच लक्ष दिले. यातूनच त्यांचे दूरदृष्टी दिसून येते. शिवाजी महाराजांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता.  भारताकडे जगाला आकर्षित करण्याची क्षमता आहे. जगाला जर आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे दर्शन घडवले तर भारताच्या पर्यटन क्षेत्राचा गतीने विकास होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...