पुणे- मुंबई च्या महिला महापौरांबद्दल काय वक्तव्य केले गेले ते सर्वांना ठाऊक आहे त्या महिला महापौरांनी तिकडे तक्रार केली तर त्याला राजकारण म्हणायचे, आणि (पुणे) इथे सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींवर तक्रार झाली तर आमचा काही संबंध नाही, संस्थेचा आहे म्हणायचे.. एकाने आरे म्हटले तर दुसऱ्याला कारे म्हणता येते ..प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावे,कोणताही घटक, समाज दुखावणार नाही याची काळजी घ्यावी… अशी गर्भित सूचना देत दुसरा लसीचा डोस टाळणाऱ्यावर काय कारवाई करायची ते पुढील बैठकीत ठरवणार …असाही इशारा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला
आज पुण्यात विविध विषयांवर अजित पवार यांनी बैठका घेतल्या दुपारी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.मात्र दुसरा डोस घेण्यास काहीजण टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात बारामती ,इंदापूर, दौंड अशा काही ठिकाणी अनेक जण दुसरा डोस घेण्यास उत्सुक असलेले दिसत नाहीत. त्या भागात दुसरा डोस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे देखील प्रयत्न सुरू आहेत. यावर देखील नागरिकांनी सहकार्य केले नाही तर प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना दिला.पहिला डोस पूर्ण करून दुसरा देण्यासाठी अग्रभागी लसीकरणात एक नंबर ला मुंबई आणि 2 नंबर ला पुणे आहे.दोन्ही डोस प्रथम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर बूस्टर तिसरा डोस द्यायचे झाले तर सिरम त्याबाबत सहकार्य करू शकेल मात्र तिसरा डोस द्यायचा कि नाही याबाबत केंद्राच्या सूचना घ्याव्या लागतील.