पुणे- संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते! राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी राऊतांच्या एक थोबाडीत मारली असती! अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियातून नोंदविली आहे फेसबुक वर एकाच पोस्ट मधून संपूर्ण तर ट्विटर वर अनेक पोस्त मधून हि प्रतिक्रिया नोंदविली आहे . पहा नेमके त्यांनी या पोस्ट मध्ये कोणत्या शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.
संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकून त्यांची किव येते! राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत हे दिसत आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती!तुम्ही राज्य करा, मुस्लिमांची मतं मिळवा, कोण नाही म्हणतंय?केवळ ५ टक्के मुस्लिम गडबड करतात परंतु ९५ टक्के प्रामाणिक आहेत. मालेगाव, नांदेडमध्ये जे अस्वस्थता माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यावर पूर्वीसारखा निषेध करा! केवळ मुस्लिम मतांची काळजी करू नका. जे ५ टक्के मुस्लिम गडबड करत आहेत त्यांच्यावर तुम्ही टीकापण नाही करणार का?तुम्हाला झोपताना, उठताना केवळ भाजपा दिसते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरु केला, आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आम्ही फोडला, शेतकऱ्यांचे पैसे आम्ही थांबवले, काय चेष्टा चालली आहे का? सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही आहे का?सगळीकडे जर भाजपाचा हात आहे असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही ३ पक्ष समर्थ आहात ना? भाजपाचा हात कापून काढा ना तुम्हाला कोणी अडवलं आहे? तीन पक्ष एकत्र असूनही तुम्ही दुबळे आणि तुमचे सरकार पूर्णपणे अपयशी आहे! राज्याचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. आजी गृहमंत्री आता आजारातून उठले आहेत तर मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. सध्या बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत!