मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकबाबत सुरु असलेल्या निषेधाची झळ मुंबईत पोहोचली आहे. आसाम आणि ईशान्येकडील राज्यातील लोकांनी मोठ्या संख्येने शनिवारी येथील आझाद मैदानावर जोरदार निदर्शने केले. यावेळी अभिनेत्री दीपानिता शर्मा देखील उपस्थित होती. आधीपासूनच निदर्शनाची माहिती असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात होते.
विरोधकांनी सांगितले की, सुमारे 200 जमाती आणि 33 भाषा आसामची ओळख आहे. मात्र हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आसामची ही ओळख मिटवू शकते. वोट बँकेसाठी भाजप सरकार अशाप्रकारचे पाऊल उचलत आसामच्या लोकांचा हक्क हिरावून घेण्याचे काम करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये निदर्शने सुरुच, अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी देखील नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात निदर्शने सुरूच आहे. मुर्शिदाबाद आणि उत्तर 24 परगणा जिल्हा आणि हावडा (ग्रामीण) भागातून हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यातील अनेक रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर या निदर्शनाचा परिणाम पडला आहे.
कर्नाटकात हिंदू शरणार्थिंनी व्यक्त केला आनंद
कर्नाटकातील बांगला छावणीत राहणाऱ्या बांगलादेशातील हिंदू शरणार्थींनी रंगांनी होळी खेळून आनंद व्यक्त केला. हे सर्व शरणार्थी रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर तालुक्यात वास्तव्यास आहेत.