Home Blog Page 602

गावची जत्रा, पुढारी सत्रा …शनिवारी तमाशा शिबिराचा समारोप

माजी आमदार कवि लहू कानडे, भारत गणेशपुरे यांची उपस्थिती लाभणार

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी आयोजित तमाशा सम्राट काळू बाळू कवलापूरकर यांना समर्पित केलेल्या तमाशा शिबिराचा समारोप समारंभ शनिवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होत असून यावेळी गावची जत्रा, पुढारी सत्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थितीत राहणार असल्याची माहिती या शिबीराचे संचालक तथा लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभाग, आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहकार्याने गेली दहा दिवसाचे तमाशा प्रशिक्षण शिबीर लोककला अकादमी (मुंबई विद्यापीठ) येथे सुरू होते.या शिबिरामध्ये तमाशा परंपरेनुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने गण, गौळण, बातवणी, रंगबाजी असे तमाशा कलेचे विविध कला प्रकार या क्षेत्रातील अभ्यासकांनी या दरम्यान शिकविले.त्यानुसार तमाशा शिबिरात सहभागी झालेल्या विदयार्थ्यांनी शेवटच्या दिवशी एक पारंपारिक तमाशा सादर करायचा असतो. त्यामुळे शनिवारी (ता. 29मार्च) पारंपारिक तमाशा कला रसिकांना विनामूल्य बघायला मिळणार आहेत.
या शिबीराच्या समारोपाला माजी आमदार, जेष्ठ कवि लहू कानडे,”चला हवा येऊ दया” फेम भारत गणेशपुरे, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक संतोष पवार, चित्रपट अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी तमाशा शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गावची जत्रा, पुढारी सतरा हा तमाशा सादर करणार आहेत. हे शिबिर सुरू झाल्यावर श्री. कृष्णा मुसळे (ढोलकी)श्री. मदन प्रसाद (हार्मोनियम गायकी )श्रीमती हेमाली म्हात्रे(नृत्य),श्री. योगेश चिकटगावकर (अभिनय ) लावणी सम्राधणी प्रमिला लोदगेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
शनिवार दि. 29 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या शाहिर पट्ठे बापूराव कला दालन सांस्कृतिक भवन तिसरा मजला (गेट नंबर दोनच्या बाजूला) येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम प्रवेश विनामूल्य आहे.

कुणाल कामरा, सुषमा अंधारेंवरील हक्कभंग स्वीकारला :दोघांनाही आजच नोटीस जारी होण्याची शक्यता

मुंबई-भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल केलेला हक्कभंग स्वीकारण्यात आला आहे. या प्रकरणी आजच या दोघांनाही नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामरा व अंधारे या दोघांच्याही अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत कुणाल कामरा व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांचा हक्कभंग स्वीकारला आहे. सभापती राम शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. ही समिती कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांना कदाचित आजच खुलासा करण्यासंबंधीची नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधारे व कामरा या दोघांच्याही अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेने कामरा याच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कामराचे गाणे म्हणून शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला होता.

कुणाल कामराची मद्रास हायकोर्टात धाव:अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ताधारी पक्ष यांच्यावरील टीकात्मक गाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कुणाल कामराने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.कामराच्या वकिलाने आपल्या अशिलाला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे. कामरा यांच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तो सध्या पद्दुचेरीत आहे.स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामराविरोधात समन्स बजावला आहे. यामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कुणाल कामराने आपल्या वकिलांकरवी ही अटकपूर्व याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी आपल्याविरोधात दाखल एफआयआर संदर्भात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. त्याच्या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर कुणाल कामराविरोधात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर नंतर मुंबई स्थित खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 353 (1) (ब), 353(2) व 356(2) (मानहानी) चा दाखला दिला आहे.

थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; महावितरणचे आवाहन

पुणे, दि. २८ मार्च २०२५: पुणे परिमंडलामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांकडे अद्यापही ८२ कोटी ९७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहेत्यामुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९), रविवारी (दि. ३०) व सोमवारी (दि. ३१) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. 

वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरले नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत गेल्या २७ दिवसांमध्ये पुणे परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ३३ हजार ३२९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात पुणे शहरातील १३ हजार २२२, पिंपरी चिंचवड शहरातील १० हजार ८२० आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांतील ९ हजार २८७ थकबाकीदारांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे पुणे शहरात ३६ कोटी ८६ लाख पिंपरी चिंचवड शहरात १८ कोटी ६५ लाख आणि  आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांत २७ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९), रविवारी (दि. ३०) व सोमवारी (दि. ३१) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या माहितीसाठी –

१)      देयकाचा तत्पर भरणा सवलत (प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंट) –वीजदेयकाच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास १ टक्के सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्टपेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते.

२)      नलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के सवलत – क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेट, मोबाइल बँकींगद्वारे वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.

३)      थकबाकीवरील व्याज – वीज देयकांच्या देय तारखेपासून असलेली थकबाकी ६० ते ९० दिवसांदरम्यान भरल्यास – १२ टक्के व्याज आणि वीज देयकाची थकबाकी ९० दिवसांनंतर भरल्यास – १५ टक्के

४)       विलंब शुल्क आकारणी – संबंधित महिन्याचे वीज देयक देय तारखेच्या मुदतीत न भरल्यास १.२५ टक्के विलंब शुल्क आकारणी केली जाते.

लावणी प्रशिक्षण शिबीरातील विदयार्थ्यांनी सादर केलेल्या झगडा कला प्रकाराला रसिकांनी दिली दाद….!

पुणे-सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित सणसवाडी (जि. पुणे ) येथील “लावणी प्रशिक्षण शिबीरा”चा समारोप संपन्न झाला.संचालिका रेश्मा परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांचे लावणी प्रशिक्षण शिबीर सणसवाडी (जि. पुणे) येथे सुरू होते.

नवोदित लोककलावंतांना लोककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, म्हणून शासन दरवर्षी विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करते. त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात या लावणी प्रशिक्षण शिबीराचा वाखण्याजोगा समारोप झाला.
दहा दिवसाच्या शिबिरात नृत्य शिकलेल्या विदयार्थ्यांनी सुंदर अशा लावण्या सादर केल्या. परंपरेनुसार गण,मुजरा,गवळण (श्रुगारिक ), आम्ही काशीचे बाम्हण ही बैठकीची लावणी,पाहुणीया चंदवदन,वाटल होत तुम्ही याल,आशुक मासुक नीर नशिकची, राया मला सोडून जाऊ नका,बाई ग बाई -(छक्कड), मी तुमची मैना तुम्ही माझे राघु,पाया मघ्ये चाळ बांधुनी (छक्कड), पारंपारिक झिल, अशा विविध लावणी कला प्रकार यावेळी सादर केला.याला सभागृहातील रसिकांनी भरभरून दाद दिली.
विशेषतः गावचा पाटील आणि एक लावणी नृत्यांगणा यांच्यातील झगडा हा लावणीचा कला प्रकार नम्रता अंधारे आणि उमा काळे यांनी अंत्यत उत्कृष्ट अभिनयातून सादर केला.आणि रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. स्वतः हा रेश्मा परितेकर यांनी रंगमंचा ताबा घेवून आपल्या लोककलेची झलक दाखविली.
सुप्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर,नटरंग फेम ढोलकीपट्टू कृष्णा मुसळे यांची यावेळी चांगलीच जुगलीबंदीची झलक ऐकायला मिळाली. यांना विठ्ठल या ढोलकीपट्टूने साथ दिली होती.या समारोपाला लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वानाथ शिंदे, प्रभाकर ओव्हाळ, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड,सहयोगी प्राध्यापक डॉ. नवनाथ शिंदे, सणसवाडी कला केंद्राच्या संचालिका सुरेखा पवार, अप्सरा जळगावकर, उपस्थितीत होते. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित विदयार्थ्यांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिले जाणारे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले.

अभिनेत्री नेहा शितोळे चे लेखन क्षेत्रात पदार्पण

लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता देवमाणूस ह्या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.

तेजस देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित आहे.

लेखकाच्या भूमिकेत पदार्पण करताना नेहा सांगते, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री ह्या नात्याने आत्ता पर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली”

ती पुढे म्हणते, ”‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”

लव फिल्म्स प्रस्तुत, “देवमाणूस” या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

‘गुलकंद’ मधील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित…

काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’मधील ‘चंचल’ हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘चंचल’ गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं ‘चल जाऊ डेटवर’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.

गाण्यात सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत असून समीर आणि सईचे नृत्य एक सरप्राईज आहे. सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल १मे २०२५ ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे. तोवर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की!

दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, “या गाण्यातील सई, समीर आणि प्रसाद, ईशा यांची केमिस्ट्री मजेशीर असून प्रेक्षकांना हसवणारी आहे. गाण्याचे बोल, संगीत सगळंच खूप छान आहे. एक वेगळाच मूड बनवणारं हे गाणं असल्यानं त्याचं चित्रीकरण तसंच होणं गरजेचं होतं. मस्त कलरफुल ठिकाणी चित्रित करण्यात आलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. गाण्यात सई -समीर जरी डेटवर जात असल्याचे दिसत असले तरी १ मे रोजी सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह ही डेट एन्जॉय करावी.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, ” चित्रपट यशस्वी करण्यात गाण्यांचा मोठा सहभाग असतो. कधी कधी कथेतून जी गोष्ट, भावना मांडता येत नाहीत त्या गाण्यातून मांडता येतात. असंच हे गंमतीशीर गाणं आहे. हे या चित्रपटातील दुसरं गाणं आहे. पहिले गाणं रोमँटिक होते, हे गाणं अतिशय एनर्जेटिक असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. चित्रपट पाहातानाही प्रेक्षक हे गाणं अतिशय एन्जॉय करतील.”

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे होती त्रस्त,तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा

मुंबई-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एक नवा खुलासा बाहेर आला आहे. त्यानुसार, दिशा आपल्या वडिलांच्या अफेअरमुळे तणावात होती. संबंधितांना पैसे देऊन ती पुरती थकली होती. यामुळे आलेल्या आर्थिक वैफल्यातून तिने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले, असे मालवणी पोलिसांच्या यापूर्वीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यातच आता मालवणी पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेल्या आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये वरील नवी माहिती उजेडात आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दिशा सालियान वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसे देऊन थकली होती. कष्टाने कमावलेला पैसा नको त्या गोष्टींवर खर्च होत असल्यामुळे ती खचली होती. तिने आपल्या मित्रांशीही ही गोष्ट बोलून दाखवली होती. याच आर्थिक तणावातून नंतर तिने आत्महत्या केली. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालात दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या अहवालात डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी तपास करुन एक अहवाल सादर केला होता. त्यात दिशाचे काही प्रोजेक्ट्स अयशस्वी झाले होते, मित्रांशी खटके उडाले होते, अशा कारणांचा उल्लेख होता. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दिशाच्या वडिलांनीच लेकीने कष्टाने कमावलेले पैसे आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यावर उधळल्याचेही यात नमूद आहे. दिशाने ही गोष्ट तिच्या काही मैत्रिणींना आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही सांगितली होती. 2 जून 20202 रोजी दिशाने यासंबंधी आपल्या वडिलांना जाब विचारला आणि त्यानंतर ती तिचा होणारा नवरा रोहन रॉय याच्या जनकल्याण नगरमधील फ्लॅटवर राहायला गेली.

दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यानंतर त्यांनी दिशाने आत्महत्या केल्याचा अंतिम निष्कर्ष काढला. 4 फेब्रुवारी 2021 रोजी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. सतीश सालियन यांनी आता पुन्हा याचिका दाखल करून काही बड्या असामींवर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर 3 दिवसांनी तिचे शवविच्छेदन झाले होते. त्यात दिशाच्या हात, पाय व छातीवर जखमा झाल्याचा उल्लेख आहे. विशेषतः तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद आहे. एवढेच नाही तर दिशाच्या नाक व तोंडातून रक्त येत असल्याचेही या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. पण तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याची नोंद त्यामध्ये नाही.

दुसरीकडे, दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या वकिलांसह नुकतीच मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या कथित हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा त्यांचा आरोप आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात. इतरही अनेक गोष्टी आमच्या तक्रारीत नमूद आहेत. या गोष्टी संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहेत.

मंत्री थर्ड डिग्रीची भाषा करत असेल तर महाराष्ट्रात तालिबानी राज्य:हिंदू राष्ट्र म्हणणारे इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देताय, गद्दारांना तशीच शिक्षा…- संजय राऊत

मुंबई-एखादा मंत्री जर थर्ड डिग्री देण्याची भाषा करत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रात तालिबानी राज्य आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणत आहात आणि इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देत आहात, मग तसे असेल तर इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना कोणती शिक्षा देता माहिती आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना काय शिक्षा दिली जाते , हे पाहायचे असेल तर इराणमध्ये जा आणि बघा. तिथे गद्दाराला भर चौकात उघडे करत पार्श्वभागावर 100 फटके मारले जातात आणि मग फासावर लटकवतात. तुम्ही कुणालला तशी शिक्षा देणार असाल तर तशीच तुमच्या मंत्र्यांना मान्य आहे का? तसा एखादा प्रस्ताव आणू.

संजय राऊत म्हणाले की, आमच्यावर अनेकदा टीका झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक चुकीची वक्तव्य केली गेली पण त्यांनी ती सहन केली. तुम्ही त्याला शब्दाने किंवा कायद्याने त्याला विरोध करू शकतात. कायद्याचे राज्य जर टिकवायचे असेल तर अभिव्यक्ती स्वतंत्र जपले पाहिजे.दिशा सालियान हिच्या वडीलांनी मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नये. तिचे वडील असे का वागत आहे, त्यांनाच माहिती पण आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिशा सालियान प्रकरणी सत्य पहिलेच समोर आले आहे. काय झाले हे पूर्वीच् समोर आले आहे. दिशाच्या वडीलासंच्या आडून काही राजकीय लोकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला लक्षात यायला हवे.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुबियांवर चिखलफेक करणारे काही लोकं आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना असे राजकारण करताना लाज वाटली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय पुरुष आहेत, त्यांचा फोटो कुणीही वापरू शकते. शिंदेदेखील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरतात. पण बाळासाहेब जर असते तर त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चाबकाने फोडले असते.संजय राऊत म्हणाले की, सत्तेतील लोकं म्हणतात कुणाल कामराला टायरमध्ये टाकून मारले पाहिजे. द्या ना थर्ड डिग्री, चांगली गोष्ट आहे. पाहूना तोपर्यंत कुणाची सत्ता राहते. तुम्हाला दुखावणारे वक्तव्य जर कुणी केले असेल तर त्यासाठी देशात कायदा आहे, हे असे वक्तव्य म्हणजे ही सत्तेची मस्ती आहे.

कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देणार…मंत्री देसाईंची भाषा

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेसेनेत अजूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिवसैनिकांनी कुणालच्या मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यावर ‘अॅक्शनची रिअॅक्शन येणारच’ असे सांगून शिंदे यांनी या कृतीचे समर्थन केले होते. आता त्यांच्या पक्षाचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी तर थेट कायदा हाती घेऊन कुणालला ‘थर्ड डिग्री’ देण्याची धमकीच दिली आहे. कायद्याचे राज्य असताना कायदेशीर कारवाई ऐवजी ‘थर्ड डिग्री’ ची म्हणजे बेदम मारहाणीची भाषा करून मोगलाई च्या राज्याची आठवण शंभूराज देसाई यांनी करून दिल्याची टीका आता होऊ लागली आहे.

शंभूराज म्हणालेे, ‘कुणालने मर्यादा ओलांडली आहे. आता पाणी डोक्यावरून वाहत असून त्याला प्रसाद देण्याची वेळ आली आहे. शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओत प्रसाद दिला. तरीही आता तो मुद्दाम रोज एक नवा व्हिडिओ पोस्ट करत आहे. त्यामुळे आता तो कोणत्याही बिळात लपला तरी त्याला तेथून बाहेर काढून रस्त्यावर पटकले जाईल. त्याला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री दिली जाईल,’ असा इशारा देसाई यांनी दिला.शिंदे यांची बदनामी केल्याच्या तक्रारीवरून कुणाल कामरावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन वेळा त्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. पण सध्या तो तामिळनाडूतील मूळ गावी गेलेला आहे. कुणालच्या वकिलांनी २ एप्रिलपर्यंत हजर राहण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. पण ती फेटाळण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी चौकशीस हजर राहावे, असे आदेश पोलिसांनी बजावले आहेत. त्यामुळे आता कुणाल हजर होतो की कोर्टात जाऊन दिलासा मिळवतो, याकडे लक्ष लागले.

कुणालचे समर्थक मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलेत. गेल्या दोन दिवसांत देश-विदेशातून त्याच्या खात्यात ४ कोटी सात लाख ८० हजार रुपये क्राऊड फंडिंग जमा झालाय. व्यवस्थेविरोधात भाष्य करण्याचे धाडस दाखवणाऱ्या कुणालला नेत्यांनी दाखल केलेल्या कायदेशीर कारवाईत लढण्यासाठी मदत म्हणून ही रक्कम पाठवली जात असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षातील काही नेते पैसे देऊन कुणालला सत्ताधाऱ्यांविरोधात बोलायला लावत असल्याचा आरोप होतो. पण ‘तुम्ही माझे खाते तपासू शकता,’ असे सांगून कुणालने आरोपाचे खंडन केले.

शिंदेसेनेचे स्थानिक नेते राहुल कनाल यांनी खार पोलिसात तक्रार देऊन कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला टेरर फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला आहे. राहुल कनाल म्हणाले की, ‘कुणाल पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्व मोठ्या नेत्यांवर बोलतो. ‘हम होंगे कामयाब’ असे देशाचे गाणे आहे. या गाण्याला ‘हम होंगे कंगाल’ असे विडंबन त्याने केले आहे. कॅनडा, यूएसए आणि पाकिस्तानमधून त्याला ४०० डॉलर पाठवण्यात आले आहेत, त्याची चौकशी करून कारवाई करा. कुणालचे यूट्यूब अकाउंट बंद करा,’ अशी मागणीही त्यांनी केली.

भारतीय लष्कराचे शौर्य युवापिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी – काळकर

पुणे (ता. २७ मार्च): भारतीय सैन्याने देशावर आलेल्या प्रत्येक धोक्याला यशस्वीपणे परतवून लावले असून, आपले लष्कर नेहमीच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

भारत-पाकिस्तान युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि लष्करी इतिहास व माजी सैनिकांसोबत कार्यरत असलेल्या ‘ऑलिव्ह ग्रीन’ या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मार्बल सभागृहात १९६५ च्या युद्धातील छायाचित्रे व माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. पराग काळकर बोलत होते.

या वेळी ‘ऑलिव्ह ग्रीन’ संस्थेचे संचालक ले. कर्नल (नि.) अवधूत ढमढेरे, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, काशिनाथ देवधर, डॉ. संजय तांबट तसेच विद्यार्थी उपस्थित होते. युद्धाच्या छायाचित्रांचे अंगावर शहारे आणणारे विश्लेषण लष्करी इतिहासतज्ज्ञ नितीन शास्त्री यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले.

येथे शिकविली जाते, पारंपारिक लावणी….

ठाण्याच्या “लावणी नृत्य” प्रशिक्षण शिबिरात,विदयार्थ्यांमध्ये आनंद…. उत्साह… आणि जोश.

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या सहकार्यातून ठाण्यात सध्या बहुरंगी बहुढंगी असे दहा दिवसांचे “लावणी नृत्य प्रशिक्षण शिबीर”सुरू आहे.
काही मंडळींनी बदनाम केलेल्या लावणीला आज शासनाने या शिबीराच्या माध्यमातून राजश्रय दिला आहे. म्हणूनच या शिबिराच्या संचालिका शैला खांडगे यांच्यावर विश्वास दाखवत या शिबीराच्या प्रशिक्षणासाठी डॉक्टर वकील, उद्योजिका महिलांनी आज वेळात वेळ काढून प्रवेश घेतला आहेत.
बुधवार दि. 26मार्च रोजी या शिबिरातील प्रशिक्षणार्थी विध्यार्थ्यांना लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ गणेश चंदनशिवे यांनी एक ते दिड तास प्रात्यक्षित्य करून लावणीची परंपरा या विषयावरचे धडे दिले.डॉ. मुकुंद कुळे यांनी लावणीचा सिद्धातिक इतिहास सांगितला, तर मंत्रालयातील पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी लावणीला परंपरा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन विविध शिबीरं आयोजित करते.त्यामुळे पुढच्या पिढीने ही परंपरा शास्त्रशुद्ध शिक्षण घेवून जपावी.असे विदयार्थ्यांना सांगितले.
लावणी सम्रादयी प्रमिला लोदगेकर यांनी लावणीचा ठेका धरून नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी आपल्या लावणी नृत्याची परंपरा सांगितले.यावेळी लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे मनःभरून कौतुक केले.
शिबीराच्या संचालिका शैला खांडगे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.

येथे शिकविली जाते पारंपारिक लोककला
गण गवळण, मुजरा, छक्कड,शृंगारीक लावणी असे विविध कला प्रकार दहा दिवस शिकविले जाणार आहेत.त्यामुळे आम्हाला कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत आहेत. म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर आनंद आहे…. मनात उत्साह आहे…. अन तेवढा जोश सुद्धा आहे. असे येथील आलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थाचे प्राजंळ मत आहेत.

काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी अनंतराव गाडगीळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता

पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये सबंध महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली आहेत.
प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आता नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि संघटनात्मक काही फेरबल करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पुन्हा एकदा फिल्डिंग सुरू झाली आहे. माजी आमदार अनंतराव विठ्ठलराव गाडगीळ,अविनाश बागवे, संजय बालगुडे, या नावांची चर्चा असली तरी सध्याचे प्रभारी अरविंद शिंदे यांनाच अध्यक्ष राहू द्यावे मात्र माजी मंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी,अभय छाजेड आणि शिंदे यांच्यात तत्पूर्वी समन्वयाची बैठक घेऊन एकोपा साधावा असे नेत्यांना वाटू लागले असल्याचे काहीजण सांगत आहेत. असंख्य वेळा आमदारकी डावलल्याने पक्षापासून दूर गेलेले आबा बागुल यांच्याबाबत देखील नेते विचार करू शकतात असेही काहींचे म्हणणे आहे.काँग्रेस कडे मातब्बर अनुभवी नेते असले तरी त्यांच्यात आपसातच प्रचंड दरी निर्माण झाल्याने शहरातील काँग्रेसची दुरावस्था झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.या सर्वांना एकत्र आणून पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी अनंतराव गाडगीळ यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता काही जाणकार सूत्रांनी वर्तविली आहे.ज्यामुळे अनंतराव गाडगीळ यांच्यासारखा ब्राम्हण चेहरा देखील शहराच्या राजकारणात सक्रीय होऊन पक्षाला उभारी मिळू शकेल अशी आशा काही समीक्षकांना वाटते आहे. काहींनी रोहित टिळकांचे नाव देखील सुचवले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान सपकाळ यांच्याकडे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला.यानंतर आता पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या गटांकडून पुणे कॉग्रेस शहराध्यक्ष पदासाठीचे वेगवेगळी नावं चर्चेत आहे. पुणे शहरातील काँग्रेसचा शहराध्यक्ष बदलावा यासाठी गेल्या काही काळापासून काँग्रेसमधील काही गट कार्यरत आहेत. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलावा, यासाठी पुण्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते.शहराध्यक्ष बदलाबाबत मागील वेळेस एका कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली होती.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अविनाश बागवे , अरविंद शिंदे हे उत्तम चेहरा असून त्यांना महापालिकेत विविध पदांवरती काम केलं असून त्यांना महापालिकेची चांगली जाण आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्यासारखा युवा आणि आक्रमक चेहरा दिल्यास काँग्रेसला फायदा होईल, अशी भूमिका देखील मांडण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान अनंतराव गाडगीळ हे दिले तरी शहराध्यक्ष पद स्वीकारतील काय? याबाबत अनेकांना शंका वाटते आहे.

बनावट पावत्या बनवणाऱ्या पुण्यातील टोळीचा पर्दाफाश

पुणे, 27 मार्च 2025

केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या (CGST) पुणे-II आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या बनावट पावत्यांची अंदाजे रक्कम 25 कोटी रुपये इतकी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा लाभ घेण्याच्या आणि वापरण्याच्या उद्देशाने वस्तूंची कोणतीही नेआण केल्याशिवाय या बनावट पावत्या  जारी केल्या गेल्या.अशा आठ बनावट कंपन्या/खोट्या कंपन्यांचा प्रारंभिक शोध लागला असून त्यापैकी सहा पुण्यातल्या आहेत.फसवणूक केलेल्या करांच्या रकमेचे स्वरूप आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या प्रादेशिक व्याप्तीचे मूल्यांकन केले जात आहे. 

पुण्यातील रहिवासी असलेल्या या संघटीत टोळीचा सूत्रधार असलेल्या तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.ज्या कंपन्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC)  लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पुढील तपास आणि वसुलीची कारवाई सुरू आहे. 

यात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, CGST पुणे-II आयुक्तालयाद्वारे पुणे आणि जवळपासच्या भागात सक्रीय असलेल्या एकाधिक बनावट GST इनव्हॉइसिंग आणि बनावट ITC पेडलिंग संघटित टोळीशी संबंधित नऊ जणांना गेल्या सोळा महिन्यांत अटक करण्यात आली आहेत.बनावट आयटीसीच्या धोक्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा विभाग कटिबद्ध असून ते त्याच्या कायदेशीर थकबाकी देणाऱ्या कंपन्यांची यामुळे फसवणूक होते आणि खऱ्या करदात्यांवर  यामुळे  अन्याय होतो आणि अर्थविभागाचे  नुकसान होते.

पुणे रेल्वे स्टेशन प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या व सुरक्षेकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष: शिवसेना आक्रमक

पुणे- वाढत्या गुन्हेगारीने शहराला आणि राज्याला त्रस्त केले असताना पुण्यातील रेल्वे स्थानकावर महिला, त्यांची बालके आणि एकूणच प्रवासी देखील सुरक्षित नसताना त्यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक करणाऱ्या रेल्वे अधिकार्यांना आज पुण्यात शिवसेनेने धारेवर धरले यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलीस बोलाविले पोलिसांनी मध्यस्थी करत लेखी निवेदन द्यायला लाऊन रेल्वे सुरक्षेचे महत्व पटवून दिले यावेळी पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भातील मागण्या रेल्वे प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. या सर्व आंदोलनाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल.असा इशारा पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.
याप्रसंगी विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, विभाग प्रमुख अनिल दामजी,अनिल परदेशी, रोहिणी कोल्हाळ, युवराज पारिख, गिरीश गायकवाड, नितीन थोपटे, शैलेश जगताप उपस्थित होते.संजय मोरे यावेळी म्हणाले,‘पुणे रेल्वे स्टेशनला लाखो प्रवासी रेल्वेने ये जा करत असतात. त्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु रेल्वे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास येते. आताची रेल्वे स्टेशनची परिस्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झालेली आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षेचे संदर्भात अनेक निवेदनं दिली व आंदोलन सुद्धा केले. त्यावेळी आम्हाला त्या वेळेचे डी आर एम दुबे मॅडम यांनी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सांगितले होते की लवकरच रेल्वे बोर्डाकडून पुणे रेल्वे स्टेशन येथे 120 सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परंतु आत्तापर्यंत कुठेही सीसी कॅमेरे लावलेले नाही. याचा अर्थ रेल्वे रेल्वे प्रशासन सुरक्षिततेच्या बाबतीत चालढकल करत आहे.

शिवसेनेने केलेल्या मागण्या ….

१) व्हीआयपी गेट, अम्ब्रेला गेट ताडीवाला रोड गेट या ठिकाणी 24 तास RPF व GRP पोलीस TC नियुक्त करावे.
२) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात नवीन उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
३) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात RPF व GRP पोलिसांची गस्त वाढवावी.
४) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या मेन गेटच्या व्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद करण्यात यावे.
५) महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.
6) पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची संख्या जास्त असते, त्यामुळे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करावी ( पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करावे व आरक्षण केंद्राच्या आवारात गार्डन सारखे बाकडे बसवावेत)
७) पुणे रेल्वे स्टेशन मधील स्टॉल धारक व फॅन्ड्रीवाले रेल्वे स्टेशन येथे त्यांचे सामान ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसते स्टॉल व फॅन्ड्रीवाल्यांना सामान ठेवण्यासाठी बंदी करावी.
८) पुणे रेल्वे स्टेशन येथील पार्सलवाले कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कुठेही सामान टाकतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना चालायला सुद्धा जागा रहात नाही. रेल्वे प्रशासनामार्फत आपण पार्सल वस्तूंसाठी नियमित जागा ठरवून द्यावी.
९) दारू पिणारे लोक सर्रासपणे पुणे रेल्वे स्टेशन येथे वावरतात. त्यांना आपण पुणे स्टेशन परिसरात बंदी करावी.
१०) व्हीआयपी गेट समोरील लेनमध्ये RPF पोलीस लोखंडी बॅरिगेड लावतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो व संपूर्ण पुणे स्टेशन परिसर ट्रॅफिक जाम होते. बॅरिगेड लावणे त्वरित बंद करावेत.
11) उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांना स्वच्छ व थंड पाण्याची मोफत व्यवस्था करावी.