Home Blog Page 549

सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या: हर्षवर्धन सपकाळ.

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, जुमला ठरू नये.

पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकार घेईल त्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ६ मे २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणताही विलंब न करता व कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घेऊन नगरसेवक, महापौर, सभापती पदांचे पूर्ववैभव आणावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था लागू केली गेली व सत्तेचे विकेंद्रीकरण केले. यातून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, सभापती अशी सत्तेची विभागणी झाली पण मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकाच घेतल्या नाहीत. केंद्रात मोदीशाह व राज्यात फडणवीस यांना सत्ता आपल्याच हाती हवी होती या आग्रही भूमिकेमुळे या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयानेच निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने आतातरी निवडणुका घेऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करावे असे सपकाळ म्हणाले.

चौंडी मंत्रिमंडळ बैठक..
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून चौंडी गावी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा करण्यात आली. पण राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता ह्या योजनांसाठी सरकार पैसा कोठून आणणार हा प्रश्न आहे. सरकारकडे लाडकी बहिण योजनेला निधी नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग केला. मागील महिन्यात एसटी कामगारांना पगार देण्यास पैसे नव्हते. शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत तर या घोषणांची अंमलबजावणी कशी करणार. निवडणुकी आधी अशाच मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या पण आता त्याची अंमलबजावणी केली जात नाही. २०१४ च्या निवडणुकी आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन बारामतीतील एका कार्यक्रमात दिले होते, त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. आता चौंडी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणा सुद्धा आधीच्या घोषणांप्रमाणे जुमले ठरू नयेत असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पहलगाम हल्ला..
पहलागाम अतिरेकी हल्ल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचे गुप्तचर विभागाला संकेत मिळाले होते तरिही सरकारकडून काही हालचाली झाल्या नाहीत असे मल्लिकार्जून खर्गे म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य असू शकते, खर्गे यांना ५० वर्षांचा राजकीय अनुभव आहे ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी. पहलगाव प्रश्नी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला सर्वांचा पाठिंबा आहे. अशा प्रसंगी देश एकजूट आहे हाच संदेश गेला पाहिजे पण हल्ल्याच्या १० दिवसानंतरही सरकारकडून ठोस भूमिका घेतलेली नाही असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीतील निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिपरिषद बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार
🔸 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार
🔸 व्यावसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देणार

✅ राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार
🔸 राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार
🔸 कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास
🔸 हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार
🔸 हे अभियान राबविण्यासाठी ₹10.50 कोटी खर्च करणार

✅ धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव.
‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार
🔸 दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण
🔸 आतापर्यंत यासाठी ₹288.92 कोटी वितरित
🔸 राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना

✅ धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव
🔸 राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
🔸 प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतीगृह असणार. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर, मुलींसाठी 100 क्षमतेचे.
🔸 नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह
🔸 नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार
🔸 या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव

✅ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार
🔸 राज्यात असे 3 ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी)
🔸 राज्यात अशा 19 विहिरी
🔸 राज्यात असे एकूण 6 घाट
🔸 राज्यात असे एकूण 6 कुंड
🔸 अशा एकूण 34 जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करणार
🔸 यासाठी ₹75 कोटी खर्च करणार

✅ अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार
🔸 या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल.
🔸 यासाठी ₹485.08 कोटी खर्च करणार
🔸 जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह यासाठी देणार

✅ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून ₹5503.69 कोटींचे मंदिर विकास आराखडे
🔸 चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : ₹681.32 कोटी
🔸 अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार: ₹147.81 कोटी
🔸 श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : ₹1865 कोटी
🔸 श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा : ₹259.59 कोटी
🔸 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा: ₹275 कोटी
🔸 श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा : ₹1445.97 कोटी
🔸 श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा : ₹829 कोटी

✅ अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार

✅ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय

✅ ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढविण्याचा निर्णय

✅ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-2025 जारी करण्याचा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल:एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय होऊ शकतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

0

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले आहेत.या निर्णयाचे आपण मनापासून स्वागत करतो आणि निवडणूक आयोगाने तयारीला लागावे असे आमचे म्हणणे आम्ही त्यांच्यापर्यंत कळवू असे ते म्हणाले.

तुर्कियेची पाकिस्तानला साथ, धोकादायक युद्धनौका कराचीत पोहोचली

४ मे २०२५ रोजी, तुर्किये नौदलाची युद्धनौका TCG Buyukada (F-512) तिच्या संपूर्ण ताफ्यासह पाकिस्तानच्या कराची बंदरात पोहोचली. पाकिस्तान नौदलाने म्हटले आहे की या बंदर दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य मजबूत करणे आहे. तुर्कियेने समन्वय वाढवण्यासाठी एक पाऊल म्हणूनही याचे वर्णन केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कोणत्याही कारवाईसाठी सतर्क असताना तुर्किये युद्धनौका कराचीत पोहोचली. तुर्कियेचे राजदूत डॉ. इरफान नेझिरोग्लू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी एकता दाखवण्याचे आश्वासन दिलेल्या बैठकीनंतर TCG बुयुकडा कराचीला पोहोचले.युद्ध सुरू करण्याच्या पेचप्रसंगात, पाकिस्तानने भारताला संदेश देण्यासाठी तुर्कियेची युद्धनौका मागवली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे तुर्किये जहाज ७ मे पर्यंत कराचीतच राहण्याची शक्यता आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ म्हणतात, ‘भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्किये पाकिस्तानला आपला पाठिंबा दर्शवू इच्छित आहे. म्हणूनच त्यांनी टर्किए टीसीजी बुयुकडा पाकिस्तानला पाठवले आहे.२७ एप्रिल रोजी तुर्कियेचे ७ सी-१३० हरक्यूलिस विमान पाकिस्तानात उतरले. यापैकी ६ विमाने इस्लामाबाद येथे आणि एक विमान कराची येथील हवाई दल तळ ‘फैसल’ येथे उतरले. यामध्ये बेरेक्टर टीबी२ ड्रोन, छोटी शस्त्रे, स्मार्ट बॉम्ब आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, तुर्कियेने हे नाकारले.०१८ मध्ये, दोन्ही देशांमध्ये MİLGEM प्रकल्पावर एक करार झाला. याअंतर्गत, तुर्कियेने पाकिस्तानसोबत चार अडा-क्लास कॉर्व्हेट युद्धनौका पुरवण्यासाठी करार केला. यापैकी दोन जहाजे तुर्कियेमध्ये आणि दोन पाकिस्तानमध्ये बांधली जात आहेत. पहिले जहाज पीएनएस बाबर २०२३ मध्ये कार्यान्वित झाले. टीसीजी हा या प्रकल्पाचा एक भाग आहे.

२०१८ मध्ये, तुर्किये आणि पाकिस्तानमध्ये ३० T१२९ हेलिकॉप्टरचा करार झाला. याशिवाय, २०२५ मध्ये वितरित होणाऱ्या ४ मिलजुम-क्लास कॉर्वेट्ससाठी देखील करार करण्यात आला.याशिवाय, पाकिस्तान आणि तुर्कियेमध्ये दोन्ही देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव देखील होतात.तुर्किये आणि पाकिस्तानमध्ये खूप मजबूत ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लष्करी संबंध आहेत. दोन्ही देश इस्लामिक सहकार्य संघटनेचे म्हणजेच ओआयसीचे सदस्य आहेत आणि अनेक मुद्द्यांवर एकमेकांना पाठिंबा देतात.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तुर्कियेने पाकिस्तानला राजनैतिक पाठिंबा दिला होता. तथापि, लष्करी मदत मर्यादित होती.

निवृत्त जेएनयू प्राध्यापक आणि परराष्ट्र व्यवहार तज्ञ राजन कुमार म्हणतात,तुर्कियेने यापूर्वीही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. २०१९ आणि २०२० मध्ये, तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत काश्मीरला ‘वादग्रस्त प्रदेश’ म्हणून वर्णन केले. याशिवाय, २०१९ मध्ये त्यांनी काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला विरोध केला.

 दरम्यान आज सकाळी  आरएसएफने पोर्ट सुदानवर एक मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये विमानतळ, तेल डेपो आणि टर्मिनलसारख्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले, तसेच एसएएफ बॅरेक्ससह. या हल्ल्यात जनरल बुरहान राहत असलेल्या हॉटेल आणि अतिथी राजवाड्यावरही हल्ला झाला.

पुण्यातील या ८५ ठिकाणांहून वाजणार भोंगा ….War horn

पुणे- उपनियंत्रक, नागरी संरक्षण कार्यालय, पुणे यांनी पुण्यातून कुठून कुठून भोंगा वाजविला जाईल याची यादी आज येथे सादर केली आहे.
भोंग्याचे ठिकाण व पत्ता

आगाखान पॅलेस नगर रोड, पुणे-६
पुणे मुलींची अंधशाळा, कोथरुंड, पुणे ५२९
इंडियन केबल हडपसर, पुणे-१३
एस.आर.पी.एफ. ग्रुप रामटेकडी, पुणे-२२
हिंगण स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे-५२
छत्रपती संभाजी मनपा शाळा क्रं. ७०, कोथरुड, पुणे-२९
एस.एन.डी.टी. कॉलेज कर्वे रोड, पुणे
किलोस्कर किसान कोथरुड, पुणे-२९
एरंडवणे फायर स्टेशन कर्वे रोड, पुणे
बैंक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड,
फर्ग्युसन कॉलेज, पुणे
गव्ह. टेक्निकल स्कूल, घोले रोड शिवाजीनगर, पुणे
अॅग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
गव्ह. पॉलिटेकनिक, चतुः श्रृंगी, पुणे
पाषाण तलाव, पाषाण, पुणे-८
एन. सी. एल. पाषाण, पुणे-८
पोलीस मोटारवर्कशॉप, औंध, पुणे-२७
श्री. शिवाजी विद्यामंदिर औंध, पुणे-२७
पर्वती वॉटर वर्क्स, सिहंगड रोड, पुणे-९
धर्मवीर संभाजी म.न.पा. शाळा नवी पेठ, पुणे
रेल्वे स्टेशन शिवाजीनगर, पुणे-५
एल.आय.सी. बिल्डींग, नारायण पेठ, पुणे-३०
पी. एम. टी. वर्कशॉप, स्वारगेट
सेंट जोसेफ टेक. स्कूल, शंकरशेठ रोड, पुणे
सेंट्रल फायर बिग्रेड भधानी पेठ, पुणे-२
म.न.पा. शाळा भवानी पेठ, (सावित्रीबाई हायस्कूल) पुणे-२
म.न.पा.शाळा नानावाडा बुधवारपेठ, किंकर राम प्रशाला, पुणे-२
म.न.पा. दवाखाना सोन्या मारुती चौक, हुतात्मा बाबु गेणु रविवारपेठ, पुणे-२
पुणे जिल्हा परिषद सोमवार पेठ, पुणे-११
शांताबाई लडकत मनपा शाळा, नाना पेठ, पुणे-२ महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ, पुणे-२
म.न.पा. आयात कर भवन, शिवाजीनगर, पुणे-५
सुदर्शन केमिकल इन्स्डस्ट्रीज आर टी ओ शेजारी, संगमवाडी, पुणे
बाबुराव सणस म न पा कन्या शाळा, मंगळवार पेठ, पुणे-११पर्णकुटी येरवडा, पुणे-६
ना.सं. येरवडा सब कंट्रोल येरवडा.
एस. पी. कॉलेज, टिळक रोड, पुणे
पुनम रेस्टॉरंट, डेक्कन जिमखाना, पुणे-४
श्री. शिवाजीमराठा हायस्कुल, शुक्रवार पेठ, पुणे
केशवराज जेथे मनपा शाळा, (गंज पेठ) महात्मा फुले पेठ,
वैदिक संशोधन मंडळ मुकुंद नगर, पुणे
ना.सं. पर्वती उपनियंत्रण केंद्र, पर्वती पुणे-९
शंकरराव मोरे विदयालय, पौड रोड, पुणे
मेढी फॉर्म गोखलेनगर, पुणे
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा शाळा, बोपोडी, पुणे-१२
पी डब्ल्यू डी वर्कशॉप, दापोडी, पुणे-१२
जयहिद सिनेमा खडकी, पुणे-३
रेल्वे पोलीस मुख्यालय, खडकी, पुणे
जे एन पेटीट टेक्नि, हायस्कुल, बंडगार्डनरोड, पुणे
बैंक ऑफ महाराष्ट्र लक्ष्मी रोड, पुणे-२
वेस्टर्न इंडिया हाऊस लक्ष्मी रोड, पुणे
न्यु इंग्लिश स्कुल, रमण बाग पुणे
वनाज फॅक्टरी, पौड रोड
इंजिनिअरिं कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
सरस्वती विदयामंदिर विदयालय, (घारपुरे हायस्कूल, शुक्रवार पेठ,) पुणे
अभिनव कला महाविदयालय, टिळक रोड, पुणे-३०
कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पुणे-३७
महाराष्ट्र वृत्री उदयोग विकास महामंडळ, मार्केट यार्ड, पुणे
यशवंतराव चव्हाण, प्रशाला बिबवेवाडी,
विश्वकर्मा टेक्नि. इन्स्टि, अपपर इंदिरा नगर, पुणे
कौन्सिल हॉल, कम्पाऊंड, पुणे-१
अपंग संस्था वानवडी, पुणे-४०
रेल्वे लायब्ररी बिल्डींग, रेल्वे घोरपडी, संस्था, पुणे-४९
भारत फोर्ज कंपनी मुंढवा, पुणे
सेंट्रल जेल येरवडा, पुणे-६
रेल्वे स्टेशन पुणे,
चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन, (राजभवन) पुणे
लॉ कॉलेज, प्रभात रोड, पुणे-४
इंडस्ट्रियल ऑक्सिजन नगर रोड, पुणे
सिम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रोड, पुणे
वैभव टॉकीज हडपसर, पुणे-२८
राजर्षि शाहू म.न.पा. शाळा मुंढया
वि.स. खांडेकर म.न.पा. शाळा सहकारनगर, पुणे
एम.एस.ई.बी. रास्ता पेठ, पुणे
साठे बिस्कीट विश्रांतवाडी, येरवडा, पुणे
येकफिल्ड कंपनी, वडगांव शेरी, पुणे
पुणे कॅन्टोन्मेंट ऑफिस
वानवडी कॅन्टोन्मेंट शाळा
डॉ. आंबेडकर हायस्कुल, पुणे कॅन्टोन्मेंट
घोरपडी डिस्पेन्सरी पुणे कॅन्टोन्मेंट
अॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी
ओ.सी.एस. दिघी (V.S.N.L.) दिघी
कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी कॅन्टों.
कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी बाजार, शाळा
प्रायमरी स्कूल, संगमवाडी खडकी,

टॉर्च आणि कॅश ठेवण्याचा सल्ला,देशातील 244 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल:युद्धात बचावाचे मार्ग शिकवले जातील

नवी दिल्ली-


पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (७ मे) देशातील २४४ भागांत युद्धात बचावाच्या तंत्रांवर मॉक ड्रिल आयोजित केले जातील. गृह मंत्रालयाने या भागांना नागरी संरक्षण जिल्हे म्हणून सूचीबद्ध केले आहे. हे सामान्य प्रशासकीय जिल्ह्यांपेक्षा वेगळे आहेत.गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल दरम्यान हवाई हल्ला आणि ब्लॅकआउट झाल्यास नागरिकांनी काय करावे हे सांगितले जाईल. नागरिकांना त्यांच्या घरात वैद्यकीय किट, रेशन, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी होऊ शकतात म्हणून रोख रक्कम सोबत ठेवा.

नागरी संरक्षण जिल्हे त्यांच्या संवेदनशीलतेनुसार 3 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. श्रेणी-१ सर्वात संवेदनशील आहे आणि श्रेणी-३ कमी संवेदनशील आहे. ५ मे रोजी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश जारी केले होते.

आज दिल्लीतील गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मॉक ड्रिलच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी त्यात उपस्थित होते.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने अस्थिर बाजारपेठांमध्ये संभाव्य स्थिरता आणि कर बचत क्षमता डोळ्यासमोर ठेवून टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केला

मुंबई, :  टाटा ऍसेट मॅनेजमेंटने टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंड लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. या नाविन्यपूर्ण फंड ऑफ फंड योजनेचे उद्दिष्ट आर्बिट्रेज फंडचे कमी अस्थिरतेचे धोरण आणि उच्च गुणवत्तेच्या कॉर्पोरेट बॉन्ड्सची स्थिर संचय क्षमता यांचा समन्वय घडवून आणणे हे आहे. नवीन फंड ऑफर ५ मे २०२५ रोजी खुली होईल आणि १९ मे २०२५ रोजी बंद होईल.

देशांतर्गत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणारा हा ओपन एंडेड फंड ऑफ फंड कॉर्पोरेट बॉन्ड आणि इक्विटी आर्बिट्रेज रिटर्नवर मिळवलेले व्याज यांच्या संतुलित मिश्रणाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना एक बहुउपयोगी सोल्युशन प्रदान करतो.

टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह एफओएफ दोन वर्षांच्या होरायझॉन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, जे स्थिर, संचय-उन्मुख आणि कर बचत सक्षम रिटर्न मिळवू इच्छितात. हा फंड जास्तीत जास्त ६५% टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाला आणि कमीत कमी ३५% टाटा आर्बिट्रेज फंडाला वाटप करतो, जो २ वर्षांचे होरायझॉन डोळ्यासमोर ठेवून ऋण स्थिरता आणि कर बचत सक्षम रिटर्न यांना एकत्र जोडतो.

टाटा आर्बिट्रेज फंड आपल्या १००% हेज्ड इक्विटी पोर्टफोलिओसह, अल्पकालीन स्थिर लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तर टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड निवडक कालावधी प्रबंधनासह, मिळवलेल्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करतो. फंड ऑफ फंड संरचनेंतर्गत हे मिश्रण, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवण्यात आल्यावर स्टॅन्डअलोन आर्बिट्रेज किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंडाच्या तुलनेत अधिक चांगल्या कर बचत क्षमतेसह एक संतुलित दृष्टिकोन प्रदान करतो.

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री शैलेश जैन यांनी सांगितले, “वर्तमान वातावरणामध्ये जिथे ऋण कमाई आकर्षक आहे आणि इक्विटी बाजारपेठेमध्ये अस्थिरता आहे, अशाप्रकारचे हायब्रिड धोरण पारंपरिक ऋण फंडांच्या तुलनेत अधिक जास्त कर-पश्चात रिटर्न देऊ शकते. फंडाचे सक्रिय वाटप आणि स्मार्ट लिक्विडिटी व्यवस्थापन रिटर्न अनुकूलित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.”

हल्लीच्या वर्षांमध्ये आर्बिट्रेज आणि हायब्रिड धोरणांकडे आकर्षण वाढत आहे कारण गुंतवणूकदार असे पर्याय शोधत आहेत ज्यामध्ये ऋण सुरक्षा आणि इक्विटी लिंक्ड उत्पादनांची कर बचत क्षमता व लवचिकता यांना एकत्र जोडले जाते.

टाटा कॉर्पोरेट बॉन्ड फंड – रेग्युलर प्लॅनने एका वर्षात ८.३४% चे वार्षिक रिटर्न दिले आहे, तर याच कालावधीत क्रिसिल कॉर्पोरेट बॉन्ड ए-II इंडेक्सने ७.९७% रिटर्न दिले आहे. २०२१ मध्ये स्थापनेपासून फंडने ५.९६% चे रिटर्न दिले आहे (स्रोत: प्रेझेंटेशन). व्हॅल्यू रिसर्चनुसार, टाटा आर्बिट्रेज फंड – डायरेक्ट प्लॅन १ वर्ष आणि ५ वर्षांच्या एसआयपी रिटर्न दोन्हींसाठी आर्बिट्रेज फंडांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. १ वर्षाच्या एसआयपीवर ८.०५% आणि ५ वर्षांच्या एसआयपीवर ७.०६% रिटर्न दिले आहे.

टाटा इनकम प्लस आर्बिट्रेज ऍक्टिव्ह फंड ऑफ फंडच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ५००० रुपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीवर २ वर्षांनी इक्विटी टॅक्सेशन लाभ आणि ३० दिवसांनी रिडीम केल्यावर ०.२५% चा खूपच कमी एक्झिट लोड यांचा समावेश आहे.

टाटा ऍसेट मॅनेजमेंट गुंतवणूकदारांना खूप चांगल्या प्रकारे संशोधन करून तयार केलेली, नाविन्यपूर्ण सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी आपली वचनबद्धता मजबूत करत आहे, ही सोल्युशन्स बदलत्या बाजारपेठेचा वेग आणि दीर्घकालीन धन निर्मिती या उद्दिष्टांना अनुरूप आहे.

स्टार हेल्थ’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती

चेन्नई,  – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वांत मोठ्या व्यक्तिग्राही आरोग्यविमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती झाली आहे. खेर हे या कंपनीत सध्या स्वतंत्र संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (ईर्डा) या संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर खेर यांच्या नियुक्तीला अधिकृतता प्राप्त होईल.राजीव खेर यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक विकास, शाश्वत धोरणे आणि नियामक प्रशासन या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले खेर हे केंद्रात वाणिज्य सचिव होते. त्यांनी पर्यावरण आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या हेत. तसेच स्पर्धा अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २०१५ ते २०२० या काळात भारताचे विदेश व्यापार धोरण घडवण्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींचे नेतृत्व करण्यात आणि जागतिक स्तराशी सुसंगत नियामक चौकट निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांची ख्याती सरकार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि धोरण अभ्यास संस्थांमध्येही आहे.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राजीव खेर म्हणाले, “भारताच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ‘स्टार हेल्थ’ने ग्राहक-केंद्रिततेसह नवकल्पनांचा अवलंब करत एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळ आणि व्यवस्थापनासोबत जवळून काम करताना मी चांगल्या प्रशासकीय पद्धती बळकट करण्यावर, दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर आणि आरोग्य तसेच विमा क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कंपनीला योग्य दिशेने नेण्यावर भर देईन. समावेशक विकास, नैतिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यावर आमचा ठाम विश्वास राहील.”

या संदर्भात ‘स्टार हेल्थचे व्यवस्थापकीय संचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या महत्त्वपूर्ण टप्प्यावर राजीव खेर यांचे नेतृत्व लाभणे हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, धोरण क्षेत्रातील सखोल जाण आणि सार्वजनिक हिताविषयीची समज स्टार हेल्थच्या पुढील विकासप्रवासात मोलाची ठरेल. विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामुळे स्टार हेल्थ अधिक सक्षम, ध्येयधोरणांनी प्रेरित आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देणारी संस्था बनण्याच्या दिशेने पुढे जाईल. सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह आरोग्यविमा सेवा देण्याच्या आमच्या संकल्पात त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच अधिक बळ येईल.”

सोमेश्वर फाउंडेशन’ तर्फे ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा १९ मे रोजी सुरू

प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन : माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती

पुणे : ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकरांची ‘पुणे आयडॉल २०२५’ स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १९ ते २४ मे २०२५ या दरम्यान, पंडित भिमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी दिली.

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी सन २००३ साली सुरू केलेल्या या स्पर्धेचे यंदा २३ वे वर्ष आहे. स्पर्धेचे उ‌दघाटन गायन क्षेत्रात राष्ट्रपती पदक विजेत्या, प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते सोमवार दि.१९ मे, सकाळी ९.३० वा. पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार आहे. अंतीम फेरी २४ मे २०२५ रोजी, १२ ते ३ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. स्पर्धेचे फॉर्म www.sunnynimhan.com या संकेस्थळावर उपलब्ध असणार आहेत. प्रवेशाची अंतीम तारीख १५ मे २०२५ राहिल. अधिक माहितीसाठी संपर्क : सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, पुणे.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून रामेश्वरी वैशंपायन, कल्याणी देशपांडे, जितेंद्र भुरूक, कोमल लाळगे हे काम पहाणार आहेत. वय वर्षे १५ पर्यंत ‘लिटिल चॅम्प्स’, वय ‘१५ ते ३० वर्ष ‘युवा आयडॉल ‘,३० ते ५० वर्ष ‘जनरल आयडॉल ‘वर्ष ५० नंतर ‘ओल्ड इज गोल्ड’ अशा चार गटात स्पर्धा होणार आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पाच हौशी कलाकारांना विशेष निमंत्रित करून त्यांना गाण्याची संधी देऊन त्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम १५ हजार, १० हजार व मानाचे ‘पुणे आयडॉल’ सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने काही निवडक व प्रतिभावंत कलाकारांना शैक्षणिक व वैद्यकीय गरजेपोटी मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते.

प्रसिद्ध गायक अरूण दाते, प्रभा अत्रे, रविंद्र साठे, महेश काळे, त्यागराज खाडिलकर, डॉ. सलील कुलकर्णी, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत, अभिजित सावंत, अभिजित कोसंबी अशा गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. सौरभ साळुंके, कोमल कृष्ण, तुषार रिठे, प्रमोद डाडर, विनोद सुर्वे, महंमद रफी अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांनी गायन क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशी माहिती जितेंद्र भुरूक आणि बिपीन मोदी यांनी दिली.स्पर्धेसाठी अमित मुरकूटे, अनिकेत कपोते, गणेश शेलार, संजय तारडे, प्रमोद कांबळे आदी नियोजन करत आहेत.

मुंबई, पुणे, संभाजीनगरसह नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गअशा एकूण १६ ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

पुणे-केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांत युद्धाचे मॉक ड्रील करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरांत महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश असून, तिथे बुधवारी एकाचवेळी ही मॉकड्रील होणार आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 244 शहरांत युद्धाची मॉकड्रील घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोन्ही देशांमधील तणाव वाढला किंवा युद्धाची स्थिती उद्धवली तर आपत्कालीन स्थितीत काय करावे? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. त्यानुसार, देशभरात 7 मे रोजी नागरी संरक्षण जिल्हे, ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ही मॉक ड्रील घेतली जाणार आहे.

देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या मॉकड्रीलमध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे. सर्वात पहिला गट हा अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा -धाटाव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.

तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या तिन्ही गटांतील 16 ठिकाणांवर बुधवारी युद्धाची मॉकड्रील केली जाईल. त्यामुळे तेथील प्रशासनाने त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआऊट केले जाणार

या मॉकड्रील अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवले जातात तसे सायरन वाजवले जातील. तसेच अनेक शहरांत वीज पुरवठा खंडीत करून ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागले. स्थानिक प्रशासन, पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या मॉकड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे.

मॉकड्रीलमध्ये नेमके काय होणार?

हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार.
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचे प्रशिक्षण जिले जाणार.
रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणे समजू नये यासाठी ब्लॅकआऊट केले जाणार.
महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना केली जाणार.
सामान्य नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार.
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचे महत्त्वे सांगितले जाणार.

मॉकड्रीलवेळी कुठे वाजणार सायरन?

प्रशासकीय भवन
सरकारी भवन
पोलीस मुख्यालय
अग्निशमन दल केंद्र/ मुख्यालय
लष्करी तळ
शहरातील मोठे बाजार
गर्दीची ठिकाणे
सायरन वाजताच काय करावे अन् काय करु नये?

सायरन वाजताच घाबरून जाऊ नका.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
तातडीने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा.
मोकळ्या जागेपासून दूर राहा.
रेडिओ, टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या इशाऱ्यांवर लक्ष द्या.
घरात किंवा एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा.

SC चे आदेश, चार आठवड्यांत अधिसूचना, चार महिन्यांत निवडणूक : 2022 पूर्वीच्या स्थितीनुसार होणार इलेक्शन

महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या चार महिन्यांत घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ह्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल.

4 आठवड्यांच्या आत काढावी लागेल अधिसूचना

कोर्टाने आपल्या आदेशात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपासून निवडणूक झाली नसल्याची बाब प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिलेत. ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

ओबीसी समुदायाला 2022 पूर्वीचे राजकीय आरक्षण

या प्रकरणाशी संबंधित एका वकिलाने बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. हे राज्यघटनेत नमूद तरतुदींच्या विरोधात आहेत. छत्रपती संभाजीनगर व नवी मुंबई महापालिका ही याची उदाहरणे आहेत. आमच्याकडे अशा अनेक अनियमितता आल्या आहेत. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे, असे कोर्टाने आपल्या नमूद केले आहे. कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित सर्वच पक्षकारांना निवडणूक घेण्यास कुणाचा विरोध आहे का? असा प्रश्न केला. त्यावर सर्वांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यानंतर कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होते, तेच आरक्षण त्यांना पुन्हा देण्यात यावे. त्यानंतर 4 आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना काढावी. या प्रकरणी वादाचे सर्वच मुद्दे टाळले जावेत असेही कोर्टाने या प्रकरणी म्हटल्याचे या वकिलाने सांगितले.

सप्टेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया होणार पूर्ण

दुसरीकडे, वकील सिद्धार्थ शिंदे यांनीही सुप्रीम कोर्टाचा आदेश समजावून सांगितला आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार ह्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. निवडणूक आयोग व राज्य सरकारला येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 29 महापालिका, 257 नगर परिषद, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकांमार्फत कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 च्या मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. आता या बाबतचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांच्या विलंबामुळे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधित्वाचा अभाव जाणवत असून, नागरिकांमध्ये असंतोषाची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित

बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई) – 1888
पुणे महानगरपालिका – 1950
नागपूर महानगरपालिका – 1951
सोलापूर महानगरपालिका – 1964
कोल्हापूर महानगरपालिका – 1972
ठाणे महानगरपालिका – 1982
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – 1982
नाशिक महानगरपालिका – 1982
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका – 1982
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – 1982
अमरावती महानगरपालिका – 1983
नवी मुंबई महानगरपालिका – 1992
नांदेड-वाघाळा महानगरपालिका – 1997
उल्हास नगर महानगरपालिका – 1992
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – 1998
अकोला महानगरपालिका – 2001
मालेगाव महानगरपालिका – 2001
मीरा-भाईंदर महानगरपालिका – 2002
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका – 2002
जळगाव महानगरपालिका – 2003
अहिल्या नगर महानगरपालिका – 2003
धुळे महानगरपालिका – 2003
वसई-विरार महानगरपालिका – 2009
लातूर महानगरपालिका – 2011
चंद्रपूर महानगरपालिका – 2012
परभणी महानगरपालिका – 2012
पनवेल महानगरपालिका – 2016
इचलकरंजी महानगरपालिका – 2022
जालना महानगरपालिका – 2023
प्रलंबित जिल्हा परिषदांची यादी

रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
नाशिक
जळगाव
अहमदनगर (अहिल्या नगर)
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
जालना
परभणी
हिंगोली
बीड
नांदेड
उस्मानाबाद (धाराशिव)
लातूर
अमरावती
बुलढाणा
यवतमाळ
वर्धा
चंद्रपूर
गडचिरोली

पाकिस्तानातील 3 कोटी लोक पाण्यासाठी तरसणार:भारताने चिनाब नदीचा प्रवाह थांबवला

पहलगाममध्ये अटकेचे सत्र तीव्र, आतापर्यंत १८० संशयितांना ताब्यात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या वॉटर स्ट्राइकचा परिणाम दिसून येत आहे.भारताने बगलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. यानंतर, सोमवारी पाकिस्तानातील सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी १५ फूटांपर्यंत घसरली. ही पातळी रविवारपेक्षा ७ फूट कमी आहे.

चिनाब नदीच्या सततच्या आकुंचनामुळे, पंजाबमधील २४ महत्त्वाच्या शहरांमधील ३ कोटींहून अधिक लोकांना ४ दिवसांनी पिण्याच्या पाण्यासाठी थांबावे लागू शकते. पाकिस्तानातील फैसलाबाद आणि हाफिजाबाद सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमधील ८०% लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी चिनाब नदीच्या पृष्ठभागावरील पाण्यावर अवलंबून आहे.

पाकिस्तानच्या सिंधू जल प्राधिकरणाला भीती होती की भारताच्या या निर्णयामुळे खरीप पिकांसाठी २१% पाणी कमी होईल. पाकिस्तानी संसदेने याला युद्ध पुकारण्याचे कृत्य म्हटले आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. १९ सप्टेंबर १९६० रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ६ नद्यांचे पाणी वाटण्यासाठी सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार, भारताला तीन पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास आणि सतलज) अधिकार मिळाले, तर पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्या (सिंधू, झेलम आणि चिनाब) वापरण्याची परवानगी देण्यात आली.

पाकिस्तानची ८०% शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. आता भारताने या नद्यांचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट अधिकच वाढेल. तिथली आर्थिक परिस्थिती बिघडेल. याशिवाय, पाकिस्तान अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती करतो. पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक क्रियाकलापांवर परिणाम होईल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध सुरक्षा यंत्रणांनी तीव्र केला आहे. आतापर्यंत २८०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणि १८० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी नेटवर्क आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पाळत वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, काश्मीर प्रदेशात वाहनांची तपासणी तीव्र करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी चेकपॉईंटवर कडक तपासणी सुरू असते.

स्लीपर सेल्स ओळखून कारवाई केली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गम भागात असलेले ६० ट्रेकिंग मार्ग आणि पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांचा ओघ ८५% ने कमी झाला आहे.

पर्यटन विभाग आणि टूर ऑपरेटर्सच्या मते, हल्ल्यापूर्वी दररोज ७,००० पर्यटक खोऱ्यात येत असत जे आता ८०० ते १००० पर्यंत कमी झाले आहे .

भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- सुरूंगाची (कमी स्फोटकांसह) युद्धजन्य प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

0

नवी दिल्‍ली-

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाद्वारे स्वदेशी बनावटीच्या बहु-प्रभावक तसेच बहुउद्देशीय भू- दारूगोळा सुरूंगाची (एमआयजीएम) युद्धजन्य प्रमाणीकरण (कमी स्फोटकांसह) चाचणी यशस्वी झाली. ही प्रणाली अतिशय  प्रगत आहे. विशाखापट्टणमच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने आणि पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि चंदीगडच्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी या डीआरडीओ च्या अन्य प्रयोगशाळांच्या सहयोगातून हे बहुउद्देशीय विघातक दारूगोळ्यासह भू सुरूंग  विकसित केले आहे.

आधुनिक प्रचंड  जहाजे आणि पाणबुड्यांच्या  विरोधात भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी ‘एमआयजीएम’ची रचना करण्यात आली आहे. विशाखापट्टणम येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि हैदराबाद येथील  अपोलो मायक्रोसिस्टम्स लिमिटेड या प्रणालीचे उत्पादन भागीदार आहेत.

A floating object in the waterDescription automatically generated

डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योगाचे कौतुक करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, या प्रगत प्रणालीमुळे भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत म्हणाले की, या प्रमाणीकरण चाचणीसह, ही प्रणाली आता भारतीय नौदलात समाविष्ट होण्यासाठी सज्ज आहे.

भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार-पुण्यातून कोण? भिमाले कि बिडकर ?

0

पुणे-भाजपमध्ये सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष पदावर बदल होण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.

पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे.

आठ वर्षांच्या मुलाने सांगितली आईच्या खुनाची आंखोदेखी कहाणी :घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून वाद त्यातून पत्नीचा खून

पुणे- रात्री ज्या राकेश निसार ला पोलिसांनी बाईक वरून पत्नीचा मृतदेह विल्हेवाटीसाठी नेताना पकडला .त्याच्या ८ वर्षाच्या मुलाने आपल्या समोरच पित्याने आईची हत्या केल्याची आखो देखी पोलिसांना कथन केली आहे. या आठ वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना पोलिसांनी आरोपीला पकडले. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नांदेड सीटीजवळ घडली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, स्वयंपाक करण्यावरून व घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून पती व पत्नीमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून घेऊन निघाला. यावेळी रस्त्यातच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला व कसून चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी 8 वर्षांच्या मुलाला विचारले असता, मुलाने घडलेला संपूर्ण प्रकार डोळ्यात पाणी आणत सांगितला आणि आरोपी पतीचे पितळ उघडे पडले.

राकेश निसार असे आरोपीचे नाव आहे तर बाबीता निसार असे मृत महिलेचे नाव आहे. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसारला रंगेहाथ पकडले आणि सिंहगड पोलिसांनी अटक केली. राकेश हा धायरी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता व मजूरी काम करायचा. रात्री एकच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरासमोरून भुमकर पुलाजवळ राकेश आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जात असताना काही लोकांनी पाहिले. येथील नागरिकांना संशय आला व त्यांनी तातडीने पोलिसांना याची कल्पना दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बिट मार्शल पोहोचले आणि राकेशला पकडले. यावेळी राकेशने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मृतदेह कोणाचा आहे आणि कुठे घेऊन चालला असा प्रश्न विचारल्यावर राकेशने उडवाउडवीचे उत्तर देण्यास सुरू केले. मित्राने मृतदेह मागवला होता. त्याला खेडशिवपूरजवळ नेऊन देतो असे त्याने सांगितले. तसेच मृत पत्नीने फाशी घेत आत्महत्या केल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांना संशय आला व त्यांनी थेट राकेशचे घर गाठले. यावेळी घरात राकेश आणि बाबीताचा आठ वर्षांचा मुलगा होता. मुलाकडे चौकशी केली असता मुलाने पोलिसांना सांगून टाकले की वडिलांनीच आईला मारून टाकले. आई आणि वडिलांमध्ये जेवणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून रोज वाद व्हायचे. आज भांडण झाल्यावर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकले, असे उत्तर मुलाने पोलिसांना दिले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.