Home Blog Page 440

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांनी देशाला नाहीतर जगाला संदेश दिला, मराठी जपण्याचे काम ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केले तीच जपवणूक आपण करायला पाहिजे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन हा प्रसिद्ध मराठी कवी, लेखक कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी रिल्सस्टार अथर्व सुदामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी कुसुमाग्रजांच्या “जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी !‬ गेल्यावर ही या गगनातील, गीतांमधुनी राहीन मी” या कवितेचा उल्लेख करीत कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पुढे ते बोलताना म्हणाले, २००० वर्षापूर्वीची आपली मराठी भाषा संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृत मधील असलेली ज्ञानेश्वरीचे मराठीत अनुवाद केले. त्यामुळे मराठी जपण्याचे काम करत संतांनी, कलाकर, लेखक,कवी यांनी जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासन व राज्य शासनाचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी स्वागत करत अभिनंदन केले. सदर उपक्रमाचे विरोधी पक्षनेते,उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, युवती शहध्यक्ष कु.पूजा झोळे, कार्याध्यक्ष कु.लावण्या शिंदे यांनी आयोजन केले होते.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मा.नगरसेवक,बाळासाहेब बोडके, खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके, कसबा अध्यक्ष अजय दराडे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष महेश हांडे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे,अल्पसंख्याक महिला अध्यक्ष नूरजहा शेख,वकील अध्यक्ष विवेक भरगुडे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, ग्राहक संरक्षण अध्यक्ष राजेंद्र घोलप, कोथरूड महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, सरचिटणीस दुष्यंत जाधव, धनंजय पायगुडे, अनिकेत कोठवदे, उपाध्यक्ष शिवाजी पाडाळे, डिंपल इंगळे, प्रशांत निम्हण, योगेश वराडे, वंदना साळवी, विवेक मुगळे, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, अंगद माने, युवक कार्याध्यक्ष आनंद सागरे, युवती कार्याध्यक्ष श्रेया तांबे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, राहुल तांबे, शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, कोथरूड युवक अध्यक्ष मोहित बराटे, कोथरूड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर, कसबा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, शिवानी पोतदार, सागर चंदनशिवे, अर्चना वाघमारे,ओंकार निम्हण, शैलेश मानकर, अलीम शेख, सचिन जाधव,अरुण गवळे, नवनाथ खिलारे, प्राजक्ता देसले,सुरेखा पाटील,राणी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘अर्थ’नेपुण्यामध्ये तिसरे ‘यलोडोअर’ सुरु करून पश्चिम भारतात आपले स्थानअधिक मजबूतकेले

पुणे२५ फेब्रुवारी २०२५:  टायटनचा प्रीमियम हॅन्डबॅग ब्रँडअर्थ’ने आपले तिसरे एक्सक्लुसिव “यलो डोअर” पुण्यामध्ये सुरु करून पश्चिम भारतात आपल्या रिटेल विस्ताराची घोडदौड कायम ठेवली आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या एक्सक्लुसिव्ह स्टोरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुण्यामध्ये विमान नगरमधील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये सुरु करण्यात आलेले जवळपास ५५० चौरस फुटांचे नवीन स्टोर म्हणजे अर्थ’च्या धोरणात्मक विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुण्यातील ग्राहकांची उत्तम क्रयशक्तीजोमात असलेले आयटी क्षेत्र आणि युवा नोकरदारव्यावसायिकांची वाढती लोकसंख्या यामुळे या शहरातील रिटेल बाजारपेठेची छान भरभराट होत आहेया उत्साहजनक रिटेल बाजारपेठेचा लाभ घेण्याच्या धोरणात्मक उद्देशाने ब्रँडने आपले एक्सक्लुसिव स्टोर याठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतलामहाराष्ट्राचे दुसरे सर्वात मोठे शहरी केंद्र आणि खूप महत्त्वाचे तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यामध्ये नोकरदारव्यावसायिक महिलांचे आणि फॅशनच्या बाबतीत चोखंदळ ग्राहकांचे प्रमाण जास्त आहेअर्थ’ च्या प्रीमियम हॅन्डबॅन्ग उत्पादनांसाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे.

अतिशय सुबकआकर्षक आणि आनंददायी वातावरण असलेलेअर्थ’ स्टोर भारतीय महिलांसाठी आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रस्तुत करते. “पॉकेट्स ऑफ जॉय” या मूलभूत संकल्पनेवर आधारित असलेले हे स्टोर आपल्याला एका वेगळ्या जगाची सफर घडवतेनवीन उत्पादनेभेट देण्यासाठी उपयुक्त आणि प्रत्येक बॅगमधून मिळणारा छोटाछोटा आनंदप्रत्येक दिवस आनंदानेसहजपणे जगता यावा यासाठी डिझाईन करण्यात आलेली उत्पादने या सर्व गोष्टी ठळकपणे स्टोरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

मिनिमल आणि नीटनेटकी सुंदर रचनास्पर्शाची वेगळी अनुभूती देणारे टेक्श्चर्स आणि मजेशीर घटक यांचा आकर्षक मिलाप असलेले अर्थ’ स्टोर अगदी सहजसोप्या खरेदीला अजून जास्त आनंददायी बनवतेयाठिकाणचा प्रत्येक तपशील एक सुखद आश्चर्य आहेआमच्या बॅग्सचे सौंदर्य आणि उपयुक्तता त्यामधून प्रदर्शित होते, “पॉकेट्स ऑफ जॉय” प्रत्यक्षात साकार करणारा खरेदीचा अनुभव याठिकाणी मिळतो.

टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स अँड ऍक्सेसरीज डिव्हिजनचे सीईओ श्री मनीष गुप्ता यांनी सांगितले, “पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी १० आउटलेट्स सुरु करून आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत जवळपास १०० स्टोर्स सुरु करण्याची व्यापक योजना आहेसुरुवातीला आम्ही पुणेदिल्लीकोलकाताचेन्नई आणि मुंबई या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहोतआमची अपेक्षा आहे कीमार्च २०२५ पर्यंत अर्थ’ च्या एकंदरीत विक्रीमध्ये एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे योगदान जवळपास १५ ते २०असेलब्रँड स्टोर्स सुरु करणे हा आमच्या रिटेल धोरणातील महत्त्वाचा भाग आहेरिटेल विस्तार करत असताना एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सची संख्या वाढवण्याची आमची योजना आहेसुरुवातीच्या स्टोर्सना मिळत असलेले यश आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेयेत्या आर्थिक वर्षांमध्ये पुढील टप्प्यातील स्टोर्ससाठी टायटन फ्रॅन्चायजी मॉडेलचा वापर करेल अशी अपेक्षा आहेआमच्या वृद्धी योजनेच्या पुढील टप्प्यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी बाजारपेठांचा समावेश केला जाईल.”

हे नवीन स्टोर अर्थ’ ब्रँडचे महाराष्ट्रातील स्थान अधिक मजबूत करेलपुण्यामध्ये हे त्यांचे पहिले स्टोर आहेआर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारतभर १०० स्टोर्स सुरु करण्याच्या या ब्रँडच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक पाऊल आहेप्रीमियम फॅशन ऍक्सेसरीजची आणि विचारपूर्वक घडवण्यात आलेल्या उत्पादनांची प्रचंड आवड असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण अर्थ’ पुढे देखील सुरु ठेवेल.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने ८२ दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी दिली.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसात म्हणजे दि. १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दीष्टे निश्चित करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची एकूण संख्या दि. ६ डिसेंबर रोजी ७१,४३७ होती व त्यांची एकूण क्षमता २८३ मेगावॅट होती. शंभर दिवसांच्या मोहिमेत एकूण घरांची संख्या १.२५ लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. राज्यात दि. २६ फेब्रुवारी रोजी योजनेच्या लाभार्थी घरांची संख्या १,२८,४७० व एकूण क्षमता ५०० मेगावॅट झाली होती. या योजनेचे शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण झाले. या आधी महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दीष्ट साठ दिवसात पूर्ण केले आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. योजना सुरू झाल्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत राज्यात ७१४३७ हजार घरांना लाभ झाला होता तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसात ५७,०३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले. योजनेत आतापर्यंत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना एकूण ८०० कोटी रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या २१,०२७ झाली आहे. नागपूरनंतर पुणे (९८७५ घरे), जळगाव (९४८९ घरे), छत्रपती संभाजीनगर (८८१४ घरे), नाशिक (८५५८ घरे), अमरावती (७११९ घरे), कोल्हापूर (६२९१ घरे), धुळे (४१८७ घरे) आणि सोलापूर (४००७ घरे) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला ३० हजार रुपये, दोन किलोवॅटला ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. जास्तीत जास्त अनुदान ७८ हजार रुपये आहे. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मिटर मोफत दिला जातो. छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

थकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

एक मार्चपासून ठेकेदारांचा काम बंद आंदोलनाचा सरकारला इशारा

महिनाअखेर ७० टक्के बिले देण्याची मागणी

पुणे, प्रतिनिधी – शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर  राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय ठेकेदारांच्या संघटनांनी दिला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा धडाका सरकारने लावला होता. त्याचे कार्यारंभ आदेशही ठेकेदारांना देण्यात आले. काही कामे पूर्ण झाली, तर काही प्रगतिपथावर आहेत. मात्र, या कामांची बिले अजूनही ठेकेदारांना मिळालेली नाहीत. विविध विभागांची मिळून जवळपास ४६ हजार कोटींची बिले राज्यातील ठेकेदारांची अडकली आहेत. शासनाने सहा महिन्यांपासून बिले काढली नसल्यामुळे राज्यातील ठेकेदार

आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथील मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात चक्क डंपर आणून व पोतराजा पुढे साकड घालत हे त्यांनी अभिनव आंदोलन केले. पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशन, महाराष्ट्र हॉटमिक्स असोसिएशन, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी न दिल्यास सर्व कामे बंद ठेवण्याची घोषणा यावेळी कंत्राटदार संघटनेने केली.

यावेळी पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, महाराष्ट्र हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष बाबा गुंजाटे, अनिल जगताप, संजीव व्होरा, एम एस पंजाबी,भालचंद्र हुलसुरे, बिपिन दंताळ, सागर ठाकर ,शैलेश खैरे, विश्वास थेऊरकर , उदय साळवे, तुषार पुस्तके, अशोक ढमढेरे, राजेंद्र कांचन, कैलास इंगळे, दिग्विजय निंबाळकर व सुमारे २०० कंत्राटदार उपस्थित होते.

रवींद्र भोसले म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी विशेष भरीव तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार करतील अशी अपेक्षा यावेळी भोसले यांनी व्यक्त केली.

लेखनाच्या माध्यमातून महिलांचे अव्यक्त जग उलगडले

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  महिला साहित्यिकांचा सन्मान

पुणे : महिला लेखकांनी केवळ महिला किंवा त्यांच्या समस्येविषयी लिहायला पाहिजे असे नाही. महिलांचे जग वेगळे आहे. महिलांनी निम्मे अवकाश व्यापले आहे परंतु या अवकाशाची कल्पना कोणालाही नाही. महिला लिहितात त्याला खूप आयाम असतात. महिलांना गृहीत धरले जात होते परंतु लेखनाच्या माध्यमातून त्यांचे अव्यक्त जग उलगडत आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महिला साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, विनायक कदम महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होत्या.

स्नेहा अवसरीकर, वसुंधरा काशीकर, विनया खडपेकर, चित्रलेखा पुरंदरे, डॉ.स्मिता डोळे, ऋता पंडित या महिला साहित्यिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मुलांना कोणत्याही भाषेच्या शाळेत टाका, परंतु घरी मराठीतच बोला. आपल्या भाषेवर आपण प्रेम करायला पाहिजे त्या सोबतच इतर भाषांमधील साहित्य देखील वाचायला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उमा कुलकर्णी म्हणाल्या, ललित साहित्य हे खूप प्रभावी असून त्याची ताकद वेगळी आहे. कथा, कादंबऱ्या समाजावर मोठा प्रभाव टाकू शकतात. साहित्य टिकून ठेवायचे असेल तर वाचकांच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. आजच्या काळातील लेखकांनी आपले सामर्थ्य वाढवायला पाहिजे कारण आत्ताची पिढी ही आधीच्या पिढी इतकी भाबडी नाही. त्यामुळे लेखकांच्या साहित्यात दम असला पाहिजे. वाचन संस्कृती वाढवण्याची जबाबदारी केवळ वाचकांची नाही तर ती लेखकांची देखील आहे.

त्या पुढे म्हणाल्या, भाषा हे जिवंत माध्यम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून केवळ आनंद नको, तर भाषा बोलायला हवी. भाषा बोलली नाही तर ती मरून जाते. सध्या काही भाषांवरती ही वेळ आली आहे तसे मराठीचे होऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. 

शनिपार चौकात ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, (कसबा विभाग) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे आयोजन
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कसबा विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३००० हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग नोंदवला.

उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते योगेश खैरे, संघटक प्रल्हाद गवळी, मनविसेचे प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अभिषेक थिटे, धनंजय दळवी यांनी भेट दिली.

मनसे शहर सचिव वसंत खुटवड, मनविसे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी उपक्रमाचे आयोजन केले. तर, रुपेश चांदेकर, ऋषिकेश करंदीकर, करण मेहता, चंद्रकांत राजगुरु, प्रमोद उमरदंड, राहूल मुंगले यांनी उपक्रमाला सहकार्य केले.

मराठीत स्वाक्षरी करणाऱ्याला यावेळी पेढा देखील देण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष होते. यावेळी कॅलिग्राफी करणारे कलाकार देखील सहभागी झाले होते. मराठी भाषेचे महत्व आणि महती या उपक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली.

महावितरणच्या पिंपरी विभागामध्ये नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती

0

सोबतच ४ नवीन शाखा कार्यालयांना मान्यता

पुणे, दि२७ फेब्रुवारी २०२५: दर्जेदार वीजसेवा व ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणच्या पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाचे विभाजन करून नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी या चार शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. नव्याने तयार झालेल्या हिंजवडी उपविभागाचे कार्यालय आणि नवीन चार शाखा कार्यालयांमध्ये एकूण ८८ तांत्रिक व अतांत्रिक नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी विभागाच्या सांगवी उपविभागात यापूर्वी सांगवी, ताथवडे व हिंजवडी असे तीन शाखा कार्यालय होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कंपन्यांचे आयटी हब तसेच विजेसह नवीन वीजजोडण्यांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगवी उपविभागाच्या विभाजनाचा आणि नवीन हिंजवडी उपविभाग व चार नवीन शाखा कार्यालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठवला होता. त्यास मंजूरी देत महावितरणने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.  

सांगवी उपविभागाच्या पुनर्रचनेत सांगवी उपविभागात आता सांगवी, पिंपळे गुरव (नवीन), पिंपळे निलख (नवीन) व वाकड (नवीन) असे चार शाखा कार्यालय राहतील तर नवीन हिंजवडी उपविभागात ताथवडे, हिंजवडी आणि हिंजवडी एमआयडीसी (नवीन) असे तीन शाखा कार्यालय राहतील. पूर्वीच्या सांगवी उपविभागात एकूण २ लाख ५६ हजार ग्राहक होते. पुनर्रचनेनंतर सांगवी उपविभागात १ लाख ४० हजार आणि नवीन हिंजवडी उपविभागात १ लाख १६ हजार वीजग्राहक असतील.

नवीन हिंजवडी उपविभाग कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नवनिर्मित पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत हिंजवडी, चाकण एमआयडीसी व भोसरी-२ या तीन उपविभागांची तसेच ११ शाखा कार्यालयांची तसेच नवीन ८८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीसाठी नवीन उपविभाग व शाखा कार्यालयाबाबत वीजग्राहक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे वीज व ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होईल. 

अभिवाचनातून उलगडली स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘माझी जन्मठेप’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मरणासन्न यातना सोसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याच धारदार शब्दात तरुण कलाकारांनी आपल्या अमोघ वाणीने, आणि तितक्याच जिवंत अभिनयाने बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर अभिवाचनाच्या माध्यमातून सादर केले. या अभिवाचनाच्या द्वारे एका प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान आणि त्यांचा जीवनपट ‘माझी जन्मठेप’ मधून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राहक पेठेतर्फे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहयोगाने ‘माझी जन्मठेप’ अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्य अविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, संदीप खर्डेकर, श्रीकांत जोशी आदी यावेळी उपस्थित होते. या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सामाजिक समरसतेचा संदेश पुढे नेत, कार्यक्रमात हिंदू खाटीक समाजाचे नेते नरेंद्र सदाशिव घोणे यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या अभिवाचन नाट्यविष्काराची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची होती. तरी दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, संकलन अलका गोडबोले, नेपथ्य संदेश बेंद्रे, शब्दाचार मार्गदर्शन सुभाष सावरकर, संगीत मयुरेश माडगावकर यांनी केले. जान्हवी दरेकर, मुग्धा गाडगीळ बोपर्डीकर, गौरव निमकर, समर्थ कुलकर्णी, शंतनू अंबाडेकर, नवसाजी कुडव हे कथन कलाकार होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान मधील काळ्यापाण्याच्या शिक्षेच्या काळामध्ये कशा प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक यातना भोगल्या याचे जिवंत चित्रच जणू या अभिवाचनाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडले. ज्याप्रमाणे घाण्याला जुंपलेल्या बैलाकडून तेल काढणीचे काम करून घेतले जात, तसेच कैदयांकडून करून घेतले जाई. त्यावेळी त्यांना होणारा शारीरिक त्रास असो वा अंदमानच्या कोठडीमध्ये झालेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानसिक अवस्था अभिवाचनातून कलाकारांनी पुन्हा एकदा रसिकांसमोर मांडली.

सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन जितका हवा तितका लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सामाजिक दृष्टीकोन समाजाच्या तळापर्यंत पोहोचावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर पोहोचतील याची आम्हाला निश्चितच खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्राहक पेठ, भगिनी निवेदिता सहकारी बँक आणि पु.ना.गाडगीळ अँड सन्स यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

पुण्यात :वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरचे महिला प्रवाश्यासमोर समोर गैरवर्तन; महिलेची कॅबमधून उडी

0

पुणे-पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट परिसरात बस मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने कॅब मधून उडी मारली तसेच थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासासाठी कॅब बुक केली होती. त्यानंतर संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. या दरम्यान गाडी चालवत असताना आरोपी ड्रायव्हर तरुणाने रियल व्हिव्ह मिरर मधून महिलेकडे पाहून हस्त मैथुन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले.याप्रकरणी खडकी पोलिसांनी वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक देखील केली आहे. खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेला माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी आहे. तो नुकताच मुंबईवरून पिंपरी चिंचवड येथे कामासाठी आला होता. पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच महिलांच्या सुरक्षेबाबत घडत असलेल्या घटनेमुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

“त्रिनेत्र महोत्सव -शिवशक्ती आराधना” महाशिवरात्री निमित्त विशेष नृत्य महोत्सव संपन्न

पुणे, २६ फेब्रुवारी २०२५ – केअर एनजीओ यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर “त्रिनेत्र” या विशेष नृत्य महोत्सवाचे भव्य आयोजन बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, पुणे येथे करण्यात आले. भगवान शंकराच्या विविध रूपांवर आधारित या नृत्य सादरीकरणांनी उपस्थित रसिकांना अद्वितीय अनुभूती दिली.

या भव्य कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रज्ञा डांगे, नम्रता पंडित, डॉ. महेशकुमार वडदरे आणि सत्यजित जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी मयूर ठेंगे वारेगावकर, निशा गोंधळे, जया ठेंगे, सृष्टी मराठे व योगिनी कोठाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सांस्कृतिक सोहळ्यात एकूण १४४ कलाकारांनी सहभाग घेतला. याप्रसंगी गणेश आप्पा गांधे (दिवाणी न्यायाधीश)व श्री बाळासाहेब होनराव या मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली विविध नृत्यप्रकारांतून भगवान शंकराची आराधना साकारली गेली, ज्यात शास्त्रीय व लोकनृत्यांचे अप्रतिम सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

“त्रिनेत्र” हा केवळ एक नृत्य महोत्सव नसून, भक्ती आणि संस्कृती यांचा अनोखा संगम ठरला. केअर एनजीओ तर्फे आयोजित या भव्य सोहळ्याने महाशिवरात्रीचे पावित्र्य अधिकाधिक वाढवले आणि शिवभक्तांच्या मनात चिरंतन ठसा उमटवला

तृप्ती देसाईंनी अडविली गृहराज्यमंत्री योगेश कदमांची गाडी अन म्हणाल्या, कोणत्या तोंडाने इथे आलात ?

संतप्त तृप्ती देसाई पोलिसांच्या कब्जात…

पुणे : स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देत आढावा घेतला. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी योगेश कदमांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी देसाईंनाच ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये नेले. त्यानंतर देसाई अधिकच आक्रमक झाल्या.

लोकशाहीत आवाज उठवू शकत नाही का? मला कशाला अटक करताय? आरोपीला तातडीने अटक करा,अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. पोलीस व्हॅनमध्ये बसतानाही तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या ‘आरोपीला अटक झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत होत्या.भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेऊन कदम यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला. पोलिस बलात्कार करणारा आरोपी शरण येण्याची वाट पाहत आहेत का? तुम्ही येथे कोणत्या तोंडाने आलात? आरोपीला घेऊन या? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी गृह राज्यमंत्र्यांवर केली.

तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम घटना घडल्यानंतर 50 तासांनी येथे आलेत. आम्हाला त्यांना राज्यात काय चाललंय याचा जाब विचारायचा होता. भेटायचे होते. यासाठी आम्ही त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय गाडेसारखा साधा आरोपी सापडत नाही. ही कसली यंत्रणा आहे? त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाही करण्यात आले आहे.

पोलिसांना लाखोंचा पगार मिळतो. फुकट मिळतो. पोलिस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे. राजकीय दबावामुळे अशी अनेक प्रकरणे दाबण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण घ्या. वाल्मीक कराड स्वतःहून शरण आला. आता या प्रकरणातही आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट पाहिली जात आहे का? रात्रभर महिला झोपल्या नाहीत. आज सगळ्या महिला आहेत. मुले-मुली आहेत. सर्वजण घाबरलेत. महिला एसटीमध्ये सुरक्षित प्रवास करतात. पण एसटीही आता सुरक्षित राहिली नाही.

मंत्री योगेश कदम यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला पोलिस जबरदस्तीने ओढून आणतात. तसे आरोपीलाही ओढून आणा. अन्यथा आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचा निकाल लावू. मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो की पळवून लावला जातो? वाल्मीक कराड सरेंडर होणार अशा बातम्या आल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम इथे कोणत्या तोंडाने आलेत. त्यांनी आरोपीला घेऊन यावे. हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. इथे कोयता गँग आहे, गाड्या जळत आहेत. पोलिस यंत्रणा साफ अपयशी ठरली आहे.

पालकमंत्री अजित पवार आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची भाषा करतात. आम्हा सर्वांची हीच मागणी आहे. त्यांचे बारामतीचे बसस्थान कुठे आणि आमचे स्वारगेट बसस्थानक कुठे. गाड्या बंद पडल्यात. त्यात कंडोमची पाकिटे पडलेत. साड्या पडल्यात. मटक्याचे आकडे चालतात. आम्ही आतापर्यंत अनेकदा हा विषय मांडला. पण अशी वेळ आली की रस्त्यावर उतरावे लागते. महिलांबाबत असे घडत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असेही तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या.

स्वारगेट रेप केस: पोलिसांचा निष्काळजीपणा नाहीच , मात्र आरोपी लवकरच गजाआड होईल – गृहराज्यमंत्री

योगेश कदम, गृहराज्यमंत्री म्हणाले,’ पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकेशननुसार त्याला फॉलो केलं जातंय. त्याचं संभाव्य लोकेशनही आपल्याकडे आहे. लवकरच आरोपीला पकडलं जाईल. एक असा गैरसमज तयार केला जातोय, परवा सकाळी घटना घडली, ती कालपर्यंत का कळवली गेली नाही? ज्यावेळेला फिर्याद आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच आरोपीला ओळखलं. तो अलर्ट होऊ नये म्हणून ही माहिती बाहेर दिली गेली नाही. जर माहिती आधीच बाहेर दिली असती तर आता जे संभाव्य लोकेशन सापडलं आहे ते मिळालं नसतं. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. फक्त गुप्तता पाळण्यात आली आहे पुणे शहराच्या बाबतीत ही जी घटना घडली आहे ती एसटी स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांमार्फत रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजल्यापर्यंत कितीवेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार पीआय फेरी मारून गेल्याचं दिसतंय. पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नाही. पोलीस अलर्ट नव्हते असंही नाही. आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत. घटना घडली तेव्हा आजूबाजूला माणसं होते.गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी बलात्काराचे हे प्रकरण फोर्सफुली घडले नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुली कृती झाली नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेवर1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा

पुणे-स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दत्तात्रय गाडे याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय तरुणीवर धमकावून शिवशाहीमध्ये बलात्कार केला आणि पसार झाला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. घटनेच्या 48 तासांनंतरही आरोपी पोलिसांना सापडला नाही. आरोपीच्या शोधासाठी सुरुवातील आठ पथके तैनात केली होती. आता 13 पथके तैनात केली आहे. आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी आहे. त्याच्यावर याआधीच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे. सध्या तो जामिनावर सुटलेला आहे.

फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलिस ठाण्याशी किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आली आहे. आरोपीबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून पोलिसांनी दत्तात्रय गाडेबद्दल माहिती काढून घेतली. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुण्यात काम करणारी तरुणी फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आली होती. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते. यादरम्यान पीडितेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल रुग्णालयाने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिला. आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली आहे. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्वारगेट अत्याचार :आरोपी राजकीय कार्यकर्ता अन तोतया पोलिसही

स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत असल्याचे ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा तो ‘कार्यकर्ता’ असल्याचेही समोर आले झाले असून, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारीही असल्याचे प्राथमिक तपासात आढळले.दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, गाडे सातत्याने स्वारगेट एसटी स्टँडवर असावा; त्यामुळे त्याला तेथील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा उठवून त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचा तर्क लावण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत असे. मात्र, हे सराईत गुन्हेगार सातत्याने तेथे येत असल्याने, पोलिसी कारवाईवरही मर्यादा येत असल्याचे खासगीत सांगितले जाते.

गाडे हा घटनेच्या दिवशी रात्री किमान दीड-दोनपासून एसस्टी स्टँडवर असल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाची चक्रे फिरली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्याने कोणाशी संपर्क साधल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गाडेने याखेरीजही अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये तक्रारदार पुढे येत नसल्याने त्याचे धारिष्ट्य वाढल्याची शक्यता आहे. गाडेबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महादेवांच्या भिंतीचित्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व दीपक मानकर यांचा हस्ते अनावरण

पुणे


ॐ नवनाथ मित्र मंडळ ट्रस्ट गेली अनेक वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज अशा थोर विचारवंताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या हेतूने अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करत असे. याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या महाशिवरात्रीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील व पुण्यातील पहिले व सर्वात मोठे “महादेवांचे” भिंतीचित्र साकारलेल्या भव्यदिव्य अश्या भिंतीचित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील,पुणे शहराचे माजी उपमहापौर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. एरंडवणे गावठाण येथील राजमयूर सोसायटी, ॐ नवनाथ मित्र मंडळ ट्रस्ट, अजय कंधारे, माजी नगरसेवक दिपक पोटे,आशिष पाडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील प्रसिद्ध भिंतीचित्रकार निलेश खराडे यांच्या हस्ते साकारण्यात आलेले आहे. त्यांच्याही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच हिंदू राजा महाराज अघोरी टीम, संगमनेर यांनी अतिशय सुंदर जिवंत देखावा सादर केला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनावरण सोहळ्या प्रसंगी जयंती भावे, महेश पोटे, हर्षवर्धन मानकर, पुनीत जोशी,दत्ता सागरे, प्राची शहा, डॉ.संदीप बुटाला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.