Home Blog Page 400

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर -इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे.
आज त्याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून तीन दिवसांची म्हणजे 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती.परंतु जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी माहिती दिली आहे. “आरोपी प्रशांत कोरटकर याला किमान सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी आम्ही न्यायालयासमोर केली. आवाजाचे नमुने शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून घ्यायचे असतात. आवजामधील स्वर आणि व्यंजन महत्त्वाचे असून आवाजात बदल केला जाऊ शकतो, असे सरोदे म्हणाले.“मागील एक महिन्यांपासून आरोपी प्रशांत कोरटकर फरार होता. आता तो पोलिसांवर खापर फोडत आहे आम्ही त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली,” असे देखील असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, कोरटकरला केवळ तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे.

दिशा सालियन प्रकरण:आदित्य ड्रग्जच्या व्यापारात, उद्धव ठाकरेही आरोपी, CM असताना पदाचा गैरवापर; वकील ओझांचा आरोप

मुंबई-दिशा सालियनच्या वडिलांनी आज मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या? यावरून बरेच राजकारण रंगले आहे. पण आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले.

सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात. इतरही अनेक गोष्टी आमच्या तक्रारीत नमूद आहेत. या गोष्टी संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहेत.

आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची माहिती आम्ही यात दिली आहे. आदित्य ठाकरे व डिनो मोरिया यांच्या फोनवरील रेकॉर्डिंगचाही यात समावेश आहेत. या सर्वांचा नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज प्रकरणात आरोपी बनवलेल्या समीर खानशी संबंध आहे. हा एक मोठा विषय आहे. त्यावर सरकारने उत्तर द्यावे. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्ज प्रकरणात समावेश असताना त्यांना अटक करण्यापासून कुणी रोखले व त्यात किती कोटींची डील झाली होती हे त्यांनी सांगावे, असे नीलेश ओझा म्हणाले. दिशा सालियनचा मित्र स्टिव्ह पिंटो अद्याप बेपत्ता असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पत्रकारांनी यावेळी नीलेश ओझा यांना या प्रकरणात तुम्ही उद्धव ठाकरे यांना आरोपी केले काय? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, या प्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी आहेत. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेला गुन्हा लपवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा गैरवापर केला. सचिन वाझे हे त्यांच्याच गँगचे सदस्य होते. हायकोर्टाने ख्वाजा युनूस हत्या प्रकरणात सचिन वाझे यांना तुरुंगात पाठवले होते. ते 16 वर्षे निलंबित होते. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या काळात त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेतले. त्यांची थेट क्राईम इन्टेलिजन्स यूनिटमध्ये नियुक्त केली.

त्यानंतर त्यांनी वाझे यांच्या मदतीने याचे खून कर, त्याचा खून लपव, त्याच्याकडून खंडणी उकळ, मनसूख हिरेनला आदी अनेक प्रकारची कामे केली. उद्धव ठाकरे स्वतः सचिन वाझेचा बचाव करण्यासाठी पुढे आले. या प्रकरणात परमबीर सिंहांविरोधात थेट पुरावे आहेत. या सर्व आधारावर या लोकांना आरोपी करण्यात आले आहे, असे ओझा म्हणाले.

आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी यांना राष्ट्रसंत पदवी प्रदान 

पुणे : पूज्य आचार्य श्री विजय नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांना श्री गोडवाड जैन श्वेतांबर मूर्तीक पूजक संघाच्यावतीने ‘राष्ट्रसंत पदवी’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेले आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांचे ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. जयराज भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंजाब केसरी पू. आ. श्री विजय वल्लभसुरीश्वरजी यांचे पट्टधर व नुकतेच भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व महाराष्ट्र सरकारचे विशेष राजकीय अतिथी शांतीदूत पू. गच्छाधीपती आ. श्री विजय नित्यानंदसूरीश्वरजी म. सा. यांना अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव गणपतराज मेहता व सर्व ट्रस्ट मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत ही पदवी आणि सन्मानपत्र देवून सन्मानित केले. गुरुपूजनाचे लाभार्थी फतेचंद रांका परिवाराला गुरुदेव श्री यांच्यावर चादर अर्पण करण्याचा मान मिळाला.

विमलचंद संघवी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. फतेचंद रांका यांनी सांगितले, की आपल्या गुरूंच्या उपकारांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटतो. गुरूंच्या गुणांचे वर्णन करताना मुनिराज श्री मोक्षानंदविजयजी म. सा. म्हणाले, की गुरूंच्या आशीर्वादानेच संसारातील कठीण कामही सहज पूर्ण करता येतात. पू. आ. श्री नित्यानंदसूरीश्वरजी म. सा. यांनी काेणत्याही पदव्यापेक्षा लोकांचे प्रेम हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. समाजाच्या कल्याणासाठीच्या कामांमध्ये गोडवाड जैन श्वेताम्बर संघाचा सहभाग अधिक महत्त्वाचा आहे. 

या प्रसंगी विमलचंद संघवी यांनी ‘गोडवाड ९९’ हा ग्रंथ आचार्य श्री यांना समर्पित केला. या कार्यक्रमाचे संचालन विश्वस्त संपत जैन यांनी केले. आभार व्यक्त करताना संपत जैन यांनी गुरुदेव श्रींची विनम्रता व मधुर अमृतवाणीचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमात विश्वस्त प्रकाश छाजेड, संपत जैन, भद्रेश बाफना, सुरेश कुंकुलोल, अशोक लोढा, ललित लालवाणी, रोहित बाफना, किरण बलदोटा, पारस बोराणा, विजय नहार व समाजाचे मान्यवर उपस्थित हाेते, अशी माहिती संपत जैन यांनी दिली. 

जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात? CM फडणवीसांनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई- मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या वतीने विधिमंडळात मांडण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे फडणवीसांनी आज दिली. या वेळी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा कट कशा पद्धतीने आखला गेला, याची माहिती दिली. तसेच या प्रकरणावरून त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुषार खरात आणि इतरांनी जयकुमार गोरे प्रकरणात विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर, ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र, त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे, अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर हे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही. तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दादा एकदम दरडावून बोलतात, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. मात्री आम्ही दोघे, शांततेत बोलत असतो. मात्र तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला, तरीही आमच्यात एकी कायम राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड ज्यावेळी राज्यातील घटना घडामोडींबद्दल बोलत होते. त्यावेळी ते बांगलादेश विषय बोलता की काय? असा मला प्रश्न पडत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दंगेखोर आणि बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर झाला नसता तर चांगले झाले असते. मात्र तो स्वातंत्र्य सेनानी असल्यासारखी छाती बडवली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. दंगेखोर आणि बलात्कार यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. मात्र त्यांच्या विषयी कोणाच्या मनात संवेदना निर्माण झाली असेल तर ते योग्य नाही. त्या संदर्भात त्यांची मने तपासूनच पहावी लागतील, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. आप इतना भी गरज गरज के ना बरसों, की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं। खैर मुश्किल मुझ में तो अभी साख बाकी है, आप खुद अपनी फितरत के बारे में सच बोलो, आप में वह पहले वाली बात कहा बाकी है। सीबीआयने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या प्रकरणात आधी फोन शोधून काढला आणि नंतर फोन मधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे. या प्रकरणातले जे गुन्हेगार आहेत त्यांनी अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे. या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे, ती शिक्षा दिली जाईल. यासाठी सर्व प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहात दिले आहे.

सिंहगड किल्ला विकास आराखडा बैठक पंधरा दिवसात होणार

विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांची लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर

पुणे : सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड बैठक येत्या पंधरा दिवसात घेण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधीमंडळात दिली.

सिंहगड किल्ल्याची सध्या दूरवस्था आहे, तेथे हजारो पर्यटक दररोज येतात मात्र त्यांच्यासाठी चालण्यासाठी रस्ता सुध्दा नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी विकास आराखडा कधी होणार आहे?

किल्ल्यावर एकत्रित मालकी असलेल्या पुरातत्व विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रित बैठक कधी होईल असा प्रश्न खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधीमध्ये मांडला.

आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की, तापकीर यांनी मांडलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहेच. सिंहगड किल्ल्याच्या विकास आराखड्यासंदर्भात पुरातत्व, वन, सा‌र्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकारी या चार विभागाची एकत्रती मालकी आहे आणि त्यांच्यी त्या चारही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली होणे गरजेचे आहे. त्याबाबत येत्या पंधरा दिवसांमध्ये ही बैठीक होईल असे नियोजन केले जाईल.


आमदार तापकीर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सहा कोटींची वर्क ऑर्डर निघाली असल्याची माहिती दिली. या सहा कोटींमधून राजाराम महाराज समाधी परिसर, वाडा संवर्धन, कंत्राटीपध्दतीवर स्वच्छतागृह बांधकाम व देखरेख, कल्याण दरवाजा दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे.यातील काही कामे सुरु झाली आहे तर काही लवकरच सुरु होतील असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

राजसंन्यास’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’वर बंदी घाला:अमोल मिटकरी यांची मागणी; थोरातांची कमळा, प्रणयी युवराजचेही घेतले नाव


मुंबई:’राजसंन्यास’ ही राम गणेश गडकरी यांची कादंबरी, तसेच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘प्रणयी युवराज’, ‘स्वप्न भंगले रायगडाचे’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ यासारख्या नाटक अन् चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सभागृहात केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे आपण नेहमी नाव घेतो. एवढी मोठी संत परंपरा, महापुरुष लाभले असताना करही समाजद्रोही लोकांकडून जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान केला जातो. अलीकडेच नागपूरचं उदा. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करत ज्या प्रकारे धमकी दिली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्याला एका महिन्यानंतर अटक झाली. तर दुसरीकडे राहुल सोलापूरकर नावाच्या व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यावर एफआयआरदेखील झाला नाही. यावर आपण काही कडक कायदा करणार का नाही.

अमोल मिटकरी पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर आपण तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. नेत्यावर कुणी बोलले तर आक्रमक रित्या पुढाकार घेत कारवाई करा म्हणतो. पण महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा एखादा चिल्लर माणूस अवमान करत असेल आणि त्याला अटक होण्यासाठी महिनाभर लागत असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्ठीने चांगले नाही.

थोरातांची कमळामधून दाखवला अत्यंत वाईट प्रसंग

अमोल मिटकरी म्हणाले की, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची एक परंपरा आता सुरू झाली आहे. म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य करा आणि पोलिस सुरक्षा घेत सुरक्षित स्थळी जा हे राज्याला न शोभणारे आहे. एका चित्रपटानंतर तरुण पिढीने संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती घेण्यास सुरूवात केली. संभाजी महाराजांवर 20 नाटकं आणि 35 ते 40 चित्रपट आहेत जी युट्युबवर उपस्थित आहेत. उदाहरण द्यायचे असेल तर थोरातांची कमळा हा चित्रपट तुम्ही पाहिला तर त्यामध्ये संभाजी महाराज ते थोरात्याच्या कमळेला थेट बोहल्यावरुन उचलून नेतानाचा अत्यंत वाईट प्रसंग दाखवलेला आहे. इतकंच नाही सरकारकडून एक पुस्तक विकले जाते, त्यामध्ये संपूर्ण गडकरी असे एक नाटक आहे. म्हणजे रामगणेश गडकरी यांचे ते पुस्तक आहे त्या नाटकाचे नाव आहे राजसंन्यास आणि त्यामध्ये असे लिहले आहे की, संभाजी महाराज आणि तुळसा यांच्या नात्यामधील ते नाटक आहे, अशी पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी.

 फहीम खानच्या घरावर बुलडोझर, हायकोर्टाचे ताशेरे,म्हणाले,’कायद्यात चौकटीतच राहा , अन्यथा ही निवडक आणि हेतुपुरस्सर कारवाई ठरू शकते.

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने (NMC) नागपूर हिंसा प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली असून, कथित मास्टरमाइंड फहीम खान आणि आणखी एका आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. मात्र, मनपाच्या या कारवाईवर आता बॉम्बे उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने स्थगिती दिली आहे.फहीम खान नागपूर दंगलीत आरोपी केल्यावर कळले काय कि त्याचे घर हे अनधिकृत आहे ?त्यापूर्वी कळले कसे नाही ? असे सवाल उपस्थित होत असताना न्यायालयाने नमूद केले की, कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली पाहिजे, अन्यथा ही निवडक आणि हेतुपुरस्सर कारवाई ठरू शकते. याप्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत मनपाला कोणत्याही नव्या कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे.१७ मार्चला रात्री नागपूरात हिंसाचार (Nagpur Violence) उसळला होता. त्यानंतर या घटनेचा म्होरक्या फहीम खान सहित अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्याच्यासहित सहा जणांवर देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमच्या अन्य बाबींचा तपास करताना त्याच्या संजयबाग येथील ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने नागपूर महानगरपालिकेने ही तोडण्याची कारवाई केली होती.

हिंसेच्या घटनेनंतर मनपाने फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला होता. यावर फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही कारवाई पक्षपाती स्वरूपाची आहे आणि निवडक पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे यावर त्वरित स्थगिती दिली जाते. तसेच, राज्याच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता नागपूरातील यशोधरा नगर येथील यशोधरानगर येथील संजय बाग कॉलनीतील मनपाने फहीम खानच्या घरावर कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे महाल परिसरात एका अनधिकृत दोन मजली इमारतीवरही बुलडोझर चालवण्यात आला. मनपाने एक दिवस आधी नोटीस बजावली होती आणि अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. यानंतर आज सकाळी मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई करत ही इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, विद्युत वितरण कंपनीनेही या घराचा वीज पुरवठा खंडित केला. मनपाच्या या कारवाईनंतर बॉम्बे उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

नोटिस न देता बुलडोझर कसा फिरवलात? फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात भंगार व्यापारी किताबुल्ला हमीदुल्ला आणि त्यांच्या पत्नीला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यानंतर त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईविरोधात हमीदुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मालवण नगर परिषदेला नोटिस बजावली.

गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतानं विजय मिळवला. त्यानंतर किताबुल्ला यांच्या कुटुंबानं भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. यानंतर मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली रोडवरील किताबुल्ला हमीदुल्ला खान यांचं दुकान अधिकृत असल्याचं सांगत ते बुलडोझरनं पाडलं.कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता घर आणि दुकान जमीनदोस्त केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. किताबुल्ला हमीदुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली. ‘सर्वोच्च न्यायालयानं बुलडोझर जस्टिसविरोधात कठोर सूचना दिलेल्या आहेत. अशा कारवाया रोखल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेनं केलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करुन आमचं घर आणि दुकान कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाडण्यात आलं,’ असं हमीदुल्ला यांनी याचिकेत नमूद केलं आहे.आणि आपण कोणतीही भारत विरोधी घोषणा दिल्याचा त्यांनी इन्कार केला आहे.

10-12 सिलिंडरचे विस्फोट:सिलिंडर ठेवलेल्या ट्रकला आग

मुंबई – धारावी पोलिस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोड, दक्षिण वाहिनीवर, निसर्ग उद्यानाच्या फुटपाथ लगत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या व सिलिंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग लागून त्यामध्ये 10-12 सिलिंडरचे विस्फोट झाले आहे.सदर घटनेमध्ये कोणीही जखमी नसून आग लागलेल्या ट्रकच्या शेजारी पार्क केलेल्या साधारण तीन ते चार वाहनांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. आग लागलेल्या वाहन चालकाची ओळख निष्पन्न झाले असून सदर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची आग फायर ब्रिगेडच्या एकूण 19 गाड्यांनी आटोक्यात आणली आहे.
घटनास्थळावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच सहायक पोलिस आयुक्त तसेच पोलिस उपआयुक्त परिमंडळ पाच त्यांच्या स्टाफ सहित घटनास्थळावर हजर आहेत. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

ईशान्य मॉल मधील प्लिंक्स पबमध्ये महिला बाऊन्सरचा विनयभंग- दोघांवर गुन्हा दाखल

पुणे-येरवडा परिसरातील नामांकित ईशान्य मॉल मध्ये असलेल्या प्लिंक्स पब मध्ये दोन तरुण डान्स फ्लाेअरवर डान्स करत असताना त्यांचा धक्का इतर महिलांना लागत हाेता. त्यामुळे सदर तरुणांना समजवण्यास गेलेल्या महिला बाऊंसरचा आरोपींनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर येरवडा पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ७९, २९६, ११५ (२) , ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश दादाभाऊ घावटे (वय- ३४,रा. अण्णापूर, ता.शिरुर,पुणे) व यश कोतवाल (रा.काेरेगाव भीमा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. सदर आरोपी विरोधात ३० वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधीत घटना ही २३ मार्च राेजी रात्री पावणेएक वाजण्याचे सुमारास ईशान्य मॉल मधील प्लिंक्स पब मध्ये घडली आहे.

संबंधित महिला बाऊंसर ही मागील दोन वर्षापासून प्लिंक्स पब मध्ये नाेकरी करत आहे. तिची डयुटी सायंकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत असते. २२ मार्च राेजी रात्री सदर महिला तिच्या इतर सहकाऱ्यांसह काम करत असताना, हॉटेल किंग्ज फुडस अॅण्ड ब्रेवरेजस येथे रात्री दहा वाजता पब मध्ये गर्दी वाढली हाेती. त्यावेळी व्हीआयपी टेबल क्रमांक ४ येथे चारजण जेवण व मद्यपान करत बसले हाेते. २३ मार्च राेजी मध्यरात्री पावणेएक वाजता सदर टेबलवर बसलेला एक तरुण व त्याचा मित्र हे डान्स फ्लाेअरवर डान्स करत हाेते. त्यावेळी त्यांचा डान्स करणाऱ्या इतर महिलांना धक्का लागत हाेता. त्यामुळे त्यांना तक्रारदार यांनी बाजूला डान्स करण्यास सांगितले. त्यावर चिडून त्यातील एका तरुणाने मी बाजूला जाऊन डान्स करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणाला. त्यानंतर त्याने महिलेस अश्लील शिवीगाळ करुन तिला मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे बाेलत आक्षेपार्ह कृत्य केले. त्यामुळे महिलेने घाबरुन हॉटेलचे सुपरवायझर यांना बाेलवले.थाेड्यावेळाने तेथे मॅनेजरसह इतरही स्टाफ आला. त्यांनी संबंधित दोन आरोपींना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघे ऐकूण घेण्याचे मनस्थितीत नव्हते. त्यांनी महिलेसह स्टाफला शिवीगाळ करणे सुरुच ठेवल्याने त्यांना पब बाहेर घेऊन जाण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती हाॅटेलने दिल्यावर पोलिस सदर ठिकाणी येऊन त्यांनी संबंधित दाेघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले करत आहे.

कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांची जामीनावर सुटका:कामरा म्हणाला ,’मला पश्चाताप नाही..

मुंबई-कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.सुपारीच्या प्रश्नावर कुणाल म्हणाला की, तुम्ही माझे बँक खाते तपासू शकतात आणि मी सुपारी का घेऊ? मला पश्चाताप नाही, जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन.”, असे कुणाल कामराने म्हटले आहे

कुणाल कामराने विंडबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. या टीकेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सर्व वादावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने विचारले, तर मी माफी मागेन अशी एका वाक्यात कुणालने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे कुणालच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कुणालने गाण्यातून एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले होते. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओ आणि हॉटेल द युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली होती. याप्रकरणी तोडफोड करणाऱ्यांवर खार पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सुरूवातीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला. कोर्टाने सर्व 11 जणांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

या सर्व घडामोडींनंतर कुणाल कामरा याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ”मला ते बोलल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. जर न्यायालयाने मला विचारले तर मी माफी मागेन.”, असे कुणाल कामराने म्हटले आहे. मात्र, कुणाल कामराने ही प्रतिक्रिया माध्यमांना किंवा सोशल मीडियावर नाही तर पोलिसांना तक्रारीवर दिलेल्या उत्तरात दिली आहे. एनडीटीव्हीने पोलिस सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सुपारीच्या प्रश्नावर कुणाल म्हणाला की, तुम्ही माझे बँक खाते तपासू शकतात आणि मी सुपारी का घेऊ? मी मराठीत कोणताही कार्यक्रम केलेला नाही. मी हा कार्यक्रम हिंदीमध्ये केला आहे. मी सुपारी घेतली नाही, असे कुणाल म्हणाला.

कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार- शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

म्हणाले,’ पुण्यात दिसल्यास चोप देणार..!!

पुणे-कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा पुणे शहराच्या वतीने तीव्र निषेध करतो. तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या कामराचा आबारा का डाबरा करण्याचा कडक इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.कुणाल कामरा याने आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा या कुणाल कामराचा आबरा का डाबरा करायला आम्हाला वेळ लागणार नाही अशा कडक शब्दात पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी इशारा दिला. तसेच हा वाचाळवीर कुणाल कामरा पुणे शहरात दिसल्यास त्याला शिवसेना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

तथाकथित स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करून त्याच्या खालच्या पातळीचे वैचारिक दर्शन घडवले आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीतील नेतृत्वाला, लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असल्याचे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले आहे.

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे. अशा नेत्याविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हा केवळ शिंदे यांचाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.

लोकशाहीमध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मान आहे, मात्र त्याच्या मर्यादा ओलांडून अत्यंत हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला कधीही न शोभणारी आहे, कुणाल कामराची ही भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह्य नसून बेजबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या भावनांचा अपमान होईल.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील सिंथेटीक टेनिस कोर्टचा नूतनीकरण सोहळा उत्साहात संपन्न!

पुणे– मनपाच्या वतीने कोथरूड मध्ये विकसित केलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन सिंथेटीक टेनिस कोर्टचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हे क्रीडांगण म्हणजे कोथरूड-कर्वेनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा…आहे या शब्दात स्वप्नील दुधाने आणि माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले कि,’ आमच्प्रया भागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आपण २०१७ साली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्याच टर्ममध्ये पुणे मनपाच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित केले आहे. या ठिकाणी सन २०१७ आणि सन २०२० साली विकसित केलेल्या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचाही समावेश असून या टेनिस कोर्टचे नूतनीकरण आणि अद्ययावतिकारण होणे, काळाची गरज बनले होते. याचसाठी वेळोवेळी पाठपुरावा करत तब्बल २५ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणत आपण या कामाचा शुभारंभ केला होता.गेल्या आठ वर्षांपासून अनेक खेळाडूंनी या ठिकाणी सराव करत आपल्या पुणे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. आज खेळाडूंच्याच शुभहस्ते नूतनीकरण सोहळा संपन्न होत असताना अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या तब्बल चार दशकांपासून टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देणारे दत्तात्रय शिंदे आणि अनेक वर्षांपासून त्यांचा वारसा जपत खेळाडू या क्रिडा संकुलात घडवणारे प्रशिक्षक रोहित शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्व क्रीडाप्रेमी आणि पालक वर्गाला आपल्या पाल्याला खेळातही प्राविण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देत पुणे शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यात योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

६० वर्षीय विधवा महिलेच्या संघर्षाला यश – अखेर न्यायालयाच्या आदेशाने बिल्डरविरोधात गुन्हा दाखल!

पुणे : २४ मार्च २०२५

एका वयोवृद्ध विधवा महिलेने आपल्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाला अखेर यश आलेय , करारानुसार घराचा ताबा वेळेत न दिल्याने तसेच करारात नमूद केलेल्या सुविधा न पुरवल्याने, न्यायालयाने बिल्डर अलीअसगर याच्याविरोधात FIR नोंदवण्याचा आदेश दिला आहे वयोवृद्ध महिलेच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड.क्रांती सहाणे, अ‍ॅड सुरज जाधव, अ‍ॅड स्वप्नील गिरमे, अ‍ॅड आदिल दातरांगे, अ‍ॅड नेहा पिसे, अ‍ॅड नुपूर अरगडे, अ‍ॅड सागर मांढरे, यांनी बाजू मांडली.

ही वयोवृद्ध महिला एका मोठ्या आशेने घर घेण्यासाठी पुढे आली होती. वृद्धापकाळी आधार मिळावा, सुरक्षित घर मिळावे, आयुष्यभराच्या कष्टाची काहीतरी शाश्वती असावी या आशेने घर घ्यायला निघालेल्या या महिलेच्या स्वप्नांवर बिल्डरच्या फसवणुकीमुळे पाणी फिरले. वेळीच घराचा ताबा न मिळाल्याने, तसेच करारातील सुविधा न दिल्याने तिच्यासारख्या अनेक सदनिके धारकांना अन्याय सहन करावा लागत आहे.

६० वर्षीय विधवा महिलेने बिल्डरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करून लढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, पण न्यायालयाच्या आदेशाने अखेर २२ मार्च २०२५ रोजी अलीअसगर आयसक्रीमवाला बिल्डरविरोधात FIR नोंदवण्यात आली.

फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडाया महिलेच्या न्यायासाठी केलेल्या लढ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळू शकतो. फक्त योग्य मार्गाने संघर्ष करण्याची तयारी हवी!”ही कारवाई म्हणजे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्ससाठी धडा आहे! सामान्य लोकांचे हक्क हिरावणाऱ्या बिल्डर्सला आता जबाबदारी स्वीकारावीच लागेल. या महिलेसारख्या असंख्य ग्राहकांची स्वप्ने चिरडली जात आहेत, आणि आम्ही ते होऊ देणार नाही!”
— अ‍ॅड. तोसिफ शेख

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २४ : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर  होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेसना संगमनेर बसस्थानकामध्ये थांबा देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.