Home Blog Page 395

गौरव आहुजाला अखेर सशर्त जामीन मंजूर

पुणे:भरचौकात अलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर न्यायालयाने दिलासा दिला आहे. भारत देश सोडून जायचे नाही. दर सोमवारी ११ ते २ यावेळेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावायची अशा अटी शर्तींवर एन.एस बारी कोर्टाने आहुजाला जामीन मंजूर केला.
न्यायालयाने आहुजाच्या वडिलांना मुलाला समजावून सांगावे असे तोंडी सांगितले.

मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा (वय 25) या तरूणानं भर चौकात कार थांबवून लघुशंका केली होती. तसंच अश्लील कृत्य केलं होतं. येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यानंतर दोघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र गौरव आहुजा याने केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी येरवडा पोलिसांनी मुदतवाढीची दोनदा मागणी केली त्यामुळे आहुजा चा पोलीस कोठडीमधील मुक्काम वाढला. बुधवारी ( दि. २५) आहुजा यांचे वकील ऍड रमेश परमार व ऍड सुरेंद्र आसुणे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की आहुजा ने केलेल्या कृत्याला महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट चा कायदा लागू होत नाही तसेच त्याच्यावर लावण्यात आलेली सर्व कलमे ही जामीनपात्र आहेत. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आहुजा याला सशर्त जामीन मंजूर केला.

रिंग रोड साठी रेडिरेकनरच्या ५ पटीने मोबदला मिळणार असेल तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ: कदमवाकवस्तीचा आक्रमक पवित्रा

पुणे : विकासासाठी आमचा कोणाचाही विरोध नाही. रिंगरोड करण्यासाठी लागेल, तेवढ्या आमच्या जमिनी घ्या. पण मोबदला मात्र दोन अडीच पटीने नव्हे, तर रेडी रेकनरच्या पाच पटीने मिळाला पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेत कदमवाकवस्ती येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.प्रारुप विकास योजनेतील 65 मीटर रुंद रस्त्यासाठी सन 2015 च्या नवीन भूसंपादन अधिनियमाव्दारे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमीनीच्या भूसंपादन या प्रस्तावासंदर्भात कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी वरील भूमिका घेतली.

यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून विद्या गायकवाड, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

पुणे रिंग रोड हा 65 मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे 17 एकर जमीन (67581.54 चौ. मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे. प्रशासनाला जमीन खरेदी करून क्षेत्र विकत घ्यायचे आहे.

पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकहित व विकासासाठी क्षेत्र देऊन सहकार्य करावे. तसेच या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.

याला प्रतिउत्तर देताना अनेक शेतकरी आक्रमक झाले. यावेळी बोलताना शेतकरी गणपत चावट म्हणाले की, क्षेत्र देण्यासाठी आमची काहीही अडचण नाही. पण रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला आम्हाला मान्य नाही. जर शासनाने रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला दिला, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत. तसेच सर्कल जर रद्द केले तर व्यावसायिकांची दुकाने व शेतकऱ्यांची घरे वाचतील.

दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या. तसेच काही शेतकऱ्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले आहे. मात्र त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यांना मोबदला मिळणार का? यावेळी पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली आहे.

यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, उद्योजक बाळासाहेब भोसले, गणपत चावट, चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, सदस्य आकाश काळभोर, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, उदय काळभोर, सुशील काळभोर तुषार काळभोर, ग्रामसेवक अमोल घोळवे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र हे रिंग रोड मध्ये जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र देऊन विकासात हातभार लावावा. या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे.

  • कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी, पुणे भूसंपादन विभाग

शासनाला आम्ही क्षेत्र देण्यासाठी तयार आहोत मात्र, रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला न देता तो रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला द्यायला हवा, ५ पटीने मोबदला मिळणार असेल तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत.

  • गणपत चावट, शेतकरी, कदमवाकवस्ती (ता. हवेली)

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 26: जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडअडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.

क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेवून श्री. डुडी म्हणाले, क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरीता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणापत्राकरीता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल. क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस लावून इलेक्ट्रानिक ट्रन्झिंट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपआपल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करुन घ्यावी. खाणपट्टयात केलेले उत्खनन आणि त्याकरीता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदाराकंडून तपासून करून घ्यावा.

जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदेशीर कामकाज होत असल्यास प्रशासनास कळवावे, याबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. डूडी म्हणाले.

श्री. मापारी म्हणाले, तात्पुरते खाणपट्टाधारकांनी नियमाप्रमाणे ६ मीटर पेक्षाअधिक खोल खोदकाम करु नये, आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. मापारी म्हणाले.

श्री. जगताप यांनी जिल्ह्यातील खाणपट्टयाबाबत माहिती दिली.

श्री. कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडीअडचणींबाबत सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. २६: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करावी. यातील प्रलंबित राहिलेली प्रकरणांच्याबाबतीत त्यामागील कारणे शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करुन अधिकाधिक प्रकरणात कर्ज वितरीत करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पतपुरवठा आराखड्याच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक भूषण लगाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी आदींसह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) उद्दिष्ट ६ हजार ३७० कोटी असून फेब्रुवारी २०२५ अखेर उद्दिष्टाच्या १०२ टक्के म्हणजेच ६ हजार ५३१ कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. ही चांगली कामगिरी आहे. तथापि, मत्स्यवसाय तसेच पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत उद्दिष्टानुसार कर्ज वितरण होण्याची आवश्यकता असून यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कृषी मुदत कर्ज आणि कृषी पायाभूत सुविधांसाठीच्या कर्जाचा लक्ष्यांक वाढविण्यात यावा.

पुढील वर्षात कृषी पायाभूत सुविधांसाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी देण्यात येणार असून त्यासाठी पीक निहाय समूह पद्धतीने पायाभूत सुविधा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेंतर्गत निवडलेल्या पिकांच्या निर्यातीसाठी सर्व ती मदत करण्यात येणार आहे. काढणीपश्चात प्री कुलींग, वाहतूक, शेतमाल टिकविण्याची प्रक्रिया आदी शीतसाखळी निर्मितीसाठी मदत करण्यात येणार असून या अनुषंगाने कर्जपुरवठ्याबाबत बँकांचे सहकार्यही आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

सीएमईजीपीप्रमाणेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम स्वनिधी, मुद्रा, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पीएम विश्वकर्मा योजना आदी प्राधान्याच्या योजना असून त्याबाबतचे लक्ष्य बँकांनी पूर्ण करावे.

तळेगाव दाभाडे, थेऊर फाटा, हडपसर येथे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) उभारण्यासाठी निधी प्राप्त झाला असून यासाठी जागा आवश्यक असल्याचे संबंधित बँकांकडून सांगण्यात आले. त्यावर तात्काळ संबंधित तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरुन शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील म्हणाले, स्वयंसहायता बचत गटांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, लखपती दिदी योजनेंतर्गत कर्ज वितरणासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. शासनाच्या विविध योजनांमध्ये वेळेत कर्ज परतफेड केल्यास व्याज सवलत देण्यात येत असल्याने मुदतीत कर्ज परतफेड करुन योजनेचा लाभ घेण्याची लाभार्थ्याचा प्रयत्न असतो. यामुळे कर्ज थकित राहत नसल्याने बँकांनी लाभार्थ्यांच्या प्रस्तावावर जलदगतीने कार्यवाही करत कर्ज वितरणाचे काम करावे.

विविध आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र अथवा राज्य शासनाच्या अर्थसहाय्याव्यतिरिक्त लाभार्थ्याची मागणी पाहून त्यापैकी जिल्हा परिषदेने ७५ टक्के अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असून बँकांनी २५ टक्के कर्ज कर्ज द्यावे, असेही श्री. पाटील म्हणाले.

डॉ. मोहनवी यांनी २०२४-२५ चा पतपुरवठा उद्दिष्ट आणि गाठलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने बँकांनी चांगली कामगिरी केल्याचे सांगितले. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री. लघाटे म्हणाले, कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढून कर्जदारांमध्ये बँकांनी विश्वास निर्माण करावा.
दर महिन्याला आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करण्यासह त्यामध्ये आर्थिक व्यवहारांबाबत सायबर सुरक्षेच्या अनुषंगानेही जागृती करण्यात यावी, असे सदस्यांनी यावेळी सुचविले.

जिल्ह्याचा २०२४-२५ चा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा आहे. ३१ डिसेंबरपर्यंत २ लाख ७३ हजार कोटी पतपुरवठा करण्यात आला असून उर्वरित लक्ष्यही पूर्ण होईल असे बैठकीत सांगण्यात आले. पुढील वर्षाचा अंदाजित आराखडा ३ लाख ७ हजार कोटी रुपयांचा करण्यात आला आहे, अशी माहिती योगेश पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी नाबार्डच्यावतीने तयार करण्यात आलेल्या संभाव्यतायुक्त पत आराखडा- २०२५-२६ चे (पीएलपी) प्रकाशन करण्यात आले.

ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि या पदावर बसवले त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देणार – अजित पवार

तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही;प्रवेशकर्त्यांना अजित पवार यांचा शब्द…

येत्या काही दिवसात मविआचे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील – सुनिल तटकरे

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

मुंबई दि. २६ मार्च – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.उबाठा गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदाताई म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली.

कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले.शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.नुसत्या भाषणांनी पक्ष वाढणार नाही त्या भाषणातून फक्त विचार घेता येतात. लोकांपर्यंत जाऊन काम करायला हवे असे सांगतानाच तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी आज प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांना दिला.

येत्या काही दिवसात मविआचे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील – सुनिल तटकरे

महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी येत्या काही दिवसात अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यात एक वलय निर्माण करण्यात माणिकराव जगताप हे यशस्वी झाले आहेत. महाड – पोलादपूर इथल्या जनतेने त्यांच्यावर भरपूर प्रेम केले आहे. माझ्या लोकसभा निवडणुकीत स्नेहल जगताप हिने मला मदत केली नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत माझी मदत स्नेहल जगताप यांना झाली नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.देशात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर लोककल्याणकारी कामे आपण करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराने आज अनेक लोक पक्षासोबत जोडली जात आहेत. सामाजिक समतेचा हुंकार ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या भूमीत काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुमच्या पाठीशी उभी केली जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघात ९२ हजार मते मिळाली परंतु मला विजयापर्यंत जाता आले नाही. मात्र ज्यांनी संधी दिली आणि ज्यांनी विरोधात काम केले त्यांचे आभार महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी मानले.तळा, म्हसळा या तालुक्यांचा विकास ज्यापध्दतीने केला जात आहे त्याचपध्दतीने महाड – पोलादपूरचा विकासही तटकरेसाहेबांनी करावा अशी अपेक्षा स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी माझे वडील पक्षाचे सदस्य होते. आज मला या कुटुंबात परत आल्याचे समाधान वाटत असल्याचे स्नेहल जगताप म्हणाल्या.महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यासह रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप,श्रेयस जगताप,तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जिल्हा परिषदचे माजी सभापती नारायण डामसे,माजी सभापती जयवंतीताई हिंदूळा आदींसह कर्जत तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे,रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे,प्रदेश उपाध्यक्ष कप्तान मलिक, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, रायगड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती उमाताई मुंडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री नितेश राणेंची राजकीय फायद्यासाठी दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त विधाने, तरीही मुख्यमंत्र्यांकडून कारवाई नाही.

नागपूर हिंसाचारासह राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. २६ मार्च २०२५
राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपाच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री आणि मंत्री यांची वर्तणूक संविधानविरोधी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन नागपूर हिंसाचारासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सविस्तर निवेदन दिले. या शिष्टमंडळात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अमिन पटेल, आ. भाई जगताप, आ. विकास ठाकरे, आ. राजेश राठोड, आ. संजय मेश्राम, आ. बाळासाहेब मांगुळकर, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह नेते उपस्थित होते.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याचे मत्स्यपालन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राजकीय फायद्यासाठी दोन धर्मात तेढ निर्माण व्हावे या उद्देशाने सातत्याने वादग्रस्त विधाने केली आहेत. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे याचाच अर्थ राज्यातले सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडावी हे राज्य सरकारचे धोरण आहे. औरंगजेबाची कबर ही केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. अशा केंद्र सरकार संरक्षित वास्तूचे संरक्षण करण्याची राज्य सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे असे असतानाही भाजपचे मातृसंस्था असणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संस्था औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन करतात. राज्याचे मुख्यमंत्री आणि नितेश राणेसारख्या मंत्र्यांना संविधानाच्या आधारे मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे. राज्य संविधानाच्या आधारे चालावे याची संविधानाचे संरक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण राणेंसारख्या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी कराल अशी अपेक्षा होती.

नागपूर शहरात रामनवमी व ताजुद्दीन बाबाचा उरुसामध्ये दोन्ही धर्माचे लोक उत्साहाने सहभागी होतात. नागपूर शहराने आजपर्यंत सामाजिक सौहार्द टिकवण्याचे काम करुन एक आदर्श घालून दिला आहे, याच नागपूर शहरात धार्मिक मुद्द्यावर हिंसाचाराची घटना घडावी हे अत्यंत चिंताजनक व निषेधार्ह आहे. नागपूर शहरात हिंसाचार का उसळला, त्याची माहिती घेण्यासाठी तसेच शहरात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सत्यशोधन समितीने नागपूरला भेट दिली पण पोलीसांनी या समितीला दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारली. काँग्रेसच्या समितीने सामाजिक संस्था व स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधून या दंगलीची माहिती जाणून घेतली, त्याची माहितीही राज्यपाल महोदयांना दिली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पुण्यातून यूपी ला पळवून नेणाऱ्या मंगळवार पेठेतील तरुणाला पकडले, मुलीची मेरठ मधून केली सुटका

पुणे- पुण्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून लग्नाचे उत्तर प्रदेश राज्यात पळवुन नेलेल्या मंगळवार पेठेतील शावेद शब्बीर शेख या १९ वर्षीय तरुणाच्या मुसक्या बांधून मेरठ मधून या अल्पवयीन मुलीची सुटका पुणे पोलिसांनी केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत एक अल्पवयीन मुलीस तिचे आई वडीलाचे कायदेशीर रखवालीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेले बाबत दिनांक ०२/०२/२०२५ रोजी गुन्हा रजि.नं. २५/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा करुन सदरचा गुन्हा महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक शितल जाधव याचेकडे तपास दिल्याने त्यांनी तपास सुरु केला होता .
अल्पवयीन मुलीबाबत वरिष्ठाचे आदेशाने तात्काळ कारवाई करुन, त्याचा गांभीर्याने शोध घेणेबाबत आदेश असल्याने, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे शहर संदिप सिंग गिल, यांनी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रशांत भरमे यांना सुचना दिल्याने लागलीच त्याचे अधिपत्याखालील तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक अरविद शिदे यांना आदेश दिल्याने सदर बाबत तांत्रिक विश्लेषन करुन, स.पो. फौज महेबुब मोकाशी याना माहिती प्राप्त झाली की, सदर मुलगी सध्याचा ठावठिकाणा हा उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ शहरात आहे. त्याबाबत लागलीच वरिष्ठांची परवानगी घेवुन तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक अरविद शिदे, सहा. पोलीस फौज. मेहबुब मोकाशी, पोलीस अंलदार तानाजी नांगरे, गजानन सोनुने, महिला पोलीस अंमलदार रेखा राऊत असे पथक तयार करुन, त्यांना उत्तरप्रदेश राज्यात मेरठ या शहरात पोहचले . शामनगर झोपडपटटी भागात मुलीचा कसोशीने शोध घेतला असता तीचे सोबत एक इसम मिळुन आल्याने त्याचेकडे सखोल चौकशी करुन, सदर मुलीस लग्नाचे अमिष दाखवुन पळवुन घेवुन गेलेला आरोपी नामे शावेद शब्बीर शेख वय १९ रा. मंगळवार पेठ पुणे यास ताब्यात घेवुन चौकशी अंती वर नमुद गुन्हयामध्ये फरासखाना पोलीस स्टेशन येथे अटक केली, व अल्पवयीन मुलीस तिचे आई वडीलांचे ताब्यात सुखरूप देवुन फरासखाना पोलीसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिप सिह गिल , सहा. पो. आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पो. नि. (गुन्हे) अजित जाधव, सहा. पो. निरी. शितल जाधव, पोलीस उप.निरी. अरविंद शिंदे स.पो. फौज. मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, सुनिल मौरे, तानाजी नागंरे, गजानन सोनुने, गौस मुलाणी, नितीन जाधव व महिला पो. अमंलदार रेखा राऊत यांनी केलेली आहे.

गणेश पेठेत मॅफेड्रॉन (एम.डी.) विकणाऱ्या सराईतास पकडले,सुमारे ६ लाखाचे MD हस्तगत

0

पुणे- गणेश पेठेत मॅफेड्रॉन (एम.डी.) विकणाऱ्या सराईतास पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून सुमारे ६ लाखाचे MD हस्तगत करण्यात आले आहे बडे सय्यद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी गजा आड केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ पोलीस उप आयुक्त परि. १ संदिपसिंह गिल यांनी हद्दीतील सर्व तपास पथकांना सुचना देवुन अंमली पदार्थ विक्री करणा-याची गुप्त माहीती काढून कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे दि.२५/०३/२०२५ रोजी श्रध्दा सोप कंपनीच्या समोर, नाडे गल्ली, गणेश पेठ पुणे येथील सार्वजनिक रोडवर अझहर ऊर्फ बडे सय्यद वय ३१ वर्षे रा. नाडे गल्ली, गणेश पेठ, पुणे हा सदर भागात मॅफेड्रॉन (एमडी) ची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार महेश राठोड व समीर माळवतकर यांना त्याचे बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनीं तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
सदर ठिकाणी जावून सापळा रचुन कार्यवाही केली असता आरोपी अझहर ऊर्फ बडे सय्यद रा.नाडे गल्ली, गणेश पेठ यांचे ताब्यात ५,८७,३००/-रू. कि.चे २९ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एम.डी.) मुद्दे मालजप्त करण्यात आले असून पोलीस अंमलदार महेश राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरासखाना पोलीस स्टेशनला गु.र नं. ५८/२०२५ कलम एन. डी. पि. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीने हे एम.डी. कोठून विकत घेतले त्याबाबत तपास सरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहा. पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भरगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहा. पोलीस निरी. वैभव गायकवाड, पोलीस उप निरी अरविंद शिंदे सहा.पो.फौज. मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागंरे, गजानन सोनुने, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली

ससून मधून कैदी पळाला

पुणे- ससून रुग्णालयात उपचारासाठी असलेला विनयभंग गुन्ह्यातील आरोपी हा नेमणुकीस असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी संतोष साठे (वय ५० वर्षे रा. म्हसोली ता. कराड) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव असून याबाबत त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की,बुधवारी सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी ससून हॉस्पिटल वॉर्ड क्र 18 येथे उपचारासाठी दाखल असलेला आरोपी संतोष साठे हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अमलदारांची नजर चुकवून पळून गेला आहे. त्याच्यावर कराड तालुका पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.या विनयभंगाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला मंगळवारी ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी कराड पोलीस स्टेशनचे दोन गार्ड कर्तव्यावर हजर होते मात्र, त्यांची नजर चुकवून संबंधित आरोपी हा पसार झाला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेची पाहणी करण्यात आली असून संबंधित आरोपीचा माग काढण्यात येत आहे याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहे.

केंद्र सरकारच्या ‘NAMASTE’ योजनेची अंमलबजावणी करणारे पुणे ठरले देशातील पहिले शहर

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ कडून कचरा वेचकांच्या नोंदणीस सुरुवात

पुणे, २६ मार्च २०२५: देशातील कचरा वेचकांना सामाजिक आणि आर्थिक सन्मान मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावे आणि त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘NAMASTE’ (National Action for Mechanized Sanitation Ecosystem) योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली. केंद्र सरकारतर्फे अधिकृत नोंदणी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे या योजनेद्वारे कचरा वेचकांना मिळतील. यासाठी स्वच्छ संस्था, पुणे महानगरपालिका आणि कष्टकरी पंचायत यांनी पुढाकार घेत पुण्यातील नोंदणी शिबिरास आज सुरुवात केली.

कचरा वेचकांना आणि त्यांच्या कामाला नसलेली ओळख, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा आभावाने मिळणारा लाभ यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. NAMASTE योजना हे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे आणि असंघटित कचरा वेचकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहात (SWM) समावेशासाठी सक्ती करते. हा महत्त्वाचा टप्पा कचरा वेचकांच्या अदृश्य परंतु अमूल्य योगदानाची अधिकृतपणे दखल घेईल आणि त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविकेसाठी सक्षम करेल.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) मार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. अर्बन मॅनेजमेंट सेंटर (UMC) आणि UNDP हे या उपक्रमाला तांत्रिक सहाय्य करत आहेत.

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्थेचा पुढाकार
NAMASTE योजनेची अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळे ‘स्वच्छ (SWaCH) आणि कष्टकरी पंचायत’ यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने कचरा वेचकांना औपचारिकरित्या घनकचरा व्यवस्थापनात सामील करून त्यांना सन्मानजनक व सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा म्हणून, २६ मार्च २०२५ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

या कार्यक्रमाचे उद्घाटन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि उपायुक्त श्री. संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप आणि मुकुंद बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कष्टकरी पंचायतचे आदित्य व्यास यांनी केले.

स्वच्छ संस्थेच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेने कचरा वेचकांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यामध्ये देशात पुढाकार घेतला. मागील २० वर्षांच्या या भागीदारीची दखल घेत केंद्र सरकारच्या NAMASTE योजनेची आज पुण्यात सर्वप्रथम सुरूवात झाली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमधून इतर शहरांना देखील प्रेरणा मिळेल. ‘NAMASTE’ सारख्या उपक्रमांद्वारे कचरा वेचकांसोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील” – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी

“मागील ३० वर्षांत पुण्यातील कचरावेचकांनी संघर्ष करून ओळखपत्र आणि इतर कामगारांप्रमाणे सरकारी योजनांचा हक्क मिळवला. पुणे महानगरपालिकेसोबत काम करताना आम्हाला व आमच्या कामाला मान्यता मिळाली, आणि आता NAMASTE योजनेद्वारे केंद्र सरकारमार्फत आमची कामगार म्हणून अधिकृत नोंदणी होत आहे. हे आमचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,” अशा भावना स्वच्छ च्या कचरा वेचक प्रतिनिधी सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.

‘NAMASTE Waste Picker Portal’ आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आज ५० हून अधिक कचरा वेचकांची नोंदणी करण्यात आली. यापुढेही कचरा वेचकांची नोंदणी नियमितपणे सुरू राहणार आहे. कचरा वेचकांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक रोजगाराचा मार्ग या योजने अंतर्गत त्यांना प्राप्त होणार आहे. कचरा वेचक हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत, मात्र आजवर त्यांना अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. NAMASTE योजनेमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, तसेच पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या उपक्रमामुळे शहराची स्वच्छता अधिक सक्षम होईल आणि कचरा वेचकांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.

जयवंत दळवी यांचा लेखनात कधीही तोल गेला नाही : संजय मोने

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजनअभिवाचन, दृकश्राव्य माध्यमातून उलगडले समग्र जयवंत दळवी

पुणे : जयवंत दळवी आयुष्यात कधीही माणसात रमले नाहीत; परंतु त्यांच्या लेखनातून मात्र ते कायम माणसातच रमलेले दिसतात. व्याकरणातील सगळे रस त्यांनी लेखनात वापरले त्यातील रौद्र, बिभत्स, शृंगार, क्रोध असे अनेक टोकाचे रस वापरताना देखील त्यांचा कधीही तोल गेला नाही. ढोल न पिटता स्त्रीवादी लेखकाची भूमिका जयवंत दळवी यांनी उत्तम रितीने पार पाडली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी केले. कार्यक्रमाला पुणेकरांची गर्दी पाहता जयवंत दळवी यांची लोकप्रियता आजही टिकून आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

विख्यात लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‌‘कॅलिडोस्कोप : जयवंत दळवी‌’ या विशेष कार्यक्रमाचे आज (दि. 25) बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गिरीश जयवंत दळवी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संजय मोने बोलत होते. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या जान्हवी जानकर, प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती चिटणीस, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सतिश जकातदार, शैलेश दातार, राजेश दामले मंचावर होते. कार्यक्रमाची निर्मिती संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची तर संहिता लेखन सतीश जकातदार यांनी केले. संयोजन निकिता मोघे यांनी केले. नाटक, चित्रपटातील दृश्ये, सशक्त अभिवाचनातून जयवंत दळवी यांचे समग्र दर्शन घडले.
रेखा इनामदार-साने, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, विजया मेहता, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे जयवंत दळवी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. ‌‘बॅरिस्टर‌’, ‌‘नातीगोती‌’, ‌‘सूर्यास्त‌’ या नाटकांमधील, ‌‘चक्र‌’, ‌‘रावसाहेब‌’, ‌‘महानंदा‌’, ‌‘उत्तरायण‌’, ‌‘पुढचं पाऊल‌’ चित्रपटांची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली.
अभिवाचन कार्यक्रमात अभिनेत्री स्वाती चिटणीस (नातीगोती), शैलेश दातार (स्वगत), राजेश दामले (मोहिनी दिवाकर), अभिनेते संजय मोने (ठणठणपाळ) यांचा सहभाग होता.
जयवंत दळवी यांच्या नाट्यकलाकृती, त्यांच्या प्रत्यक्ष भेटी याविषयी संजय मोने यांनी आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण, शहरी पार्श्वभूमी, यांत्रिकीकरणामुळे झालेले बदल अशा विविध विषयांवरील उत्तम साहित्यकृतींची निर्मिती जयवंत दळवी यांनी केलेली दिसते. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता दळवी यांनी शांतपणे आणि तटस्थपणे लेखन केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

साहित्यिक कार्यक्रमाला झालेली पुणेकरांची गर्दी आनंददायक आहे, असे सांगून रामदास फुटाणे म्हणाले, जयवंत दळवी यांच्या सहवासातील अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संवादचे सुनील महाजन अविरतपणे कार्यरत आहेत, याबद्दल त्यांनी कौतुक केले.

विजया मेहता म्हणाल्या, जयवंत दळवी हे मनस्वी दडपण घेऊन वावरणारे लेखक होते. त्यांच्या कलाकृतीत विषयाची मांडणी आणि पात्रे यांची चपखलता जाणवते.
रेखा इनामदार-साने म्हणाल्या, दळवी लोकप्रिय आणि गंभीर लेखक होते. त्यांच्या लिखाणात वास्तवाचे यथातथ्य चित्रणच नव्हे तर त्याला कल्पनेची जोडही होती. समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीची नस त्यांना उमगली होती.
विक्रम गोखले म्हणाले, मानवी मनाची गुंतागुंत सक्षमपणे मांडणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी होय. दिलीप प्रभावळकर म्हणाले, अभिनेता म्हणून दळवींची नाटके केल्याने माणूस म्हणून माझ्या व्यक्तीमत्त्वात खूप मोठा फरक पडला. माझ्या लिखाणावरही दळवी यांच्या लेखनाचा मोठा प्रभाव आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, मनात आलेला प्रत्येक विचार सगळ्यांना बोलता येत नाही. ते विचार आपल्या लेखनातून मांडणे हे दळवी यांच्या नाटकातील व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य होय. दळवींनी लिहिलेली पात्रे अभिनित करताना व्यक्तिरेखांच्या आत शिरून विचार कसा करायचा हे मला उमगले. सुसंस्कृतपणाचा बुरखा फाडून लेखन ही दळवी यांची हातोटी होती.
प्रसाद ओक म्हणाले, माझ्या आयुष्यातील दळवी यांचे स्थान मोलाचे आहे. ते अस्सल नाटककार होते.

बिगर नंबर प्लेटच्या बाईकवर … माहिती मिळताच दोघांना पकडले अन ते निघाले बाईकचोर, ३ बाईक जप्त

पुणे- पोलिसांना दोघे जन नंबर प्लेट नसलेल्या बाईक वरून गेल्याची माहिती एकाने पोलिसांना दिली , पोलिसांनी माग काढला आणि त्यांना पकडले अन ते निघाले बाईक चोर , या दोघा चोरट्यांकडून ३ बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर, गुन्हा रजि नं ८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात गोपीनाथ नगर कोथरुड पुणे येथील दत्त मंदीराचे समोरुन मोपड चोरी झालेबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यायातील चोरीस गेलेली मोपडेचा व अज्ञात चोरट्यांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे दि.२३/०३/२०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस अमंलदार योगेश सुळ व हनुमंत माळी असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शास्त्रीनगर पोलीस चौकीचे चौकी अमंलदार योगेश सुळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेघसृष्टी गोपनाथ नगर कोथरुड परीसरात दोन अनोळखी इसम हे संशयीतरीत्या एका काळ्या रंगाच्या बिगर नंबर प्लेटचे अॅक्टीव्हा स्कुटरवर फिरत आहेत. सदरच्या माहिती प्रमाणे मेघसृष्टी गोपीनाथनगर, कोथरुड येथे दोन अनोळखी इसम बिगर नंबर प्लेटचे अॅक्टीव्हा गाडीवर फिरताना मिळुन आले. सदर इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) आकाश सुरेश वाघिरे वय २१ वर्षे, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ कोकांडे वस्ती शिवमंदीरा जवळ शिवाजीनगर पुणे २) आदित्य भारत जाधव वय २१ वर्षे रा. मनोहर क्लासिक बिल्डींग फ्लॅट नं.१०, तिसरा माळा चंदननगर खराडी पुणे अशी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेकडील मिळुन आलेली अॅक्टीव्हा स्कुटरचे मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची माहिती दिली त्यामुळे त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारले असता त्यांनी सदरची अॅक्टीव्हा ही बालाजीनगर, भारती विद्यापीठ कात्रज पुणे येथुन चोरी केल्याचे कबुल केले म्हणुन त्यांना लागलीच कोथरुड पोलीस ठाणेत आणुन त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन मोटर सायकली चोरी केल्याचे कबुल केले व सदर मोटर सायकली ह्या काढुन दिले आहेत. तपासादरम्यान आरोपीचे ताब्यातून एकूण ८४,०००/- रु. कि.च्या तीन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या आरोपींनी कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं.८४/२०२५, लोणी काळभोर पोलीस ठाणे गु.र.नं.१२६/२०२५ व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं.१७६/२०२५ मधील मोटर सायकल चोरीचे तीन गुन्हे कोथरुड पोलीस ठाणे पुणे शहर पोलीसांनी उघड केले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परि ३ श्री. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, भाऊसाहेब पठारे यांचे मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस उप निरीक्षक बसवराज माळी, पोलीस अमंलदार योगेश सुळ, हनुमंत माळी यांचे पथकाने केली आहे.

स्टार्टअप्स च्या माध्यमातून भारत महासत्ता बनेल-डॉ. पंकज जैन 

ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ चे उद्घाटन

पुणे, दि.२६ मार्च : “अभिनव कल्पना, नवनिर्मिती, प्रतिभा, चौकटीबाहेरील विचार यांची सांगड ही यशस्वी स्टार्टअप होण्यासाठी महत्वाची आहे. यातूनच भारत भविष्यातील महासत्ता बनेल. जगामध्ये भारतीय बाजारपेठ खूप मोठी असल्याने येथे लाखो स्टार्टअप सुरू होण्याची गरज आहे.” असे विचार डॉ. पंकज जैन यांनी व्यक्त केले.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्याच्या दृष्टिने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या तीन दिवसीय स्पर्धांचे उद्घाटन युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी ब्लू ओशन स्टील्स चे सीईओ डॉ. पंकज जैन, नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, यूएसएचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश कोरडे आणि अ‍ॅसेंच्यूअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहरोत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र-कुलगुरू व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. मिलिंद पांडे, डॉ. कृष्णा वर्‍हाडे, डॉ. कृष्णप्रसाद गुणाले, डॉ. अंजली साने, डॉ. मंगेश बेडेकर, डॉ.अक्षय मल्होत्रा व डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती उपस्थित होते.  
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या स्टार्टअप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. पंकज जैन म्हणाले,“विद्यार्थ्यांमध्ये अद्वितीय गुण असतात, जे त्यांना उत्तम उद्योजक बनवू शकतात, ते चौकटीबाहेर विचार करू शकतात, नवीन परिस्थितींशी लवकर जुळवून घेतात. तंत्रज्ञानावरील त्यांचे प्रेम त्यांना उद्योन्मुख ट्रेंड ओळखण्यास व त्यांचा फायदा घेण्यास मदत करते. याच गोष्टींच्या आधारावर स्टार्टअपच्या माध्यमातून देश महासत्ता बनेल.”
राजेश कोरडे म्हणाले,“ युवकांमध्ये असलेल्या उर्जेचा उपयोग स्टार्टअपमध्ये परिवर्तन करण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांनी सहकार्याची भावना ठेऊन नव कल्पनांना भरारी दयावी. देशात वाढत जाणार्‍या लोकसंख्येला पाहता येथे लाखो स्टार्टअप उभे करण्याची गरज आहे. अशा वेळेस युवकांनी आपली क्षमता ओळखून स्टार्टअप्स्मध्ये रचनात्मक काम करावे.”
भूपेश गहरोत्रा म्हणाले,“देशातील सर्व समस्यांवरील समाधान शोधण्याचे एकमेव साधन म्हणजे हॅकेथॉन होय.तसेच विद्यार्थ्यांनी अपयशातून शिकत राहावे. हॅकेथॉन हे मुलांचे ट्रेनिंग सेंटर असून एआय चा वापर करून नवे स्टार्टअप्स् सुरू करावेत. प्रत्येकाला गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“ स्टार्टअपमधून उद्याचा भारत सक्षम होऊ शकतो. अशावेळी आम्ही कोणतेही स्टार्टअप उभे करण्यासाठी टीबीआयच्या माध्यमातून सर्वतोपरी कार्यरत आहोत. आंत्रप्रेन्युअरशीपसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे.”
डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,“हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू मधून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल. यातून सृजनात्मकता समोर येऊन विद्यार्थी स्वःताचे स्टार्टअप सुरू करू शकतील. उद्योजक बनण्यासाठी कोणत्याही डिग्रीची आवश्यकता नसते. हॅकॅथॉन या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना सतत नवी दिशा मिळत असते. देशाचे भवितव्य घडविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण या जागतिक समस्या केवळ आंत्रप्रेन्युअरशिपच्या माध्यमातून सोडविता येईल. तसेच महिला उद्योजकांची वृद्धि होण्यासाठी एमआयटी टीबीआय अधिक प्रयत्नशील आहे. ‘माइंड टू मार्केट’ आणि ‘पेपर टू प्रोडक्ट’ ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना द्यावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याच्या हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येते. जागतिक शांतताप्रिय समाजाची मानसिकता ठेऊन विद्यार्थ्यांनी नवकल्पनांना भरारी द्यावी.”
पार्थ आणि गौरव या विद्यार्थ्यांनी प्रास्ताविक केले. पियुष मोटवानी आणि अल्फिया सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कृष्णप्रसाद गुणाले यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा:एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय

एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय
पुणे : महाराष्ट्र राज्यातील एकूण १,७२४ सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-यांनी दहा-वीस-तीस अंतर्गत एस-१४ वेतनश्रेणी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. पोलीस महासंचालक यांनी ६ आॅगस्ट २०२४ रोजी गृह विभागाला पाठवलेल्या प्रस्तावावर तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा आणि याचिकाकर्त्यांना १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढीचे फायदे  शासन निर्णय  २/३/ २०१९ व  २५/२/२०२२ चे शासन आदेशानुसार देण्याची शिफारस करावी, असे निर्देश न्यायालयाने  दिले आहेत.

शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास, थकीत रकमेची गणना करून नवीन वेतन निश्चितीची कार्यवाही त्वरित करावी. या निर्णयामुळे सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-यांना न्याय मिळाला असून, त्यांच्या वेतनातील तफावत दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. संपत महादेव जाधव आणि विनायक महादेव खंदारे यांनी केलेल्या या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  रवींद्र व्ही. घुगे आणि अश्विन डी. भोबे यांनी हा निर्णय दिला, अशी माहिती संपत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सदाशिव भगत (उपाध्यक्ष  पुणे), हनुमंत घाडगे (उपाध्यक्ष पुणे ग्रामिण), गिरी,  शरद बोंगाळे (खजिनदार) उपस्थित होते. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पोलिस बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पोलिस नाईक पद रद्द केलेने पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार यांच्या मूळ वेतन स्तरात फक्त १०० रुपयांच्या ग्रेड पे फरकामुळे झालेल्या अन्यायाचे निराकरण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

संपत जाधव म्हणाले,  न्यायालयाच्या आदेशानुसार, ९० दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्य गृह सचिवांनी आदेशांच्या पालनार्थ त्वरित कार्यवाही करावी, यासाठी संपत जाधव यांनी  सर्व संबंधितांना लेखी पत्रव्यवहार केला आहे आणि सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे केव्हेटही दाखल केली आहे. सध्याच्या अधिवेशनानंतर,  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री अजित पवार हे उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे पालनार्थ लवकरात लवकर आदेश पारित करतील. जर १५ दिवसांच्या आत आदेश निर्गमित झाले नाहीत, तर मुख्य गृह सचिवांना नोटीस देऊन उच्च न्यायालय, मुंबई येथे अवमान याचिका दाखल केली जाईल.

सरकारी वकिलांनी ६ मार्च २०२५ रोजीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले की, ९ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशाच्या पालनार्थ वित्त सचिवांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि लवकरच कार्यवाही होईल. त्यामुळे, न्यायालयाने ६ मार्च २०२५ रोजीच्या ६९३ याचिकाकर्त्यांच्या याचिकेतही ९ डिसेंबर २०२४ च्या आदेशाप्रमाणेच निर्णय दिला आहे, ज्यामध्ये १ जानेवारी २०१६ पासून लाभ देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार, नाईक पद भूतलक्षी प्रभावाने रद्द करून, सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनुसार अनुक्रमे पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस फौजदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांची एस-१४ वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊन वेतनातील तफावत दूर होईल.

पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली निखिल गुप्ता यांनी ६ आॅगस्ट २०२४ रोजी शासनास प्रस्ताव पाठवला आहे. पहिल्या पदोन्नत्या काढून घेतल्याशिवाय सुधारित पदोन्नती देणे संयुक्तिक नसल्याने, गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याचिकाकर्ते संपत जाधव यांनी पोलीस महासंचालक, स्वीय सहाय्यक आणि कार्यालयीन प्रशासकीय अधिका?्यांचे आभार मानले आहेत.  याचिकाकर्त्यांच्या वतीने  उच्च न्यायालयात विष्णू मदन पाटील यांनी काम पाहिले आहे.

स्वतःच्या मावशीच्या घरात केली चोरी पण पोलिसांनी अवघ्या तीनच तासातच घातल्या बेड्या

पुणे-स्वताच्या मावशीच्या घरी चोरी केली खरी त्याने , पण पुणे पोलिसांनी त्याला अवघ्या ३ तासात हुडकला आणि १ लाख २२ हजाराच्या चोरीच्या मुद्देमालासह गजाआड केला .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’फिर्यादी मावशी या ह्या त्यांचे राहते घराचा दरवाजा ओढुन घेवुन त्यांचे मुलीच्या घरी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा १,२२,०००/- चा ऐवज चोरून नेला म्हणुन यातील त्यांनी लष्कर पोलीस स्टेशन, येथे तक्रार दिल्याने अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा रजिस्टर क्र. ५३/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना, फिर्यादी यांचे घराजवळील बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी किरण राजेश कुंटे वय २८ वर्षे धोबी घाट कॅम्प पुणे याच्याकडे त्यास विश्वासात घेवुन तपास केला .. तेव्हा त्याने त्याची मावशी फिर्यादी यांच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने आला असता, त्याला त्याच्या मावशीचे घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. त्याने गुपचुप चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट उघडुन त्याच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले वरीलप्रमाणे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,०००/-रू. चोरल्याने तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडुन चोरी केलेली सर्व सोन्याचे दागिने रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उप आयुक्त, परि-२, श्रीमती स्मार्तना पाटील , सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग दिपक निकम, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकगिरीश कुमार दिगांवकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे), प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, लोकेश कदम, सागर हराळ, महिला पोलीस अंमलदार अलका ब्राम्हणे यांनी केली आहे.