Home Blog Page 378

वडगाव,धायरी, सिंहगड रस्ता परिसरात तासभर वीज खंडित

महापारेषणच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड;

पुणे, दि. ०४ एप्रिल २०२५: महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास सुमारास बिघाड झाला. त्यामुळे शहरातील सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, किरकीटवाडी, नांदेड सिटी या परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अर्धा तास खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीमध्ये आज सायंकाळी ५.४५ वाजता बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या १३ उपकेंद्रांसह ६६ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामुळे वडगाव, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी, नांदेड गाव, सिंहगड रस्ता आदी परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी ६.५० वाजेपर्यंत तासभर बंद होता. तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ६.१८ वाजेपर्यंत अर्धा तास बंद होता. महापारेषणकडून इतर अतिउच्चदाब उपकेंद्रांतून महावितरणच्या १३ उपकेंद्रांना व ६६ वीजवाहिन्यांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आल्यानंतर सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान, बिघाड झालेल्या वीजवाहिनीचे काम महापारेषणकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या रुग्णांना उपचारासाठी ॲडव्हान्सची सक्ती करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद करा.

खासगी रुग्णालयात दर पारदर्शकता, उपचार प्रमाणीकरण यासाठी कायदा करा.

: डॉ अभिजीत मोरे (आम आदमी पार्टी- महाराष्ट्र राज्य सचिव ) यांची मागणी

पुणे- शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गुंतागुंतीची प्रसूती असणाऱ्या गरोदर महिलेला (तनिषा भिसे) ॲडव्हान्स रक्कम न भरल्यामुळे उपचार नाकारण्याची आणि त्यानंतर त्या रुग्णाचा इतरत्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सध्या राज्यभर गाजते आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये (यामध्ये तथाकथित धर्मदाय पण कॉर्पोरेट स्टाईलने चालणारी मोठी रुग्णालये सुद्धा आली) भरपूर ॲडव्हान्स रक्कम भरल्याशिवाय तातडीच्या प्रसंगी सुद्धा उपचार मिळत नाही ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने खुलासा केलेला असला तरी तब्बल 10 लाख रुपये डिपॉझिट लेखी मागितल्याची बाब त्यांनी नाकारलेली नाही, हे महत्वाचे आहे. मयत रुग्ण महिलेच्या नणंदेने इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीनुसार रुग्णाचा ब्लड प्रेशर वाढलेला होता तसेच योनिमार्गाद्वारे रक्तस्त्राव होत होता. अशावेळी सदर रुग्णाला भरती करून उपचार मिळणे आवश्यक होते. धर्मदाय रुग्णालयांना तातडीच्या रुग्णांसाठी ॲडव्हान्स मागता येत नाही असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

ही केवळ एक घटना नसून अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत असतात. अनेकदा तातडीच्या वेळी व्यक्तीला उपचार मिळणे हे आवश्यक असताना खासगी रुग्णालय प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या ॲडव्हान्सची मागणी होते. ती पूर्ण करणे कित्येक रुग्णांना त्या क्षणी शक्य होत नाही. परिणामी अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना राजरोसपणे राज्यात घडत आहेत.

राज्यात खासगी हॉस्पिटलने किती ॲडव्हान्स मागावा याचा ठोस नियम नाही. याबाबत संदिग्धता असल्याने हॉस्पिटल कडून अनेकदा रुग्णांकडून भरमसाठ ॲडव्हान्स रक्कम मागितली जाते. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना उपचार नाकारला जातो. ॲडव्हान्स मागणे गैर नाही पण ॲडव्हान्स दिल्याशिवाय तातडीचे उपचार सुरु करणार नाही असा अनेक खासगी रुग्णालयांचा आग्रह योग्य नाही.

मुर्दाड कॉर्पोरेट आरोग्य व्यवस्थेविरोधात नागरिकांच्या मनामनामध्ये असलेला असंतोष दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात उत्स्फुर्तपणे उघड होत आहे. याची गंभीर दखल राज्य शासनाने घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ अभिजीत मोरे यांच्याकडून खालील मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे जाहीररित्या करण्यात येत आहे.

1) जवळच्या सरकारी, खासगी अशा कोणत्याही रुग्णालयात गंभीर, किचकट प्रसूतीच्या महिला भगिनींना उत्पन्नाची अट न घालता राज्य सरकार द्वारे फ्री युनिव्हर्सल इमरजन्सी मॅटरर्निटी केअर द्या.
2) खासगी रुग्णालय नफेखोरी प्रतिबंध कायदा बनवण्यात यावा. खासगी रुग्णालयांमध्ये तातडीच्या रुग्णांना उपचारासाठी ॲडव्हान्सची सक्ती करता येणार नाही अशी कायदेशीर तरतूद करा. खासगी रुग्णालयात दर पारदर्शकता, उपचार प्रमाणीकरण यासाठी कायदेशीर तरतूद करा. या कायद्याद्वारे राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दरांमधील पारदर्शकता बंधनकारक करण्यात यावी. सर्व रुग्णांना उपचारापूर्वी संबंधित रुग्णालयाचे दरपत्रक देण्यात यावे. सर्व रुग्णांना उपचाराच्या खर्चाचे अंदाजे बिल उपचार सुरू करण्यापूर्वी देण्यात यावे. तसेच रुग्णांना त्यांची उपचाराची कागदपत्रे न देणे हा दखलपात्र गुन्हा समजला जावा.

मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्या आक्रमक:डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची केली तोडफोड

पुणे-डॉ. घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. डॉ. सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत आहेत. तसेच त्यांचे स्वतःचे देखील खासगी रुग्णालय आहे. याच रुग्णालयाची भाजपच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. गर्भवती महिलेच्या उपचाराअभावी निधन झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सकाळपासूनच दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आंदोलन केले आहे.

डॉ. सुश्रुत घैसास हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कार्यरत आहेत. डॉ. घैसास यांनी भिसे कुटुंबीयांकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र 10 लाख उपलब्ध न झाल्याने उपचार देण्यात आले नाहीत. त्यामुळे रुग्णाला भिसे कुटुंबीयांना नाईलाजाने दुसऱ्या रुग्णालयात न्यावे लागले होते. त्यानंतर सूर्या रुग्णालयात गर्भवती महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला व त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉ. घैसास यांच्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

आंदोलकांनी असेही सांगितले कि,’ दीनानाथ रुग्णालायचा अहवाल देखील आला असून यात सर्व कर्मचारी व डॉक्टरांना क्लिनचीट देण्यात आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांचे खासगी रुग्णालय गाठून या रुग्णालयात तोडफोड केली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या की, त्यांनी जीव घेतला आहे आणि त्याच पैशांनी एवढे मोठे हॉस्पिटल बांधले आहे. त्यांना माणुसकी नाहीये. त्यांच्यामुळे दोन बाळं निराधार झाली आहेत. त्या बाळांचे संगोपन त्यांनी करायचे आहे, अशी मागणी देखील महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत असताना त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यावेळी अडीच लाख रुपये सध्या आहेत उर्वरित रक्कम देतो असे सांगूनही प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर भिसे कुटुंबाने गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला.

लंडनहून मुंबईला निघालेले विमान उतरले तुर्कीत !

३० तास अडकलेल्या प्रवाशांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दिलासा

लंडनवरुन मुंबईत येणाऱ्या विमानाचे तुर्कीत लष्करी विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग

केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या संवेदनशीलतेने प्रवाशांना दिलासा

पुणे-
लंडनवरुन मुंबईला प्रवासी विमान घेऊन जाणारे व्हर्जिन अटलांटिक विमान (व्हीएस३५८) मध्ये एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी अवघडरित्या लँडिग करावी लागली. मात्र, दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटे असल्याने हार्ड लँडिंग होउन गियरमध्ये समस्या निर्माण झाली. तसेच या विमानतळावर सुविधांची कमतरता व संर्पक साधनांच्या मर्यादा होत्या. त्याचप्रमाणे संबंधित विमानतळ हे इतर देशांतर्गत/ आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या तुलनेत लहान असल्याने त्याठिकाणी लहान व्यवसायिक विमानांचे आणि लष्करी विमानांचेच उड्डाण होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी भारतीय प्रवासी ३० तास अडकून पडले होते. त्यातील काही प्रवाशांच्या ओळखीच्या लोकांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संर्पक साधून मदतीची मागणी केली. मोहोळ यांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत अडकलेल्या प्रवाशांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी हवाई खात्या मार्फत बाेलणे करत व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स यांच्याशी देखील चर्चा केली.

त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणाशी संर्पक करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी येण्यासाठी दिलासा मिळाला आहे.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष पथक नियुक्त केले. तसेच चांगल्या समन्वयासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महारष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील माेहाेळ यांच्याशी चर्चा केली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पाेपहार देण्यात आले, र्गभवती महिलांची विशेष काळजी घेतली, लहान मुलांना आवश्यक साधने उपल्बध केली, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. व्हर्जिन अटलांटिकने लँडिग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु साेडवण्यात अपयश आले. कारण, संबंधित एअरलाइन्सने लंडनहून तुर्कीच्या दिशेने नवीन प्रवासी वाहतूक विमान पाठवले परंतु तुर्की सरकार व लष्कराने सदर विमानास लॅँडिग परवानगी नाकारली. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले. सध्या र्व्हिजन अटलांटिक संबंधित विमानातील लँडिंग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय हवाई खात्याचे पाठपुराव्याने तुर्की सरकारच्या नियमांनुसार प्रवाशांना हाॅटेल मध्ये रहाण्याची साेय व नियमित प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानतळावर नेऊन पर्यायी विमानाने घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करण्याचा मार्ग देखील सूचित करण्यात आला. दरम्यान, माेहाेळ यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवत अधिकारी व एअरलाइन्स यांच्या संर्पकात राहून नियमित घडामोडींची माहिती घेत राहिले आणि तांत्रिक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सदर प्रवाशांचे तुर्कीवरुन मुंबईच्या दिशेने व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने उड्डाण झाले असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते मुंबई विमानतळावर सुखरुप उतरणार आहे.

मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता

याबाबत मुंबईतील उच्च न्यायालयात कामकाज करणारे ॲड .सत्यम सुराणा यांनी सांगितले की, लंडनवरून मुंबईला येणाऱ्या संबंधित विमानात माझा एक मित्र प्रवास करत होता. त्यांनी अचानक तुर्कीत अडकून पडल्याची मला माहिती दिल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मला तात्काळ निरोप आला, त्यांनी संपर्क साधत सविस्तर घटना जाणून घेतली .हवाई मंत्रालयातील दोन अधिकारी सातत्याने वेगवेगळे यंत्रणांशी संपर्क करण्यासाठी नेमण्यात आले. वेगवान हालचाली केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकला आहे. या माध्यमातून केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता दिसून आली आहे.

भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ

श्री रामजी संस्थान तुळशीबाग येथील श्रीरामनवमी उत्सवात ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी कार्यक्रम ; उत्सवाचे २६४ वे वर्ष

पुणे : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… कानडा राजा पंढरीचा… अशाच एका सरस रचनासह नमो ज्ञान राजा… या संतांनी काही नवीन स्वरबद्ध अभंग पेशवेकालीन तुळशीबा श्रीराम मंदिरात सादर केले. भक्तिगीतांतून शब्द आणि संगीताचा सुरेल मिलाफ या कारणाने रसिकांनी अनुभवला.

श्रीरामजी संस्थान तुळशीबागवतीने श्रीराम मंदिर श्रीरामनवमी उत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘राम बरवा कृष्ण बरवा’ या वृषाली मावळंकर, केतन अत्रे व सहकारी यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले होते.

संस्थानचे कार्यप्रणाली विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले य तुळशीबागवाले परिवार उपस्थित होते. श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

काल मी रघुनंदन पाहिले… या ग.दी. माडगूळकर यांनी मांडल्या आणि सुधीर फडके उरफ बाबुजी यांनी संगीतबद्ध केलेले गीत सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा… दशरथा घे हे पायसदान… यांस उत्तम सुपरिचित भक्तीरचनांचा स्वराविष्कार देखील पुणेकरांना अनुभव आला. श्रीराम जय राम जयजयराम निनादात संपूर्ण मंदिराच्या भक्तीमय झाला होता. स्हल दामले यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

पुण्यात 6 एप्रिलला गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे होणार उद्घाटन

— पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट मध्ये देशभरातील नामांकित संघ व खेळाडू मोठ्या प्रमाणात होनार सहभागी—
पुणे –
येत्या 6 एप्रिल ला पुण्यात होणाऱ्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद्घाटन होणार आहे .ही गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा संकलित जाते .ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडणार आहे तर एकूण 16 संघ आणि 180 ते 250 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ 13 एप्रिल 2025 रोजी पुण्यातिल प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आणि क्लब येथे पार पडणार असल्याची माहिती गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले .
पुढे ते म्हणाले की ,अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .आज देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत .पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग 2025 ची घोषणा करण्यात आली .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
आंतरराष्ट्रीय लीग च्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे .व सर्व यजमान संघाचा नुकताच स्वागत समारंभ पार पडला.
या प्रिमियर लीगचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे .
या वेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुप चे अनिरुद्ध सेवलेकर,ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट चे रोहन सेवलेकर,एस गोल्फिंग चे आदित्य मालपणी ,ऑक्सफर्ड रिसॉर्ट चे व्यवस्थापक कौशिल वोरा पत्रकार परिषदेस उपस्थित होते .
या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत .आजपर्यत्न ईगल फोर्सेस ,बिनधास्त बॉईज ,सुलतान स्विंग्स ,ब्लिस्ट्रिंग बर्ड्स ,झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स,सुझलोन ग्रीन्स,रोरिंग टायगर्स,
पुना लायन्स,सुब्बन सनरायजर्स ,द लीगशी क्लब ,बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग च्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी सांगितले आहे .

चित्रप्रदर्शनातून उलगडणार वन्दे मातरम्‌‍चा इतिहास,भारतमातेच्या विविध रूपांचेही घडणार दर्शन

दिग्गज चित्रकारांची मूळ चित्रेही बघण्याची संधी

पुणे : वन्दे मातरम्‌‍ या राष्ट्रमंत्राच्या सार्ध शती (150) जयंती वर्षानिमित्त तसेच ऋषी बंकिमचंद्रांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सुरवातीलाच वन्दे मातरम्‌‍चा इतिहास मांडणाऱ्या तसेच गेल्या सव्वाशे वर्षात नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवार, दि. 8 ते शनिवार, दि. 12 एप्रिल या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 .30 वाजता खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक मकरंद केळकर आणि वन्दे मारतम्‌‍चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रवींद्र सातपुते यावेळी उपस्थित होते. दि. 12 एप्रिल पर्यंत प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुली असणार आहे.
रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पंडित श्रीपाद दा. सातवळेकर, अवनीन्द्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. संगणकीय मांडणी अनंत कुलकर्णी यांची आहे.
वन्दे मातरम्‌‍च्या 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत भरविण्यात येत असलेल्या ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवा अंतर्गत चित्रप्रदर्शनाच्या आयोजनात वन्दे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समितीचे सहकार्य लाभले आहे. ऋषी बंकिमचंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या स्मृतीमहोत्सवाची सांगता शनिवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‌‘आनंदमठ‌’ या संगीत नाटकाचा प्रयोगाने होणार आहे. मराठी रंगभूमीवर गेल्या 125 वर्षामध्ये आनंदमठ ही कादंबरी प्रथमच नाट्य स्वरूपात आणण्यात आली आहे. बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत कोलाज क्रिएशन्स निर्मित व विनिता तेलंग लिखीत व रवीन्द्र सातपुते दिग्दर्शित या संगीत नाटकाला 2025 च्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांत व सर्वोच्च एकूण 8 पारितोषिके मिळाली आहेत. नाट्यप्रयोग सशुल्क असून चित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले चौकशीचे आदेश

मुंबई, दि. 4: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

‘अभिषेकी’ सुरांनी बहरली संगीत मैफल 

पंडित शौनक अभिषेकी यांचे बहारदार गायन ; श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजन 

पुणे : अविट गोडीचे राग, त्याला सप्तसुरांची साथ, तबल्याच्या थापेने निर्माण होणारे ताल आणि त्याला गायकांची सुरेल गायन साथ… अशा राग आणि सुरांनी नटलेल्या ज्येष्ठ गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या संगीत मैफिलीने सद्गुरु श्री जंगली महाराज संगीत महोत्सव बहरला.

सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित उत्सवामध्ये पंडित शौनक अभिषेकी आणि सहकारी कलाकारांनी शास्त्रीय संगीताची सुमधुर मैफल सादर केली. 

पंडित शौनक अभिषेकी यांनी अबोर रागातील झपताल खयाल एक तालाने मैफिलीची सुरुवात केली . ‘नयना पार लग’ या गाण्याला तीन तालामध्ये सादर करून पंडित शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. करण देवगावकर (गायन), प्रणव गुरव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) अतुल गरुड (तालवाद्य) यांनी पंडित अभिषेकी यांना सुरेल साथ संगत केली.

पंडित शौनक अभिषेकी यांचे विविध रागातील हरकतींचे सूर, त्याला तबला आणि संवादिनीची सुरेल साथ यामुळे जंगली महाराज मंदिराचा भक्तिमय परिसर मैफिली मुळे संगीतमय झाला होता. या संगीतमय वातावरणाचा आनंद घेत प्रेक्षकही  तल्लीन झाले होते. नभास या आले पर, फुलू  लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर डोह झाले, चंद्र तार्‍यांची  केली शेज परी नाही निज लोचनांना, पाऊले हे माझे नुरे, वरी चांदणे हे झुले, घेऊन ये तू सत्वरी भेटायला, वाळवंटी ध्यान लागे, काळजाला विठ्ठल जागे, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर अशा भक्तिमय गीतांनीही शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, सद्गुरु जंगली महाराज यांच्याशी माझे कलाकार म्हणून निश्चितच काहीतरी नाते आहे, त्यामुळेच मला वारंवार या ठिकाणी माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे. या संधीचे सोने करण्याचा मी कायम प्रयत्न करीत असतो या ठिकाणी कला सादर केल्यानंतर माझ्यातील कलाकाराला अतिशय आनंद आणि समाधान मिळते.

अनंतराव पवार अभियांत्रिकीत आय एमएल बुटकॅम्पचे प्रश्न…

पुणे–
संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी एआय एमएल उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष सरावही लक्ष केंद्रीत  ३ दिवसांच्या आयएमएल बुटकॅम्पचे स्पष्टीकरण करण्यात आले. या बुटकॅम्पचा उद्देश सत्ताधारी अथक तंत्रज्ञान संकल्पनांची ओळख करून देणे आणि त्यांना या दोन्ही गोष्टी करणाऱ्यांचा समावेश आहे. शिबिरिंग पायरल प्रोग्राम एआय एमएलचा परिचय, न्यूथॉन आणि डीप लर्निंग, पॉवर बीआय, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) टॅचजीपीटी संकल्पना स्वीकारण्याची ओळख करून प्रात्यक्षिकांचा अनुभव. सुनील ठाकरे मार्गदर्शन मार्गदर्शन डॉ. रमा गायकवाड विभाग प्रमुख , संगणक अभियांत्रिकी यांनी केले.
या बुटकॅम्पसाठी प्रर्य डॉ.सुनील ठाकरे , कार्यशाळेचे समन्वयक डॉ.रमा गायकवाड , पालक आणि विद्यार्थी यांनी विधान नोंदविले. शब्दाने या नाविन्यपूर्ण विषयावर कार्यशाळेचे वर्णन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षणाच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

नव तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावामहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचा महसूल विभाग देशात आदर्श ठरेल असे नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित

पुणे दि. 4: महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजा सोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील हॉटेल ऑर्चिड येथे दोन दिवशीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे पुढे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करताना अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर द्यावा, ए आय (कृत्रिम बुध्दीमत्ता) सारख्या या नवमाध्यमांचा वापर करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. या कामात आपला सहभाग अधिक असला पाहिजे, समाजाप्रती आपले काही देणे असून आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे, इतर राज्यात झालेल्या नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा नवीन संकल्पना राबवून कामे व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आय. ए. एस. अधिकाऱ्यांकडे खूप मोठा अनुभव असून त्या अनुभवाचा उपयोग विभागाला होण्याच्या दृष्टीने, त्यांनी सहभाग नोंदवावा, अधिकाऱ्यांच्या अभ्यासातून जर त्यांना काही नवीन बदल सुचवायचे असतील तर त्यावर शासन निश्चितच विचार करेल, तलाठी पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, सर्वांच्या सूचना ऐकून घेऊन विभागात गतिमान काम होण्याच्यादृष्टीने शासन निश्चितच प्रयत्‍न करेल.

विभागातील विविध कामे करताना नियमात काम असेल तरच कामे करावीत, जर काम नियमात नसेल तर संबंधितांना लेखी कळवावे.नियमबाह्य कामे होता कामा नये याची दक्षता घ्यावी. या कार्यशाळे निमित्त प्रत्येक जिल्ह्याने शून्य हेरिंग (सुनावणी) संकल्प राबवून. सुनावणीचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याचे तात्काळ खंडन करुन त्याबाबतची वस्तुस्थिती माध्यमांना कळवावी. आपण केलेल्या चांगल्या कामांची माहिती माध्यमांना द्यावी, मीडियाच्या माध्यमातून चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचून शासनाची प्रतिमा अधिक उजळ होण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला तलाठी पासून ते उच्च अधिकारी पर्यंत एक परिवार म्हणून काम करायचे असून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन अडचणींचे तात्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातल जाणार नाही, सर्वांनी लोकहिताची चांगले कामे करावीत, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या सत्कार करण्यात येईल.त्यासाठी मी महसूल विभागाचा प्रमुख म्हणून मी नेहमी आपल्या पाठीशी उभा आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार प्रास्ताविकात म्हणाले, महसूल विभागाच्या कृती कार्यक्रमांतर्गत विभागाने बरेच कामे पूर्ण केले असून, अपूर्ण कामे काही दिवसात पूर्ण होतील. महसूल विभाग हा महत्त्वाचा विभाग असून सर्व विभागांशी निगडित आहे हा विभाग ब्रिटिश कालीन विभाग असला तरी, आता या विभागाच्या नियमांमध्ये बऱ्याचशा सुधारणा होत आहेत.

दोन दिवसीय कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले, या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्य पध्दतीची व विचारांची एकमेकांना देवान घेवाण व्हावी, तसेच जे परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, तरुण जिल्हाधिकारी आहेत त्यांना चांगल्या कामांची माहिती व्हावी, त्यांना काम करताना प्रोत्साहन व ऊर्जा मिळावी. शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्याच्या चांगल्या कामांची माहिती दुसऱ्या जिल्ह्यांना व्हावी, तसे काम त्यांच्या जिल्ह्यामध्ये व्हावे या उद्देशाने कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे असेही श्री. कुमार म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्र्यांचे हस्ते भूमि अभिलेख विभागाच्या बोधचिन्हाचे अनावरण, इस्पित, (इलेक्ट्रॉनिक्स प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ) कार्यप्रणालीचे तसेच भू प्रमाण केंद्र, ई मोजणी व्हर्जन टू यंत्रणेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जमाबंदी आयुक्त डॉ. दिवसे यांनी, भुमिअभिलेख विभागाच्या डिजिटल कार्य पद्धतीची माहिती विशद केली.
या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सहायक‍ जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आभार व्यक्त केले.

दीनानाथ रुग्णालयाने महिलेला अॅडमिट करून घेणे गरजेचे होते- मुख्यमंत्री म्हणाले, उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी अन कारवाई

रुग्णालयातील प्रकाराबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने लक्ष घातले होते. परंतू, रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही

पुणे- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. दीनानाथ रुग्णालयाने महिलेला अॅडमिट करून घेणे गरजेचे होते. भविष्यात अशा घटना पुन्हा होवू नये यासाठी कडक कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. धर्मादाय रुग्णालयांकडून नैतिकतेचे पालन होते की नाही, यासंदर्भात आपण प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने महिलेचा जीव गेल्याची घटना गुरुवारी घडली होती. या घटनेवर आता विविध राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत या घटनेतून असंवेदनशीलतेचा परिचय पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. तसेच भविष्यात अशा प्रकाराच्या घटना घडू नये यासाठी कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतून पाहायला मिळतो. दीनानाथ मंगेशकर हे अतिशय प्रतिष्ठित रुग्णालय आहे. लता दीदींनी स्वत: पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या पाठीमागे आपले संसाधने उभे करून हे रुग्णालय उभे केले. ज्याप्रकारे तिथल्या काही डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसुतीला आलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले. लोकांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची अतिशय चीड आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विशेषत: धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे या संदर्भात एक उच्च स्तरीय समिती तयार केलेली आहे. ही समिती या घटनेचा तपास करेलच, त्यासोबत अशा घटना होवू नये म्हणून कडक कारवाई केली जाईल. पैशांची चिंता न करता महिलेला अॅडमिट करून घेणे गरजेचे होते. धर्मादाय रुग्णालयांकडून नैतिकतेचे पालन होते की नाही, यासंदर्भात आपण प्रयत्न करणार आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रुग्णालयातील प्रकाराबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने लक्ष घातले होते. परंतू, रुग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. भविष्यात अशा प्रकाराच्या घटना घडू नये यासाठी कडक कारवाई करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

उच्च न्यायालयाचा आदेश हा अतिरिक्त कायदा घेतला, त्यांनाच आहे. आम्हाला तो आदेश नाही, अशी भूमिका अनेक रुग्णालयांनी मांडली होती. त्यामुळे त्यासंदर्भात स्कीम तयार केली. आता कायद्याने हे अधिकार धर्मदाय संस्थेकडे घेतलेले आहे. धर्मदाय ही संस्था स्वतंत्रपणे चालते, पण त्याच्यामध्ये काही ना काही नियंत्रण हे राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाचे आहे. या विभागाच्या माध्यमातून अशा सगळ्या रुग्णालयांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी समितीत

1) उपसचिव श्रीमती यमुना जाधव,

2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,

3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर

4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांना खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.

धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत.

विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.

शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पदे तात्काळ भरण्यात यावीत.

निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.

योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.

दिनानाथने दिले स्पष्टीकरण: तनिषाच्या प्रसूतीसाठी 10 लाख रुपये का मागितले? गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिल्याचा दावा

पुणे- १० लाख का मागितले ? गर्भवती महिला का दगावली ? या महिलेला कोणता आजार होता ?कोणते धोके आणि सल्ले दिले समजावून सांगितले होते ? या बाबत दिनानाथ रुग्णालयाने अखेरीस स्पष्टीकरण दिले असून या प्रकरणाची चार तज्ञांनी चौकशी करून आपला अहवाल सादर केला आहे आणि वाकड येथील रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यू मुले आणि अडव्हांस मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आल्याचे या समितीने म्हटले आहे.

अहवालातील माहिती :

या प्रकरणी रुग्णालयाने खालील तज्ञांची समिती स्थापन करून आपला अहवाल तयार केला आहे.
१. वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर,
२. डॉ. अनुजा जोशी (वैद्रद्यकीय सुप्रिटेंडन्ट)
३. डॉ. समीर जोग (अतिदक्षता विभाग प्रमुख)
४. श्री. सचिन व्यवहारे (प्रशासक)
त्यांनी रुग्णाचे जुने केस पेपर्स, सध्याचे पेपर्स, संबंधित डॉक्टर यांचे जबाब नोंदवून घेतले.
१. सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे) MRD १०५३७६३. या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या.
२. सदर महिला रुग्णाची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती.
३. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता.
४. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही.

५. १५ मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnancy बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत.
६. २८ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजता सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी.
डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy व caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये १० ते २० लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वेद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले.
असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना सचिन व्यवहारे यांना फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.
डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्‌या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
यानंतर माध्यमातून आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंती मुळे मृत्यू झाला.
वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली व २९ मार्च राजी सकाळी सिझेरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिटल मधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवली असे समजते.
सदर चौकशीअंती व रुग्णालयातील इतर सिनियर gynaecologist च्या opinion नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :
१. सदर रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती.

२माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.

३ Advance मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते.
रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही.
रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व advance मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.


“क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना उपयुक्त वस्तू भेट”

गरजेवर आधारित उपक्रमांचे महत्व जास्त – ना. चंद्रकांतदादा पाटील.

पुणे-एखाद्या संस्थेला, गणपती मंडळाला नेमकं काय हवंय हे ओळखून त्यांच्या गरजेवर आधारित उपक्रमाचे महत्व हे जास्त असतं आणि म्हणून संदीप खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कल्पकतेचे मी अभिनंदन करतो असे गौरवोदगार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन च्या वतीने आज 35 संस्था, गणेश मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ व ज्ञाती संस्था तसेच भजनी मंडळाना उपयुक्त असे खुर्च्या, स्पीकर सेट, वॉटर कुलर व इतर साहित्य भेट देण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, योगेश रोकडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर,कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे,विशाल धनवडे,भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, उपाध्यक्ष मंदार बलकवडे,सर्वेश जोशी, संदीप पाटील, योगेश सुपेकर, रशीद शेख, अनुज खरे,विश्वजित देशपांडे, मंदार रेडे,राजन परदेशी,सुनील पारखी, राजू दाभाडे,राजा पाटील, दिनेश भिलारे,प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, केतकी कुलकर्णी,यासह संतोष लांडे,शंतनू खिलारे,संगीताताई शेवडे, पूनम कारखानीस,मंगल शिंदे, कविता सदाशिवे,अपर्णा लोणारे, रामदास गावडे,कुणाल तोंडे,समीर ताडे,दत्तात्रय देशपांडे,नितीन कंधारे, सतीश गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.
कोणताही कार्यक्रम, उपक्रम सुरु केले जाते वर्ष दोन वर्ष ते कार्यक्रम होतात मात्र नंतर आलेले वाईट अनुभव, त्यातून आलेली निराशा किंवा इतर कारणांनी हे बंद पडते, मात्र सातत्याने वर्षानुवर्षे उपक्रम करण्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन चे वेगळेपण आहे त्याचेही मी कौतुक करतो असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. समाजात काम करताना लोकोपयोगी वस्तू भेट देणे महत्वाचे असून केवळ सरकार वर अवलंबून राहून समाजाची परिस्थिती किंवा सामाजिक स्वास्थ्य सुदृढ होणार नाही तर त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने गरजुंना मदत करावी असे आवाहन देखील ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन ने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून यापुढील काळात रोख स्वरूपात वर्गणी न देता वस्तूरूपी मदत करण्यात येणार असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.गणेश मंडळ असतील अथवा अन्य संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, हे जेव्हा मदत मागायला येतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून वस्तूंचा अभाव असल्याचे लक्षात आले , यातूनच ही कल्पना सुचली आणि मग स्पीकर, खुर्च्या, वॉटर कुलर, वॉटर प्युरिफायर, पंखे,अन्न धान्य अश्या वस्तू मदत म्हणून देण्याचा मानस केला असेही संदीप खर्डेकर म्हणाले. प्रत्येक महिन्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन,ग्लोबल ग्रुप, संजीव अरोरा मित्र परिवार,नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट,वेस्टर्न इंडिया फोर्जिंग अश्या सर्वांनीच एकत्र येऊन सेवाकार्याचे मॉडेल तयार केले असून सामाजिक संस्थांना गरजेनुसार मदत करण्याचा निर्धार केला असल्याचे ही संदीप खर्डेकर, संजीव अरोरा, मनोज हिंगोरानी, सचिन कुलकर्णी, अरुण जिंदल यांनी जाहीर केले.
आज प्रामुख्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, अखिल भारतीय ब्राह्मण संघ,हिंदुत्ववादी बहुजन मोर्चा, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना,रोलबॉल असोसिएशन, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, परशुराम हिंदू सेवा संघ, सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसएबीलीटीज, एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्ट,देशप्रेमी मित्र मंडळ, दशभुजा मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ, सिद्धेश्वर मंडळ,उमेद फाउंडेशन, सेवाव्रत फाउंडेशन इ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले,सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत,योगेश रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले तर प्रतीक खर्डेकर व कल्याणी खर्डेकर यांनी संयोजन केले.

जनतेच्या कराच्या पैशावर उभारलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अद्दल घडवा.

रुग्णालयातील अंतर्गत चौकशी ही निव्वळ धुळफेक, संबंधित डॉक्टरांवरही कठोर कारवाई करा.

मुंबई, दि. ४ एप्रिल २०२५
पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे, जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बाळं आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर आहे.

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.