Home Blog Page 373

भारतीय सिनेसृष्टीत नवा अध्याय: एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्स एकत्र

दिग्गज एकत्र! एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्सचा मोठा प्रकल्प

एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्सचा महत्त्वाचा पॅन-इंडिया चित्रपटासाठी ऐतिहासिक संयोग

भारतीय चित्रपट उद्योगात धूम माजवणाऱ्या, दिग्दर्शक एटली, स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख कंपनी कलानिधी मारन यांच्या सन पिक्चर्स यांनी एक ऐतिहासिक पॅन-इंडिया चित्रपटासाठी त्यांच्या बहुप्रतिक्षित सहकार्याची औपचारिक घोषणा केली आहे.

हा अद्याप अनटाइटल्ड फिल्म असलेला चित्रपट तीन जबरदस्त क्रिएटिव्ह ताकतींच्या संयोगाचे प्रतीक आहे — एटली, ज्यांनी जवान, थेरी, बिगिल, मर्सल सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा दिग्दर्शन केला; अल्लू अर्जुन, पुष्पा चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि देशभर पसरलेल्या फॅंडमचे प्रतीक; आणि सन टीव्ही नेटवर्क, जे भारतातील सर्वात प्रभावशाली मीडिया गटांपैकी एक आहे.

सध्यातरी ‘AA22 x A6’ म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट भारतीय भावनांशी संबंधित परंतु जागतिक आकर्षण असलेली कथा, भव्यता, भावना आणि अॅक्शनने भरपूर एक ऐतिहासिक सिनेमॅटिक अनुभव होणार आहे.

हा प्रोजेक्ट या वर्षाच्या अखेरीस फ्लोअरवर जाईल, आणि कास्ट, क्रू आणि रिलीज शेड्यूल संदर्भातील अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल.

अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्ससोबतच्या या मोठ्या सहकार्याबद्दल एटली यांनी आपली आनंद व्यक्त करत म्हटले,
“ही ती फिल्म आहे जी मी वर्षानुवर्षे स्वप्न पाहिली होती. या कथेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी मी खूप वेळा शांतपणे मेहनत घेतली आहे. आणि आता अल्लू अर्जुन सरांसारख्या आयकॉन स्टारसोबत, कलानिधी मारन सरांसारख्या दूरदर्शी निर्मात्याच्या नेतृत्वाखाली सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाचे निर्माण करणे — हे माझ्यासाठी स्वप्नाचे सत्य होण्यासारखे आहे. हा चित्रपट आत्म्याने ‘मास’ आहे आणि त्याच्या कथेच्या मांडणीमध्ये जादुई आहे — जे प्रत्येक प्रेक्षकाला स्पर्श करेल आणि मनोरंजन देईल.”

सन पिक्चर्सने या ऐतिहासिक संयोगाबद्दल सांगितले,
“मास स्टोरीटेलर एटली यांच्या भव्य दृष्टिकोन आणि आयकॉनिक अल्लू अर्जुन यांच्या बॉक्स ऑफिसवरील सीमांची ओळख तोडणारी उपस्थिती यासह, सन पिक्चर्सचा हा संयोग एक जादुई अनुभव देणारा ठरेल. हा एक असा प्रोजेक्ट आहे जिथे उद्योगातील सर्वोत्तम लोक एकत्र आले आहेत, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसह, जागतिक स्तरावरही नवे मानक स्थापित करेल.”

बारामती आणि पुरंदर तालुक्यात वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन

उद्योजक व भूखंडधारकांनी वारसनोंदी करुन घ्यावे-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचे आवाहन

बारामती, दि. ८: राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने प्रादेशिक कार्यालय, बारामती येथे ९ एप्रिल तर असोसिएशन हॉल, जेजुरी, पुरंदर येथे ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात बारामती व पुरदंर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, भुखंडधारकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. तरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व भूखंडधारकांनी उपस्थित राहून वारस नोंदी करुन घ्याव्यात, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले आहे.

शास्त्रीय सूर संगीतातून रंगली मैफल

सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात कलापिनी कोमकली यांचे सुश्राव्य गायन
पुणे: सुस्वर स्वर, शास्त्रीय संगीतातील विविध रागांमधील बंदिशींचे चपखल सादरीकरण आणि रसिकांची मनमुराद दाद, अशा भारावलेल्या वातावरणात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम पार पडला.

सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवात विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीत व भजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 प्रशांत पांडव (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), आणि राजगोपाल गोसावी (पखवाज) यांनी कलापिनी कोमकली यांना सुमधुर साथ संगत केली. ट्रस्टचे राजेंद्र तांबेकर यांच्या हस्ते कलापिनी कोमकली यांचे स्वागत करण्यात आले.

विदुषी कलापिनी कोमकली यांनी त्यांच्या वडिलांनी आणि गुरूंनी पंडित कुमार गंधर्व यांनी रचलेल्या ‘देवो दान मोहे’ या राग कल्याणमधील बंदिशीने मैफिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बडा खयाल आणि धृत रचनांनी मैफल रंगवत नेली. रसिकांनी त्यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला.

कलापिनी कोमकली म्हणाल्या, मी माझ्या गायनाचे अनेक ठिकाणी सादरीकरण केले आहे, परंतु प्रत्यक्ष सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या समाधीसमोर गायन करण्याची संधी मला मिळत आहे, याबद्दल मी आभारी आहे. एक प्रकारे मी देवाच्या दरबारातच माझे सादरीकरण करत आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्सने महाराष्ट्रात आपले स्थान विस्तारले, पुण्यात नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू

 पुणे विभागातील निम-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये विमा प्रवेश वाढवण्याच्या उद्देशाने
धोरणात्मक विस्तार
 महाराष्ट्र विभागाचा सध्या 2,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय पोर्टफोलिओ असून आर्थिक वर्ष
26 मध्ये 20% वाढीचा अंदाज
 1,17,000 हून अधिक एजंट्सच्या मजबूत नेटवर्कच्या सहाय्याने संपूर्ण प्रदेशात ग्राहकांपर्यंत पोहोच
आणि समुदायाशी दृढ संबंध निर्माण

 स्टार हेल्थ इन्शुरन्सने महाराष्ट्रात 32 लाखांहून अधिक लोकांना आणि पुण्यात 6.8 लाख हून अधिक
लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण दिले आहे

Pune, : भारतातील सर्वात मोठी रिटेल हेल्थ इन्शुरन्स कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स
कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ने पुण्यात येरवडा येथे नवीन प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनासह
महाराष्ट्रातील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. हा विस्तार या भागातील निम शहरी आणि ग्रामीण
बाजारपेठांमध्ये आपले स्थान वाढवण्याच्या स्टार हेल्थच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. येथे लाखो
कुटुंबांसाठी आरोग्य सेवांसाठी आर्थिक साहाय्याची गरज महत्त्वाची आहे. कंपनी पुणे विभागात ग्राहकांशी
अधिक दृढ नाते निर्माण करण्यावर आणि त्यांचा सहभाग वाढवण्यावर देखील लक्ष केंद्रित करेल.
उद्घाटन प्रसंगी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रॉय
म्हणाले, “पुणे नेहमीच आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि आमच्या नवीन प्रादेशिक
कार्यालयाच्या उद्घाटनाने आम्ही या प्रदेशाशी असलेली आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत.
महाराष्ट्र व्यवसाय आणि दर्जेदार आरोग्य सेवा संरक्षण शोधणाऱ्या व्यक्तींसाठी केंद्र म्हणून विकसित होत
असताना आमचे लक्ष आरोग्य विमा अधिक सुलभ आणि अखंड विना अडथळा करण्यावर आहे. आम्ही IRDAI
च्या ‘सर्वांसाठी विमा’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहोत आणि वैद्यकीय आणीबाणीत व्यक्ती आणि कुटुंबांना
आवश्यक आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी जागरूकता वाढवून प्रवेश सखोल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मजबूत स्थानिक टीम आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह, आरोग्य संरक्षणाचा विस्तार आणि या प्रदेशासाठी
आरोग्यदायी, सुरक्षित भविष्य घडवण्याच्या या प्रवासाचा भाग होण्याचा आम्हाला आनंद आहे.”

नवीन प्रादेशिक कार्यालय 13 ते 16, KIA शो रूमच्या वर, पहिला मजला, येरवडा, पुणे – 411006 येथे
स्थित आहे. येथे प्रशासन, दावे, वित्त आणि खाती, रुग्णालय संबंध, शिक्षण आणि विकास, कायदेशीर आणि
विक्री यांसारख्या प्रमुख विभागांतील काम पाहणाऱ्या टीम आहेत. मुंबई वगळता महाराष्ट्रात कंपनीकडे सध्या
2,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय पोर्टफोलिओ आहे आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये 20% वाढ होण्याचा
अंदाज आहे. या विभागाला 1,17,000 पेक्षा जास्त एजंट्सच्या मजबूत नेटवर्कचे पाठबळ आहे. त्यापैकी
बहुतांश एजंटनी ग्रामीण समुदायांच्या आरोग्य विम्याच्या विशिष्ट गरजांवर लक्ष केंद्रित करून प्रशिक्षण घेतलेले
आहे. आर्थिक वर्ष 25 (एप्रिल-डिसेंबर’24) मध्ये, स्टार हेल्थ इन्शुरन्सने महाराष्ट्रात 32 लाखांहून अधिक
लोकांना आणि पुण्यात 6.8 लाखांहून अधिक लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण दिले आहे. तसेच येत्या काही
वर्षांत ग्रामीण भागांत विमा संरक्षण वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. पुण्यात, स्टार हेल्थकडे
जवळपास 470 रुग्णालयांचे नेटवर्क, 20 शाखा आणि 360 कर्मचारी आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेडी आणि लहान गावांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करत पुणे
विभाग स्टार हेल्थच्या ग्रामीण विस्तार धोरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. येरवड्यातील नवीन कार्यालय
स्टार हेल्थच्या हिंजवडी, तळेगाव, चाकण आणि इतर विकसीत होत असलेले औद्योगिक कॉरिडॉर आणि
टाउनशिपसह अनेक सेवांपासून वंचित बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणात्मक केंद्र म्हणून काम करेल.
जोडीला शहरी केंद्रांच्या तुलनेत आरोग्य विमा प्रवेश पारंपारिकपणे कमी असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हे
आणि जुन्नर तालुक्यांतील लहान गावांमध्ये आरोग्य विमा प्रवेश वाढवेल.
या नवीन प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनासह स्टार हेल्थ पुणे विभागातील एजंट्स आणि
पॉलिसीधारकांसोबत अधिक वैयक्तिकृत, जवळचे संबंध निर्माण करून ग्राहक सेवा वाढवण्याचा आणि त्यायोगे
त्यांचे म्हणणे ऐकले जाईल, त्यांना महत्त्व दिले जाईल आणि काळजी घेतली जाईल हे सुनिश्चित करण्याचा
प्रयत्न करेल.

समता पंधरवड्यानिमित्त जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. ८: समता पंधरवड्यानिमित्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या; परंतु, मुदत संपूणही जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज न दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता सीइटी, जेईई, नीट आदी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच पदवीनंतर एम.बी.ए. एम.सी.ए. एल.एल.बी. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. त्याकरीता ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://ccvis.barti.in किंवा https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन त्याची मूळ प्रत (हार्ड कॉपी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, आळंदी रोड, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या ठिकाणी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणेचे सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.

तनिषा भिसे मृत्यू नंतर झोपलेल्या आरोग्य प्रमुख झाल्या जाग्या … सर्व खासगी रुग्णालयांना दिली नोटीस:उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्याची ताकीद

पुणे- महापालिकेचे आरोग्य खाते झोपले आहे काय ? असा ठणठणीत सवाल केल्यावर महापालिकेच्या झोपी गेलेल्या आरोग्य प्रमुख अखेरीस जाग्या झाल्या आणि शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास सक्त मनाई केली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर प्रथम उपचार करा त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून दीनानाथ रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

महापालिकेने आपल्या नोटीसीत सर्वच खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्यास बंदी घातली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाऊ नये. सर्वप्रथम रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मनपाने आपल्या तातडीच्या नोटीसीद्वारे दिलेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इमर्जन्सी स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, पुणे पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात वैद्यकीय दुर्लक्षीपणा आढळला तर गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी पोलिसांनी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे. यासंबंधीच्या सरकारी अहवालात तनिषा भिसे यांना रुग्णालयात गंभीर स्थितीत तब्बल साडेपाच तास बसवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. ही वैद्यकीय नेगलिजन्सची बाब आहे. यामुळे उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या पत्रासोबत जोडल्याची माहिती आहे.

प्रशासनात लोकाभिमुख काम करण्याची सांघिक भावना हवी ⁃ माजी आयुक्त रमानाथ झा

आयुक्त – निर्णयांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिकारी ते सेवक वर्ग असते..!
⁃ पुणे दि ७ एप्रील
आयुक्त निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेस प्रशासन संबोधतात, मात्र यामध्ये लोकाभिमुख काम करण्याची सांघिक भावना (टिम वर्क) हवी, असे वक्तव्य पुणे महापालिकेचे माजी आयुक्त (आय ए एस) श्री रमानाथ झा यांनी पुणे महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात केले.
ते पुढे म्हणाले के अनेक वर्षे महापालिकेत काम करताना ऊत्तरदायीत्वाची सांघीक भावना उत्पन्न होते व आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आपण अधिकारी ते सेवकवर्ग करता, हेच प्रशासकीय कामाचे गमक आहे. माझ्या कारकिर्दीत झालेल्या कामांची आपण स्तुती केलीत, मात्र निर्णयांची अंमलबजावणी करणारे तुम्हीच असल्याने ते निर्णय फलद्रुप ठरल्याचे सांगून निवृत्त अधिकारी ते सेवकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सेवानिवृत्ती नंतर चे आयुष्यमान वाढत असल्याचे सांगून ते दर्जेदार व लोकोपयोगी पद्धतीने जगून समाजाचे देणे फेडणे हेच आपल्या हाती असल्याचे सांगितले.
⁃ या प्रसंगी पुणे मनपाचे माजी उपायुक्त व निवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष जयंत पवार, माजी अध्यक्ष संभाजी राजे भोसले,माजी कार्याध्यक्ष विठ्ठलराव शेटे सर ,ज्येष्ठ सल्लागार गोपाळदादा तिवारी, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, माजी उपायुक्त नंदकुमार जगताप, कार्याध्यक्ष संजीव मोरे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक स्व भाई वैद्य यांच्या प्रतिमेस मानयवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुणे “महापालिका स्थानिक स्वराज्य (स्वायत्त) संस्था असुन “लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संविघानिक कर्तव्यपुर्तीतुन चालते” असे प्रतिपादन संघटनेचे जेष्ठ सल्लागार गोपाळदादा तिवारी यांनी केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “अधिकारी ते सेवक वर्ग हे प्रशासन असुन ‘लोकशाही’चा प्रथम स्तंभ असल्याने, या घटकाच्या संविधानीक हक्कांची पुर्तता होणे, यास संरक्षण व नैतिक बळ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मा. ‘रमानाथ झा यांच्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत’ मनपा सेवकांना न्याय मिळाला व अशा आयुक्तांच्या कारकिर्दीचे सर्वचजण स्मरण करतात असे उदगार कामगार नेत्या काॅ. मुक्ता मनोहर यांनी काढले. “पुणे मनपा सेवा निवृत्त संघटनेच्या पारदर्शक समाजिक कार्यास उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार” ही आमच्या कामास मिळालेली पावती असल्याचे गौरवोद्गार संघटनेचे अध्यक्ष जयंत पवार यांनी प्रस्ताविक भाषणात काढले.
⁃ या प्रसंगी संघटनेच्या परंपरे प्रमाणे ‘विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या’ सेवा निवृत्त सेवकांचे व कुटुंबियांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. (त्यांची नांवे वैशाली बर्गे,उषा सातव)
⁃ पाहुण्यांचे स्वागत व सत्कार कार्याध्यक्ष संजीव मोरे व पदाधिकारी यांनी केले.
⁃ सुत्र संचालन – शिल्पा देशपांडे यांनी केले.
⁃ आभार प्रदर्शन सरचिटणीस बापुसाहेब खलाटे यांनी केले.
सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिका,पीएमपीएमएल, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त सेवक उपस्थित होते.

तुमचं लाडकं, महागाईच्या गोदीत बसलेलं मोदी सरकार!:’मोदी सरकारचे गॅस दरवाढीवर खुले पत्र’ म्हणत शरद पवार गटाचा टोला


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचे एक कथित खुले पत्र सोशल मीडियावर शेअर करत ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’ असा सणसणीत टोला हाणला आहे.

केंद्र सरकारने सोमवारी स्वयंपाकाच्या गॅसमध्ये तब्बल 50 रुपयांची दरवाढ केली. या निर्णयावरून केंद्रावर चौफेर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोदी सरकारचे जनतेला एक कथित खुले पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पत्राद्वारे मोदी सरकारच्या धोरणावर तिरकस टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेतानाच शरद पवार गटाने जनतेला आता ही दरवाढ सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

शरद पवार गटाने आपल्या ट्विटर अकाऊंटरवर हे पत्र शेअर केले आहे. गॅस दरवाढीवर मोदी सरकारचं खुलं पत्र, असे शिर्षक असणाऱ्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार.उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने केलेली गॅस दरवाढ ही आजपासून म्हणजे 8 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.

शेअरमार्केट ट्रेडिंग नावाने १ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणा-या ६ भामट्यांना १२ दिवसांची कोठडी

पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. पुणे सायबर पोलिसांनी देशपातळीवरील फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, आरोपींचे दुबई, गुजरात आणि पश्चिम बंगाल कनेक्शन असल्याचे समोर आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अनन्या गुप्ता नावाच्या महिलेने संपर्क केला. तिने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळेल, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एक कोटी ६० लाख रुपये जमा करण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान १७ मार्च रोजी वाघोलीतील एका बँकेच्या खात्यातून पाच लाख ८२ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे काढल्याचे निष्पन्न झाले. यावरून खराडीतील केतन भिवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तांत्रिक तपासातून इतर आरोपींची नावे समोर आली. गोविंद सूर्यवंशी (रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), रोहित कंबोज (रा. वाघोली, मूळ रा. पंजाब), ओंकार भवर (रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह पुरोहित (रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी), निखिल ऊर्फ किशोर सातव (रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यातील सूर्यवंशी आणि कंबोज बी.टेक पदवीधर असून, डिजिटल मार्केटिंग आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारात सक्रिय आहेत. सूर्यवंशी हा वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को.ऑप बँकेचा संचालक आहे. कंबोज बँकेतील तांत्रिक कामे बघत होता. सातव हा बनावट बँक खाती पुरवठा करीत होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम, तुषार भोसले, संदीप पवार, दिनेश मरकड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.या टोळीने दीडशे बँक खाती वापरून सायबर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नॅशनल सायबर पोर्टलवर विविध राज्यांत २९ तक्रारी दाखल असून, त्यात या टोळीचा हात असल्याचे सायबर पोलिसांनी उघड केले आहे.

‘सुशीला-सुजीत’ १८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, ता. ७: स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे, यामुळे चर्चेत असलेला बहुप्रतीक्षित ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीझर, पोस्टर, प्रसारगीत आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून, चित्रपट निखळ कौटुंबिक मनोरंजनाचा एक आगळा अविष्कार ठरणार आहे.

‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’च्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहेत. स्वप्नील आणि सोनाली एका घरात बंद दाराआड अडकून पडतात. त्यांचा मोबाईलसुद्धा बाहेर राहिला आहे. त्यांचे नाते काय आहे, त्यांचात संबंध काय आहे, अडकण्याचे कारण काय, हे प्रश्न रसिकांना पडले असले तरी त्यातून पडद्यावर धमाल पाहायला मिळणार याची हमी मात्र त्यांना मिळाली आहे. ट्रेलर, पोस्टर यातून  ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणिप्र साद ओक यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत सर्व कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांनी एकत्र येत आगळा उत्सव साजरा केला होता. आता चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहिली जात असताना कलाकारांनी चित्रपटाचे विविध पैलू पत्रकारांसमोर उलगडले. निर्माती मंजिरी ओक, अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, राधा सागर आदी उपस्थित होते.

तीन दिग्गजांचे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येणे तर आहेच, पण प्रसाद ओकच्या पंचरंगी भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहेत. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि गायक अशा बहुपेडी भूमिकेत प्रसाद पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यातही त्याची या चित्रपटातील भूमिका आगळी-वेगळी आहे आणि त्याने त्यातील एक गाणेही गायले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून हा नवा चित्रपट आहे.

चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडीओजचे असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. पटकथा व संवाद अजय कांबळे यांचे आहेत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 

“आज मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी प्रयोग होत आहेत. कथेच्या बाबतीत हासुद्धा एक तसाच प्रयोग आहे. ही अगली कथा प्रेक्षकांना आनंद देवून जाईल,” असे उद्गार प्रसाद ओक यांनी काढले. स्वप्नील जोशी म्हणाला, “हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो. टीझर, ट्रेलर पाहिल्यावर हे मनोमन पटल्याशिवाय राहत नाही. माझी आणि सोनाली कुलकर्णी यांची अगली केमिस्ट्री आणि प्रसादचे दिग्दर्शन हा बेत फक्कड जमून आला आहे.”

सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “अभिनयाचा कस लावणाऱ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या भूमिका करायला मला आवडत. “सुशीला-सुजीत”माझी भूमिका तशीच आहे. स्वप्नील आणि प्रसादबरोबर पहिल्यांदाच काम करत होते, त्यामुळे हएक्साईटमेंट होतीच. प्रत्यक्षात काम करताना खूपच धमाल आली. कथा, संकल्पना, संवाद त्यांनी निर्मितीमुल्ये या सर्वच बाबतीत चित्रपट वेगळा आहे. मला पूर्ण खात्री आहे, प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल.”

विक्रमी वीजजोडण्यांमुळे महसूलात ५१३७ कोटींनी वाढ

महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीजहानीत घट

पुणे, दि. ०७ एप्रिल २०२५: गेल्या दोन वर्षांत महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांचे अचूक बिलिंग, विविध उपायायोजनांनी वीजहानीमध्ये घट आणि विक्रमी ४ लाख ३४ हजार नवीन वीजजोडण्यांमुळे वार्षिक महसूलात ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. सोबतच चालू वीजबिल वसूलीची वार्षिक कार्यक्षमता १०० टक्क्यांवर नेली आहे. या कामगिरीसोबतच पुणे परिमंडलाने छतावरील सौर प्रकल्पांना गती देत राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅटची स्थापित क्षमता निर्माण केली आहे.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहामध्ये पुणे परिमंडलाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच झाली. तीत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी ग्राहकसेवेसह विविध कामांचा मागील तीन आर्थिक वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, संजीव नेहेते, अनिल घोगरे, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व शीतल निकम (प्रभारी, मानव संसाधन) यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलामध्ये १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन विशेष प्रयत्न व उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याकडून मीटर रीडिंग एजन्सी आणि सर्व कार्यकारी अभियंता, लेखा अधिकाऱ्यांची द्वैमासिक संयुक्त आढावा बैठक घेण्यात येत आहे. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण ०.७३ टक्क्यांनी वाढले आहे. तर सरासरी वीजबिलांच्या प्रमाणात ०.९३ टक्क्यांनी घट झाली आहे. यासोबतच पुणे परिमंडलामध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३४ हजार ८३६ विक्रमी नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांची संख्या ३९ लाख १७ हजार ७०१ झाली असून राज्यात सर्वाधिक आहे. तसेच वीजबिल वसूलीची कार्यक्षमता वाढवून प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील १२४ कोटींची थकबाकी सन २०२४-२५ अखेर ६९ कोटींवर आणली आहे. तर गेल्या दोन वर्षांत ६२ कोटी ४० लाख रुपयांच्या वीजचोरींचा पर्दापाश करण्यात आला आहे.

या सर्व कामगिरीची फलनिष्पत्ती म्हणजे गेल्या दोन वर्षांत वितरण हानीमध्ये ०.३६ टक्के, लघुदाब वीजहानीत ०.९६ टक्के तसेच तांत्रिक व वाणिज्यिक हानीमध्ये ०.३२ टक्के घट झाली आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलाच्या तांत्रिक व वाणिज्यिक हानीचे प्रमाण ७.६९ टक्के आहे. परिणामी महावितरणच्या पुणे परिमंडलाचा वार्षिक महसूल २१ हजार २८० कोटी रुपयांवर गेला असून दोन वर्षांमध्ये त्यात तब्बल ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

यासह पुणे परिमंडलाने सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये भरारी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी एकूण ९ हजार ९७७ ग्राहकांकडे छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता २४९ मेगावॅट होती. यंदा मार्चअखेर २८ हजार ६०४ ग्राहकांकडे ही क्षमता राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅट झाली आहे. राज्यात छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत पुणे परिमंडलाचा सर्वाधिक १५ टक्के वाटा आहे, हे विशेष.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, महावितरणचा आर्थिक डोलारा वीजबिलांच्या वसूलीवरच आहे. ‘दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ आणि ‘वीजबिलांची शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीचे उद्दिष्ट घेऊन गेल्या दोन वर्षांत काम करण्यात आले. त्यास सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुणे परिमंडलाची ही आगेकूच झाली आहे. मात्र वीजक्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही. त्यामुळे या त्रिसूत्रीनुसार पुढेही दैनंदिन कामकाज गतिमान करण्याची सूचना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी यावेळी केली.

झिजीया कर लावून सुरु असलेली लूट थांबवून पेट्रोलचा दर ५१ रुपये तर डिझेलचा ४१ रुपये प्रति लिटर करा: हर्षवर्धन सपकाळ

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलरवर, पण भारतात मात्र अवाजवी कर लावून जनतेची लूट.

सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी.

युपीए सरकार असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले की ट्विट करणारे सेलिब्रिटी आता गप्प का?

मुंबई, दि. ७ एप्रिल २०२५
जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजीया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आकडेवारीसह पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी करता येऊ शकतात हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल ७० रुपये लिटर तर डिझेल ४५ रुपये लिटर होते. मग आता तर क्रूड ऑईल ६५ डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत. युपीए सरकार असताना पेट्रोलवर ९.५६ रुपये तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर (एक्साईज टॅक्स) होता, तो भाजपा सरकारने वाढवत ३२ रुपयांपर्यंत केला, काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना एक्साईज टॅक्स मध्ये आणखी २ रुपयांची वाढ झाली. १ रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता १८ टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे, यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. एलपीजी सिलिंडरसुद्धा ४०० ते ४५० रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलींडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे, ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

रशिया भारताला बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दराने क्रूड ऑईल देते, त्याचा थेट फायदा हा रिलायन्स व नायरा या दोन कंपन्यांना होतो. ह्या दोन कंपन्या सरकारच्या लाडक्या आहेत का? क्रूड ऑईलच्या किमती कमी होत असताना त्याचा फायदा जनतेला न होता ऑईल कपन्यांना होत आहे. स्वस्तातले क्रूड ऑईल घेऊन या कंपन्या युरोपमध्ये विकून नफेखोरी करत आहेत. सर्वसामान्यांना याचा फायदा होण्यापेक्षा सरकार मोठ्या उद्योगपतींना लाभ देत आहे. युपीए सरकार असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले तर ट्विट करणारे अमिताभ बच्चन, अक्षयकुमार सारखे सेलिब्रिटी आणि बाबा रामदेव सारखे स्वयंघोषित संत आता पेट्रोल १०९ रुपयांवर असतानाही गप्प आहेत. तर एलपीजी सिलिंडर १५ रुपयांनी वाढले तर रस्त्यावर उतरणारे आता कोठे गायब झाले? असा प्रश्न करत हा तेलाचा हा जो काळा खेळ सुरु आहे, त्यावर सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : प्रतिनिधी
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. गणपती मंदिरात श्रींच्या आरतीबरोबरच ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रामनवमी निमित्ताने गणपती मंदिरात भगवान प्रभू श्रीरामाचे भव्य आणि आकर्षक शिल्प उभारण्यात आले होते. संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ‘हेल सर्विसेस’चे सहायक संचालक प्रशांत वाडीकर आणि ‘फॅमिली वेल्फेअर’च्या सहायक संचालक डॉ. सुनिता वाडीकर यांच्या हस्ते सकाळी साडेवाजता श्रींची भक्तिभावपूर्वक आरती करण्यात आली तर दुपारी परंपरेनुसार ‘श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून तुळशीबाग राम मंदिर, जोशी राम मंदिर आणि सोमवार पेठ काळाराम मंदिर येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी मानाची ताटे अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला. राम नवमीनिमित्त मंदिरात संपूर्ण शहरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व, विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर:हायकोर्टाचे पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबई-बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने निकाल देताना हे आदेश दिले आहेत.

अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत आज मुंबई हायकोर्टाने आदेश जारी केले आहेत.मुंबई गुन्हे शाखेचे लखमी गौतम यांच्या नेतृत्वात हा तपास केला जाणार आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील ज्या पोलिसांवर आरोप होते, त्या पोलिस अधिकाऱ्यांवर मॅजिस्ट्रेट कोर्टाने एक अहवाल तयार केला होता. त्यात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सरकारने त्यातील एका विशिष्ट भागाला आव्हान दिले होते. मात्र, ते सुद्धा फेटाळून लावण्यात आले आहे. या प्रकरणातील पाच पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश जारी केले आहेत.

मुंबई पोलिस सहआयुक्त गुन्हे यांना या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत याचिका दाखल केली होती. या घटनेबाबत दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांच्या कारवाईवर ठपका ठेवला होता. यावर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली होती.

“रक्तस्राव होत असताना…साडेपाच तास तनिषा भिसेंवर कोणतेही उपचार झाले नाही ” रुपाली चाकणकर म्हणाल्या ..

पुणे-मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकरांनी आज वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली. याबाबत ते म्हणाले, “आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतात. जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत. १५ मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते. रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती. परंतु, ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररित्या रुग्णाची गोपनिय माहिती सोशल मीडियावर मांडल्या. ही माहिती गोपनिय ठेवण्याचा नियम आहे. याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो.”

“रुग्णालायात ९ वाजून १ मिनिटांनी रुग्णाची एन्ट्री आहे. रुग्णाला २ एप्रिलला बोलावलं होतं. पण २८ मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितलं. संबंधित स्टाफला डिलिव्हरीसाठी तयारी करण्यास सांगितलं. त्यानुसार स्टाफने ऑपरेशनचीही तयारी केली. रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होतं. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असंही म्हणाले. मग मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रात्री अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट तुमच्याकडे असलेली औषधं असतील ते घ्या आणि तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करण्यास रुग्णालयाने सांगितलं. या सर्व कालावधित रुग्णाची मानसिकता खचून गेली”, असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.रात्री अडीच वाजता ससून रुग्णालयात नातेवाईकांनी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या काळात रुग्णाची मानसिकता खचली होती, त्यामुळे रुग्ण १५ मिनिटांत बाहेर आला. ते रुग्णालयात कोणालाही भेटले नाहीत. तिथून ते सूर्या रुग्णालयात गेले, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. खचलेली मानसकिता आणि रक्तस्राव यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

एक अहवाल आला, दोन अहवाल बाकी
चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा अहवाल आला आहे. डॉ. राधाकिशन पवार, डॉ. प्रशांत वाडिकर, डॉ. कल्पना कांबळे, डॉ नीना बोऱ्हाडे या सदस्यांनी हा अहवाल सादर केला आहे. दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालयाचा अहवाल यात दिला आहे. हा मृत्यू माता मृत्यू असल्याने यासंदर्भातील सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समितीअंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाबींचा अहवाल अंतिम अहवाल आज सायंकाळी जाहीर होईल. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल उद्या सकाळपर्यंत सादर होईल.