पुणे- घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार घेणाऱ्या फातिमानगर येथील अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा मारला . या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०४/२०२५ रोजी श्रीराम नवमी बंदोबस्ताच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे आदेशाने वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे व अवैध धंद्यांना प्रतिबंध करणेकामी वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे व स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकांना बातमी मिळालेल्या बातमीवरुन स.नं. १७, बालाजी दर्शन, चौथा मजला, प्लॅट नं.४०४, फातिमानगर, वानवडी, पुणे येथुन एक इसम हा त्यांचे ओळखीचे ग्राहकांकडुन रेसकोर्सच्या घोड्यांवर जुगार घेऊन त्याचे काम पाहणारे कामगारांकडुन यांचे करवी भारतात ऑनलाईन रिंगवर जुगार लावुन ते हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी भारतात चालणारे घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार, व पैशाची देवाणा-घेवाण करताना मिळुन आल्याने व ते जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे ताब्यातुन एकुण ५५,०००/-रु.कि.चे जुगाराकरीता वापरलेले मोबाईल व इतर मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. १५६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नमुद आरोपीना भा.न्या.सं. कलम २९ प्रमाणे नोटीस देण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोण हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि-०५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, वानवडी पो.स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व बालाजी वाघमारे या पथकाने केली आहे.
घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार,फातिमानगरमध्ये छापा
देशाला आकार देण्यात अभियंता-वास्तूविशारद यांची भूमिका महत्वपूर्ण: आर्कि. अभय पुरोहित
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पुणे: “बांधकाम क्षेत्रात नवीन पद्धतीचे प्रकल्प स्पर्धात्मक भावनेने उभे रहात आहे. देशाच्या प्रत्येक शहरात पायाभूत सुविधा निर्माण होत असून, त्यामध्ये आर्क्टिकेट बहुमूल्य योगदान देत आहेत. इंजिनिअर आणि आर्क्टिकेट यांची देशाला नवीन आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्कि. अभय पुरोहित यांनी केले.
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे (एईएसए-एसा) आयोजित ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात पुरोहित बोलत होते. एनडीए रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स येथे झालेल्या या सोहळ्यावेळी आर्कि. संजय तासगावकर, ‘एईएसए’चे चेअरमन आर्कि. महेश बांगड, अध्यक्ष आर्कि. राजीव राजे, संयोजक इंजि. पराग लकडे, आर्कि. विश्वास कुलकर्णी, इंजि. जयंत इनामदार आदी उपस्थित होते. प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पै व अशोक बेहेरे यांना ‘एईएसए’चे मानद सदस्यत्व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
आर्कि. अभय पुरोहित म्हणाले, “एखाद्या शहराची, भागाची, देशाची ओळख ही तेथील पायाभूत सुविधा, विकास यावरून होत असते. देश विकासाच्या वाटेवर असताना त्यापद्धतीने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाही, तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित घटकांनी यापुढेही भरीव योगदान देत राहावे. ‘एईएसए’ ही संस्था ५० वर्ष जुनी असून, यामध्ये वेगवेगळे इंजिनिअर्स, आर्किटेक्ट जोडले गेले आहेत. व्यावसायिकांनी एकत्रितपणे चांगले काम केल्यास कोणतेही काम मोठे किंवा छोटे असा भेदभाव राहत नाही. पुढील चार दशकात देश मोठ्या प्रमाणात विकास साधणार आहे. त्याचे साक्षीदार व साथीदार होण्याची संधी आपल्याला आहे.
आर्कि. अंकुर कोठारी यांना ‘रोहन यंग अचिवर्स अवॉर्ड’, फिनिक्स अकीला टॉवरला पुणे शहराबाहेरील ‘नॉन रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. राहुल गोरे (हाउस ऑफ अँम्बी व्हॅली) यांना ‘सिंगल रेसिडेशनशियल प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. ओंकार काळे यांना पुण्यात ‘नॉन रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. रवी कान्हेरे यांना ‘नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चर पुरस्कार’, आर्क्टि. हेमंत महाजन यांना ‘नॉन रेसिडेन्शियल अडॅप्टिव रियूज प्रकल्प पुरस्कार’ व ‘रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार’, पुण्यातील ‘सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार’ आर्कि. दर्शन मेढी, आर्कि. विनोद दुसिया यांना ‘पुणे रेसिडेन्शियल स्टँड अलोन मल्टी टेनिमेंट बिल्डिंग पुरस्कार’, तर आर्कि. सितेश अग्रवाल यांना ‘रेसिडेन्शियल ग्रुप हौसिंग पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अशोक बेहेरे, विनायक पै यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आर्कि. पराग लकडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. आर्कि. आलोका काळे व आर्कि. मनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले. आर्कि. महेश बांगड यांनी आभार मानले.
लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित
लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर, कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर, लेखिका नेहा शितोळे तसेच निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा क्षण लव फिल्म्सच्या मराठी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस माझ्यासाठी अत्यंत जवळचा चित्रपट आहे. भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. प्रेक्षक या कथेशी आणि पात्रांशी कसा संवाद साधतात हे पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.”
निर्माते लव रंजन म्हणाले, “देवमाणूस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला मनापासून दिलेला आदर आहे. त्यातील कला, संगीत आणि कथा सांगण्याची शैली यांचा सन्मान आहे. मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा ओलांडताना, हा केवळ आरंभ नसून दर्जेदार कथा सादर करण्याचा आमचा नवा संकल्प आहे.”
निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, “देवमाणूस हा लव फिल्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन, तसेच महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि संपूर्ण टीमच्या दमदार कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणार आहे. आम्ही या चित्रपटाचा भाग होण्याचा अभिमान बाळगतो आणि २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक चित्रपट देण्याचा आमचा निर्धार ‘देवमाणूस’मधून अधोरेखित होतो.”
लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या वतीने पुण्यात कार्यशाळेचे आयोजन
पुणे-
नीती आयोग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने 9 एप्रिल 2025 रोजी पुण्यात यशदा येथे “भारतामध्ये सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करणे” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे या कार्यशाळेचे उद्घाटन करणार असून यावेळी महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल उपस्थितीत राहणार आहेत.
दिव्यांग, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेता, भारतात सहाय्यक उपकरणे आणि उत्पादनांची आवश्यकता वाढत चालली आहे. ही सहाय्यक उपकरणे आणि उत्पादने या व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता वाढवतात तसेच अधिक समतापूर्ण आणि समावेशक समाजाच्या विकासाला हातभार लावतात. देशातील तंत्रज्ञान विषयक विकास आणि उत्साही स्टार्ट-अप परिसंस्थेत झालेल्या प्रगतीमुळे भारताला केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर इतर देशांच्या गरजा भागविण्यासाठी देखील सहाय्यक तंत्रज्ञान (AT) उत्पादन केंद्र बनण्याची प्रचंड क्षमता आहे.
या कार्यशाळेत सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही कार्यशाळा केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन संस्था आणि सहाय्यक तंत्रज्ञान (AT) उद्योग/स्टार्टअप्स यासारख्या विविध भागधारकांना भारतातील सहाय्यक तंत्रज्ञानाची वर्तमान आणि भविष्यातील परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी तसेच देशात सहाय्यक तंत्रज्ञानाला (AT) प्रोत्साहन देण्यासाठी एक परिसंस्था विकसित करण्यासाठी मिळालेल्या सूचनांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. भारतातील सहाय्यक तंत्रज्ञानाची उपलब्धता सुधारणे, सहाय्यक तंत्रज्ञानातील राज्य उपक्रम, सहाय्यक तंत्रज्ञान उत्पादने आणि जागतिक सहकार्य या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होईल.
कार्यशाळेत होणाऱ्या चर्चा आणि मिळणाऱ्या सूचना भारतात सहाय्यक तंत्रज्ञानासाठी परिसंस्था विकसित करण्यासाठी तसेच ‘विकासात कोणीही मागे राहणार नाही’ या तत्वाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात योगदान देईल.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह ! उद्घाटन संपन्न .
पुणे (दि.०८/०४/२०२५)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक 8 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक समता सप्ताह उपक्रमाचे उद्घाटन येथील सामाजिक न्याय भवनात आज दि.८.०४.२०२५ रोजी श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री.प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दरवर्षी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत अनुसुचित जाती, जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय्य साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम राबविला जातो.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयामार्फत या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समता सप्ताह दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यामध्ये मंगळवार, दि.०८ एप्रिल, २०२५ ते सोमवार, दि.१४ एप्रिल, २०२५ भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका यांचे वाचन करून भारतीय जनतेत संविधाना विषयी जनजागृती निर्माण करणे. बुधवार,दि.०९ एप्रिल, २०२५ सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करणे, जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे, गुरूवार, दि.१० एप्रिल, २०२५ विभागामध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, तसेच सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे, शुक्रवार, दि.११ एप्रिल, २०२५ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे तसेच महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलावून, कार्यक्रमांचे आयोजन करणे, शनिवार, दि.१२ एप्रिल, २०२५ संविधान जागर- भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निमिर्ती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे (किमान ६० ते ९० मि.) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे, रविवार , दि.१३ एप्रिल, २०२५, प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे, तसेच प्रत्येक जिल्हयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करणे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्हयातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे, सोमवार, दि.१४ एप्रिल, २०२५ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे, जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे. तसेच सदर दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र प्रदान करणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग यांनी दिली असून, सदर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माहिती केले आहे.
एमआयडीसीने घेतला अटी शर्तींचा भंग केलेल्या कंपनीकडून भूखंडाचा ताबा
बारामती, दि.८: भाडेपट्टा करारनाम्याने वाटप केलेल्या भूखंडाच्या अनुषंगाने अटी व शर्तींचा भंग केल्याने मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंड परत ताब्यात घेतला आहे.
मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांना महामंडळाने ५ नोव्हेंबर २००९ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे भूखंड वाटप केला होता. महामंडळाच्या भाडेपट्टा करारनामा मधील अटी व शर्ती भंग केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचा करारनामा रद्द करण्याबाबत टर्मिनेशन नोटीस महामंडळाकडून १६ जानेवारी २०२५ अन्वये बजावण्यात आलेली होती. त्यानुसार आज (८ एप्रिल) या भूखंडाचा पंचनामा करून महामंडळाने सदर भूखंडाचा रितसर ताबा परत घेतलेला आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन
पुणे, दि. ८: पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून लेखी समस्या मांडता यावी याकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबईमार्फत १५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला येथे सकाळी १० वाजता पुणे शहरासाठी १५ एप्रिल रोजी तर पुणे ग्रामीणसाठी १६ एप्रिल रोजी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी येथे १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वा. जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
या सुनावणीकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून पीडित महिला, तक्रारदार महिलांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.
0000
दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर बड्या अधिकाऱ्याचा पदभार काढला.. महापालिका आरोग्य प्रमुखांवर कारवाई का नाही ?
पुणे- सेवेबद्दल आणि उपचार पद्धतीबाबत ख्यातनाम अशा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासन आणि सरकारी अधिकारी यांच्यातील बेपर्वाई आता तपासण्याची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागातील एका बड्या अधिकाऱ्याकडून आज पदभार काढून घेण्यात आला आहे मात्र दुसरीकडे महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांच्या बेपर्वाई बद्दल महापालिकेचे आरोग्य प्रमुख काय झोपले होते काय ? असा सवाल करत महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांची तातडीने उचलबांगडी झाली पाहिजे अशी मागणी आता करण्यात येऊ लागली आहे.
मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आता आरोग्य विभागात झाडाझडतीला सुरूवात झाली आहे. कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याकडील पदभार काढला आहे.
बबिता कमलापुरकर यांच्याकडे होता कुटुंब कल्याणचा अतिरीक्त पदभार होता. कुटुंब कल्याण विभागाकडे माता मृत्यु रोखण्याची मुख्य जबाबदारी असते त्यामुळे हा विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. कमलापुरकर यांच्या जागी आता डॅाक्टर संदीप सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमालापुरकर यांच्याकडे आता फक्त पुण्याचा आरोग्य विभागाच्या सहसंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. सांगळे यांच्याकडेही अतिरिक्त पदभार महत्वाच्या पदावर पुर्णवेळ आधिकार्याची नियुक्ती केलेली नाही. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर कमलापुरकर यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाकडुन कारवाईला सुरवात झाल्याची चर्चा आहे.
दिनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा सोमवारी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. बालेवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भिसे कुटुंबियांनी भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे घैसास यांचे लायसन रद्द करण्याची देखील मागणी केली होती.
महागाईने हैराण जनतेचा अंत, हे चोर सरकार पाहत आहे- पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे …
पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या सेसची व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात आज बालगंधर्व चौक येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘निवडणुकीच्या आगोदर केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी करू त्याचप्रमाणे अनेक लोकपयोगी आश्वासने दिली होती. निवडणुक झाल्यानंतर ही सर्व आश्वासने फेल ठरली असून केंद्र सरकार सातत्याने महागाईमध्ये सातत्याने वाढ करून गोरगरीब नागरिकांची हेळसांड करीत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ५०० रूपयात घरगुती गॅस सिलेंडर देणार असे घोषित केले असताना सत्तेत आल्यावर त्यांनी आता पाठ फिरविली आहे ही सामान्य जनतेची फसवणुक व चेष्ठा आहे. जनतेला लालच दाखवून सत्तेत आलेले हे खोटे सरकार आहे. केंद्र व राज्य सरकार निवडणुकीच्या आधी अनेक फसव्या योजना जाहिर करतात व त्या बळावर मते मिळवून निवडणुका जिंकतात. निवडुन आल्यावर दिलेला शब्द पाळत नाही. हे खोटारडे सरकार कराचा बोजा सामन्य जनतेकडून वसूल करतात. हे काँग्रेस पक्ष कदापीही सहन करणार नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार.’’ यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, रफिक शेख, माजी नगरसेकविका लता राजगुरू, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, राजेंद्र शिरसाट, अविनाश साळवे, राज अंबिके, नीता रजपूत, प्राची दुधाने, प्रियंका मधाळे, ॲड. राजश्री अडसूळ, अर्चना शहा, प्रियंका रणपिसे, शिवानी माने, शारदा वीर, रेखा जैन, अंजली सोलापूरे, मंदा जाधव, माया डुरे, स्वाती शिंदे, सीमा सावंत, सुंदर ओव्हाळ, ज्योती चंदेवळ, अनिता धिमधिमे, यशराज पारखी, गुलाम खान, मुन्ना खंडेलवाल, प्रकाश पवार, अविनाश अडसूळ, जयसिंग भोसले, समीर गांधी, अक्षय जैन, संदिप मोकाटे, संतोष आरडे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, राजू ठोंबरे, रमेश सकट, हेमंत राजभोज, अक्षय माने, सचिन दुर्गोडे, किशोर मारणे, राजेश मोहिते, राजाभाऊ कदम, लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते.
पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण
२१ ते २४ एप्रिल दरम्यान ‘चित्रपताका’ नावाने होणार महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण
मुंबई दि.८: ‘मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव ‘चित्रपताका’ असे ठेवण्यात आले आहे. त्याचेच प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला, हातात पताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात आहे’ अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते.
२१ ते २४ एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे ‘ चित्रपताका ‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच ‘चित्रपताका’ ही संकल्पना या महोत्सवामागे आहे. प्रेक्षक आणि मराठी सिनेमा घडवणारे लेखक, दिग्दर्शक, निर्माते,सर्व चित्रकर्मी अशा घटकांचा हा महोत्सव असणार आहे’ असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
या चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये पूर्ण लांबीचे सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण विषयक, स्त्री जीवना विषयक प्रश्न मांडणारे चित्रपट, बालचित्रपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. सिने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, मराठी चित्रपटांविषयीचे प्रदर्शनही या महोत्सवात असणार आहे. पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, सुबोध भावे, अलका कुबल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर महोत्सवास उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. नवे आणि जुने चित्रकर्मी, उत्तम प्रेक्षक यांना एकत्र आणणारा, मराठी चित्रसृष्टीचा हा चार दिवसांचा सोहळा असणार आहे.
‘चित्रपताका’च्या माध्यमातून मराठी सिनेमा साता समुद्रपार पोहोचावा, आणि ही घौडदौड यापुढेही अशीच सुरू राहावी, हीच या महोत्सवामागील प्रेरणा आहे. हा महोत्सव विनामूल्य असून ऑनलाईन वा प्रत्यक्ष कला अकादमी येथे येऊन महोत्सवासाठी नावनोंद करणे गरजेचे आहे. सर्व मराठी चित्रपट रसिकांना या महोत्सवाला हजेरी लावण्याचे आवाहन ह्या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचार:निदर्शकांनी दगडफेक केली, वाहने जाळली; पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये मंगळवारी वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार उसळला. निदर्शकांनी अनेक वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. निदर्शकांशी झालेल्या संघर्षात अनेक पोलिस जखमी झाले.
मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम संघटना निदर्शने करत होत्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.
VIDEO | West Bengal: People hold protest against Waqf (Amendment) law in Jangipur, Murshidabad. Protest turned violent as they allegedly vandalised a police vehicle and set it on fire.
— Press Trust of India (@PTI_News) April 8, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz pic.twitter.com/GUu0RsrQQo
जमाव हिंसक झाला. लोकांनी पोलिसांच्या गाड्या आणि इतर वाहनांना आग लावली. यानंतर घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वास्तविक, वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेने २ एप्रिल रोजी आणि राज्यसभेने ३ एप्रिल रोजी मंजूर केले. १२ एप्रिल रोजी उशिरा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला मान्यता दिली आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले. सरकारने नवीन कायद्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली होती.
नवीन कायद्याबाबत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात १२ याचिका दाखल झाल्या आहेत. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ११ एप्रिलपासून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, या कायद्याचा उद्देश वक्फ मालमत्तेमध्ये भेदभाव, गैरवापर आणि अतिक्रमण रोखणे आहे. राज्यसभेत १२८ सदस्यांनी या विधेयकाला (आता कायदा आहे) पाठिंबा दिला, तर ९५ सदस्यांनी विरोध केला. हे विधेयक २ एप्रिल रोजी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. या काळात २८८ खासदारांनी समर्थनात मतदान केले, तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले.
वक्फ कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ११ याचिका दाखल
नवीन वक्फ कायद्याच्या घटनात्मकतेविरुद्ध जमियत उलेमा-ए-हिंद व्यतिरिक्त ७ एप्रिलपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ११ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. जमियत उलेमा-ए-हिंदने म्हटले आहे की, आमच्या राज्य युनिट्स देखील या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देतील.
याचिकांवरील सुनावणीबाबत, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, नवीन वक्फ कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची यादी करण्याचा म्हणजेच सुनावणी करण्याचा निर्णय ते घेतील. जमियत उलेमा-ए-हिंदचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली होती.
यावर सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले- तुम्ही वकिलांना आम्हाला मेल किंवा पत्र पाठवायला सांगा. यावर सिब्बल म्हणाले की, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खरं तर, सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीसाठी तोंडी उल्लेख करण्याची म्हणजेच तोंडी अपील करण्याची पद्धत रद्द करण्यात आली आहे. सिब्बल यांच्यानंतर, सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले- ठीक आहे, आपण पत्रे आणि मेल पाहू. यावर निर्णय घेतला जाईल. आम्ही त्यांची यादी करू.
तृप्ती भोईर, आदिनाथ कोठारे, तर ऋषीकेश जोशी, दिपक करंजीकर प्रमोद पवार यांचा मराठी चित्रपट अनुदान शिफारस समितीत समावेश
मुंबई- मराठी चित्रपटासाठी अनुदान देणारी शिफारस समिती गठीत करण्यात आली असून त्यात पाच अशासकीय सदस्यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक कला व क्रीडा व्यक्तीच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट /माहितीपट /लघुपट या अनुदान देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने छाननी समिती गठीत केली असून “छाननी समिती”मध्ये प्रमोद पवार, श्रीमती तृप्ती भोईर, आदिनाथ कोठारे, तर ऋषीकेश जोशी, दिपक करंजीकर यांची “निवड समिती”मध्ये अशासकीय सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे
थॅलेसेमिया मुक्त भारतासाठीसर्वंकष, संघटित प्रयत्नाचा पुण्यात निर्धार
पुणे
थॅलेसेमिया या रक्ताच्या गंभीर आजारावर रुग्णांचे उपचार व्यवस्थापन, वाहक शोध आणि समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्या वतीने संयुक्त प्रयत्न केले जाणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला.
पुण्यातील ‘सेवा भवन’ येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमासंबंधीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, ‘जनकल्याण समिती‘चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. थॅलेसेमिया या समस्येच्या संदर्भात काम करणारी रक्त केंद्र आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचे सुसूत्रिकरण ‘जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्यातर्फे केले जाणार आहे.
जेव्हा सामूहिक व प्रभावी प्रयत्न होतात तेव्हा वैद्यक क्षेत्रासमोर येणाऱ्या नित्य नवीन आव्हानांवर मात करता येते, असे पूर्वीचा इतिहास सांगतो. अशाच पद्धतीचे प्रयत्न सर्वांनी मिळून आणि सर्वंकष पद्धतीने आपण केले तर आपण याही आव्हानावर मात करून थॅलेसेमिया मुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.
रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या समस्येच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार प्रतिनिधींसमोर मांडला. डॉ. चिन्मय उमरजी यांनी आजाराची शास्त्रीय माहिती आणि सध्याचे प्रचलित व्यवस्थापन याची माहिती दिली. थॅलेसेमिया सोसायटी पुण्याच्या अध्यक्ष डॉ. नीता मुन्शी आणि राज्य रक्त संक्रमण परिषद, सहाय्यक संचालक, डॉ. महेंद्र केंद्रे यांनी थॅलेसेमिया आजार आणि त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन केले.
थॅलेसेमिया रुग्णांचे व्यवस्थापन या विषयावर संभाजीनगरच्या डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि डॉ. लिझा बलसारा यांनी थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी थॅलेसेमिया तपासणी या विषयावर डॉ. अतुल कुलकर्णी आणि डॉ. अमर सातपुते यांनी तसेच थॅलेसेमिया विषयाचे व्यापक समाज प्रबोधन या विषयावर प्रदीप पराडकर आणि डॉ. आशुतोष काळे यांनी
चर्चा समन्वयन केले.
थॅलेसेमिया हा रक्ताचा एक अनुवांशिक आणि अतिशय गंभीर आजार आहे. वाहक पती-पत्नी एकत्र आले तर मुलांना हा आजार होतो. या आजारावर आज किफायतशीर उपचार नसल्यामुळे ठराविक कालावधीनंतर वारंवार त्यांना रक्त द्यावे लागते. या आजाराबाबतचा सर्वंकष विचार कार्यशाळेत करण्यात आला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील २४ संस्थांचे तसेच १५ रक्त केंद्रांचे प्रतिनिधी कार्यशाळेत उपस्थित होते. या आजाराच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही कार्यशाळेत करण्यात आला.
अरुण दातेंमुळे तीन पिढ्या भावगीताच्या विश्वात रमल्या – खासदार मेधा कुलकर्णी
‘नवा शुक्रतारा’च्या १०० व्या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद
१०० व्या कार्यक्रमानिमित्त गायक, संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार
पुणे दि. ७ एप्रिल, २०२५ : १९६३ साली शुक्रतारा हे गाणे लिहिले गेले असेल, त्या काळी आमचा जन्मही झाला नव्हता, त्या काळची तरुण पिढी अरुण दातेंची भावगीते ऐकायची, त्यामध्ये रमायची. आम्ही तरुण वयात असताना त्या भावविश्वात आम्हीही रंगलो आता आमची मुले तारुण्यात येत असताना अरुण दाते यांच्या गीतांमधील गोडवा आजही कायम आहे. त्यामुळे अरुण दातेंमुळे तीन पिढ्या या भावगीतांच्या विश्वात रमल्या, अशा भावना खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. ‘शुक्रतारा’, ‘लाजून ते हसणे…’, ‘झोपाळ्या वाचून झुलायचे…’, ‘या जन्मावर…’ अशी कित्येक गाणी आजही रसिकांच्या मनावर गारुड घालत अरुण दाते यांच्या आठवणी जाग्या करतात, असेही त्यांनी नमूद केले.
स्व. अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांच्या ‘नवा शुक्रतारा’ च्या १०० व्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माणिक निर्मित, अतुल अरुण दाते प्रस्तुत आणि मॅजिस्टिक्स लँडमार्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. अतुल अरुण दाते, मॅजिस्टिक्स लँडमार्क्सच्या प्रीती पानसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. १०० व्या ‘नवा शुक्रतारा’ निमित्त आज गायक, संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “शुक्रतारा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरतो कारण त्यातील गाणी पुन्हा पुन्हा ऐकण्याची मागणी ही रसिकांची आहे. यामध्ये गाण्यांच्या चालींचे. पाडगांवकरांच्या गीतांचे आणि अरुण दाते यांच्या आवाजाचे महात्म्य आहे, असे मला वाटते. आज आपण यु ट्यूबवर अनेकदा गाणी ऐकतो, अगदी पुन्हा पुन्हा ऐकतो. पण, ती मजा येत नाही. अशा कार्यक्रमांमधील मजा इथेच लाईव्ह ऐकण्यात आहे. कार्यक्रमामध्ये आपण गायक, कलाकारांचे सादरीकरण पाहतो, दाद देतो, वन्स मोर देतो, कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने मित्र मंडळी, कुटुंबियांसोबत मजा घेतो. त्यामुळे असे कार्यक्रम हे होत रहायला हवे असे मला वाटते.”
अरुण दाते मला मुलगी मानायचे. त्यांच्या आवाजात जेवढा गोडवा होता तेवढाच गोडवा त्यांच्या स्वभावातही होता. त्यांचे वागणे देखील खूप छान असायचे. आज नवा शुक्रताराचे प्रयोग पाहताना अरुण दाते यांच्या आवाजाची, गाण्याच्या गोडव्याची प्रचीती येते, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
बाबांनी शुक्रताराचे तब्बल पावणे तीन हजार कार्यक्रम केले. ‘नवा शुक्रतारा’ हा त्यांच्या याच कार्यक्रमांपुढील १०० कार्यक्रमांचा भाग आहे असे मी मानतो. ‘नवा शुक्रतारा’चा पहिला प्रयोग पुण्यात झाला, १०० वा प्रयोगही पुण्यात होतोय आणि २०० वा प्रयोगही आपण पुण्यातच करू असा विश्वास यावेळी अतुल अरुण दाते यांनी व्यक्त केला.
मी भावगीत गायकाचा मुलगा असलो, तरी सर्व प्रकारचे संगीत ऐकतो. फक्त भावगीतच ऐकले पाहिजे असे कधीच मनात आले नाही. मी पाकिस्तानी कलाकारांची गाणीही ऐकली आहेत. मात्र मराठी भावसंगीत टिकावे म्हणून काम करायचे असे मी ठरविले होते, त्यामुळे याच क्षेत्रात कार्यरत आहे, असेही दाते यांनी नमूद केले.
अरुण दाते जरी हिंदू होते तरी त्यांनी गायकीमध्ये कधीच धर्म आणला नाही. ते मेहेंदी हसन आणि मायकल जॅक्सन दोघांचे ही संगीत ऐकायचे अशी आठवण अतुल दाते यांनी सांगितली.
२०१६ पासून ‘नवा शुक्रतारा सुरु झाला तेव्हापासून मी त्याचा भाग आहे. कार्यक्रमांच्या गर्दीत आपला स्वत:चा एक वेगळा कार्यक्रम असावा याचे समाधान मला या कार्यक्रमाने दिले. माझा हा ८५ वा सोलो शुक्रतारा कार्यक्रम असल्याचा मला आनंद आहे असे सांगत मंदार आपटे म्हणाले, “९९ व्या कार्यक्रमावेळी मी अंतर्मुख होतो, आपण कुठे बसलो आहोत, इथे बसण्याची आपली पात्रता आहे का? हे विचार सातत्याने माझ्या मनात येत होते. १९९६ साली कोल्हापूर ला असताना एका प्रेक्षकाने तिकीट रद्द केले म्हणून अरुण दाते यांच्या शुक्रताराचा कार्यक्रम मी मागच्या रांगेत बसून पाहिला होता. आज मी दाते कुटुंबातील एक भाग आहे हे माझे भाग्य आहे, असे मी समजतो.”
‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम करताना माझ्या आवाजात प्रेक्षकांनी अरुण दातेंचा आवाज शोधू नये असे मी कायम सांगतो, आपण शुक्रतारा नाही आपण केवळ या कार्यक्रमाद्वारे त्यातली गाणी लोकांसमोर नेत आहोत याची मला जाणीव आहे. अरुण दाते यांचा आवाज एकमेव आहे, अरुण दाते हेच एकमेव ‘शुक्रतारा’ आहेत असे मंदार आपटे म्हणाले. मी फक्त अरुण दाते यांनी गायलेली उत्तम गाणी, उत्तम शब्द, उत्तम संगीत हे रसिकांसमोर सादर करतो कारण संगीत हा माझा आनंद आहे. संगीत हे व्यावसायिकतेपेक्षा जास्त माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे असेही आपटे यांनी नमूद केले.
‘नवा शुक्रतारा’च्या १०० व्या कार्यक्रमानिमित्त सहभागी कलाकारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये गायिका पल्लवी पारगांवकर, वर्षा जोशी यांसोबतच प्रसन्ना बाम, अमित कुंटे, अभय इंगळे, प्रणव हरिदास, झंकार कानडे, अमेय ठाकुरदेसाई, प्रशांत कांबळे, सायली सोनटक्के, शुभंकर कुलकर्णी, तुषार जोशी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम जय राम जय जय राम या अरुण दाते यांनी गायलेल्या एकमेव भजनाने झाली. यानंतर ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला…’, ‘सखी शेजारिणी तू हसत रहा…’, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे…’, ‘दिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे…’ ही गीते सादर झाली. कार्यक्रमाची संकल्पना अतुल अरुण दाते यांची होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती जोशी यांनी केले.
भारतीय सिनेसृष्टीत नवा अध्याय: एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्स एकत्र
दिग्गज एकत्र! एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्सचा मोठा प्रकल्प
एटली, अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्सचा महत्त्वाचा पॅन-इंडिया चित्रपटासाठी ऐतिहासिक संयोग
भारतीय चित्रपट उद्योगात धूम माजवणाऱ्या, दिग्दर्शक एटली, स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख कंपनी कलानिधी मारन यांच्या सन पिक्चर्स यांनी एक ऐतिहासिक पॅन-इंडिया चित्रपटासाठी त्यांच्या बहुप्रतिक्षित सहकार्याची औपचारिक घोषणा केली आहे.
हा अद्याप अनटाइटल्ड फिल्म असलेला चित्रपट तीन जबरदस्त क्रिएटिव्ह ताकतींच्या संयोगाचे प्रतीक आहे — एटली, ज्यांनी जवान, थेरी, बिगिल, मर्सल सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा दिग्दर्शन केला; अल्लू अर्जुन, पुष्पा चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि देशभर पसरलेल्या फॅंडमचे प्रतीक; आणि सन टीव्ही नेटवर्क, जे भारतातील सर्वात प्रभावशाली मीडिया गटांपैकी एक आहे.
सध्यातरी ‘AA22 x A6’ म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट भारतीय भावनांशी संबंधित परंतु जागतिक आकर्षण असलेली कथा, भव्यता, भावना आणि अॅक्शनने भरपूर एक ऐतिहासिक सिनेमॅटिक अनुभव होणार आहे.
हा प्रोजेक्ट या वर्षाच्या अखेरीस फ्लोअरवर जाईल, आणि कास्ट, क्रू आणि रिलीज शेड्यूल संदर्भातील अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल.
अल्लू अर्जुन आणि सन पिक्चर्ससोबतच्या या मोठ्या सहकार्याबद्दल एटली यांनी आपली आनंद व्यक्त करत म्हटले,
“ही ती फिल्म आहे जी मी वर्षानुवर्षे स्वप्न पाहिली होती. या कथेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी मी खूप वेळा शांतपणे मेहनत घेतली आहे. आणि आता अल्लू अर्जुन सरांसारख्या आयकॉन स्टारसोबत, कलानिधी मारन सरांसारख्या दूरदर्शी निर्मात्याच्या नेतृत्वाखाली सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाचे निर्माण करणे — हे माझ्यासाठी स्वप्नाचे सत्य होण्यासारखे आहे. हा चित्रपट आत्म्याने ‘मास’ आहे आणि त्याच्या कथेच्या मांडणीमध्ये जादुई आहे — जे प्रत्येक प्रेक्षकाला स्पर्श करेल आणि मनोरंजन देईल.”
सन पिक्चर्सने या ऐतिहासिक संयोगाबद्दल सांगितले,
“मास स्टोरीटेलर एटली यांच्या भव्य दृष्टिकोन आणि आयकॉनिक अल्लू अर्जुन यांच्या बॉक्स ऑफिसवरील सीमांची ओळख तोडणारी उपस्थिती यासह, सन पिक्चर्सचा हा संयोग एक जादुई अनुभव देणारा ठरेल. हा एक असा प्रोजेक्ट आहे जिथे उद्योगातील सर्वोत्तम लोक एकत्र आले आहेत, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसह, जागतिक स्तरावरही नवे मानक स्थापित करेल.”
