ए . राजा , कानिमोळी , लालूप्रसाद यादव , कलमाडी नंतर आता जयललिता ….
————————————————————-
१९९१ ते १९९६ या कालावधीत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकीर्दीत ज्यांच्याकडे साडेसहासष्ट कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. त्यात २८ किलो सोने, ८९६ किलो चांदी, १० हजारहून अधिक साड्या, ७५० चपलांचे जोड, ९१ महागडी घड्याळे सापडली होती. या बेहिशोबी मालमत्तेबद्दल १९९६ मध्ये तमिळनाडू सरकारच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.मुख्यमंत्रिपदावर असताना (त्यावेळेची किंमत ६६.कोटी ६५ लाख )रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बेंगलोर विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जॉन मायकल डिकुन्हा यांनी दोषी ठरविलेअसून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार असून, आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागेल.
तब्बल १८ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. या निकालामुळे जयललितांचा पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पंरतु तामिळनाडूतील विरोधी पक्ष डीएमकेचे कार्यकर्ते मात्र आनंदला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून राज्यभर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यत आली आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन, त्यांची पुतणी इलावारसी आणि जयललिता यांचा दत्तकपुत्र सुधाकरन यांच्यावरही या प्रकरणात आरोप आहेत. विशेष न्यायाधीश जॉन मायकेल डिकुन्हा यांनी हा निर्णय जाहीर केला.
तमिळनाडूत हा खटला नि:पक्षतेने चालणार नाही ही शक्यता लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने तो चेन्नईहून बंगळुरू येथील विशेष न्यायालयात वर्ग केला होता. कोणाही राजकीय पुढाऱ्याविरुद्ध दीर्घकाळ चाललेला पहिलाच खटला असावा. यादरम्यान देशाने पाच लोकसभा निवडणुका पाहिल्या तर तामिळनाडूने तीन विधानसभा निवडणुकांना तोंड दिले. एवढ्या प्रदीर्घ काळात हा खटला चालविणारे डिकुन्हा हे पाचवे न्यायाधीश आहेत.
निकालामुळे जयललिता यांच्या राजकीय भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी २००१ मध्ये ‘तानसी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात जयललिता यांना दोषी ठरविले होते. तेव्हा दोषी व्यक्तीने मुख्यमंत्रिपदावर राहणे योग्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र पुढे त्या निकालास स्थगिती मिळाली व त्यांचा राजकीय विजनवास टळला होता. (१९९६ मधील फोटो या बातमी साठी वापरला आहे )
बिस साल बाद … २८ किलो सोने, ८९६ किलो चांदी, १० हजारहून अधिक साड्या, ७५० चपलांचे जोड, ९१ महागडी घड्याळांनी नेले कारागृहात ….
अभिनेता मंगेश देसाई ला ‘राजवाडा ‘ भोवला ?
अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर कंपनीच्या दीपक पारखेने मराठी चित्रपट अभिनेते मंगेश देसाई यांचीही सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारखेने निर्माण केलेल्या ‘राजवाडा’ या चित्रपटाचे सहा लाख रुपये मानधन त्याने दिलेच नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (२६ सप्टेंबर) देसाई यांचा जबाब नोंदवला.
मंगेश देसाई ने तक्रार स्वतः हून नोंदविली कि पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदविला गेला याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीसुपर पॉवर कंपनीतील घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी दीपक पारखे याने घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी ‘राजवाडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेते मंगेश देसाई यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटासाठी देसाई यांचे मानधन आठ लाख रुपये ठरले होते. त्यापैकी एक लाख रुपये चेकद्वारे, पन्नास हजार रोख व चाळीस हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले. उर्वरित सहा लाख दहा हजार रुपयाचे चेक त्यांना देण्यात आले आहेत. हा चित्रपट २७ दिवस चित्रीकरण करून पूर्ण करण्यात आला. मात्र त्यांना देण्यात आलेले चेक बाऊंस झाले आहेत. इतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. त्या अनुषंगाने मंगेश देसाई यांचा जबाब नोंदवल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
विधानसभेचे भाजप उमेदवार
(पुणे जिल्हा)
शिरूर : बाबूराव पाचर्णे,
बारामती : बाळासाहेब गावडे,
पुरंदर : संगीता राजे निंबाळकर,
मावळ : आ. संजय भेगडे,
चिंचवड : लक्ष्मण जगताप,
पिंपरी : अमर साबळे,
वडगाव शेरी : जगदीश मुळीक ,
कोथरूड : प्रा. मेधा कुळकर्णी,
खडकवासला : आ. भीमराव तापकीर,
पर्वती : आ. माधुरी मिसळ,
हडपसर : योगेश टिळेकर,
पुणे (कॅन्ट.) : दिलीप कांबळे,
कसबापेठ : आ. गिरीश बापट,
खेड-आळंदी – शरद बुट्टे-पाटील
भोर- शरद ढमाले
(मुंबई व परिसर)
बोईसर : जगदीश धुडी,
नालासोपारा : राजन नाईक,
भिवंडी (ग्रामीण) : सीताराम पाटील,
शहापूर : अशोक एर्नक,
भिवंडी (पूर्व) : संतोष शेट्टी,
मुरबाड : किसन काथोरे,
उल्हासनगर : आ. कुमार इयलानी,
डोंविवली : आ. रवींद्र चव्हाण,
मीरा-भाईंदर : नरेंद्र मेहता,
मुंब्रा-कळवा : अशोक भोईर,
बेलापूर : मंदा म्हात्रे,
बोरीवली : आ. विनोद तावडे,
दहिसर : मनीषा चौधरी,
नागोठाणे : हेमेंद्र मेहता,
मुलुंड : आ. सरदार तारासिंग,
जोगेश्वरी (पूर्व) : उज्ज्वला मोडक,
दिंडोशी : मोहीत कांबोज,
कांदिवली (पूर्व) : अतुल भातखळकर,
चारकोप : आ. योगेश सागर,
मालाड (पश्चिम) : डॉ. राम बारोट,
गोरेगाव : विद्या ठाकूर,
अंधेरी (पश्चिम) : अमित साटम,
अंधेरी (पूर्व) : सुनील यादव,
विलेपार्ले : ऍड. पराग अळवणी,
चांदीवली : सीताराम तिवारी,
घाटकोपर (पश्चिम) : आ. राम कदम,
घाटकोपर (पूर्व) : आ. प्रकाश मेहता,
अणुशक्तीनगर : संदीप आसोलकर,
कुर्ला : विजय कांबळे,
कलिना : अमरजितसिंग,
वांद्रे (पूर्व) : महेश पारकर,
वांद्रे (पश्चिम) : ऍड. आशीष शेलार,
धारावी : दिव्या ढोळे,
सायन-कोळीवाडा : कॅप्टन तमिळ सेल्व्हन,
माहीम : विलास आंबेकर,
वरळी : सुनील राणे,
शिवडी : शलाका साळवी,
भायखळा : मधू चव्हाण,
मलबार हिल : आ. मंगलप्रभात लोढा,
मुंबादेवी : अतुल शाह,
कुलाबा : ऍड. राज पुरोहित,
पनवेल : प्रशांत ठाकूर,
उरण : महेश बैदी,
अलिबाग : राजू साळुंके,
(नाशिक जिल्हा)
नांदगाव : अद्वय हिरे,
मालेगाव (बाह्य) : पवन ठाकरे,
बागलाण : दिलीप बोरसे,
चांदवड : डॉ. राहुल अहेर,
सिन्नर : माणिकराव कोकाटे,
निफाड : भागवत बोरास्ते,
नाशिक (पूर्व), बाळासाहेब सानप,
नाशिक (मध्य) : देवयानी फरांदे,
नाशिक (पश्चिम) : सीमा हिरे,
देवळाली : कॅप्टन कुणाल गायकवाड,
इगतपुरी : परशुराम वाघेरे,
डहाणू : पास्कल धनागरे,
विक्रमगड : आ. विष्णू सावरा,
पालघर : दीपा संके,
(सोलापूर जिल्हा)
मोहोळ : संजय क्षीरसागर,
सोलापूर शहर उत्तर : आ. विजयराव देशमुख,
अक्कलकोट : आ. सिद्धरामप्पा पाटील,
सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख,
कराड दक्षिण : अतुल भोसले,
सातारा : दीपक पवार,
(कोकण)
रत्नागिरी : सुरेंद्र (बाळ) माने,
कणकवली : आ. प्रमोद जठार,
सावंतवाडी : अतुल काळसेकर,
गुहागर : डॉ. विनय नातू,
(कोल्हापूर जिल्हा)
कोल्हापूर दक्षिण : अमर महाडिक,
करवीर : केरबा चौगुले,
कोल्हापूर उत्तर : महेश जाधव,
इचलकरंजी : आ. सुरेश हळवणकर,
(सांगली जिल्हा)
मिरज : सुरेश खाडे,
शिराळा : शिवाजीराव नाईक,
पळूस-कडेगाव : पृथ्वीराज देशमुख,
खानापूर : गोपीचंद पडाळकर,
तासगाव-कवठे महांकाळ : अजित घोरपडे
(मराठवाडा व नगर)
अकोले : अशोक भांगरे,
नेवासा : बाळासाहेब मुरकुटे,
राहुरी : आ. शिवाजीराव कर्डिले,
श्रीगोंदा : आ. बबनराव पाचपुते,
कर्जत जामखेड : आ. प्रा. राम शिंदे,
गेवराई : ऍड. लक्ष्मण पवार,
माजलगाव : आर. टी. देशमुख,
परळी : पंकजा मुंडे- पालवे,
लातूर (ग्रामीण) : रमेश कराड,
लातूर (शहर) : शैलेश लाहोटी,
अहमदपूर : गणेश हाके,
निलंगा : संभाजी पाटील निलंगेकर,
औसा : पाशा पटेल,
तुळजापूर : संजय निंबाळकर,
भोकर : डॉ. माधव किन्हाळकर,
लोहा : मुक्तेश्वर धोंडगे,
नायगाव : राजेश पवार,
मुखेड : गोविंद राठोड,
वसमत : ऍड. शिवाजी जाधव,
हिंगोली : तानाजी मुटकुले,
परभणी : अजय गव्हाणे,
परतूर : बबनराव लोणीकर,
बदनापूर : नारायण कुचे,
सिल्लोड : सुरेश बनकर,
फुलंब्री : हरिभाऊ बागडे,
औरंगाबाद (पश्चिम) : मधुकर सावंत,
गंगापूर : प्रशांत बंब,
वैजापूर : एकनाथ जाधव,
शाहदा : उदयसिंह कचरू पडवी
नंदुरबार : डॉ. विजयकुमार गावित
नवापूर : अनिल मोहन वसावे,
साकरी : मंजुळा गावित,
धुळे शहर : अनिल गोटे,
सिंदखेडा : आ. जयकुमार रावल,
शिरपूर : डॉ. जितेंद्र ठाकूर,
चोपडा : जगन्नाथ बाविस्कर,
रावेर : हरिभाऊ जावळे,
भुसावळ : संजय सावकारे,
जळगाव शहर : राजुमामा भोळे,
जळगाव ग्रामीण : पी. सी. आबा पाटील,
अंमळनेर : अनिल भाईदास पाटील,
एरंडोल : मच्छिंद्र पाटील,
जामनेर : आ. गिरीश महाजन,
मुक्ताईनगर : आ. एकनाथराव खडसे,
मलकापूर : आ. चैनसुख संचेती,
चिखली : सुरेशअप्पा खाबुतारे,
सिंदखेडराजा : डॉ. गणेश मंते,
जळगाव जामोद : आ. डॉ. संजय कुटे,
आकोट : प्रकाश भारसाकळे,
अकोला पश्चिम : आ. गोवर्धन शर्मा,
मूर्तिजापूर : आ. हरीश पिंपळे,
वाशीम : आ. लखन मलिक,
कारंजा : डॉ. राजेंद्र पाटणी,
धामणगाव रेल्वे : अरुण अडसड,
बडनेरा : तुषार भारतीय,
अमरावती : डॉ. सुनील देशमुख,
तिवसा : निवेदिता चौधरी,
दर्यापूर : श्रीकृष्ण बुंदले,
मेळघाट : प्रभुदास भिलावेकर,
मोर्शी : डॉ. अनिल बोंडे,
आर्वी : आ. दादारावजी केचे,
देवळी : सुरेश वाघमारे,
हिंगणघाट : समीर कुणावार,
उमरेड : आ. सुधीर पारवे,
नागपूर (दक्षिण-पश्चिम) आ. देवेंद्र फडणवीस,
नागपूर (पूर्व) : आ. कृष्णा खोपडे,
नागपूर (मध्य) : आ. विकास कुंभारे,
नागपूर (पश्चिम) : आ. सुधाकर देशमुख,
नागपूर (उत्तर) : डॉ. मिलींद माने,
कामठी : आ. चंद्रशेखर बावनकुळे,
तुमसर : चरण वाघमारे,
साकोली : बाळा काशीवार,
अर्जुनी मोरगाव : आ. राजकुमार बडोले,
गोंदिया : विनोद अग्रवाल,
आमगाव : संजय पुरम,
अहेरी : राजे अंबरीश महाराज,
राजुरा : संजय धोटे,
बल्लारपूर : आ. सुधीर मुनगंटीवार,
ब्रह्मपुरी : आ. अतुल देशकर,
चिमूर : कीर्तिकुमार भांगडिया,
यवतमाळ : मदन येरावार,
उमरखेड : राजेंद्र नजरधने,
भाजपची दुसरी यादी –
अक्कलकुआ- विजय पराडके
धुळे ग्रामिण – मनोहर भदाणे
शिर्डी – राजेंद्र पिपाडा
कोपरगाव – स्नेहल कोल्हे
पारनेर – बाबासाहेब रामभाऊ तांबे
अहमदनगर – अभय आगरकर
उदगिर – सुधाकर भालेराव
उमरगा – कैलाश शिंदे
उस्मानाबाद – संजय पाटील-दुधगावकर
बार्शी – राजेंद्र मिरगणे
वाई – पुरुषोत्तम जाधव
दापोली – केदार साठे
सांगली – सुधीर गाडगीळ
नांदेड उत्तर- सुधाकर पांढरे
नांदेड दक्षिण- दिलीप कंदाकृती
नसावंगी- विलास खरात
जालना- अरविंद चव्हाण
औरंगाबाद मध्य- किशनचंद तनवानी
मालेगाव मध्य- हाजी मोहम्मद
कल्याण- यशवंत गवळी
येवला – शिवाजी मानकर
वसई- शेखर धुनी
भिवंडी पश्चिम- महेश चौगुले
कल्याण ग्रामीण- रमेश पाटील
ओवळा-माजिवडा- संजय पांडे
भांडूप पश्चिम- मनोज कोटक
वर्सोवा – भारती लव्हेकर
कर्जत – राजेंद्र येनुकर
महाड – सुधीर महाडिक
जुन्नर – नेताजी डोके
आंबेगाव – जयसिंग येरांडे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
अचलपूर – अशोक बनसोड
वर्धा- पंकज भोयार
कटोल- आशिष देशमुख
सावनेर – सोनबा मुसळे
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण- सुधाकर कोल्हे
रामटेक – माल्लिकार्जुन रेड्डी
भंडारा – रामचंद्र अवसारे
अरमोरी- कृष्णा गजबे
वणी – संजीव रेड्डी
राळेगाव – प्रा. अशोक उके
डिग्रस – अजय दुबे
अरणी – राजू तोडसम
जिंतूर – माणिक मुंडे
मी धंदेवाईक नाही तर पूर्णवेळ स्वयंसेवक- बापट ; कोणाशी लढत नाही,मतदारांच्या हक्कासाठी लढतो – टिळक
पुणे – विद्यमान आमदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा भाजपतर्फे, तर रोहित टिळक यांनी कॉंग्रेसतर्फे कसबा विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बापट म्हणाले , मी धंदेवाईक नाही पूर्णवेळ स्वयंसेवक आहे तर टिळक म्हणाले , कोणाशी लढत देण्यासाठी मी उभा नाही , मी मतदारांचे हक्क मिळवून देणे नागरी समस्या सोडविणे यासाठी लढतो आहे
कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा काढून आज सकाळी बापट यांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी त्यांच्या सोबत गिरिजा बापट, नगरसेवक अशोक येनपुरे, किरण सरदेशपांडे, राजेंद्र येनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर टिळक यांनी केसरीवाडा येथे श्रीगणेशाची आरती करून आणि मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक श्याम मानकर, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, सुधीर काळे, उल्हास भट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी बापट आणि टिळक एकाचवेळी आल्याने त्यांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.
बापट म्हणाले, “”युतीच्या माध्यमातून गेली वीस वर्षे मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. महायुती तुटल्यामुळे मी दु:खी झालो आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. अद्यापही मतदारसंघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत. मी धंदेवाईक नसून पूर्णवेळ स्वयंसेवक आहे. माझी लढत सर्वांबरोबरच आहे. जनता सुज्ञ आहे. मी कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही. जनताच योग्य काय तो निर्णय घेईल.‘‘
तर टिळक म्हणाले, “”गेल्या वेळेस जनतेचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. परंतु गेल्या पाच वर्षांत मी मतदारसंघात काम करीत आहे. राज्यात आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांच्या बळावर मी निवडणूक लढवीत आहे. माझी लढत ही कोणाशी नसून, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी उभा आहे. मतदार योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास मला आहे.‘‘
५ वर्षात केलेल्या कामाचा अहवाल लोकांपुढे ठेवणे माझे कर्तव्य- वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील यांनी प्रकाशित केलेल्या विकासपर्व या पुस्तिकेवर टीका करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले होते, की राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवत असल्याप्रमाणे हा अहवाल छापला आहे. याला प्रत्युत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे विधानसभेचा अध्यक्ष असलो, तरी माझी पहिली जबाबदारी आपल्या मतदारसंघाची होती. त्याचा एकूण गोषवारा लोकांपुढे ठेवणे, हे माझे कर्तव्य आहे. त्यामागे माझी भावना अत्यंत विनम्रपणाची आहे. ज्यांनी मला विश्वासाने व प्रेमाने पाच वेळेस निवडून दिले, त्यांचा विश्वास खरा ठरला की नाही हे जाणण्याचा त्यांना हक्क आहे. त्यामुळे केवळ कर्तव्य भावनेमधून आणि आपल्या भागात काय झाले आहे, काय होणार आहे, हे लोकांना कळण्यासाठीच अहवाल दिला आहे, असे पाटील म्हणाले.
मी नेहमी कामाच्या आधारे जनतेचा कौल मागितला. या पाच वर्षांत अनेक योजना यशस्वी केल्या. शेती, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये केलेल्या कामातून मतदारसंघाचे रूप कसे पालटले आहे, हे दाखविणे हा प्रयत्न विकासपर्व प्रसिद्ध करण्यामागील आहे. जनतेच्या प्रेमाचा उतराई होण्यासाठीच कामाचा अहवाल प्रसिद्ध केला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
त्यामागची भावना ज्यांना समजलेली नाही ते राष्ट्रपती निवडणुकीचा संदर्भ जोडून खिजवत आहेत. यातून ते मतदारांबद्दल अनादर व्यक्त करून राष्ट्रपती पदाचीही अप्रतिष्ठा करत आहेत. ते पुढे म्हणाले, की वास्तविक ही कामे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्यांची केवळ आठवण व्हावी, म्हणून अहवाल सादर केला आहे
भाजपच्या 172 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पुणे- आज भाजपनं 172 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या मध्ये पर्वती – माधुरी मिसाळ , हडपसर -योगेश टिळेकर , पुणे लष्कर – दिलीप कांबळे , खडकवासला – भीमराव तापकीर , कोथरूड – मेधा कुलकर्णी , वडगावशेरी -जगदीश मुळीक , पिंपरी– अमर साबळे , चिंचवड -लक्ष्मण जगताप , मावळ- संजय भेगडे , पुरंदर- संगीताराजे निंबाळकर , बारामती- बाळासाहेब गावडे , शिरूर बाबुराव पाचारणे देण्यात आली आहे या यादीत बबनराव पाचपुते(श्रीगोंदा) , लक्ष्मण जगताप(चिंचवड ) , राम कदम(घाटकोपर -वेस्ट ) या नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे दरम्यान आज आ , गिरीश बापट यांनी आहे कि , आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती चे आशीर्वाद घेऊन मी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील सर्व नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमीच मिळत आला आहे. हे प्रेम असेच मिळत राहणार याबद्दल मला विश्वास आहे.कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासास याही वेळी मी पात्र ठरेन याबद्दल मला अजिबात शंका नाही.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, काँग्रेसचे अभय छाजेड, अपक्ष सचिन तावरे आणि बहुजन समाज पक्षाचे राम पालखे, शिवलाल भोसले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यातील मिसाळ व पालखे यांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला असून, इतर उमेदवारांनी अजून एबी फॉर्म जोडलेले नाहीत. आजपर्यंत ८ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील बहुतेक सर्वांनी एक अपक्ष व एक पक्षाचा असे दोन अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
अँड़ रमेश धर्मावत व आबा वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण ७७ अर्ज नेण्यात आले आहेत.
,
उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे – बाळा नांदगावकर
ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी प्रामाणिक इछ्या आहे .असे झाले तर मला आनंदच होईल उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे हि माझी आणि कार्यकर्त्यांची हि भूमिका आहेच. दोघे भावू समंजस आहेत अशी प्रतिक्रिया म न से आमदार बाळा नांदगावकर यांनी दिल्याने आता खळबळ उडाली आहे
दोघे भावू संपर्कात आहेत पण राजकारणाबद्दल तेच आपसात निर्णय घेतील मी सुरुवातीपासून ठाकरे घराण्याशी प्रामाणिक आणि निष्ठेने राहिलो आहे आणि राहील अगदी कोणी मला मुख्यमंत्रीपद दिले तरी मी ठाकरे घराण्यालाच प्राधान्य देईल मी ते पद स्वीकारणार नाही उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे आहेत असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे
उद्धवराज महाराष्ट्रात येणार काय ? बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार काय ?
मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद केवळ ठाकरे बंधूंमध्ये असून हे बंधू एकत्र येवून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला तर तमाम मराठी माणूस एकत्र येवू शकतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू शकतो असा विश्वास सेना -मनसे च्या अनेक कार्यकर्त्यांना असून गेल्या १८ सप्टेंबरलाच अमित शहा यांनी मांडलेली वेगळी चूल लक्षात घेवून या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी आपापले विचार प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला होता . उद्धव आणि राज यांनी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत आपापला योग्य सहभाग नोंदवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे अशी हि मागणी काहीजणांनी केली आहे , युती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्यानंतर राज्यात लगेचच या नुसार नव्या गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून शिवसेना आणि मनसेचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची जोरदार हवा राजकीय वर्तुळात पसरली आहे. योगायोग म्हणजे गेल्या आठवडाभरात आजारपणाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन वेळा फोनवरून बोलणंही झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज आणि उद्धव यांची युती होणार की नाही याचं उत्तर येणारा काळचं देईल पण या दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू झाल्याची मात्र पक्की बातमी मिळाली आहे.उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची मुंबई वगळता राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मोजक्या लोकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर, मनसेने बहुतेक उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबवले आहे. राज यांनी काल सायंकाळीच 153 जागांवर उमेदवार जाहीर केले. मनसे आज किमान 50-60 जागांवर उमेदवार जाहीर करणार होते मात्र ही यादी थांबविण्यात आल्याचे कळते आहे.उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करीत आहेत. तसेच राज यांच्याशी वारंवार संपर्कात आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत या दोघांत काही चर्चा होऊ शकते. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ 24 तास शिल्लक आहेत. दुसरीकडे, सेना-मनसेत निवडणूकपूर्व युती होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात ते एकमेंकांच्या उमेदवारांना सहकार्य करू शकतात. तसेच निवडणुकीनंतरही ते एकत्र येऊ शकतात. अशी हि शक्यता आहे
नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ”सिद्धांत”
सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश समाजातील लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न मराठीतील एक सिनेनिर्मिती संस्था करत असून त्यांच्या या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांची ही तेवढीच वाहवा मिळत आहे. आजवर शाळा, अनुमती, फॅन्ड्री अशा एकाहून एक सरस कलाकृतीतून तयार करून केवळ मनोरंजनात्मक नव्हे तर सामाजिक संदेश दिणारी सिनेनिर्मिती संस्था म्हणजे ‘नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल’.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी ‘सिद्धांत’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून ‘सिद्धांत’ सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या ‘मामी’ फिल्म फेस्टिवलच्या ‘इंडिया गोल्ड २०१४’ विभागात करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून २१ ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे. नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणिता सारख्या पद्धातीशी मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा ‘सिद्धांत’ सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिने दिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून ‘शाळा’ सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
‘सिद्धांत’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद लिहिले असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
नुकत्याच सोशल साईट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या ‘सिद्धांत’ सिनेमाच्या पोस्टरने मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयरमध्ये ‘टाइमपास’

रविवार या शब्दातच एका अर्थाने टाइमपास हा शब्द दडलेला असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रविवार म्हणजे हक्काची सुट्टी आणि टाइमपास करण्यासाठीचा हक्काचा दिवस. प्रत्येक रविवार हा तसा खासच असतो पण २८ सप्टेंबरचा रविवार हा जरा जास्तच स्पेशल असणार आहे कारण या दिवशी साजरा होणार आहे “वर्ल्ड टाइमपास डे” ज्यासाठी निमित्त असणार आहे यावर्षीचा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट “टाइमपास”. यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत यशाचे सर्व विक्रम मोडणारा आणि नवे विक्रम रचणारा “टाइमपास” हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रविवारी रात्री ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
“आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ”… “चला हवा येऊ द्या”… “नया है वह” सारखे तुफान धमाल संवाद, “मला वेड लागले प्रेमाचे”, “दाटले रेशमी धुके” सारखी रोमॅंटीक गाणी, दगडु-प्राजक्ताची इनोसंट लव्ह स्टोरी , प्राजुच्या वडील लेलेंचा त्याला विरोध, त्यातून येणारी जुदाई , प्रेमाची परिक्षा असा सगळा मसाला या चित्रपटात होता. टाइमपास म्हणून सुरू झालेल्या प्रेमात दगडू सिरीयस होतो आणि त्यातून मिळणा-या आनंदाची आणि दुखःचीही कथा म्हणजे टाइमपास हा चित्रपट. वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवली होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या चित्रपटाचे फॅन बनले होते. चित्रपटाचे संवाद, गाणी सोशल नेटवर्क साइट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. यात दगडूची भूमिका प्रथमेश परबने तर प्राजक्ताची भूमिका केतकी माटेगावकरने साकारली होती. याशिवाय वैभव मांगले, भाऊ कदम, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ सारखे सुपरहीट चित्रपट देणा-या रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.
झी मराठीवरून या चित्रपटाचा आता वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेंव्हा अनेकांनी चित्रपटगृहांत जाऊन तो बघितला होता. याशिवाय हा चित्रपट अनेकवेळा बघणा-या प्रेक्षकांची संख्याही खूप जास्त होती. ज्यांनी तेव्हा बघितला त्यांना अजून एकदा आनंद देण्यासाठी आणि ज्यांना त्यावेळी बघता नाही आला अशा प्रेक्षकांसाठी ही खास मेजवानी असणार आहे. झी मराठीचे प्रेक्षक केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही आहेत. अशा सर्व मराठी प्रेक्षकांसाठी टाइमपासचा टीव्ही प्रिमीयर हा खास नजराणा ठरणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. टाइमपासचा हा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
ॐ कारांनी दुमदुमली पुण्यनगरी

अथर्वशिर्ष व श्रीसुक्ताचे पवित्र शब्द १२३ शाळेतील १३,००० चिमुकल्यां च्या मुखी
· पुण्यातील सारसबागेसमोरील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रसच्या महालक्ष्मी मंदिरा तर्फे १२३ शाळेतील १३,००० विद्यार्थ्यांसाठी अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , शोभा धारिवाल, खासदार अनिल शिरोळे , प्रताप परदेशी,उपस्थित होते.
यावेळी खासदार अनिल शिरोळे म्हणाले “मला अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठणाच्या मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित राहता आले त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठण याचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात फार महत्वाचे स्थान आहे आणि याच्या पठणामुळे विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडण्यास मदत होते.”
१३,००० विद्यार्थ्यांनी केलेल्या पवित्र स्तोत्र पठणांनी पुण्यनगरी अधिकच पावन झाली व भक्ती रसात न्हाऊन निघाली.उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन प्रार्थनेतून भक्ती देवीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने हा धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आला होता. उद्याचे भवितव्य असणार्या या विद्यार्थांना धार्मिक कार्यक्रमात तल्लीन झालेले पाहून उपस्थितांनाही अभिमान वाटला.
श्री गणेश व महालक्ष्मी हे बुद्धी व वैभवाचे दैवत आहेत. असीम बुद्धीमत्ता व वैभव हवे असणार्यानी यांची आराधना करणे अनिवार्य आहे. आज मुलांनी केलेली आराधना भविष्यात नक्कीच त्यांना काहीतरी गोड फळ देईल हे निश्चित. असेही ते म्हणाले
शिवसेनेची पहिली यादी जाहीर
शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. शिवसेनेने माजी महापौर सुनील प्रभु यांच्यासह विद्यमान चार आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.
शिवसेनेचे उमेदवार-
शिवडी – अजय चौधरी
माहिम – सदा सरवणकर
अंधेरी (पूर्व) – रमेश लटके
अंधेरी (पश्चिम) – जयवंत परब
वरळी – सुनील शिंदे
दिंडोशी – सुनिल प्रभु
कांदिवली पूर्व – अमोल कीर्तिकर
गोरेगाव – सुभाष देसाई
वांद्रे पूर्व – बाळा सावंत
जोगेश्वरी – रवींद्र वायकर
दहिसर – विनोद घोसाळकर
धारावी – बाबुराव माने
विलेपार्ले – शशिकांत पाटकर
कल्याण (प.) – विजय साळवी
‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…राज ठाकरे

महाराष्ट्रातील तरुणांना दर्जेदाज शिक्षण मिळायला हवे, पोलिस भरतीत नोकरीसाठी येणाऱ्या लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपन्या बंद करून राज्य सरकारनेच सिक्युरिटी कंपनी काढायला हवी, बिल्डरांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एसआरए योजना सरकारनेच राबवली पाहिजे, गुन्हेगारी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व वाहनांना डिजिटल नंबरप्लेट लावल्या पाहिजेत, मराठी संस्कृतीची १०० मंदिरे उभारली पाहिजेत, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ, तरुणांना रोजगार मिळावे यासाठी रोजगार कार्ड आदी असलेली म न से ची ब्ल्यू प्रिंट राज ठाकरे यांनी सादर केली महाराष्ट्र स्वायत्त करण्याचा, महिलांच्या नावावर घरांची नोंदणी केल्यास करात माफी देण्याचा अशा अनेक विषयांचा समावेश या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…हो, हे शक्य आहे’, अशी ‘कॅचलाइन’ घेऊन मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली असून सुमारे दोन ते अडीच तास या ब्ल्यू प्रिंटचे षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरे यांनी सादरीकरण केले. गेली नऊ वर्षे यासंदर्भात अभ्यास सुरू होता, या आराखड्याची वेबसाइट तयार करण्यात आली असून सुमारे तीन ते साडेतीन लाख शब्दांचा मजूकर त्यावर आहे, अशी माहिती राज यांनी यावेळी दिली.
सायकल रैली वर प्रचार करीत निम्हण यांचा अर्ज दाखल
घटस्थापनेच्या दिवशीच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा व लेक वाचवा चा संदेश देत आ. विनायक निम्हण यांनी पूर्ण मतदार संघात सायकलवऱ फिरून उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे आमदार विनायक निम्हण यांच्या कुटुंबीयांकडे २१ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता असून पन्नासहून अधिक ठिकाणी निम्हण यांच्याकडे १०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. उमेदवारी अर्ज भरताना निम्हण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे
आमदार निम्हण यांच्या नावावर सोळा कोटी रुपयांची मालमत्ता असून यामध्ये २ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर, निम्हण यांच्या पत्नी स्वाती यांच्याकडे ५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ३ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. निम्हण कुटुंबीयांकडे ७१ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या चांदीच्या वस्तू, दागदागिने आहेत. यामध्ये हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. शहर आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी निम्हण कुटुंबीयांकडे १०० हेक्टरहून अधिक जमीन असल्याचे निम्हण यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
१६ मोटारी –
आमदार विनायक निम्हण यांच्याकडे सोळा चारचाकी गाड्या असून यासर्वांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. निम्हण यांच्याकडे ७ हायवा, दोन आयशर, आय १०, टोरँग, डस्टर, होंडा ब्रायो, यासह टाटा टेम्पो आणि एक मर्शिडीज बेंन्स यांचा समावेश आहे. इतक्या गाड्या असतानाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मात्र निम्हण यांनी सायकल रॅली काढून अर्ज भरणे पसंत केले.
श्री जगद्गुरू शंकराचार्य- विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना आणि सरकारी वकीलउज्ज्वल निकम यांच्या हस्ते पूजा संपन्न
दिव्यशक्ती असणारया दुर्गा देवीचे स्वागत आणि पुजा या गोष्टींनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते नवरात्रीच्या महोत्सवाला सुरवात झाली. २५ सप्टेंबर २०१४ ला विविध रंगांची उधळण, दिव्यांची सजावट, प्रवचन या सर्व गोष्टींनी युक्त अशा मंगलमय वातावरणाने सारसबागेजवळील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टचे महालक्ष्मी मंदिर उजळुन निघाले. हजारोंच्या संख्येने भक्त देवीची, सरस्वतीची,महालक्ष्मीची, कालीची पुजा मनोभावाने, प्रेमाने करण्यासाठी एकत्रित आले होते. पार्वतीची पुजा या उत्सवाचा महत्वाचा भाग मानतात, तसेच माता शैलापुरी उजव्या हातात त्रिशुळ धारण आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैलावर विराजमान असते या देवीची पुजा करणे आणि हा उत्सव साजरा करणे हा प्रत्येक भक्ताला खुप मोठा आनंदाचा क्षण होता .
श्री. जगद्गुरू शंकराचार्य- श्री. विद्यानृसिंह भारती, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थित घटस्थापनेचा विधी करण्यात आला. ते म्हणाले, ‘आपल्या आयुष्यात देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि काली यांना खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा विधी करावयास मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि धार्मिक मंदिराची स्थापना केल्याबद्दल मी विश्वकर्मा कुटुंबाचा आभारी आहे.’
संध्याकाळची आरती सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली.श्री. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘या भक्तीपूर्ण उत्सवात सहभागी होताना मला फार आनंद होत आहे. यादेवळात तीन आदिशक्तींचा वास असून त्या तुम्हाला शांती आणि समृद्धी देतील.’
मंदिराच्या सर्व कर्मचारयानी अविरत घेतलेल्या कष्टामुळे मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण होते. तसेच मंदिरात येणारया सर्व भक्तांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या मंदिराच्या सर्व कर्मचारयानी रात्रंदिवस मेहनत घेतली. या मंदिरात सर्व पंथाचे, जाती धर्माचे, भक्त एकत्रित आले त्यामुळे या मंदिरात विविधतेत एकता दिसली.




