Home Blog Page 3670

महाराष्ट्र म्हणजे भारताला समृध्दते कडे नेणारी भूमी -अभिनेता मुकेश तिवारी

0

q
साहित्य -संस्कृती -देशभक्ती अशा सर्वच पातळीवर महाराष्ट्र म्हणजे भारताला मिळालेली एक अमुल्य देणगी आहे जी भारताला समृद्धतेकडे नेत राहील असे प्रतिपादन येथे प्रसिध्द अभिनेता मुकेश तिवारी यांनी केले ऍड.उज्ज्वल निकम हि देखील महाराष्ट्रानेच भारताला दिलेली एक देणगीच आहे आणि त्यांच्या जीवनावरिल मराठी चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले . ‘आदेश – पॉवर ऑफ लॉ ‘ या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तिवारी येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते . हा चित्रपट मराठी त असला तरी नंतर तो तमिळ , तेलगु आणि बंगाली भाषेत हि डब करून प्रसारित केला जाणार आहे असे यावेळी लेखक आणि निर्माते संविधान आंग्रे यांनी सांगितले .
मुकेश तिवारी यावेळी बोलताना पुढे म्हणाले ,”महाराष्ट्राला संतांची भूमी आहे असे म्हटले जाते , येथेच साहित्य आणि संस्कृती या परंपरेचा मूळ स्त्रोत आहे भारतात कुठे हि नाही अशी येथे .चित्रपट आणि नाटक याबाबतची धोरणे राबविली जातात .हिंदी सिनेमाची देखील महाराष्ट्र हीच कर्मभूमी आहे . जुने चित्रपट ,नाटके , संगीत येथे कधी हि कालबाह्य होत नाही . कितीही खडतर अवस्था आली तरी त्यामुळे येथील रंगभूमी जिवंतच राहील रंगभूमी हाच सिनेमा सृस्तीचा आत्मा आहे सध्या शॉर्ट फिल्म मोठ्या संख्येने होत आहेत . फायदा -तोटा याचा विचार न करता चित्रपट -नाटक आणि रंगभूमी वेगाने पुढे जाते आहे येथील रसिकता च त्याला कारणीभूत आहे प्रशिक्षण घेवूनच अभिनय करावा किंवा या सृष्टीत उतरावे असे काही नाही इच्छ्याशक्ती मनापासून आहे तो येथे आज न उद्या यश प्रस्थापित करतोच करतो नाना पाटेकर -कमाल हसन हि उदाहरणे यासाठी देता येतील आज सिनेमा क्षेत्रात हि चांगले परिवर्तन मला जाणवते आहे पूर्वी मराठी सिनेमा २५ लाखात होत आता तो २ करोड च्या पुढे कधी सरकला हे समजले हि नाही प्रत्येकाची इमेज हि आता बदलते पूर्वी चित्रपटात एक -दोन विनोदी कलाकार असत , तसेच खलनायक असत आणि नायक असत , आता जो नायक आहे तोच कॉमेडीयन हि असू शकतो आणि तोच काह्ल्नायक हि असू शकतो लाईफ स्टाईल बदलते आहे तसा सिनेमाही बदलतो आहे आणि पारंपारिक दर्शक हि बदलतो आहे भोजपुरी सिनेमांवर मात्र यावेळी मुकेश तिवारी यांनी टीका केली केवळ आयटम सॉंग साठी पेट्रोल पंप विकून सिनेमा काढणारी प्रवृत्ती किती दिवस तग धरेल असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले ,1993 पासून शासनाचे विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहणाऱ्या उज्व्वल निकम यांनी दहशतवाद्यांविरुद्ध सन 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, कल्याण लोकल रेल्वे बॉम्ब स्फोट खटला, गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बॉम्ब स्फोट खटला व नुकताच हॉटेल ताज, ओबेरॉय येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा पाक अतिरेकी अजमल कसाब यांचा खटला, वेगवेगळे संवेदनशील खटले अतिशय कर्तव्यदक्षपणे हाताळून भारतीय कायद्याचे आणि भारताचे रक्षण करण्याचेच काम केले आहे ऍड. निकम यांनी आतापर्यंत चालविलेल्या विविध खटल्यात एकूण 628 कुख्यात आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा तर 37 गुन्हेगारांना मृत्यू दंडाची शिक्षा झालेली आहे.ऍड. निकम यांनी यापूर्वी देखील एक डिसेंबर 10 ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा बैठकीत “दहशतवाद’ या विषयावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे (पुणे) माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कायदा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉक्‍टरेट ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना वेगवेगळ्या संघटनांमार्फत आतापर्यंत एकूण 65 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आज आपल्यात नसलेल्या देशभक्तांवरील चित्रपटात मला कामे करण्याची संधी मिळाली पण आज हि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या घटनेचे आणि त्याद्वारे भारताचेच प्रामाणिकपणे आणि कौशल्याने रक्षण करणाऱ्या उज्ज्वल निकामांवरील चित्रपटात वकिलाची भूमिका करण्याचे काम मला करण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे . सह निर्माता दिनेश पुजारी , योगेश वणवे यांनी सांगितले कि संविधान आंग्रे यांनी या चित्रपटाच्या निर्मिती साठी काही वर्षे मेहनत घेतली . अशा प्रकारे सरकारी वकिलाच्या जीवनावर येणारा हा पहिलाच चित्रपट आहे दिवाळी पर्यंत तो प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही मोजक्या खटल्यांचा यात समावेश करण्यात आला असून अवास्तववादाला टाळून तो करण्यात येतो आहे त्यामुळे ऐक्शन – थ्रिलर यांचा अति वापर येथे नसेल मात्र केसेस च्या कथानाकाप्रमाणे १ आयटम सॉंग आणि अन्य २ गाणी यात असतील ती अजून चित्रित व्हायची आहेत सुमारे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे . दीपक सवाखंडे या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून सिनेमोटोग्राफी दिलीपकुमार डोंगरे यांची आहे अशोक शिंदे , अनंत जोग ,मिथिला नाईक , हेमंत वनारसे यांच्या यात भूमिका आहेत संविधान आंग्रे हे स्वतः उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारत आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भूमिका प्रथमच पुण्यातील पत्रकार शरद लोणकर साकारीत आहेत

‘टपाल ‘ने पाणावले श्रीदेवी चे डोळे

0

q

q1
‘टपाल ‘ मराठी सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने पती बोनी कपूर आणि मुलगी जान्हवी कपूरसोबत हजेरी लावली . श्रीदेवीने सिनेमाच्या टीमला आपल्या शुभेच्छा दिल्या. हा सिनेमा बघितल्यानंतर तिने ट्विटवरून याची प्रशंसा केली. श्रीदेवीने ट्विट केले, ”आताच ‘टपाल’ हा मराठी सिनेमा पाहिला. खूप दिवसांनंतर डोळ्यांत पाणी आले. प्रत्येकाने बघावा असा हा सिनेमा आहे.”रिलीजपूर्वीच तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटविलेला बहुचर्चित मराठी सिनेमा ‘टपाल’ येत्या 26 सप्टेंबरला राज्यात सर्वत्र रिलीज होतोय.
यावेळी श्रीदेवी आणि जान्हवी नेहमीप्रमाणे ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या. कपूर कुटुंबासह या स्क्रिनिंगला दिग्दर्शक इम्तियाज अली, आर. बाल्की, गौरी शिंदे यांनीसुद्धा हजेरी लावली होती. शिवाय घरोघरी टपाल पोहचवणा-या पोस्ट मास्तरांनीही सिनेमाच्या स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर यांनीही ‘टपाल’ सिनेमा अवश्य पाहा, असे आवाहन केले होते.
लक्षण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात कथा एका छोट्या गावातील पोस्टमन, त्याची पत्नी तुळसा आणि शाळेत जाणा-या रंग्या या मुलाच्या भावविश्वावर आधारित आहे. पूर्वीच्या काळात गावामध्ये शिक्षक, पटवारी, पोस्टमन अशी काही मोजकी मंडळी शिक्षित असायची. त्यामुळे त्यांना गावात मोठा मान असायचा. शिवाय पोस्टमन तर लोंकाचे टपाल घरोघरी पोहोचवायचा. त्यामुळे आपल्या माणसांबद्दल माहिती पुरवाणारा दुवा या भावनेतून पोस्टमनसोबत एक भावनिक नातं तयार व्हायचं. हाच धागा पकडत ‘टपाल’ची कथा गुंफण्यात आली आहे.

मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्यासाठी वापर – पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला

0

q

पुणे शहर कौमी तंजीमच्यावतीने आगामी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी अल्पसंख्यांक समाजासाठी ” अल्पसंख्यांक बांधवांची शक्ती , समानता आणि विकास ” या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .

पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या या चर्चासत्रात पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला , दि. मुस्लिम को- ऑप बँकेचे अध्यक्ष शफी दिल्लीवाले , मौलाना हसन अशरफी ,असिफ पटेल , अस्लम बागवान , दि. मुस्लिम को- ऑप बँकेचे संचालक अब्दुल रौफ चिंधीवाला , युसुफ बागवान , हाजी सईद भाई , छबील पटेल , अब्दुल सत्तार नदाफ , बशीर शेख , अफझल खान , नईम शेख मंडपवाले आदी मान्यवर आणि मुस्लिम समाजातील अनेक सामाजिक संघटनाचे प्रतिंनिधी आणि कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला चर्चासत्रात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , समाजाचा विकास करण्यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला संविधानाने संधी प्राप्त करून दिली आहे . आतापर्यंत मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्यासाठी वापर होताना दिसून येतो . परंतु आपले बहुमोल मताबाबत मुस्लिम समाजाने जागे राहिले पाहिजे . त्यासाठी इस्लामला समजावून घेतला पाहिजे . मुस्लिम समाजाचा विकास होणे गरजेचे आहे , परंतु आपल्यामध्ये सवांदाच्या अभाव असल्यामुळे समाज मागे पडत चालला आहे . राजकारणी मंडळी मुस्लिम समाजाला सत्तेचा वाटा का देत नाही , फक्त मुस्लिम मतांचा वापर होताना दिसत आहे . समाजाने सामाजिक न्यायाकडे वळले पाहिजे , तरच समाजाचा विकास साधला जाईल . मुस्लिम समाजाचा विकास साधणाऱ्याला आपले मत द्या असे आवाहन करण्यात आले .
यावेळी दि. मुस्लिम को- ऑप बँकेचे अध्यक्ष शफी दिल्लीवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , मुस्लिम समाजाने जर ठरवले तर मुस्लिम समाजाचा आमदार होऊ शकतो . परंतु समाजातील व्यक्तीचे ऐकत नाहीत त्यामुळे मुस्लिम समाज सत्तेमध्ये मागे पडत चालला आहे . समाजातील प्रत्येकाने समाजाच्या विकासासाठी वेळ दिला पाहिजे समाजानेसुद्धा आपले पवित्र मतदानाचा हक्क बजावला पाहिजे . समाजाचा , शहराचा , राज्याचा , देशाचा विकास करणाऱ्याला काम करण्याची संधी प्राप्त करून दिली पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर कौमी तंजीमचे अध्यक्ष आरिफ काचवाला, बशीर सय्यद , आरिफ मुल्ला , वाहिद वहाब शेख , अब्दुल रशीद चिंधीवाले , शाहीद पटेल , बशीर ताजमत आदींनी केले होते .

महापुरातून तरली भाजपा -सेना युती ; आता मित्रपक्षांना त्यागाची संधी

0

q

uddhav-amit-shah.शिवसेना व भाजपच्या युतीवर अखेर आज शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे भाजप व शिवसेना नेत्यांत आज दुपारी 12 वाजता मुंबईत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर भाजप-शिवसेनेची युती अभेद्य असल्याची घोषणा विनोद तावडे व संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या बैठकीला महायुतीतील मित्रपक्षांना न बोलावल्यामुळे ते नाराज झाले आहेत. हवे तर आमच्या जागा घ्या पण युती तोडू नका असे म्हणणाऱ्या मित्रापक्षांच्यावर आता परीक्षेची आहे मात्र योग्य जागा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा राजू शेट्टी व महादेव जानकर यांनी दिला आहे.
युतीतील सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला नवा प्रस्ताव दिला. त्यानुसार शिवसेना 150, भाजप 124 तर उर्वरित चार घटकपक्षांना 14 जागा देण्यावर या दोन्ही पक्षांत एकमत झाले. याबाबतची माहिती सायंकाळी मित्रपक्षांतील नेत्यांना दिली जाणार आहे. त्यांच्याकडून संमती मिळाली की महायुतीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भाजप-सेनेतील वाद आता संपला असल्याचे दिसत असले तरी महायुतीतील इतर घटकपक्ष नक्कीच नाराज आहेत. चार घटकपक्षांना मिळून केवळ 14 मिळणार आहे.
गेल्या 25 वर्षापासून युती टिकविण्यासाठी शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, सुभाष देसाई, तर भाजपकडून ओम माथूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते उपस्थित होते.
खासदार राजू शेठ्ठी यांनी या प्रस्तावावर अधिक बोलण्यास नकार दिला. जो काही प्रस्ताव असेल तो आम्हाला सांगितला जाईल त्यानंतर यावर भाष्य करता येईल. मात्र, आम्ही यांचे भांडण मिटावे यासाठी किमान 18 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यापेक्षा कमी जागा घेणे अशक्य असेल.
खासदार रामदास आठवले यांनी सांगितले की, घटकपक्षांना किमान 20-22 जागा मिळाल्या पाहिजेत. यातील आरपीआयला किमान 8-10 जागा दिल्या तरच महायुतीत राहू अन्यथा वेगळा विचार करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असा इशारा आठवले यांनी दिला.

कर्मवीरांनी घडविला महाराष्ट्र -महापौर दत्ता धनकवडे

0

q
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी पदमविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंतीनिमित रयत शिक्षण संस्थेच्यावतीने स्वारगेट जवळील होल्गा चौकात त्यांच्या अर्धपुतळ्यास पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे , विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव ,माजी सचिव डॉ. अरविंद बुरुंगले , संस्थेचे आजीव सदस्य किसन रत्नपारखी , अशोक जगदाळे ,प्रा. संभाजी शिंदे , पांडुरंग गाडेकर , डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पथारी संघटनेचे मनोहर परदेशी , माजी सहसचिव गोपाळ विद्यासागर , साधना मुलींची शाळा मुख्याध्यापिका विद्या पवार , साधना प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय दवडे , के. के . घुले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब गायकवाड , रयत सेवक को ऑप बँकेचे संचालक संजय बांदल , वाघिरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप बनकर , महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब शेंडगे , आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्या मंजुश्री बोबडे , आजीव सेवक पंडितराव जगताप , साधना मुलांची शाळा पर्यवेषक विजय शितोळे , आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आपले विचार माद्ताना सांगितले कि , दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था सुरु केली . आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था गणना होत आहे . शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल चालू आहे . नव्या युगाची आधुनिक माहिती तंत्रज्ञाची कास संस्थेने धरलेली आहे , हि महत्वपूर्ण बाब आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्तविक रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अरविंद बुरुंगले तर मान्यवर पाहुण्याचे स्वागत अड . राम कांडगे , तर आभार विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी मानले . यावेळेस संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुष्पमाला वाहून अभिवादन केले .

खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगणारा लव्ह फॅक्टर लवकरच . . .

0

q .

हल्ली मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत,गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती होते आहे,ज्याला रसिक प्रेक्षक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत,प्रेम या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट गेल्या काही दिवसात आले त्याला युवकांचा भरघोस प्रतिसाद देखील मिळतो आहे.

मुक्ताई फिल्म प्रोडक्शन्स निर्मित,किशोर विभांडिक लिखित-दिग्दर्शित लव्ह फॅक्टर हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.आजची तरुण पिढी खर्या प्रेमाला पोरकी झाली आहे,त्याग म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे त्याग अशी खरी प्रेमाची व्याख्या सांगणारा हा सिनेमा आहे,आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे,केवळ शारीरिक आकर्षण,सौंदर्य यापलीकडे खरं प्रेम आज अभावानेच पाहायला मिळतं,अश्याच विषयावर भाष्य करणारा लव्ह फॅक्टर हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे,या चित्रपटात राजेश शृंगारपुरे प्रथमच रोम्यांटिक भूमिकेत दिसेल त्याच्या सोबत खुशबु तावडे,कुशल बद्रिके इ. कलाकारांची बडी फौज आहे.

प्रेमाची वेगळी व्याख्या सांगणारा “लव्ह फॅक्टर” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन किशोर विभांडिक यांनी संभाळल असून मुकुंद सातव हे निर्माते आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण – मयुरेश जोशी,नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे,कला दिग्दर्शन – नझीर शेख,निर्मिती व्यवस्थापक – अजय सिंग,स्थिर छायाचित्रण – सुमित रांगणेकर यांचे असून गीतकार मंगेश कांगणे यांच्या शब्दरचनेवर चिनार महेश या संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला असून चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे.

निसर्ग कवी प्रा. शंकर वैद्य यांना श्रद्धांजली

0

5639_poetry_2

महाराष्ट्र शासन, कोमसाप आणि अनेक मोठे पुरस्कार मिळवणारे कवी म्हणजे प्रा. शंकर वैद्य. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे नवे लेखक, कवी, विद्यार्थी, रसिकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळालं. उत्तम शिक्षक आणि समीक्षक, ललित लेखक, वक्ते, सूत्रसंचालक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला, अशा बहुआयामी व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली!!

– विधानसभा अध्यक्ष, दिलीप वळसे पाटील

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको म्हणून भाजपची ताणाताणी

0

uddhav-amit-shah
महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आता सुवर्णसंधी आहे, असे बोलले जात असले तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने व मुंबईतील गुजराती समाजालाही शिवसेनेचा मुख्यमंत्री नको असल्याने युतीवर ‘पाणी’ सोडण्याची पूर्ण तयारी भाजपने केल्याचे विश्वसनीय गोटातून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे ​​२५ वर्षांची युती तुटण्याची घडी समीप येत असून आज, मंगळवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जावे, अशी मुंबईतील गुजराती समुदायाची इच्छा नाही. हे पद भाजपकडेच असले पाहिजे, असा आग्रह त्यांनी मोदी व अमित शाह यांच्याकडे धरल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही युतीत तणाव निर्माण केलेला नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
भाजपने रविवारच्या बैठकीत उमेदवारांच्या दोन याद्या सज्ज केल्या. शिवसेना व मित्रपक्षांसह महायुती होईल, असे गृहित धरून एक यादी; तर, शिवसेनेला वगळून दुसरी यादी तयार करण्यात आली आहे. त्यात चार छोट्या मित्रपक्षांना स्थान देण्यात आले आहे. महायुतीतील चारही मित्रपक्ष आपल्यासोबत राहतील, असे भाजपला वाटत आहे.

धर्मसंसदेची विचारधारा उद्ध्वस्त करू-शरद पवार

0

कोल्हापूर – ‘आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केलेली संसद मानतो. मात्र श्रध्दास्थानांबद्दल वाद निर्माण करून माणसामाणसातील अंतर वाढवणाऱ्या धर्मसंसदेचा विचार महाराष्ट्रातील कार्यकर्ता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केला. साईबाबांच्या जन्माचा मुद्दा काढून श्रध्दास्थानांविषयी वाद निर्माण करणारी ही कुठली धर्मसंसद? असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला. त्यांना अधिकार कुणी दलिा हे विचारतानाच, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि शिवाजी महाराजांबाबतही अशाच धर्मसंसदेने काही निर्णय घेतले होते. परंतु राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशी विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी बाेलून दाखवला.कोल्हापुरातील जाहीर सभेत ते बोलत होते.
गांधी मैदानावर झालेल्या विराट सभेमध्ये पवार यांनी आपल्या १८ मिनिटांच्या भाषणामध्ये काही मुलभूत गोष्टी मांडून राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले. ‘लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी अपयश आले तरी धनंजय महाडिक यांना विजयी करून कोल्हापुरकरांनी पुरोगामी विचारांची कास सोडली नाही,’ असे सांगून पवार यांनी काेल्हापूरकरांचे जाहीर आभार मानले. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळेल याची अाम्ही काळजी घेतली. ऊसाला दराची तजवीज केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजदरात कपात केली,’ याची आठवणही पवारांनी करून दलिी. शाहू महाराजांचे विचार पुन्हा मजबूत करण्याची आता वेळ आली आहे. हे राज्य पुन्हा समर्थपणे उभारण्यासाठी, काळ्या आईची सेवा करण्याऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी, तरूणांचे भविष्य फुलवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्ता द्या, असे आवाहनही पवारांनी केले.
सत्ता द्या, सर्वांना आरोग्यविमा
राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आल्यास ६५ वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन, ६० टक्के शेती ठिबक सिंचनखाली आणण्यासाठी ७५ टक्के अनुदान, सर्वांसाठी आरोग्यविमा, इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, अल्पसंख्याकांसाठीच्या आझाद महामंडळाला २००० कोटींचे बजेट करू, राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सिंमेटचे रस्ते आणि गटर्स करू अशी ग्वाही पवार यांनी दिली .
अंबाबाईच्या साक्षीने सांगताे-काेल्हापूरचा टाेल रद्द करताे–
खाेटी अाश्वासने देऊन माेदी सरकार सत्तेवर अाले. मात्र, शंभर िदवसांत त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे ‘अाता माझी सटकली, मला राग येताेय’, असे जनता म्हणत अाहे. पुन्हा सत्ता आल्यास राज्यातील राहलिेले प्रश्न १०० दिवसांत सोडवतो, काेल्हापूरचा टाेलही रद्द करताे, अंबाबाईच्या साक्षीने मी हे सांगताे अाहे,’ अशी घोषणा अजित पवारांनी के
मुंडेंचे काय झाले : भुजबळ
पीयूष गाेयल, गडकरी, जावडेकर अशी केंद्रातील मंत्र्यांची नावं. भाजपच्या कार्यकारिणीतही महाजन, सहस्रबुद्धे आहेत. पाशा पटेल, फुंडकर ही नावे का नाहीत? गोपीनाथ मुंडे यांना कसेतरी मंत्रिपद िदले. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजून कसा आला नाही?’ असा सवाल छगन भुजबळांनी केला.

कोथरूड नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

unnamed

क्रीएटीव्ह फौंडेशन आणि कै.विश्वनाथ भेळके प्रतिष्ठान तर्फे कोथरूड मधील डी.पी.रोड वर
भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो.यावर्षी ही दिनांक २५ सप्टेंबर रोजी
घटस्थापना होणार असून रोज रात्री दांडिया खेळला जाणार आहे.
या वर्षी २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फक्त महिलांसाठी लावणी चा कार्यक्रम यशवंतराव
चव्हाण नाट्यग्रहात होणार असून,३० सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता सप्तरंग महाराष्ट्राचे हा कार्यक्रम
होणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक संदीप खरडेकर आणि विशाल भेलके यांनी सांगितले.
तसेच नवरात्रोत्सवात सामाजिक बांधिलकी च्या जाणीवेतून गरीब डोंगरी शाळा या संस्थेला धान्य
वाटप,तृतीय पंथीयाना साडी वाटप,मोफत आरोग्य शिबीर,अपंग मुलास सायकल वाटप,असे विविध
कार्यक्रम आयोजित केल्याचे ही संदीप खर्डेकर व विशाल भेलके यानी जाहीर केले.तसेच रविवार २८
सप्टेंबर रोजी महिलांची महा-आरती व कोजागिरी पौर्णिमेला दांडिया व दूध वाटप कार्यक्रम होणार
आहेत.सालाबाद प्रमाणे नागरिकांचा या सर्व कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभेल असे संदीप खर्डेकर
यांनी सांगितले.सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी खुले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

युतीच्या भवितव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी घेणार निर्णय

0
Uddhav1विsonia_sharad_pawar_20090928(1)
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला सतत अल्टिमेटम दिल्यानंतरही काँग्रेसने हा विषय रेंगाळत कसा राहील याचीच दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
 भाजप व शिवसेना युतीचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीने टोलवाटोलवी करण्याचा यशस्वी प्रयत्न चालवलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकमेंकांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्यात सुसंवाद असल्याचे नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्याचा फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत अशीच टोलवाटोलवी सुरु राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज चार वाजता मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यात पक्षाच्या विविध नेत्यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे यासाठी पक्षनेतृत्त्वाला साकडे घातले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रफुल्ल पटेलांनी आपण काँग्रेस नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचे इतर नेत्यांना यावेळी सांगितले. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र राहावे, ही आम्हा नेत्यांची प्रामाणिक भावना आहे. पंधरा वर्षापासून आपण एकत्र आहोत. जातीयवादी पक्षांचे मोठे आव्हान असताना या निवडणुकीलाही एकत्रपणेच सामोरे जावे, अशीच भूमिका राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. मात्र, जागावाटपाचा प्रश्न सोडवताना काँग्रेसने सन्मानजनक, सामंजस्यपूर्ण आणि अनुकूल असा प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पटेल यांनी सांगितले की, आमच्या नेत्यांची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतली. दिवस मोजकेच राहिल्याने काँग्रेसने जागावाटपाबाबत व्यावहारिक तोडगा काढवा, अशी बहुतेक नेत्यांनी आशा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमद पटेल यांच्या संपर्कात आहे. त्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी व तोडगा काढावा अशी भूमिका मांडली आहे. आमच्याही नेत्यांचे तेच मत आहे.
याचबरोबर शिवसेना-भाजप महायुतीवर आघाडीतील दोन्ही घटकपक्ष बारीक लक्ष ठेवून आहेत. ही युती फिसकटली तर राज्यात नवीनच राजकीय स्थिती तयार होईल. अशा स्थितीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला आपण सर्वाधिक जागा जिंकू शकतो असा विश्वास वाटतो. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्व ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच ज्या ठिकाणी विरोधक प्रबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती करून एकमेंकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरविले आहे. जेणेकरून आघाडीला चौथ्यांदा सत्ता हस्तगत कशी करता येईल हे पाहायचे हे धोरण ठरल्याने महायुतीचा फैसला झाल्याशिवाय आघाडीच्या जागावाटपाला वेग येणार नाही. तसेच अंतिम निर्णयही होणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्त्वात जागावाटपात जवळपास समझोता झालेला आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 ते 130 जागा देऊ केल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी किमान 134 ते 136 जागांची मागणी करीत आहे. विरोधी पक्षांची महायुती झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला 130 च्या आसपास जागा सोडू शकते. मात्र, युतीचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घ्यायचा नाही हे दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे.